चिनी माल बहिष्कार - भारताचा पहिला अधिकृत दणका - ५९ चिनी अॅपवर बंदी

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 June, 2020 - 12:05

भारत सरकारने टिकटॉक. युसी ब्राउजर, कॅम स्कॅनर .. तब्बल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.

आजवर फक्त व्हॉटसप फॉर्वर्डमध्येच हे आवाहन ऐकत असल्याने कधी सिरीअसली घेतले नव्हते. कारण दोन्ही बाजूने बोलणारे लोकं होते.

पण आता सरकारनेच अधिकृतरीत्या बंदी घालून चिनी माल बहिष्काराला एक दिशा एक वजूद दिलेय असे वाटते.

आज पासून नो हिंदी चिनी भाई भाई !!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन पायलट २६ व्या वर्षी खासदार . बत्तीसाव्या वर्षी केंद्रात मंत्री, ३६ व्या वर्षी राज्य संघटनेचा अध्यक्ष .४० व्या वर्षी उपमुख्यमंत्री झाले. याला पुढे जाणं म्हणत नाहीत?

सिंदियाची रेषही फार वेगळी नाही.

सिंदिया भाजपला जाऊन मिळाले. यांना काँग्रेसचं अध्यक्ष करायला हवं होतं?

देश वाचवायचा विचार करा. काँग्रेस बुडल्याचं सोयर सुतक ठेवायची गरज नाही. की देश वाचवायची जबाबदारी विरोधी पक्षावर आहे? (भाजप नेते आणि न्युज चॅनेल्सचा विचार कराल तर हो. तुमचं ही तेच मत असेल तर आनंद आहे.)

विरोधी पक्ष सक्षम नसेल तर काय होते हे याचे इतिहासात अनेक दाखले आहेत
मोदी नकोच आहेत
पण मोदी नाहीत तर दुसरे कोण हे ही बघावेच लागेल ना
मोट बांधलेल्या पक्षाचे सरकार आणि त्यांचा सावळा गोंधळ हाही बघून झालाय
त्यामुळे सद्य स्थितीत काँग्रेस ला पर्याय नाही
स्थानिक राजकीय पक्ष हे त्यापेक्षा वाईट

केंद्रातल्या संयुक्त सरकारांची कामगिरी एकपक्षीय सरकारांपेक्षा पुष्कळ चांगली आहे.

उदा - राजीव गांधी आणि मोदी वि नरसिंह राव, देवेगौडा ते मनमोहन.

जगात सगळीकडेच उजव्या विचारांना बहुमत मिळून मूल्यांचा र्‍हास होत असताना बहुमत नसणे हेच उत्तम वाटते. तोच कोणावरही अंकुश ठरेल.
--------------
सगळी जबाबदारी विरोधी पक्षावर ढकलून मोदींचे पाठिराखे त्यांच्या कृत्यांपासून नामानिराळे राहू शकत नाहीत

लोल. पंतप्रधान कोण आहे? बहुमत कोणाकडे आहे? शब्द फिरवून वाद घालायचं नाटक करता येईल. त्याला फार डोकं लागत नाही.
देशाचं जे काही होतंय आणि होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल.

मी सांगितलं तसं काँग्रेस पक्षाचं सोयर सुतक इतरांना असायचं कारण नाही. योगेंद्र यादव म्हणतात तसं लेट काँग्रेस डाय हा मंत्र जपा.

दुसरीकडे भाजपची सगळी यंत्रणा ( पक्ष पदाधिकारी, मंत्री, न्युज चॅनेल्स ते सोशल मीडियावरचे फुट सोल्जर्स ) + सरकारी यंत्रणा गांधी परिवाराच्या मागे लागते याचं कारण उघड आहे. तेच भाजपच्या फॅसिस्ट विचारांचे खरे विरोधक आहेत.

मोदी फॅसिस्ट आहेत.

मोदी फॅसिस्ट आहेतच.

मोदी फॅसिस्टच आहेत.

मोदी फॅसिस्टच आहेतच.

मी म्हणतो मोदी फॅसिस्ट आहेत.

मी म्हणतोय मोदी फॅसिस्ट आहेत म्हणजे ते आहेतच.

मी म्हणतोय मोदी फॅसिस्ट आहेत म्हणजे ते आहेतच आणि तुमचंही मत हेच असलं पाहिजे.

मी म्हणतोय मोदी फॅसिस्ट आहेत म्हणजे ते आहेतच आणि तुमचंही मत हेच असलं पाहिजे कारण मी म्हणतोय मोदी फॅसिस्ट आहेत.

