चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://twitter.com/RakeshSinha01/status/1284162844917772288
Prof Rakesh Sinha
@RakeshSinha01
:@RahulGandhi
जी देश की चिंता में @INCIndia
की चिंता नहीं कर पा रहे हैं!

हे लिहिणारे टीव्ही डिबेट्समध्ये संघाचे विचारवंत म्हणून ओळखले जातात . राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त खासदार आहेत.

त्यांना मिळालेलं उत्तर इथल्या बर्‍याच जणांना लागू पडतं.

जनरल नरभक्षी™@GDnarbhakshi
·
2h
Replying to
@RakeshSinha01 @RahulGandhi and @INCIndia
और तुम लोग @INCIndia की चिंता में देश की चिंता नहीं कर पा रहे हो।

लॉकडाउनमुळे दुध उत्पादनांसाठी मागणी घटली, पर्यायाने दुधाचे भाव घटले तशात केंद्र सरकारने परदेशी दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेऊन आयात करही कमी केला आहे. राज्यातल्या भाजप नेत्यांना दूध दरासाठी आंदोलन करायचे असेल तर त्यांनी ते केंद्राविरुद्ध करायला हवं.

या धर्मांध लोकांना मूर्ती फोडण्या शिवाय दुसरे काहीच सुचत नाही का ?
अगाणिस्तानमध्ये सुध्दा अशीच भव्य दुर्मिळ मूर्ती रॉकेट डागून फोडली होती .
इतर धर्मियांच्या भावना समजण्याची अक्कल या लोकांना कधी येणार ?
पाकिस्तान: खुदाई में मिली बुद्ध की प्राचीन मूर्ति, 'गैर इस्लामी' बता श्रमिकों ने तोड़ा
http://nbt.in/gMvfTZ?bga via @NavbharatTimes: http://app.nbt.in

Happy Happy Happy Happy
आता मोदींनी सरळ चीन बरोबर युद्ध चालू केले पाहिजे.
ना बांस ना बांसुरी !
चीन ने दादागिरी केली तेंव्हा पासून राजपुत्र आणि समर्थक खूपच जोशात आहेत .
त्यांची सरळ मागणी आहे चर्चा बिर्चा काय करता ,. युद्ध पुकारा युद्ध !!!!!
खर म्हणजे आता होवून जावू द्या मस्त पैकी अणु युद्ध , पाकिस्तान आणि चीन च्या मध्ये सगळ्या भारतीयांची खरपूस ऑमलेट होवून जावू द्या . दलीत ब्राह्मण मुस्लिम सगळ्यांचे प्रश्न मिटतील !!!!!

ती एक सांस्कृतिक संघटना आहे ना तीन दिवसांत सैन्य उभारू शकणारी? त्यांना पाठवायचं चीनच्या सीमेवर. तसंही तिथे लाठ्या काठ्यां नीच लढाई करायची आहे.

मे २०१४ पर्यंत मोदी चीनबबात खूप जोशात असायचे . वरच्या व्हिडियोत दिसतंय. हाउ इज द जोश मोदीजी?

मग ते राफेल आणून दिवाळीला उडवणार आहेत का ?

राजीव चे बोफोर्स वाजपेयींनी कारगिळला वापरले होते म्हणे,

मामनुस्मर युध्य च !!!

असं माझे म्हणणे आहे की , चीन च्या शुभ चिंतक लिब्रू लोकांनी पीच पीच्या डोळ्यांना विचारले पाहिजे जिगरी दोस्त पाकिस्तान सोडून इराण मध्ये 400अरब डॉलर्स ची गुंतवणूक का केली ?
ते पण शिया धर्मीय देशात ?

पाकिस्तानी न्यूज चॅनेल चा आजचा फेवरेट विषय !
" यही सिला दिया हमारे प्यार का ?
Happy

*मोदी आणि चीनी गुंतवणुकीचे रहस्य!*

भारत-चीन युद्धमय सद्यपरिस्थितीत व्हॉट्सअपवरील मेसेजद्वारे चीनच्या मालावर बंदी किंवा चीनी माल भारतात येण्याची शक्यता; अशा दोन्ही बाजूंचा भरपूर भडिमार झाला आहे/होत आहे. मात्र मोदी सरकारने या परिस्थितीत अशी काही महत्वाची पावलं उचलली त्याचवेळी सगळ्या चीनी मालाच्या आयातीवर बंदी घालायची तरी कशी, या दोन्ही परस्पर विरोधी मुद्यांना धरून इतका चांगला ढोल वाजवलाय की जनता त्यांच्या तालावर नाचायला लागली आहे. साहजिकच या संधीचा फायदा घेत जसं अनेक मुद्यांवर आजपर्यंत करत आले तसं इतिहासात केलेला कौशल्याने फेरबदल,जनतेला भुलवण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. परंतु, त्यांनी कितीही कौशल्याने सत्य लपवण्याचे प्रयत्न केले तरी ते अशक्य आहे, हे भक्तांना कोण सांगणार?

