आधीचा भाग खालील लिंकवर वाचता येईल :
https://www.maayboli.com/node/86819
अशा रितीने आम्ही आदिकैलास यात्रेला जाण्यासाठी तयारी सुरु केली. तयारी फार अशी नव्हतीच.थंडी, वारा, पावसासाठी जॅकेटस् घेतली होती. थोडेसे गरम कपडे: मोजे, टोपी ई. कागदपत्रे सगळी तयार करून घेतली होती.
आवश्यक कागदपत्रे म्हणजे :
१.यात्रेचा अर्ज (फोटो सहित)
२. इनर लाईन परमिटसाठी अर्ज ( फोटो सहित)
३.डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट,
४. एक नुकसान भरपाईचा बॉण्ड १०० रु.च्या स्टॅम्प पेपरवर (ह्यात आपण लिहून देतो की जाणीवपूर्वक यात्रा करतोय, काही कमी जास्त झाले तर मीच जबाबदार आहे ई.),
५.पोलीस वेरीफीकेशन- पासपोर्ट असेल तर लागत नाही.
या सगळ्या कागदपत्रांचे फॉरमॅट साईटवर उपलब्ध आहेत. आपण फक्त डाऊनलोड करायचे आणि भरायचे. सगळ्यांची पीडीएफ करुन नेगीजींना पाठवून दिली ईमेल वर. त्यामुळे सगळे काम घर बसल्या झाले. मूळ प्रती आपल्या बरोबर घेऊन जायच्या होत्या.
मला आता चांगलाच उत्साह संचारला होता. एका दिवसात पुऱ्या, पराठे, गुळपापडीची वडी असे काय काय प्रवासासाठी करून घेतले. हो, मुंबई दिल्ली रेलवेचा प्रवासच मुळी २६ तासांचा होता. त्यामुळे बेगमी करून ठेवली.
बॅगा भरून आम्ही बांद्र्याला रेल्वे मधे बसलो तेंव्हा वाटले की फायनली आपण निघालो आहोत; खरंच! दिवसभराच्या धावपळीने दमलो होतोच थोड्याच वेळात झोपी गेलो.
सकाळी जाग आल्यावर लक्षात आले की अजून आजचा दिवस रेल्वेतच घालवायचा आहे. पण सकाळी उठून स्वयंपाक घरात जायचे नाही, कुठल्याही कामाची चिंता नाही ही भावना जास्त सुखावत होती. गेले ८/९ महिने काही ना काही कारणाने दमछाकच चालु होती. मधेमधे सुट्ट्या घेतल्या; त्यांनीही दमवलेच होते. त्यामुळे खूप दिवसांनी एक निवांतपणा मिळाला होता. आजचे नाश्ता आणि जेवण आम्ही बरोबर घेतले होते. त्यामुळे परत पांघरुणात शिरत झोपून गेले. नंतर कधीतरी उशीरा जाग आल्यावर यथावकाश चहा, जेवणे झाली. वेळ मिळणार माहित असल्याने पुस्तक आणले होतेच बरोबर. वाचनाची नुसती चैन केली आज.
रात्री ३ला गाडी निजामुद्दीनला पोहोचली. तिथून आम्हाला पुढची गाडी नवी दिल्ली स्टेशन वरून सकाळी ६.२०ला होती. या दोन स्टेशन मधले अंतर खरेतर २० मिनिटाचे. पण रात्री अपरात्री कुठे टॅक्सी शोधा म्हणून इथूनच ट्रेन चे तिकीट काढले होते. ती ४वाजताची होती. तासभर फलाटावरच थांबलो. ४.३०ला नवी दिल्ली. आता परत २ तासाचे वेटींग होते. पण फलाटावर थांबायला बरे वाटत होते. इथे एक अमृतसरची मुलगी आम्हाला भेटली. ती पण आमच्या सारखीच इंदूरहून येऊन थांबली होती. तिचीही गाडी साधारण आमच्याच वेळेला होती. ती भेटल्यामुळे गप्पांमधे वेळ कसा गेला कळालेच नाही. मधे मधे "अमृतसरलापण शेलींग होत होते का ग?" असे बाळबोध प्रश्ण विचारून माझे भौगोलीक अज्ञान उघड केले. तिचीही करमणूक झाली असावी. तिने मग बातम्यात सांगतात तो अमृतसर जिल्हा की तालुका आहे. मूळ अमृतसर शहर लांब आहे बॉर्डर पासून; अशी माहिती पुरवली.
सकाळी काठगोदामच्या ट्रेन मधे बसलो. ११.३० ला काठगोदामला पोहोचलो सुद्धा.
