मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
निसर्ग
सिक्कीम सहल-७: बनझांकरी धबधबा
सिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन
महाबळेश्वर
नविन वर्षाची सुरवात झाली ती महाबळेश्वर सारख्या रम्य ठिकाण... तेथील स्ट्रॉबेरीची बाग आणि फुलं तुमच्यासाठी...
चांदोबाच्या जगात... राजमाचीला
सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो... डोंगर-द्ऱ्यां मधून भटकताना हा सुर अगदी सहज जाणवतो... एकांत, शांतता, रातवा, घुबड, दरी मधून वाहणारा वारा ह्यांच्या स्वरांनी रात्रीचा सुर सजलेला असतो... रात्रीच जग जसं आपल्याला गुढ वाटतं अगदी तसाच रात्रीचा सुर देखील फार गुढ असतो... पण ही गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे...
उनाड माबोकरांचा उन्हाळी वर्षाविहार !!
एप्रिल उजाडला नि सुर्य अधिक प्रसन्नतेने तळपु लागला.. घामाच्या धारा वाहु लागल्या.. अशा गरमीचा वैताग कोणाला नाही येणार.. नि अशा नकोश्या उकाड्यात जर कोणी विचारले "चल ट्रेकला येतोस का ? " तर नक्कीच नकारार्थी उत्तर मिळेल.. त्यातच 'अरे चल ना, मस्त धबधब्याखाली डुंबून येवु ' म्हटले तर वेड्यातच काढतील.. कोण्या पाणीटंचाईग्रस्त मुंबईकराला विचारले तर तो आपल्याकडच्या बादल्या पाठवुन देईल.. पण ह्या उकाड्यात अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला नक्कीच गारवा मिळतो.. धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद मनमुराद लुटता येतो.. त्या जागेचे नाव.. उल्हास व्हॅली ! ज्यालाच कॅनियॉन व्हॅली असेही म्हणतात.
कॅनियॉन व्हॅली / उल्हास व्हॅली / टायगर व्हॅली
उल्हास व्हॅली.. मध्यम स्वरुपाचा ट्रेक.. उन्हाळयात कडक उन्हात आस्वाद घ्यावा तर उल्हास व्हॅलीचा ! उल्हास नदीच्या सान्निध्यात लोणावळ्यात असलेल्या उल्हास व्हॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे धबधबा ! हा व्हॅली ट्रेक करायचा म्हणजे आधी उतार पार करायचा (टणाटण उड्या मारत!!) नि मग चढण पार करुन ट्रेकची सांगता करायची.. मधल्या वेळेत मस्तपैंकी पाण्यात डुंबायचे !
प्रेमदिन, सेलिब्रेशन नि कुलंग !!
जानेवरी महिन्यात जेव्हा अलंग-मदन करुन पायथ्याशी पोहोचलो तेव्हा कुलंग रुसलेला दिसत होता ! त्याच्या अंगावर खेळायचे राहुन गेले होते.. म्हटले इथे पुन्हा यायचे झाले तर फक्त कुलंगलाच भेटुन जायचे ! उंची सुमारे ४८०० फुटच्या आसपास.. अलंग्-मदन जोडीला खेटुनच उभा.. या त्रिकुटांमध्ये कुलंगवरुनच भोवतालचा परिसर जास्त चांगला दिसतो.. नि कळसुबाईच्या खालोखाल याची उंची ! वाटले होते पुढच्या वर्षी योग येइल.. पण लवकरच ह्या दुर्गांचे त्रिकुट पुर्ण करण्याची संधी माझ्या नेहमीच्या ''ट्रेकमेटस" या ग्रुपच्या कृपेने चालुन आली..
धो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला...
(आज सहजच मागच्या काही भटकंतीचे फोटो बघत होतो... तर गेल्या पावसाळ्यातल्या एका भटकंतीचा अनुभव खूप खूप आठवला... हा अनुभव तेव्हा मी इतर काही ठीकाणी सांगीतला होता, पण मायबोलीवर प्रथमच सांगत आहे...)
------------------------------------------------------------------------------------------
"हँलो आई, मी पालीला आलोय... आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भटकायला जाणार आहे" मी.
"अरे, पण तू तर साताऱ्याला जाणार होतास ना आज?" आई.
"हो, पण अजित आणि सरांचा आज भटकायला जायचा बेत होता... मग मला राहवलं नाही... उद्या जातो साताऱ्याला" मी.
"बर..." आई.
शुर मायबोलीकर गेले "ढाक-बहिरी"वर.. !!
सुन्या: " काय मग कसं वाटतय ?"
सम्या (समीर रानडे) : "बस्स झाला ट्रेक.. इथेच थांबेन म्हणतो "
विन्या (विनय भीडे) : "अरे त्या दरीएवढी फाटलीय "
योगी (योगायोग) : "आयला, मस्तच रे.. मजा येणार"
यो (यो रॉक्स) : "अरे ये तो शुरवात है !"
वरील उद्गार आहेत मायबोलीकरांचे.. शुरवीरांचे.. शुर मायबोलीकर्स ! ज्यास खालील घळीचे दृश्य कारणीभुत होते..