हिंदी, मराठी चित्रपट संगीत, भावगीतं, लोकगीतं यांमधील सौंदर्यस्थळांबद्दल चर्चा इथे करू.
..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८) या धाग्यावर एका कोड्याचे उत्तर देताना जी अधिकची माहिती मला लिहाविशी वाटली त्यावरून ही कल्पना सुचली.
नुकताच लता मंगेशकर यांचा वाढदिवस साजरा झाला(२८ सप्टेंबर) आणि वर्तमानपत्रात त्यांच्या बद्दल रकाने भरभरून माहिती छापून आली. त्यांच्या फक्त दोन दिवस अगोदर म्हणजे २६ सप्टेंबर रोजी सदाबहार अभिनेते देव आनंद यांचा वाढदिवस होता परंतु देवची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. लता यांच्या स्वराला तोड नाहीच. जागतिक पातळीवर नावाजलेल्या गायिका आहेत त्या. परंतु देवने पण अभिनय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे यात शंका नसावी.
रहस्यमय / थ्रिलर हिंदी चित्रपटांविषयी गप्पा. चित्रपटांची लिस्ट बनवता येईल.
हायवे, हा इम्तियाच अलीचा गेल्या वर्षी आलेला चित्रपट. मायबोलीवर शोध घेतला, तर कुणी यावर लिहिलेले दिसले नाही, म्हणून लिहितोय.
कथानकात नाविन्य नाही पण त्याच्या हाताळणीत आणि अभिनयात नक्कीच आहे.
उद्या परवावर लग्न आहे वीराचे. आणि अश्यात रात्री ती आपल्या नियोजित नवर्यासोबत भटकंतीला जाते. शहरापासून लांब. तो रस्ता सुरक्षित नाही असे तो वारंवार सांगत असतो तरीही आणखी पुढे आणखी थोडा वेळ
असे ती सांगत राहते.. आणि काहीही ध्यानीमनी नसताना तिचे अपहरण होते.
नुकतेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांचे निधन झाले. ते अभिनेते असण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्वही होते. त्यांच्याविषयीचे विविध अनुभव लिहीण्याकरता हा धागा.
दु:खद घटना धाग्यावर काहींनी लिहीलेले अनुभव संपादित करुन इथे डकवत आहे.
बेफ़िकीर | 4 November, 2014 - 00:16
उमेश कोठीकरांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी त्यांना पहिल्यांदा व शेवटचे पाहण्याची संधी लाभली. कवीवर्य निफाडकर व मलाही संधी मिळाल्यामुळे मी त्यांच्यासोबत एका खोलीत बसलो होतो.
अमरापूरकर काहीही बोलत नव्हते. पण त्यांचे तेथे असणे हेच अस्वस्थ करण्यास पुरेसे होते.
(नेटवरून साभार)
लिव्ह-ईन रिलेशनशिप्स, प्रेमाचे त्रिकोण, वि.पू.सं. आणि वि.बा.सं. या गोष्टी यशराज बॅनरसाठी नव्या नाहीत. 'दाग', 'सिलसिला', 'चांदनी', 'सलाम नमस्ते' ते अगदी अलीकडच्या 'बँड बाजा बारात' पर्यंत या विषयांना यश चोप्रांनी दिग्दर्शक म्हणून आणि नंतर निर्माता म्हणून समर्थपणे सादर केले आहे. 'शुद्ध देसी रोमांस' हा चित्रपटही अशाच एका प्रेमाच्या त्रिकोणाची हल्लीच्या जाणिवांचा तडका मारलेली 'हटके' कहाणी आहे.
माझे आजोबा मी फक्त पाच वर्षांचा असताना हे जग सोडून गेले. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू, ज्यांना आम्ही काकाआजोबा म्हणायचो, ते आणि काकूआजी, यांनी स्वतःच्या नातवंडांवर कुणी करणार नाही इतकं प्रेम आमच्यावर केलं. त्यामुळे माझ्या आजोबांबरोबर जे नातं फुलण्याआधीच संपलं ते मात्र काकाआजोबांबरोबर बर्यापैकी बहरलं. त्यांचा सहवास मला मी आठवीत असेपर्यंत लाभला.
मला देव आनंदचे सिनेमे का आवडतात, किंबहुना का आवडायचे, त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे याचाच धाकटा भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी याचा त्याच्या अनेक चित्रपटांना लाभलेला परीसस्पर्श.

हिंदी चित्रपटसृष्टी मोठी करण्यात ज्या अनेक गुणी बंगाली कलावंतांचा सिंहाचा वाटा आहे त्यातलंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे ऋषिकेश मुखर्जी.