निसर्ग

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड - भाग ५ - अंतिम

Submitted by सेनापती... on 8 September, 2010 - 01:14

पहाटे-पहाटे सर्व उठले आणि परत निघायच्या तयारीला लागले. आज ट्रेकचा नक्की शेवटचा दिवस होता. वाढीव असला तरी. चहा नाश्ता झाला. ४ दिवस 'शंभो' झालेले नव्हते तेंव्हा फ़क्त घासून-पुसून स्वच्छ झालो आणि आम्ही तोलारखिंडीकडे निघालो. गुहेमधून बाहेर पडलात की उजव्या हाताची वाट तोलारखिंडीकडे जाते. गेल्या ३-४ दिवसाच्या ट्रेकवर गप्पा टाकत आम्ही चालत होतो. तशी घाई नव्हतीच कारण पुढे अख्खा दिवस पडला होता खिरेश्वरला पोचायला. दिवाळी पहाट तर हुकली होतीच मग आता उगाच धावाधाव करून काय उपयोग होता? हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून तोलारखिंड चांगली ५-६ किमी. लांब आहे. मध्ये अनेक ढोरवाटा येउन मिळतात.

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड - भाग ४ - हरिश्चंद्रगड आणि विहंगम कोकणकडा ... !

Submitted by सेनापती... on 7 September, 2010 - 02:56

सकाळी जाग आली तेंव्हा बाहेर आमच्यापैकीच काही जणांची 'किलबिल' सुरू होती. आळस देत-देत बाहेर आलो आणि समोर बघतो तर काय... सुंदर दृश्य होते समोर. एक सुंदर पुष्करणी आणि त्याच्या बाजुलाच असलेले महादेवाचे एक अतिशय सुरेख मंदिर. काल रात्री अंधारात हे सौंदर्य बघायचे हुकले होते. थोड़े पुढे जाउन बाहेर पाहिले आणि परत मागे आलो. ज्या ठिकाणी राहिलो होतो ती जागा सुद्धा अप्रतिम होती. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. त्यातल्या सर्वात मोठ्या आणि राहण्याजोग्या असलेल्या दुसऱ्या लेण्यात आम्ही राहिलो होतो.

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड - भाग ३ - मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़कडे ... !

Submitted by सेनापती... on 6 September, 2010 - 03:53

आजच्या दिवसात मधले पूर्ण जंगल पार करत, अग्नीबाण-वाकडी अश्या सुळक्यांखालून 'कुमशेत' गाठायचे होते. तिथून पुढे मग नदी काठाने पुढे जात ४ तासात पाचनई गाठायचे होते. पाचनईवरुन मग वरती चढत हरिश्चंद्रगड़. एकुण अंतर किमान ८-१० तासांचे होते. टप्पा बराच लांबचा होता तेंव्हा उजाड़ता उजाड़ता, ६ वाजता म्हणजे अगदीच भल्या पहाटे आम्ही त्या राहत्या ठिकाणावरुन निघालो होतो. रतनगड़ बराच मागे पडला होता आणि 'अग्नीबाण सुळका' समोर दिसायला लागला होता. त्याच्या उजव्या हाताला आजोबाची प्रचंड प्रस्तर भिंत देखील दिसत होती.

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड - भाग २ - जंगलातली रात्र

Submitted by सेनापती... on 3 September, 2010 - 01:37

पहाटे ६ च्या आसपास जाग आली. एक-एक करून सर्व उठले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. सकाळी करायची सर्व महत्वाची कामे उरकून झाली. आज नाश्त्याला नुडल्स बनवायचे होते. त्याची तयारी सुरू झाली. आम्ही शाळेच्या मागच्या बाजुला 'चुल x २' बनवली. म्हणजे २ चुली बनवल्या हो. Lol एकावर चहा आणि दुसऱ्यावर नुडल्स बनवायला सुरू केले. जसे-जसे नुडल्स बनत गेले तसे-तसे ते अधिक अधिक घट्ट होत गेले. इतके की त्यातून चमचा फिरेना. नंतर समजले की मॅगी ऐवजी कोणीतरी हाक्का नुडल्स विकत आणले होते.