भक्तही लपवू पाहत असणारे गुपित सत्य म्हणजे, मोदी आणि साम्यवादी म्हणवणाऱ्या चीनचे अगदी जवळचे नातेसंबंध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका मात्र जरा भिन्न आहे जशी वसाहतवादादरम्यान इंग्रजांच्या बाजूची होती तशी या नववसाहतवादादरम्यान अमेरिकेच्या बाजूची आहे, यात काहीच वाद नाही. त्यामुळे संघ चालवत असणाऱ्या मोदी राजवटीत अमेरिकी साम्राज्यवादावरील निष्ठा ही सामान्य बाब आहे. मात्र नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात दंगलीमुळे त्यांना अमेरिकेला जाण्यास मनाई होती. तर परकीय गुंतवणूक कुठून आणायची? यातून मार्ग काढण्यासाठी कदाचित त्यांनी दुसरं राष्ट्र निवडलं. ते म्हणजे चीन.

मोदी पहिले असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी चीनचे 4 दौरे केले आणि त्यानंतर 2015-18 दरम्यान पंतप्रधानपदी असताना 5 वेळा दौरे केले. मोदींची नोव्हेंबर 2011 मधील चीनची पाच दिवसीय भेट तर ऐतिहासिकच ठरली. त्याचे कारण म्हणजे मनमोहन सरकार परवानगी द्यायला तयार नसतानासुद्धा हाँग-काँगद्वारे चीनला जाऊन गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चीनी कंपन्यांना मोदींनी निमंत्रण दिले. परिणामी गुजरातमध्ये चीनी गुंतवणूक 2013-14 दरम्यान 9000 कोटी रुपयांपर्यंत पोचली. ग्रेट वॉल मोटर्स कंपनी व शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज या बलाढ्य चीनी कंपन्यांनी गुजरातमध्ये मोठे वाहन उत्पादन केंद्र विकसित केले व मोदींचे लाडके मित्र अडाणी यांना मुंद्रा बंदरसाठी चीनी गुंतवणूकसुद्धा मिळवून दिली. मोदींनी गुजरातमध्ये मोठ्या चीनी गुंतवणुकीचे, तत्कालीन सरकारच्या विरोधाला न जुमानता, खुलेआम स्वागत केले. गुजरातला चीनी गुुंतवणुकीचा हॉटस्पॉट बनवण्याचा एवढा निर्धार केला होता की, मँडेरिन ही चीनची अधिकृत असणारी भाषा विद्यापीठांमध्ये शिकवण्याचे आदेश दिले.

अर्थातच गुजरात चीनी भाई-भाई या घोषणेला मोदींची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर वेग आला आणि चीनी माध्यमांनी त्यांच्या गुजरात मॉडेलचे कौतुकही केले. त्यानंतर 2014 साली चीनचे पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर आले आणि चीनी गुंतवणूक वाढली व भारताचे चीनी मालाच्या उकिरड्यात रुपांतर झाले. याचाच परिणाम म्हणजे चीनची भारतातील गुंतवणूक 2014 साली 1.6 अब्ज डॉलर होती ती 2020 च्या सुरुवातीलाच 8 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. जर प्रस्तावित रक्कम यात जोडली तर तो आकडा 26 अब्ज डॉलर एवढा होतो. मोदी निवडून आल्यानंतर चीनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातील startups मध्ये 1 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक केली आहे. भारताचे 72% मोबाईल फोन मार्केट चीनी कंपन्यांच्या आधारे चालते. सध्याच्या सैन्य संघर्षांनंतर भारत-चीन संबंध कसे होतील यावर अनेक प्रश्न उभे आहेत, मात्र चीनी गुंतवणुकीला परिपूर्ण वाव देण्यात मोदींचा मोलाचा वाटा आहे यात काही शंका नाही. अर्थातच हे मोदीभक्तांना समजणे जरा कठीण आहे!

