युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

हा पंचवीस माणसांचा भात काय प्रमाणात उरलाय म्हणजे आपण शेवटी थोडा खातो त्या प्रमाणात की पोटभर भातच ह्या स्केलने ? तसेच तो संपवण्यासाठी आता किती जण घरात आहेत ? भात खूप आणि माणसं घरात कमी असे प्रमाण असेल तर संपवणे कठीण आहे . पण तरी एक दोन दिवस जमत असेल तर पोळ्या न खाता दिवस फोडणीचा भात, दही भात वगैरे खाऊन जेवढा संपेल तेवढा संपवा आणि उरलेला सरळ अंदाज चुकला म्हणून टाकून द्या.

संपवण्यासाठी आणखी त्यात तेल तूप अश्या नको असणाऱ्या गोष्टी घालून quantity ही आणखी वाढवणे, त्यावर अधिक कष्ट घेणे आणि मग पुन्हा ती नवीन गोष्ट संपवत बसणे ह्या पेक्षा ते टाकून देणे आजकालच्या जमान्यात अधिक इष्ट असे मला वाटते. उरलाय म्हणून खाणे अजिबात नको वाटते.
कोणी खरच न्यायला तयार असेल तर चांगलच पण तशी योग्य व्यक्ती मिळाली नाही तर मोह न ठेवता लवकरात लवकर टाकून द्यायचं . मुद्दामहून कोणी उरवत नाही आणि टाकून देत नाही पण पार्टी वगैरे असेल तर जास्त होऊ शकत अंदाज न आल्याने . अश्या वेळी टाकून देणे सर्वात बेस्ट. पुर्वी अन्नाचा माज येणे , अन्न टाकायचं नाही वगैरे वाटत असे. हल्ली मला तसे वाटत नाही. असो.

स्वाती२ +१
ममो +१
फेकून देण्यात गिल्ट येणार असेल तर तो कमी करण्याचे उपाय मी सांगतो. तो भात आधी फ्रीज मध्ये ठेवून द्या. पहिले दोन दिवस घरातील माणसांत घेऊन थोडा संपेल. मग तो मागे पडेल. आऊट ऑफ साईट आउट ऑफ माईंड. जाऊद्या दोन आठवडे. मग तो भात ठेवलेल्या डब्याची कोणाला आठवण येईल, किंवा या दोन आठवड्यात असच सामान सरकवल्याने फ्रीज मध्ये आता जागा नाही तो रिकामा करायला हवाय असा कोणी टाहो फोडेल. जे काही नंतर होईल ते झाल्यावर लगेच काही कृती करू नका. पुढच्या कंपोस्ट डे ची वाट बघा. त्या दिवशी मात्र ब्राह्म मुहूर्त गाठलाच पाहिजे. त्यात हयगय नाही. तर पहाटे गारबेज ट्रक यायच्या आत तो भात बायोडिग्रडेबल पिशवीत घालून घरासमोर ठेवा.

यात आता भात खराबच झाला होता. आणि मी फ्रीज स्वच्छ केला ह्या दोन गोष्टींमुळे मनाला उभारी येते.

मनीमोहोर +१
अगदी बरोबर लिहिले आहे.

मनीमोहोर ब अमितव यांचे पटतेय, इथे अमेरिकेत हिवाळा आहे, त्यामुळे भात लवकर वाळणार नाही , शिवाय पंखा, हीटर वगैरे लावले तर जिज्ञासा छडी घेऊन येइल. भात कमी खा असे डॉक्टरच कानी कपाळी ओरडत असताना हाच उपाय बरा वाटतो

अमितव करेक्ट आहे. कोणी खाणार नाहीये हे माहित असून ही मी पण बरेच वेळा फ्रीजमध्ये ठेवून देते. " एक्सपायरी डेट होऊन जाऊ दे मग टाकू या " ही माझी त्यासाठीची फ्रेझ आहे.