रस्त्यातील काही फोटो :
हॉटेल बुकिंग आधीच झाले होते. हॉटेलला गेलो, बॅगा टाकल्या आणि आधी आंघोळी उरकल्या. मस्त फ्रेश झालो. लोकल अन्न पदार्थ - काही गरम खाऊया असे ठरले. फार नको होते पण ताजे गरम अन्न खायचे होते. प्रवासात घरून आणलेले पुरले होते.
काठगोदामला २ हॉटेल सत्यार्थ आहेत. त्यापैकी आम्ही थांबलेलो ते स्टेशनपासून लांब होते. एक अगदी स्टेशन समोरच आहे. पण त्याची व्यवस्था तेवडी चांगली नाही असे कळाले. हे बुकिंग सुद्धा नेगींनी करुन ठेवले होते. हॉटेल तसे लॉजिंग स्वरुपाचे होते पण आम्हाला एक रात्रच काढायची होती त्यामुळे चालणारे होते. हॉटेलला रेस्टॉरंट नव्हते म्हणूनच आजुबाजूला काही लोकल अन्नपदार्थ मिळाले तर पहावेत असे वाटले आणि पहाडी उन्हाचे सोनस्नान झाले. तेथील स्टाफही बराच होता. त्यांच्याशी फक्त चेक इन आणि आऊट एव्हढाच काय तो संबंध आला.
काठगोदाम स्टेशन ते बाजार / हलद्वानी असा साधारण ५ किमीचा रस्ता आहे. या रस्त्यावर काय नाही ते विचारा.. कपड्याच्या सगळ्या ब्रांडसची अद्ययावत दुकाने होती. मोठमोठी स्टार हॉटेल्स् होती. आणि आमचे घोडे नेमके तिथेच अडले. लोकल काही खाण्यासाठी इथे रेस्टॉरंटस् अशी फार दिसलीच नाहीत. रस्त्यावर बेलफळ रसाच्या गाड्या अगदी आपल्याकडे उसाच्या रसाच्या असतात तश्या उभ्या होत्या. पण पोटात भुकेचे कावळे ओरडत असताना ही रिस्क नको वाटली. मी पहिल्यांदाच लोकांना बेलफळ रस पिताना पाहिले.
शेेवटी खूप तंगडतोड करून एक पंजाबी रेस्टॉरंट सापडले- "डीपीज नानक". अनेकांनी तिथे हेच रेफर केले. दुपारच्या चांदण्यातली पायपीट कामी आली. जेवण खरच खूप छान होते. अगदी गरम अन्न पटापट आणून दिले. पोटभर जेवून लस्सी कम रोज फ्लेवर घातलेले ताक पिऊन हॉटेलवर आलो आल्या आल्या बिछान्यावर ताणून दिली ते थेट ७ वाजता उठलो. रात्री परत एकदा काठगोदाम स्टेशन च्या दिशेने चक्कर मारली आणि सबवे खाऊन गप झोपी गेलो. उद्या पासून खरी यात्रा सुरू होणार होती. दरम्यान के एम व्ही एन् कडून फोना फोनी झाली होती. उद्या सकाळी ७ ला आमच्या हॉटेल वरूनच पिक अप होता. त्या एक्साईमेंटमधेच झोपी गेलो.
व्वा मस्त. वाचतोय ही मालिका.
व्वा मस्त. वाचतोय ही मालिका.
मुंबई काठगोदाम प्रवास फारच लांबला म्हणायचा.
पुभाप्र..
वाचतेय, छान लिहिताय
वाचतेय, छान लिहिताय
वाचतेय
वाचतेय
वाचतेय…
वाचतेय…
आता खरा प्रवास सुरू.
आता खरा प्रवास सुरू. काठगोदामला केएमव्हीएन मध्ये राहिलो होतो. तिथे जिन्याच्या पायर्यांवर उत्तराखंडातील महत्त्वाच्या जागांची अंतरं लिहीली आहेत. तो फोटो सगळीकडे दिसतो. माझ्याकडे आहे, का ते पाहते.
पुढच्या भागाची वाट पाहते आहे.
छान लिहिलं आहे. लेखमाला
छान लिहिलं आहे. लेखमाला वाचतोय.
तुम्हाला चालेल ना हा फोटो इथे
तुम्हाला चालेल ना हा फोटो इथे ?
.सर्व प्रतिसाद कर्त्यांना
.सर्व प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद!
कारण आता कोणालाही ही जागा पहाता येणार नाही.