*स्रोत:*
https://janataweekly.org/indias-dependence-on-imperialist-china-make-in-...

------------------------------------------------------------
_Join Lokayat's English Whatsapp Channel:_
https://chat.whatsapp.com/DxY7U42lGBeHyLJwUYCtn4

_लोकायतचे मराठी व्हाट्सएप चॅनेलला जॉईन करा:_
https://chat.whatsapp.com/JaBEkjh9omOHKgtJ0sLTFC

जर प्रस्तावित रक्कम यात जोडली तर तो आकडा 26 अब्ज डॉलर एवढा होतो. मोदी निवडून आल्यानंतर चीनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातील startups मध्ये 1 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक केली आहे. भारताचे 72% मोबाईल फोन मार्केट चीनी कंपन्यांच्या आधारे चालते. सध्याच्या सैन्य संघर्षांनंतर भारत-चीन संबंध कसे होतील यावर अनेक प्रश्न उभे आहेत, मात्र चीनी गुंतवणुकीला परिपूर्ण वाव देण्यात मोदींचा मोलाचा वाटा आहे यात काही शंका नाही. अर्थातच हे मोदीभक्तांना समजणे जरा कठीण आहे !>>>>>>>>>>

त्यात काय विशेष ?
म मो आणि पी व्ही यांनी जे उदार आर्थिक सुरू केले ते सीरिया आणि नायजेरिया ची गुंतवणूक भारतात यावी म्हणून केले होते का ? त्या वेळी चिनी गुंतवणूक आलीच नव्हती का ?
का फक्त गांधी आणि कंपनी च्या आर्थिक गुंतवणुकीत देशाचा विकास घडविणारं होते ?

लेखकाच्या बुध्दी ची किव येते !
लेखकाने संबधित लेख( MADE IN china ) वर नक्कीच लिहले ला नसेल अशी आशा आहे .
आत्ता पर्यंत च्या सर्वच पंतप्रधानांनी शेजारील देशांशी मित्रत्वाचे संबंध ठेवून व्यापार वृध्दी करण्याचा प्रयत्न केला मग लेखकाला फक्त मोदी अपवाद का वाटले असावेत ? कारण फक्त एकच मोदी द्वेष !!!!!
चीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यसन लावून सीमेवर दादागिरी करत असेल , त्यांचे डेली पीपल उर्फ प्रिंट उर्फ वायर पण भारताची अवहेलना करत असेल तरी चीन बरोबर व्यापार चालूच ठेवला पाहिजे अशी तमाम कम्युनिस्ट पंथियाची इच्छा आहे का ?
भारतीय कम्युनिस्ट पंथीय लोक त्यांच्या घरात दादागिरी करून घुसणाऱ्या गुंडाला अतिथी देवो भव करतात का ?

सतत हिरवट दृष्टी ठेवल्या मुळेच काँग्रेस आणि गांधी कंपनी आपटून आपटून सुद्धा दोन्ही लोकसभा मिळून १०० च्या वर उमेदवार निवडून आणू शकली नाही .
कोणताही पक्ष १०० % अचूक निर्णय घेवू शकत नाही , त्याच प्रमाणे काही चुका भाजप कडून हि झाल्या असतील पण त्या चुका निर्भिडपणे कौशल्याने मांडणारा एक हि नेता काँग्रेस ला आजपर्यंत मिळू नये ?
अजुन किती दिवस त्या अडाणी बाळाची परीक्षा घेणार ?

१३० करोड लोकसंख्या असलेल्या देशात एक हि सक्षम विरोधी पक्ष आणि पक्ष नेता गेल्या दहा वर्षात निवडून आणू शकले नाही , हे भाजप विरोधकांचेच अपयश आहे .

चीनकडून झालेल्या 1962 मधल्या पराभवानंतर चीनबाबतचे आपले परराष्ट्र आणि आर्थिक धोरण अतिशय सावधगिरीचे आणि थोडे तटस्थ, अधिक विरोधी असे राहिले आहे. उगीच वाचाळपणा आणि राणा भीमदेवी गर्जना करायच्या नाहीत, उघडपणे चीनला चिथवायचे
नाही, शक्यतो गाजावाजा न करता मौनव्रत राखून आपली धोरणे राबवायची, आक्रमकता दिसू द्यायची नाही हे आपले धोरण अगदी योग्य होते. निक्सन-किसिंजर युगात पिंग पॉंग डिप्लोमसी द्वारे चीनला जवळ करण्याचे आणि रश्याला शह देण्याचे धोरण अमेरिकेने राबवले. ते एक प्रकारे भारताच्या विरोधी आणि पाकिस्तानला फायदेशीर ठरू शकले असते. पण पुढे परिस्थिती भराभर बदलली, अफघानिस्तानात रश्याचा हस्तक्षेप आणि छुपे युद्ध, त्याविरोधात अमेरिका लढाईत उतरणे, तालिबानचा उदय वगैरेमुळे चीन अमेरिका संबंधांना वेगळे वळण लागले आणि आपणही चीनशी उघड दोन हात करायला न जाता गोडीगुलाबीने राहण्याचा देखावा करू लागलो .