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड - भाग १

Submitted by सेनापती... on 1 September, 2010 - 22:48

दिनांक : २०-८-२००० ठिकाण : कोलेजचा कट्टा.

चला गड्यांनो, शेतीबद्दल बोलू काही!

Submitted by नरेंद्र गोळे on 31 August, 2010 - 05:21

घरातला कर्ता पुरूष जर अपयशी ठरला, त्याची नोकरी गेली, तो हताश झाला, त्याचा आत्मविश्वास ढळला तर सार्‍या घरासच अवकळा प्राप्त होते. इतर सदस्य मग आपापल्या परीने अर्थार्जन करून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही घराला मुळातली संपन्नता काही पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही.

आपल्या भारताचे तसेच झाले असावे असा मला संशय येतो आहे. भारतात ७०% व्यवसाय शेतीचा समजला जातो. म्हणून भारतातला कर्ता व्यवसाय, शेतीच म्हणायला हवा. मग भारत जर दारिद्र्यरेषेवरच घुटमळत असेल तर, तो दोषही कर्त्यालाच चिकटायला हवा ना!

मत्स्यपालन अर्थात फिशटॅन्क ठेवण्याविषयी माहिती.

Submitted by बागुलबुवा on 29 August, 2010 - 06:16

मासे पाळण्याची आवड बहुतेक आपल्या सर्वांनाच असते. निदान लहानपणी तर नक्कीच. रंगीबेरंगी माशांचं हे जग आपल्यावर कधी गारुड करुन जातं ते समजत नाही. काहींची ही भूल उतरते आणि माझ्यासारख्यांना मात्र आयुष्यभर साथ देते.

ह्या छंदाचा पाठपुरावा करताना मिळालेले काही आनंदक्षण आणि काही ज्ञानकण तुमच्याबरोबर वाटून घ्यावेत म्हणून हा लेखनप्रपंच. मत्स्यपालनाचे बहुतेक सर्व पैलू आपण इथे यथाशक्ती चर्चूया आणि आपल्या शंका निरसून घेउया.

उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १६ (अंतिम) - सारांश ... अर्थात माझ्या मनातला ... !

Submitted by सेनापती... on 26 August, 2010 - 01:49

ही लेखमालिका आजच्या ह्या पोस्टने संपतोय. खरे सांगायचे तर ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत. Wink

उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १५ - 'बियास'च्या सोबतीने ... !

Submitted by सेनापती... on 25 August, 2010 - 18:59

उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १४ - रोहतांगचा चिखल सारा ... !

Submitted by सेनापती... on 25 August, 2010 - 04:05

लेहच्या ११००० फुटावर ४-५ दिवसांच्या वास्तव्यात रात्री सुद्धा काही थंडी लागली नव्हती. काल रात्री मात्र सरचूला आलो तेंव्हा बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. तरी सुद्धा १५००० फुटावर रात्री जाणवायला हवी इतकी काही जाणवली नाही. पहाटे सर्वजण उठले तेंव्हा मात्र बऱ्याच जणांना थंडी जाणवत होती. मला मात्र तसे काहीच वाटत नव्हते. का कोण जाणे... असो. सकाळी ६ वाजता नित्यनियमाने आवराआवरी केली आणि आमच्या नाश्त्याआधी बाईक्सना सुद्धा नाश्ता देणे आवश्यक आहे हे कळून आले. खास करून अमेय आणि कुलदीप यांच्या बाईक्स पेट्रोल पित होत्या. तेंव्हा आदित्य पेट्रोल आणायला ड्रायव्हरला घेउन परत १० किमी. मागे गेला.

Pages

Subscribe to RSS - निसर्ग