अरे वा अनया! फोटो छानच. चालेल काय हो, पळेल
आता काठगोदामला त्यांचे Tourist Rest House नाहीये. त्यामुळेच दुसऱ्या हॉटेलमधे रहावे लागले. रस्ता रुंदीकरणाच्या कामात पाडले गेलेय आणि परत होण्याची शक्यता नाहीये असे सांगत होते. त्यांनाही गैरसोय होतेय खरतर यात्रा सुरु करायला. काढतील काहीतरी मार्ग.
मुंबई दिल्ली आमचा प्रवास खूपच जास्तीचा झाला कारण महिनाभर आधी आरक्षण केले, त्यात जी आधी कंन्फर्म झाली त्याने प्रवास केला. पण राजधानीने गेल्यास १८ तासात दिल्लीला पोहोचतो आपण. दिल्लीला दुपारी १२.३०ला पोहोचतो. मग रात्री ८ची रानीखेत पकडून सकाळे ६ला काठगोदाम असे करता येते. पण याला बरोबर वेळे आधी नियोजन पाहिजे. तसेच दिल्लीत मेट्रोसेवा चांगली आहे. सकाळी ६.१५ला पहिली मेट्रो धावते. जाणकारांनी माहिती द्यावी मेट्रोविषयी.
वाचतोय.
वाचतोय.
अनयाने दिलेला फोटो पाहून स्मरणरंजनात बुडालो आणि आता कोणालाही ही जागा पहाता येणार नाही वाचून चुकचुकायला झाले.
कैलास यात्रेला जाताना तिथे
कैलास यात्रेला जाताना तिथे लंचसाठी थांबलो होतो. तेव्हा इतक्या कठीण यात्रेला जातोय, ह्याचं टेन्शन होतं. परत आल्यावर एका छोटेखानी, हृद्य कार्यक्रमात प्रशस्तीपत्रकं देण्याचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा यात्रा संपल्याची हुरहूर लागली होती. पिंढारीला ट्रेकला जाताना तिथे मुक्काम केला होता. येताना जेवलो होतो
त्या जागेशी माझी अशी जरा भावनिक गुंतवणूक होती.
अरेरे !! तो जिना पाडला का ??
अरेरे !! तो जिना पाडला का ??
कैलास यात्रेला जाताना तिथे लंचसाठी थांबलो होतो. >>>> येस! आणि इथ पासून पुढे मोठी बस सोडून पाय ठेवायला जागा नसलेल्या बसमध्ये बसलो.
आम्ही नैनितालला गेलो होतो तेव्हा दिल्ली काठगोदाम रेल्वेने गेलो होतो. पण येताजाता दोन्हीवेळी रात्रीचा प्रवास असल्याने काही दिसलं नाही बाहेरचं. काठगोदाम स्टेशन एकदम मस्त आहे! सिनेमामध्ये टिपिकल लहान गावातलं स्टेशन दाखवतात तसं. मला आता परत एखाद्या लांब रेल्वे प्रवासाला जायचं आहे. आतातर बरीच अॅप असल्याने आजूबाजूने जाणार्या गाड्या, स्टेशनं वगैरेंची लाईव्ह माहिती मिळते म्हणे.
छान झाला आहे भाग. पुढचेही भरभर लिहा.
आपण इथे कैलास यात्रींचं
आपण इथे कैलास यात्रींचं व्हर्च्युअल गटग सुरू केलं की.
निकु, तुमच्या यात्रेमुळे आणि लेखांमुळे सगळ्यांना काय काय आठवलं बघा. आता थांबते. नाहीतर तुमचा धागा आम्ही हायजॅक करू.
यात्रा/ सहल आयोजकांबरोबर
यात्रा/ सहल आयोजकांबरोबर गेल्याने बरीच मजा हुकते का? तसेच यांचे(gmvnचे) दर ट्विन शेअरिंग असते का? म्हणजे आपल्याबरोबर अजून एक जण हवा?
निकु, तुमच्या यात्रेमुळे आणि
निकु, तुमच्या यात्रेमुळे आणि लेखांमुळे सगळ्यांना काय काय आठवलं बघा. आता थांबते. नाहीतर तुमचा धागा आम्ही हायजॅक करू. >> करा की मग. तुमच्या आठवणींमुळे मलापण मजा येतेय. धाग्यात भरच पडतेय की.
यात्रा/ सहल आयोजकांबरोबर गेल्याने बरीच मजा हुकते का? >> मी के एम व्ही एन कडून गेले आहे. इतरांचा अनुभव नाही.
दर ट्विन शेअरिंग असते का? >> हो धारचुला पर्यंत. पण ग्रुप पैकी इतरही कुणाबरोबर शेअर करु शकता.