कविता

फार फार वर्षापूर्वी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 July, 2012 - 08:30

फार फार वर्षापूर्वी
या जगात काही
निराळीच माणस होती .
त्या निराळ्यात..
एक वेगळीच ईच्छा होती
एक वेगळीच आस होती
आपल्या उगम पर्यंत पोहचायची
त्यांची तळमळ तीव्र होती
त्यांचे जीवन भेदून ती
शून्या पर्यंत भिडत होती
अंतरात खदखदते पेटलेपण
डोळ्यात सैरभैर वेडेपण
घेवून ती जगत होती
ब्रह्मांडातील कणाकणात
त्याची आच पोहचत होती
त्याची दाहकता अशी होती
की सृष्टीकर्ताही स्तंभित झाला
मनात म्हणाला
कळले रहस्य सृष्टीचे तर
जगणेच संपून जाईन
नकळे त्याला काय सुचले
दुसऱ्या दिवशी पहिले
तर त्या पेटलेल्या माणसांची
होती झाडे झालेली
हिरवीगार तजेलेदार
जणू आपल्या आदिमा
पर्यंत पोहचलेली

गुलमोहर: 

स्वप्नच पहात होतो मी..

Submitted by गणेश सावंत on 27 July, 2012 - 06:37

स्वप्नच पहात होतो मी.. अक्षम्य ,अपराधी ,निरागस
पाहुनाचारासकट अवहेलना होती ती ..
जाणले होते मी तेव्हा, चाहूलच म्हणा ना..
पण वेडावले मन का कुणास जाणे,
त्या क्षितीजामागे सैरावैरा धावू लागले ....
पामरा,किनाऱ्या लगतची दगडे संपून गेली..
सूर्य हि निपजतच खाली सरसावला ....
बोचरा काळोख पुन्हा डोकावू लागला ....
दुनियेची ही कैफियत काही औरच ...
हि जाणीव पूर्वी देखील होती म्हणा ////
स्वार्थ खरच इतका वाईट असतो का हो?
अनंत अमुची ध्येयासक्ती हीच का ती?

होईन पुन्हा कलंदर ,मदमस्तर
सुस्त आणि मस्त ओढून चादर
सरसावूनी ती रेशमी झालर
नाविन्य आणि चैतन्याचे वाहतील पुन्हा झरे..

गुलमोहर: 

ये तूच मग तेथे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 July, 2012 - 14:31

दारात ज्यांच्या धुत्कार गर्जतात
पायरीवरी अन श्वान भुंकतात
स्वामित्व त्या घराचे नकोच केव्हा मला
दरिद्री स्वागताचे अप्रूप असे मला

त्या उभारल्या भिंती भीतीत चिणलेल्या
अन रोखल्या झडपा संदेही आक्रसलेल्या
घेवूनी धानिकतेला काय करावे असल्या
जगणेच शाप त्यांना पदी बांधल्या साखळ्या

दे मोकळे आकाश झोपडी विस्कटलेली
दे स्वतंत्रता हृदयी स्वागता उत्सुकलेली
दे प्रेममयता ती भीती मुळी नसलेली
ये तूच मग तेथे शोधीत जागा आपुली

गुलमोहर: 

किती जरी वाटलं तरी..

Submitted by रसप on 26 July, 2012 - 14:19

किती जरी वाटलं तरी,
चंद्र कधी ओघळत नसतो
तो फक्त मनाचा खेळ असतो
आपणच आवडून घेतलेला...

उगाच वाटतं की -
आत्ताच ओघळलेला एक थेंब..
त्या डावीकडच्या तारकेने झेलला
आणि धरतीच्या संतप्त उरात
पावसाचा पहिला थेंब झिरपल्यावर
तिने एक आश्वस्त उसासा द्यावा,
तशी ती तारका क्षणभर लकाकली...
पण असं काही नसतं...
ती फक्त मनाची कल्पना असते
आपणच आवडून घेतलेली..

उगाच वाटतं की -
बेधुंद चंद्राची शुद्ध हरपली आहे
भोवतालच्या सात-आठ चिमुकल्या तारका
त्याला आधार देत आहेत
आणि तो,
खवळलेल्या सागराने पुन्हा पुन्हा धावून येत
किनाऱ्याला धडकावं... तसा
पुन्हा पुन्हा उफाळून येऊन
सगळ्यांना उधळायला बघतो आहे..

गुलमोहर: 

आता दुकाळ येणार ..माये!!

Submitted by वैवकु on 26 July, 2012 - 03:20

माये येणार येणार आता दुकाळ येणार
तुझ्या लेकराना जिणं पुन्हा नकुसं होणार

कर्जबाजारू नशीब कर म्हणतं पेरणी
गाभ धरणार कशी भेगाळलेली धरणी
माझ्या कष्टाचं बियाणं मी गं कुठं पेरणार
माये येणार येणार आता दुकाळ येणार

तहानल्या दाही दिशा माजलीया आणीबाणी
ऐन श्रावणात आटलंया धरणाचं पाणी
आता माणसातली गं माणुसकी आटणार
माये येणार येणार आता दुकाळ येणार

माझ्या हाकंssला धाव ना आई विठाई पाव ना
बरसव बरसव तुझा पावसाचा पान्हा
भुकेजल्या लेकराना तू गं कधी पाजणार
माये येणार येणार आता दुकाळ येणार
.....
.........