यात आता भात खराबच झाला होता. आणि मी फ्रीज स्वच्छ केला ह्या दोन गोष्टींमुळे मनाला उभारी येते. >> असा मोकळा रिकामा फ्रीज बघताना काय निर्मळ वाटत.

भात कमी खा असे डॉक्टरच कानी कपाळी ओरडत असताना हाच उपाय बरा वाटतो >> Good.

विकु. वाळवायचा असेल तर हिवाळ्यात भात चटकन वाळेल. कारण ह्युमिडिटी कमी. त्यात आता, तुमच्याकडे माहित नाही, पण इथे हीटर चालू केले आहेत त्यामुळे चार तास हिटर व्हेंट वर ताट ठेवून त्यात पसरुन ठेवलात तर वाळून जाईल. हिटर चालू नसेल तरी पसरुन ठेवलात तर लगेच वाळेल. वाळवा असं सुचवत नाहीये. फक्त सायन्स चुकायला नको Lol

मिल गया कोडा, अब चाहिये जीन, लगाम और घोडा नावाच्या पुस्तकातून Happy

देशी रेस्टॉमधून तुमच्या आवडीची चिकन करी मागवा ४-६ पोर्शन, ४-६ मोठे कांदे उभे चिरुन ब्राउन करून घ्या, थोडे काजू तुपात तळून घ्या, केशर दुधात खलून घ्या. आणि चिकन बिर्यानी बनवा. शुक्रवार संध्याकाळी मित्र मैत्रिणींना बोलवा ! सहज फस्त होईल सर्व भात Light 1

मी दोन्ही स्वातीशी सहमत. भात लागतोच तसा. २ किंवा ३ सर्विंग्ज च्या पोर्शन साइज मधे झिपलॉक मधे डिवाइड करून फ्रीज केला वापरता येईल नक्की. अर्थात ही कालची पोस्ट होती म्हटल्यावर आता इतका वेळ बाहेरच राहिला असेल तर आता नका वापरू !

भात शितकपाटात ठेवावा की नाही ह्याबद्दल दोन मत प्रवाह आहेत.

एका नुसार भातात रेझिस्टन्ट स्टार्च तयार होतो त्यामुळे शितकपाटात ठेवलेला भात खाणे चांगले तर दुसऱ्या नुसार भातात विषारी द्रव्ये तयार होतात त्यामुळे शितकपाटात ठेवलेला भात खाणे टाळावे.

खरे खोटे तो भातच जाणे परंतु तज्ज्ञांच्या सल्ल्याच्या प्रतीक्षेत.

तूपात तळुन गूळ, केशर, वेल्दोडे, सुकामेवा व खवा टकुन परतला. थाळीला तूप लावुन वड्या थापल्या व ट्या वड्या साखरेच्या पाकात सोऊन मस्त फ्रीझरमधे टाकलेत.

आमचूर करण्यासाठी कैरीचे सालं काढायच्या पीलरने
पातळ काप करून स्टिलच्या ताटात पसरून उन्हात ठेवले होते. आता ते पातळ काप ताटाला चिकटून बसलेत . ते कसे काढावे? माबोकर युक्ती सांगा प्लिज.
धन्यवाद.

परत उन्हात ठेवा झाकण ठेवून. आतमध्ये वाफ धरून ओलसर होइल मग निघाले की सुती कपड्यावर घालून खडखडीत वाळवा परत. तेव्हा ताट ठेवु नका.
कधीही इतक्या पातळ काप करून सुकवायचे नसते. आणि सुती कपड्यावरच घालायचे नाहितर चाळणीत.