मी म्हणतोय मोदी फॅसिस्ट आहेत म्हणजे ते आहेतच आणि तुमचंही मत हेच असलं पाहिजे कारण मी म्हणतोय मोदी फॅसिस्ट आहेत आणि म्हणूनच अर्थात दुसरं कुठलंही मत चालणार नाही.

मी म्हणतोय मोदी फॅसिस्ट आहेत म्हणजे ते आहेतच आणि तुमचंही मत हेच असलं पाहिजे कारण मी म्हणतोय मोदी फॅसिस्ट आहेत आणि म्हणूनच अर्थात दुसरं कुठलंही मत चालणार नाही कारण मी विचारस्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो म्हणून मी म्हणतो मोदी फॅसिस्ट आहेत हे तुम्ही स्विकारलंच पाहिजे.

भारताचा आणखी एक मित्र देश मोदीं च्या कर्तबगारीने दुरावला
Lord Ram was Nepali, India set up a 'fake Ayodhya', claims Nepal PM KP Oli
Alleging that India encroached the cultural facts of Nepal, Oli said that India has created a 'fake Ayodhya'. He also said that Lord Ram was a Nepali and not from India.

स्वतः दिवसरात्र चीनी व्हिडियो बघत रममाण राहणार्‍या आणि त्याची जाहिरात करून इतरांना ते पाहायला उद्युक्त करणार्‍यां कडून आणखी वेगळी अपेक्षा नाही.

रच्याकने, मी हल्ली माउंटन फेअरीचे व्हिडिओ बघते. शुद्ध देशी हिमाचली मुलीने केलेले व्हिडिओज आहेत. तुम्हीही बघा. आवडतील आणि मन शांत होईल.

इराणने भारताला मोठा झटका दिला आहे. चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे. अफगाणिस्तान सीमारेषेलगत हा रेल्वे मार्ग उभारला जाणार होता. भारताकडून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तसंच निधी मिळण्यास विलंब होत असल्याचं इराण सरकारने सांगितलं आहे. इराणने आता स्वत:च हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द हिंदू’ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

एकदम उत्तम ,
चीन आणि इराण ची दोस्ती झाली चांगलेच आहे , आपले पैसे ही वाचले .
एकीकडे पाकिस्तान च्या पुढे भीक टाकायची त्याच वेळी उघीर लोकांची नसबंदी करायची , त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य खुंटीला टांगायचे ! अशी सर्कस करणार चीन इराण ला जवळ वाटतोय हे इराण ची परदेशनिती फसल्याचे उत्तम उदाहरण आहे . आणि अमेरिकेला नेस्तनाबूत करण्यासाठी इराण ला गाजर दिले असेल .

पाकिस्तान मधील गरीब घरातील मुलींना चिनी वाम पंथी लोक वेश्याव्यवसाय मध्ये ढकलत आहेत आणि पाकिस्तानी मात्र सतत मेरे आका !मेरे अका !! टाहो फोडत वाम पंथी चीन चे पाय डोक्यावर घेत आहेत .
उकळ्या फुटणारे मात्र शोधून शोधून बातम्या आणत आहेत.
जरा चांगल्या देशांची तरी उदाहरणे देत जा !!!

ज्या देशात वाम पंथीय पक्ष देश चालवतोय आहे , अशा वाम देशाचे कौतुक कसं काय लोकं करतात देव जाणे ?

उकळ्या फुटणारे मात्र शोधून शोधून बातम्या आणत आहेत.
जरा चांगल्या देशांची तरी उदाहरणे देत जा !!!>>>>>> आतापर्यंत जमले नाही मग पुढे कसे जमणार? मोदींची कशी फजिती झाली या आनंदातच हे लोक मश्गुल असतात. Proud

काये, यांचा भारत आहे ना तो फक्त आणी फक्त सोनियाचा दिनु आणी सोनियाचा आहे. आणी मोदींचा भारत हा कुठे अस्तित्वातच नाही.

परवाच साम की एबिपी माझा वर बातमी दाखवली की या पिचपिच्यांनी जगभरात नऊ कोटी पुरुष व महिला गुप्तहेर नेमलेत. यांच्या सडक्या मेंदूच्या बायका विदेशी नागरीकांना जाळ्यात ओढतात, मग त्यांना ब्लॅकमेल करुन हे पिचपिचे माहिती गोळा करुन कंपन्या किंवा धंदे टेक ओव्हर करतात. चांगला धंदा चालू आहे यांचा. दुसर्‍यासाठी कबर खोदणारे कधीतरी त्या खड्ड्यात पडतीलच. देवाची काठी दिसत नाही पण चांगलीच वाजते.

