आज पक्षांना राहायला झाडेच उरली नाहीत. कसे जगायचे त्यांनी???
स्वातंत्र्य
दार उघडे पाहून पिंजर्याचे पाखरू हळूच बाहेर आले
पंख फडफडवले मजेने
मोठ्ठा श्वास घेऊन, शीळ घालत पाहिले इकडे तिकडे
घराच्या भिंती आज भासल्या नव्याच
त्या ओलांडून घ्यायची होती त्याला,
भरारी निळ्या आकाशात...
टुन टुन उड्या मारत सरकले ते गॅलरीकडे
गॅलरीत कुंड्याची दाटी, दोर्यांवरचे कपडे
फिरली नजर सगळ्यांवर
'टाटा, बाय बाय' म्हणत ते चढले गॅलरीच्या कठड्यावर
झेप घेण्या निळ्या आकाशात, पसरले पंख, वर केली मान
कुठे होते निळे आकाश? पांढरे ढग, वाहणारा वारा..?
प्रत्येकाच्या इच्छेशी अपुल्या इच्छा जुळवत बसणे
जुळल्या तर जुळल्या नाही तर भिन्नतेस मिरवत बसणे
असण्यासाठी असणार्याने काही केलेले नसते
नसण्यासाठी मात्र इथे असणे हे आवश्यक असते
आल्यानंतर आहे म्हणुनी असण्याचा उत्सव होतो
अस्तित्वाचा असणे नसणे यामधला साकव होतो
नदी वाहते म्हणून असतो पूल, पुलाला समजेना
'मी असल्याने नदी वाहते' गर्व पुलाचा संपेना
नदी तिच्या वळणावळणावर पूल जरूरीचे करते
त्या एकाच नदीवर सृष्टी लाख पुलांची अवतरते
मग ते पूल पुलांशी आजूबाजूच्या... इच्छा जुळवत
विजयोन्मादाने म्हणती मी पहा नदी नेली वळवत
इच्छा जुळली नाही तर मग भिन्नतेस मिरवत बसती
घरात एकटी राहणारी म्हातारी माणसे कदाचित अशीच राहत असतील
त्यांना सप्रेम अर्पण...
ऊर्जा
भर दुपार, आकाशात तळपणारा सूर्य
वातावरणात भयानक उकाडा
काळाकुट्ट डांबरी रस्ता, गरम लाटा फेकणारा
सर्वत्र विचित्र शांतता, झाडे ही निस्तब्ध उभी
तितक्याच स्तब्धपणे पाहते आहे,
खिडकीत बसलेली म्हातारी!
मधेच एक उसासा सोडते, काहीतरी पुटपुटते
बाहेरच्या वातावरणा प्रमाणे तिचे घर ही शांत आहे
चारा आणायला गेलेली पाखरे संध्याकाळी घरट्यात परततील
मग घर गजबजून जाईल, म्हातारी हसेल, बोलेल, रमून जाईल
जमवून ठेवेल ऊर्जा....
उद्याचा निस्तब्ध दिवस ढकलण्यासाठी!!!
अगदी पहाटे पहाटे
रात्र पेंगुळली
शेवटी सुर्य उगवला
अन मग ती झोपी गेली
दुर कोठेतरी
रानातला वारा
कानात बोलला
अरे बघ तरी
किती छान
पाऊस पडला
नदी म्हटली
बाळांनो
वाळूसाठी खड्डे
खणू नका हो
न जाणो
कधीतरी तुम्हीच
त्यात पडाल
खुळी दालने प्राजक्तासम उलटुन गेली पाने
फुलली राने; गूढ नभातिल झरले आषाढाने
आभाळातिल गोत उतरले; धुके दंवात नव्याने
भुलले अंकुर; पक्षी किलबिल आरव एक रवाने
मुके तेवढे सरलेले पळ संजीवकसे मेणे
अश्वासक संवाद कळ्यांचे स्नेह भारले गाणे
.....................अज्ञात
वेगळ्या रंगात असुनि, रंगते त्यांच्या सवे
रचलेली माळ त्यांची, शब्द-सूतात ओवते |
पौर्णिमा त्यांच्या गुरुंची, सुस्वरांनी साजरी
सूर त्यांचे लीन सारे, भावपूर्ण स्वरांजली |
ओवला मोती हरेक, वाहिला श्री गुरुचरणी
साधकांच्या संगीतांचे, सूर कानी दरवळती
वेधता शब्दात सूरांना, शब्द ही झाले सुरिले
ओवलेल्या फुलांनी, सूत माझे गंधावले |
सूत-शब्द फक्त माझे, सूर्-मैफिल ही तयांची
पौर्णिमा त्यांच्या गुरुंची, चांदणे माझ्या मनी |
तुझं खरं की माझं खरं
मनाचा भुंगा जीवाला या
असं रोज कुरतडत राहतो.
सत्याचं -असत्याचं मनात
जुंपतं रोज तुंबळ... अन-
कुणीतरी अज्ञात रक्षस
सुखलेल्या या जख्मांना
पुन्हा फ़ोडत राहतो.
कसं ! जगावं तरी कसं?
बाहेरच्या या जगात
नाही कुणालाच कळत
असा मी का चिडत राहतो.
कुण्या जन्माच हे पाप,
कि, जगण्याचा हा शाप?
कुणी नसताना ही माझा मी
मलाच, का कुडत राहतो?
समर्थ समाधि सज्जन गडी
शांतीची घडी घातलेली
आसमंत शांत गाभारा शांत
खोल ह्रदयात नीरव शांत
मनाची जळमट कामना कळकट
गेली वाहत सहज आज
श्रद्धा शक्तीचा घेता प्रसाद
साधना पथ साधका स्पष्ट
विक्रांत
देऊळ
बालपणीच्या आठवांचे,
देऊळ होते विठुरायाचे.
शीतल सरितेच्या तीरावरचे,
जणू मांगल्याची प्रतिमा भासे.
देऊळाच्या सभोवताली,
आम्रतरू अन वनराई .
सारवलेल्या अंगणातुनी,
सडा रांगोळी रोजच होई
एकतारीच्या सुरा मधुनी,
विठ्ठल गीते कुणी गाई.
पैसा येवून जर
मी असेन तुला विसरणार
तू दिलेल्या बुद्धीने
अन संधीने
मिळालेल्या सुखभोगावर
स्वत:चाच हक्क सांगत
असेन गर्वाने फुगणार
तर हे भगवन
दारिद्राचे वरदान देवून
मजवर कृपा कर
विक्रांत