पुन्हा रात्र टळून ब्रम्ह मुहूर्त लागला होता.मी उठलो आणि कांबळ पसरून सुखासनात बसलो ,समोरच्या घडल्यात कालच्यासारखेच चार वाजले होते.मी डोळे मिटून घेतले. मन शांत केले. मन एका कृष्णाडोहा सारखे झाले. मनात कालचा अनुभव ताजा होता . आज ही असे काही पुन्हा घडेल का हा विचार मनाला शिवून गेला . मी त्या विचारांशी झगडलो नाही फक्त पाहत गेलो विचार कुठे चालले आहेत . बस. थोड्याच अवधीत सर्व विचार विरून गेले . मन प्रसन्न वाटत होते .मन पुन्हा एका कृष्णडोहा सारखे झाले. फक्त तरंग उठत होते पण काहीच दिसत नव्हते .थोडा वेळ तसाच गेला......
रात्र टळून ब्रम्ह मुहूर्त लागला होता.मी उठलो आणि कांबळ पसरून सुखासनात बसलो ,समोरच्या घडल्यात चार वाजले होते . सुखासनात बसलो असलो तरी पाठीचा कणा मात्र ताठ होता पण बाकी सर्व शरीर हलकं आणि शिथिल होतं. पूर्वी खूप जीवाचे रान करावं लागायचे हे जमावण्यास. नाव इट हॅज बीकम अ सेकंड नेचर ,फार कष्ट पडत नाहीत.
(डिस्क्लेमर : हिमालय, कैलास हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत. सर्वार्थाने उत्तुंग! तिथे अनेक कारणांनी लोक जातात आणि त्या सगळ्यांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. मला हे या जन्मात तरी नक्की झेपणार नाही हे मी पूर्ण ओळखून आहे. पण तयारी करताना तो मानस-प्रवास घडत गेला आणि लिहावंसं वाटलं. कुठे काय घेतलं, काय तयारी केली, मग आपलं माणूस सुखरूप परत येईपर्यंत काय अवस्था झाली या सगळ्याचं हे वर्णन आहे. काही ठिकाणी थोडंफार गमतीचं, कधी तणावाचं, कधी हतबलही वाटणारंही आहे. पण कुणाच्याही श्रद्धा/ धार्मिक भावना यात दुखवायच्या नाहीयेत, आणि कुणाच्याही उत्साहावर विरजण घालयचं नाहिये.