<<परत उन्हात ठेवा झाकण ठेवून. आतमध्ये वाफ धरून ओलसर होइल मग निघाले की >> वा! याला म्हणतात युक्ती, अनुभव.
मला तर मुद्दाम प्रयोग करून बघावा असे वाटतेय Happy

कैरी, आवळा, लिंबू हे कधीच स्टीलच्या ताटात सुकवू नको. या आंबट वस्तूंमुळे ते खराब होते.
सूती कपडा प्लास्टिक ट्रे मधे ठेवून त्यावर सुकव.
सध्या झंपीची युक्ती करून बघ आणि इथे अनुभव लिही.

शेतात टोमॅटो भरपुर निघाले. पातळ सालीचे व खुप गोड होते पण टिकेनातच. टोमॅटो पिकतोय असे वाटतेय तोच तो खराब व्हायला लागला. म्हणुन सुकवुन पुड करावी असे ठरवुन पातळ काप करुन सुकत घातले तर ते ताटाला चिकटुन बसले. मग जाड काप केले, वर मिठ शिवरले आणि वाळवले. वाळले पण काळपट पडले. काय केले तर ते वाळतीलही व काळेही पडणार नाहीत.

कच्च्या टोमॅटोचे वाळवून पूड करण्यापेक्षा थोडे जाड काप करून त्याला वाळवलं तर नंतर छान काचर्या होतात.तळून त्यावर तिखट,मीठ, आवडेल तो मसाला टाकून खायला या काचऱ्या खूप छान लागतात.पण हे करायला अगदी कच्चे टमाटे असावे..पिकलेले नको

मागे विचारलेला राजमा शिजेना प्रश्न माझ्या पुरता तरी सुटला. करवंटीच्या तुकड्याने कमाल केली Happy

आता नवा प्रश्न आहे, मी पुरती हरले आहे. ढोकळा हा प्रकार काही केल्या नीट जमत नाही.
डाळ्/तांदुळ, बेसन, फक्त मूग डाळ असे अनेकाविध प्रयोग करून शेवटी शरणागती पत्करली आहे. शुअर रेसीपी असेल..चुकवून दाखवाच टाईप. तर सांगा प्लि़ज.
चितळेचा जमतो पण बाकी नाही.
१)कधी मधे गचगच राहतो.
२)पाणी कमी टाकले तर आत पीठाच्या गुठळ्या राहतात.
३)इडली पात्रात पण करून पाहिले पण नाहीच.

ढोकळा फेल Sad फील येते.

मी रेडी मिक्सचाच ढोकळा करते. बाकी फंदात पडत नाही. रेडी मिक्सचाही मागे मधेच गचगचीत राहाणं वगैरे झालं आहे पण हल्ली होत नाही. त्याचं माझ्या मते कारण ही प्रोसेस असावी.
ढोकळा करायला कुकरचा डबा काढण्यापूर्वी कुकर हाय फ्लेमवर गॅसवर ठेवणं, सामानाची जमवाजमव करणं. मी त्या पीठात थोडं आलं+मिरची कुटून घालते तेव्हा ते तयार ठेवणं. कुकरच्या डब्यात मिक्स घेऊन हाताने ते मोकळं करणं. त्यात जितकं पाणी सांगितलं आहे तितकं मोजून घेऊन हळूहळू मिक्स करत घालणं. एकाच डायरेक्शनमध्ये ते पटपट गोल फिरवत गुठळ्या मोडून घेणं. त्यात ठेचा आणि दोन तीन चमचे तेल घालून पुन्हा एकदा मिक्स करुन डबा दोन्ही हातांनी धरुन काऊंटरवर दोन तीनदा आपटणं. असं केल्याने त्यातले एअर बबल्स निघतात. पटकन कुकरला शिट्टी काढून टाकून लावणं. आता फ्लेम मिडीयमवर करुन एक १५ मिनिटं वाफवणं. ह्यातली डबा आपटीन बबल्स काढण्याची स्टेप महत्वाची आहे.
(चितळे मिक्सची साईझ मोठी असल्यामुळे गेली काही वर्ष गिट्सचं नायलॉन ढोकळा मिक्स वापरते आहे)

Pages