आता दुकाळ येणार माये.... दुकाळ येणार !!

गुलमोहर: 

रेशीमगाठ

Submitted by निंबुडा on 26 July, 2012 - 01:49

तुझा माझा रेशमी बंध..
ती गाठ रेशमीच राहू दे
.
सुती गाठ किती घट्ट बसते माहितीये ना?
सोडवू म्हणता सोडवता येत नाही...
उलट सोडवण्याच्या नादात अजूनच घट्ट होत जाते!
जितकी जास्त आवळली जाते तितके जास्त वळ!
आणि मग ओढाताणीत तुटतेच ती
किंवा दोर कापून टाकावे लागतात...
तरीही उमटलेले वळ स्वतःची खूण सोडतातच मागे..
कधी हुळहुळती... कधी भळभळती!
.
रेशीमगाठीचं तसं नाही!
जितकी अलगद बसते तितकीच अलगद सुटतेही!
आणि सुटतानाही कुठल्याही वळाचा लवलेशही नाही
उलट मऊसुत झुळझुळत्या स्पर्शाची अनुभूती..
.
.
एक मात्र आहे!
वळ दिसत नाहीत म्हणून वेदनांचं अस्तित्त्व मात्र नाकारता येत नाही!

गुलमोहर: 

श्री साईंनाथाय नम:

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 July, 2012 - 05:05

श्री साईंनाथाय नम:

तुझी करुणा दयाघना
ओघळली पुन्हा जीवना
तव प्रीतीची प्रचिती आली
पुन्हा एकदा मना

तू तो माझा तारणहार
सदा संकटी सावरणारा
हात धरुनी हाक मारता
सुखरूप घरी पोहचवणारा

तूच घडविले वाढवले मज
नकळत माझ्या मम दातारा
तव प्रेमाच्या ऋणात राहू दे
हेच मागणे पुन्हा उदारा

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in

गुलमोहर: 

.. नाही जमले तुला..!

Submitted by रसप on 25 July, 2012 - 03:53

टपटपत्या पानांना पाहुन ताल मोजला कधी
दरवळत्या झुळुकीला ओढुन श्वास भारला कधी
कधी कधी मेघांना फुटले पंखच दिसले तुला
तुझ्या मनाला समजुन घेणे नाही जमले तुला

सागरतीरी वाळूवरती नाव कोरले कधी
लाटांनी पुसले जाता नि:श्वास सोडले कधी
पुन्हा नव्याश्या व्याकुळतेने कधी व्यापले तुला
जुने नको ते विसरुन जाणे नाही जमले तुला

दिलास खांदा रडण्याला दु:खी मित्राला कधी
टिपले डोळ्यातील कुणाच्या तू मोत्याला कधी
किंचितसेही खरचटल्यावर किती डाचले तुला
पिऊन अश्रू जखम फुलवणे नाही जमले तुला

पुढे निघाले येउन कोणी पाठीमागुन कधी
तुला पाहुनी शिकले अन गेले ओलांडुन कधी
तू दैवाला दोष दिला अन दैवच नडले तुला

गुलमोहर: 

प्रवाह....

Submitted by बागेश्री on 25 July, 2012 - 03:46

कधी कधी आयुष्य,
साचून राहिल्यासरखं वाटतं!
सगळे मु़ख्य प्रश्न
एकाच पदावर जाऊन बसलेले,
अनुत्तराच्या!

वेळेने तरी किती कळ सोसावी?

शेवटी,
आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ,
आपलेच दोन घाव आणि
साचलेल्या आयुष्याला नवी वाट,
नवा प्रवाह!!

मोकळ्या झालेल्या त्याच खळग्यात,
सार्‍या किचकट प्रश्नांना टाकून, मुठमाती दिलेली,
कायमचीच!

आता, नव्या प्रवाहाचा उन्माद, त्याचा खळाळ,
सुगंधी.... वेडावणारा!

गुलमोहर: 

मन श्रावणी श्रावणी..!

Submitted by प्राजु on 25 July, 2012 - 02:36

ऊन्ह श्रावणी नभाचे, अंग ओले सोनसळी
हळदीचा माखलेला, साज ल्याली फ़ूल कळी

आला हिरवा शिरवा, भिजे शहारूनी माती
विरताना धुक्यातूनी, निखळला ओला मोती

ऊन पावसाची प्रिती, छंद श्रावणास जुना
सात रंगात शोधतो, मिलनाच्या खाणाखुणा

सडा प्राजक्ताचा दारी, मोती पोवळ्याची रास
क्षण भंगूर आयुष्य, परी गंधण्याचा ध्यास

अंग वेलीचे ओलेते, निरखून आईन्यात
लाजे नवरीच्या परी, हसे बघून पाण्यात

असे श्रावणाला पिसे, गंधाळल्या ताटव्यांचे
हातावर रंगलेल्या, मेंदीच्या गं आठवांचे

सख्या श्रावणाची ओढ, मन झिंगून झिंगून
तृषा युगांची शमूनी, सुख आले ओथंबून

अशी सोवळी ओलेती, ऊन-पावसाची लेणी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता