माणुस हा सामाजिक प्राणी आहे. जन्मल्यापासुनच तो नाती निर्माण करत असतो. आई , वडील , भाऊ , बहीण , आजी , आजोबा , काका , काकु , मामा , मामी , आत्या , मावशी अशी अनेक नाती त्याच्याबरोबर आपोआपच जोडली जातात. ती निवडण्याचा पर्याय त्याच्याकडे नसतो. तर काही नाती तो आपल्या मर्जीने निवडतो. असे असले तरीही बर्याचदा काही ना काही कारणाने नात्यांमधे वितुष्ट येतं. , अपेक्षाभंग होतो. नाती दुरावतात.© Copy Right by Kavita Patil सख्खी माणसे वैर्यासारखी वागली की त्याचा आपल्या मनावर खोलवर परीणाम होतो. तो सल सतत मनात बोचत असतो , आपली घुसमट होते. बर्याचदा विश्वास घात झाल्यामुळे आपला चांगुलपणावरचाच विश्वास उडतो.
माणुस हा सामाजिक प्राणी आहे. जन्मल्यापासुनच तो नाती निर्माण करत असतो. आई , वडील , भाऊ , बहीण , आजी , आजोबा , काका , काकु , मामा , मामी , आत्या , मावशी अशी अनेक नाती त्याच्याबरोबर आपोआपच जोडली जातात. ती निवडण्याचा पर्याय त्याच्याकडे नसतो. तर काही नाती तो आपल्या मर्जीने निवडतो. असे असले तरीही बर्याचदा काही ना काही कारणाने नात्यांमधे वितुष्ट येतं. , अपेक्षाभंग होतो. नाती दुरावतात.© Copy Right by Kavita Patil सख्खी माणसे वैर्यासारखी वागली की त्याचा आपल्या मनावर खोलवर परीणाम होतो. तो सल सतत मनात बोचत असतो , आपली घुसमट होते. बर्याचदा विश्वास घात झाल्यामुळे आपला चांगुलपणावरचाच विश्वास उडतो.
माणुस हा सामाजिक प्राणी आहे. जन्मल्यापासुनच तो नाती निर्माण करत असतो. आई , वडील , भाऊ , बहीण , आजी , आजोबा , काका , काकु , मामा , मामी , आत्या , मावशी अशी अनेक नाती त्याच्याबरोबर आपोआपच जोडली जातात. ती निवडण्याचा पर्याय त्याच्याकडे नसतो. तर काही नाती तो आपल्या मर्जीने निवडतो. असे असले तरीही बर्याचदा काही ना काही कारणाने नात्यांमधे वितुष्ट येतं. , अपेक्षाभंग होतो. नाती दुरावतात.© Copy Right by Kavita Patil सख्खी माणसे वैर्यासारखी वागली की त्याचा आपल्या मनावर खोलवर परीणाम होतो. तो सल सतत मनात बोचत असतो , आपली घुसमट होते. बर्याचदा विश्वास घात झाल्यामुळे आपला चांगुलपणावरचाच विश्वास उडतो.
"निंदकाचे घर असावे शेजारी" अशी आपल्याकडे जरी सर्वश्रृत म्हण असली तरीही स्वत:ची निंदा ही कुणालाच आवडत नाही. आपल्या वागण्या बोलण्यात काही चुक आहे हे कुणालाच पटत नाही. पण बर्याचदा असे होते की एखादया कुटुंबात किंवा मित्रमंडळी मधे कुणा एकावरच निशाणा साधला जातो. नावडतीचे मीठ अळणी या म्हणीला जागुन सतत त्या व्यक्तिची त्याच्यासमोरच निंदा केली जाते. त्या व्यक्तिच्या दिसण्यावरुन , बोलण्यावरुन , वागण्यावरुन , राहण्यावरुन तिला नको नको ते सतत ऐकावं लागतं.
