शब्द
शब्द ऐकतो शब्द बोलतो
शब्दांचे वार झेलूनी
शब्दांचेच प्रहार करतो
शब्द कधी गळ्यात पडती
हार होवूनी खोटे सुखवती
स्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती
नफा नुकसान व्यवहार जेव्हा
नजरेसमोर जाणवतो केव्हा
शब्द गिळतो शब्द फिरवीतो
शब्द जोडतो शब्द पेरतो
रूजवूनी त्यांना कागदावर
शब्दांचीच शेती करतो
शब्दांचा आधार बोलण्याला
शब्दच साह्य करी भावनांना
शब्द नसता बोलतो निशब्दांना
- पाषाणभेद
१४/११/२०११
 
  
      
  
  
      
  
  
    उपोद्घात व उपसंहार
काही शब्द आपल्याला त्यांच्या अर्थामुळे तर काही त्यांच्या नादामुळे आवडतात. नादमाधुर्यामुळे मला आवडणारे हे दोन शब्द, उपोदघात व उपसंहार.उपोदघात कादंबरीच्या आधी व उपसंहार कादंबरीच्या नंतर येत असल्यामुळे मला मतितार्थ माहित होता, पण नेमका शब्दश: अर्थ माहित नव्हता. पण काही गोष्टी कशा अकस्मातपणे उलगडत जातात!
 
  
      
  
  
      
  
  
    खुप वर्षांपुर्वी भारताबाहेर स्थायिक झालेल्या माझ्या एका बालमैत्रिणीचा गेल्या आठवड्यात फ़ोन
आला होता, आम्ही प्राथमिक शाळेत एकत्र जात होतो.
तिच्या बोलण्यात असे काहिसे शब्द आले, कि मला एकदम तिच्या आणि माझ्या आईचे बोलणे
आठवले. त्या दोघी बोलताना हे शब्द सर्रास वापरत असत. तिला मी हे सांगितल्यावर म्हणाली,
कि माझ्याशी बोलताना तिला पण तेच दिवस आठवले होते. आणि माझ्याशी मराठीत बोलताना
असे शब्द अगदी अजाणता तिच्या बोलण्यात आले.
आता माझ्या आईच्या बोलण्यातही हे शब्द येत नाहीत. पण ते शब्द, आणि त्यांचे खास उच्चार
माझ्या लख्ख लक्षात आहेत.
सहज आठवले म्हणून नोंदवतोय.
१) अय्या आणि इश्श्य.
 
  
      
  
  
      
  
  
    नमस्कार मित्रहो. इथे काय लिहायच? मराठी भाषेत जे शब्द तुम्हाला कायम बोजड वाटत आले आहेत ते शब्द.
 
  
      
  
  
      
  
  
    ही सारीच पाने आता विलगायची आहेत !
शाखे-शाखेतून कोवळे कोंब बिलगायचे आहेत ...
...
एक काठी !
...
एकच रेघ !
...
इथे असे ..
एक काठी होऊन जीवन
चालूच आहे ..
ते असे निष्पर्ण उरताना
आणि आतून रसरशीत जगत असताना
एक लक्षात येते ..
झाड होणार्याला केवळ एका काठीचे जगणे यायला हवे !
बहरांच्या आधीची केवळ एक निष्पर्ण काठी !
चित्र होणार्याने व्हायला हवे केवळ एक रेघ
अमर्याद शक्यतांची .. एक रेघ केवळ !
आणि
कविता होणार्याने,
असायला हवे शब्द
 
  
      
  
  
      
  
  
    जेथ मी होतो निरुत्तर, शब्द माझे बोलले
वाहत्या आठवांवर मी, शब्द माझे बांधले!
डाक बंगल्यातुन जेव्हा, ‘पुरोगामी’  भीड जागे
एकटे थंडीत तेव्हा, शब्द माझे भुंकले!
छाटल्या लांडग्यांनी जेव्हा, भाडोत्री बैलांच्या जीव्हा
आग पोटातील त्यांच्या, शब्द माझे ओकले!
दांडग्यांनी तोलले अन न्यायदेवतेला धना ने
रुक्मिणीचे तुळशीपत्र मग, शब्द माझे जाहले!