Covid 19 ची साथ चालू असताना अनेक भारतीय कंपन्यांनी कामगार ना कामावरून काढून टाकले.
ह्या कामगारांनी पूर्ण आयुष्य त्या कंपन्या साठी काम केले त्यांना संकट समयी आधार दिला नाही.
काल टाटा ची मुलाखत वाचली त्यांनी हेच मत मांडले आहे.
कंपन्या वाईट अवस्थेतून जात असल्या तरी कामगार ना वर्षभर साथ देणे काही अवघड नव्हत.
भारतीय कंपन्या जर ashya वागत असतील तर स्वदेशी उद्योग असेल नाही तर विदेशी सामान्य लोकांना त्याचा काही फायदा नाही.
चीन जर स्वस्तात वस्तू उपलब्ध करून देत असेल तर महाग स्वदेशी काही कामच नाही.

चीन जर स्वस्तात वस्तू उपलब्ध करून देत असेल तर महाग स्वदेशी काही कामच नाही.>>>> अहो चीन स्वस्तात वस्तु देतोय ते ठीक आहे, पण मरण पण किती स्वस्तात दिलं, नाही ?

Lockdown madhye bhartiy कंपन्या आणि त्यांचे टॉप बॉस ह्यांची कामगार कडे ( त्यांचेच देश बंधू) बघण्याचा दृष्टिकोन बिलकुल माणुसकीचा नाही.
अनेक आजू बाजूची उदाहरणे बघितली.
आपला जो फायदा करेल तो आपला मग तो विदेशी असू नाही तर स्वदेशी.
हा विचार मनात यायला लागला .
ह्या मंडळी ची वागणूक बघून.

Press Trust of India
@PTI_News
Level 1:
IPL Governing Council decides to retain all sponsors of the event, including Chinese companies
8:51 PM · Aug 2, 2020·PTI_Tweets

अरे ले लो भाई जुमला ले लो

IPL
Indian Poverty Line
चिनी मालावर बहिष्कार हे सोपे नाही हे मी अनुभवातून समजून चुकलोय.
आधी मेड ईन ईंडियाला यशस्वी करणे गरजेचे. पण दुर्दैवाने आपल्यात एकी नाही.

भक्तॉलॉजी - आपण कुठे त्यांना पैसे देतोय. ते स्पॉन्सर करताहेत म्हणजे आपण त्यांचे पैसे घेतो. त्यांच्या जाहिराती पाहिल्या तरी कोणीही भारतीय त्यांचा माल विकत घेणार नाही. चिन्यांचा पचका.

जेव्हा आपले पंतप्रधान चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली असे घोषीत करतील तेव्हा चीनी मालावर बहिष्कार घालणे योग्य राहील.

भक्तॉलॉजी - आपण कुठे त्यांना पैसे देतोय. ते स्पॉन्सर करताहेत म्हणजे आपण त्यांचे पैसे घेतो. त्यांच्या जाहिराती पाहिल्या तरी कोणीही भारतीय त्यांचा माल विकत घेणार नाही. चिन्यांचा पचका.>> चला. शेठ आता हापिशली त्याच्या चेल्यांना चोरी अशी करावी याचे मोराल बुस्ट देणार तर Wink

<< जिथे मोदी असतात तिथे शाहरूखची गरज नाही पडत Happy >>
------ दोघांचेही अभिनय कौशल्य वाखाणण्यासारखे आहे... लाजबाब.

<< राजकीय पोस्ट खूप झाल्या की मी धाग्यावर वाचनमात्र होतो. >>
----- त्याचप्रमाणे मायबोलीवर निव्वळ वाचनमात्र रहाण्यासाठी काही निकष आहेत का ? Happy
मायबोलीकर तशी परिस्थिती निर्माण होण्याचे टाळतील.

Pages