वाङ्मयशेती

मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल

Submitted by अभय आर्वीकर on 30 April, 2013 - 06:19

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
ओळख मलाच माझी पटणे कठीण झाले

नाटकी बोलतात साले!

Submitted by अभय आर्वीकर on 25 April, 2013 - 02:05

नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे

मामला तीन पद भूमीचा, तुझ्या सिंगावर घेच तू
त्या बटू वामनाची सत्ता, "अभय" पालटली पाहिजे

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

Submitted by अभय आर्वीकर on 24 March, 2013 - 15:35

                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे

कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे

माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

Submitted by अभय आर्वीकर on 26 February, 2013 - 18:44

माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

नमस्कार मित्रहो,

आज २७ फेब्रुवारी, कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्मदिवस. हाच दिवस "जागतीक मराठी भाषा दिवस" म्हणून पाळला जातो. योगायोगाने आज माझ्याही आंतरजालावर वावरण्याला १२०० दिवस पूर्ण होत आहे.

विषय: 

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 14 February, 2013 - 23:27

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं

गाव ब्रम्हांड माझे (तस्वीर तरही)

Submitted by अभय आर्वीकर on 14 February, 2013 - 11:55

गाव ब्रम्हांड माझे

सांगताना अवेळीच सांगू कसे?
पोळलेल्या मनाचे असे हे हसे!

काल गर्दी किती; रांग होती इथे
आटतांना कुणी सोबतीला नसे

हात घेताच हातात का वाटले?
तप्त अग्नीत जळलेय मोती जसे

शिक्षणाने मिळालाय विश्वास की;
चंद्र तारे अता दूर ना फ़ारसे

पिंजरा तोडुनी मी सिमा लांघल्या
गाव ब्रम्हांड माझे "अभय" छानसे

                               - गंगाधर मुटे
----------------------------------------

गहाणात ७/१२

Submitted by अभय आर्वीकर on 12 February, 2013 - 23:34

गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

अता अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला

'योद्धा शेतकरी' व 'वांगे अमर रहे’ प्रकाशन समारंभ : वृत्तांत

Submitted by अभय आर्वीकर on 25 July, 2012 - 03:14

वांगे अमर रहे - पुस्तक प्रकाशन

Submitted by अभय आर्वीकर on 11 July, 2012 - 02:14

wange amar rahe

२२ जुलैला गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचे प्रकाशन "शरद जोशी" यांच्या हस्ते.

तुला कधी मिशा फुटणार?

Submitted by अभय आर्वीकर on 19 June, 2012 - 11:27

तुला कधी मिशा फुटणार?

पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर

पंचम स्वरात बोलणे तुझे, गैरवाजवी नसेलही
पण; मुजोरीची किंमत काय? पुरेसे नाक कटल्यावर

काही औषध उरले नाही, मित्रा तुझ्या स्वभावाला
मिळणार केव्हा शांती तुला! माझे डोळे मिटल्यावर?

राखेशिवाय दुसरे आता अन्य काय उरले येथे?
अवश्य धावून तू आलास खरा; पण आग विझल्यावर

तुझ्याशी वाद घालणे असा माझा उद्देश नसतोच

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - वाङ्मयशेती