आपल्या वागण्या बोलण्यावर मुख्यत्वे करुन आपण ज्या वातावरणात वाढलो आहोत याचा सर्वात जास्त प्रभाव असतो. आपण आपल्या आई — वडीलांना / पालकांना पाहुन मोठे होत असतो. त्यांची वागणुकही आपण आत्मसात करत असतो. बर्याचदा व्यसना मुळे किंवा तापट उग्र स्वभावामुळे काही कुटुंबात सतत कलह , चिडचिड आणि अशांती असते. ©Copy Right by Kavita Patil विशेषत: दारुचे व्यसन असलेल्या घरात खुप जास्त अशांती नांदते. पुर्ण कुटुंबही उध्वस्त झाल्याची उदाहरणेही आपण पाहतो. अशावेळी लहान मुलांवर याचा विपरीत परीणाम होत असतो. सततची मारहाण , भांडण , पुरेसे अन्न न मिळणे , सततची कटकट , गरीबी यामुळे लहान मुलांची खुप घुसमट होते.
आपलं आयुष्य सर्व सुखाने पुर्ण असावं , आपल्याकडे धनाची , धान्याची आणि या बरोबर बाकीच्या आवश्यक गोष्टींची भरभराट असावी असं कुणाला वाटत नाही. पण बर्याच ठीकाणी बर्याच गोष्टींची कमतरता असते तर काही ठीकाणी निवडक गोष्टींची कमतरता असते तर काही ठीकाणी अगदी न मोजण्या इतकी कमतरता असते. © Copy Right by Kavita Patil अशा वेळी ही कमतरता आहे हे लक्षातही येत नाही पण ज्या व्यक्तिकडे या गोष्टींची भरभराट असेल त्या व्यक्तिला अशा ठीकाणी त्या गोष्टींची कमतरता वाटु शकेल.
बर्याच ठीकाणी घरात किंवा कुटुंबात सतत कलह होत असतो. घरातील किंवा कुटुंबातील एक व्यक्ती अतिशय वरचढ स्वभावाची असली तर दुसरी व्यक्ती शांत असावी म्हणजे नाती निभावता येतात पण बर्याच ठीकाणी सगळेच वरचढ आणि समोरच्याला न जुमानणारे असले की सतत वादावादी सुरु असते आणि यात चुक नसणारेही भरडले जातात. © Copy Right by Kavita Patil बर्याचदा क्षुल्लक कारणावरुनही कलह होतो याला मुख्य कारण म्हणजे अहंकार. अहंकार जपण्यासाठी माणुस सतत दुसर्याला दुखावत असतो आणि कमी लेखत असतो. "मला काहीही फरक पडत नाही" असे कीतीही म्हंटले तरीही आपल्याला या गोष्टीचा फरक पडतोच.
#गुजगोष्टीस्वलेखन
क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग ५
आपल्याला जर सतत आनंदी आणि सुखी राहायचे असेल तर ते आपण सतत क्रिएटिव्ह व्हिझ्युअलायझेशनद्वारे आपल्या डोळ्यासमोर आणु शकतो. प्रत्येकाच्या आनंदाच्या , सुखी राहण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. © Copy Right by Kavita Patil आपल्याला काय मिळाल्याने आपण आनंदी आणि सुखी होउ शकतो त्या प्रमाणे आपण आपल्यासाठी सकारात्मक विधाने बनवु शकतो.
गेलं वर्षभर या अचानक आलेल्या महामारीमुळे जगभर जनजीवन विस्कळीत झालं. सुरुवातीचे काही दिवस तर भयाण भीतीत गेले. सर्वजण मृत्युच्या सावटाखाली वावरत होते. आपल्यातील काहीजणांवर मृत्युने झडप घातली देखिल. © Copy Right by Kavita Patil खरं पाहीलं तर जो जीव जन्माला आला त्याचा मृत्यु अटळ आहे. प्रत्येकाची जायची वेळ ठरलेली असते निमित्त मात्र वेगवेगळं असतं पण ठरलेल्या वेळेत त्या जीवाला जावंच लागतं. पण आपल्या जवळचं कुणी गेलं तर तो आपल्यासाठी आघातच असतो. घरातील व्यक्ती असेल तर त्यांचं जीवनच बदलुन जातं. जवळच्या व्यक्तिंसाठी हा सर्वात मोठा मानसिक आणि भावनिक आघात असतो.