पाप असे का पुण्य ते सारे
सोड असले प्रश्न खुळे रे
घेवून गंध श्वास भर रे
अन आनंदे मस्त जग रे |
फुल कुणाचे प्रश्न असले
सांग कश्यास तुज पडले
रंग देखणे मनी भरले
स्पर्श हळवे तृप्त जाहले
ओठावरती पाऊस पडता
थेंब इवला अमृत होतो
रान हिरवे हाक मारता
जन्म मरणातून सुटतो
शब्द सजती भाव बोलती
नाती जुळती मनी सजती
ओंजळीत या सुख भरती
दे उधळूनी तू त्या जगती
ऐक मनाचे अडल्याविना
जा ओलांडून या दुनियेला
गंध येवू दे तव गाण्याला
राधा भेटते मग कृष्णाला
"आनंदाचे डोही आनंद तरंग "
माणूस नेहमी आनंदाच्या शोधात असतो.घरदार,नोकरी पैसा,गाडी,जमीनजुमला,मूलबाळ यातच खरा आनंद आहे असे त्याला वाटते.परंतु हे सगळे मिळाल्यावरही माणूस अतृप्तच असतो.कारण तो शोधात असतो सच्चिदानंद आणि हा सच्चिदानंद ऐहिक गोष्टींमधून मिळत नाही.त्यासाठी त्याला शिरावे लागते अध्यात्मामध्ये.
अध्यात्म म्हणजे काय?२४ तास पोथ्या-पुराण करणे म्हणजे अध्यात्म नव्हे.अध्यात्म म्हणजे कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही आणि दुसऱ्याच्या मनाचा विचार.भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे
"ममैव अंशो जीवलोके,जीवभूता सनातन:
मानाशाष्ठानी इम्द्रीयांनी ,प्रकृती स्थानिकार्षति /"