काये, यांचा भारत आहे ना तो फक्त आणी फक्त सोनियाचा दिनु आणी सोनियाचा आहे. आणी मोदींचा भारत हा कुठे अस्तित्वातच नाही.>>हाहाहा मस्तच

१९४७ पासून आशिया खंडातील छोटे छोटे देश कुठल्या कुठे गेले ! आणि आपण कुठे आहोत !!!

भारतात अजुन हि ७० % टक्के लोक ना रोजच्या जेवणाचा व रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे मात्र कार्यकर्ते नेत्यांना दोषी न ठरविता रोजगार हमी योजना किती उपयोगी आहे याचे
महत्व सांगत असतात .
दर वर्षी भरपूर पाऊस होवून सुध्दा शेतकरी आणि शहरी नागरिक यांचा पाण्यावरून संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही . बरं इस्रायल मध्ये आपल्या पेक्षा कमी पाऊस होवून देखील तो देश पाण्याबाबत समाधानी कसा ? याचा शोध घेण्यासाठी मंत्री मंडळ , खासदार आणि आमदार यांच्या किती तरी वेळा कमिटी स्थापन करून इस्रायल चा दौरे करून ऐश करून आले , पण पाण्याचा प्रश्न तसाच .
भारतात सक्षम लोकशाही असती आणि गांधी फ्यामिली ने इतक्या दिवस भारतावर राज्य केले नसते तर कदाचित प्रगती अजुन जास्त झालेली दिसली असती .
इतक्या दिवस फळे ओरबडली तर लोक जाब विचारणारच !!!
बरं राजपुत्र एकदा ' मला अध्यक्ष करू नका ' असे चार सल्लगारा च्या हातापाया पडून सांगत होता ! शेवटी तो महिनाभर रुसून बसला !!!!!
काय वर्णावे त्या वेळची अवस्था Happy
जणू काही काँग्रेस आणि राजपुत्र शिवाय भारताला तरणोपाय नाहीच अशी कार्यकर्त्यांची अवस्था झालेली .
हेड ऑफिस बाहेर राजपुत्र साठी मोर्च्यांचे लोंढे येत होते विशेष म्हणजे सल्लागार अहमद पटेल सुद्धा एका मोर्च्यात दिसले होते Happy

शेवटी कार्यकर्त्यांचा मान ठेवण्यासाठी राजमाता पुन्हा एकदा अध्यक्ष झाल्या ! तेंव्हा कुठे कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला .

खरेच खूप मनोरंजन केले आहे काँग्रेस आणि राज परिवार ने Happy

>>सचिन पायलट २६ व्या वर्षी खासदार . बत्तीसाव्या वर्षी केंद्रात मंत्री, ३६ व्या वर्षी राज्य संघटनेचा अध्यक्ष .४० व्या वर्षी उपमुख्यमंत्री झाले. याला पुढे जाणं म्हणत नाहीत?

सिंदियाची रेषही फार वेगळी नाही. >> सो? पुढे जायचे पंख छाटले जाताहेत किंवा पुढे जायला भवितव्य नाही असं वाटू लागणं काडिमोड घ्यायला पुरेसं आहे. आणि हे न वाटू देणं हे मॅनेजमेंटचं काम आहे. कॉर्पोरेट मध्ये असंच असतं ना? राजकारण हे करिअर सारखं आहे ना?
मामींच्या रागा पोस्टशी बर्‍यापैकी सहमत. मोदी अजिबात आवडत नाहीत आणि त्यांचा आलेख अत्यंत निराशाजनक आहे. पण दुसर्‍या पार्टीतुन माणसे घेणे यात काही वावगं नाही. ती येऊ इच्छितात याचं कारण दोन्हीकडे तपासावं. तो दुपदरी मार्ग आहे आणि जायची इच्छा असल्याशिवाय कोणी खेचुन घेऊ शकत नाही.

<परवाच साम की एबिपी माझा वर बातमी दाखवली की या पिचपिच्यांनी जगभरात नऊ कोटी पुरुष व महिला गुप्तहेर नेमलेत. यांच्या सडक्या मेंदूच्या बायका विदेशी नागरीकांना जाळ्यात ओढतात, मग त्यांना ब्लॅकमेल करुन हे पिचपिचे माहिती गोळा करुन कंपन्या किंवा धंदे टेक ओव्हर करतात>

नेपाळमधल्या चीनच्या राजदूत बाईंनी नेपाळच्या पंतप्रधानांना आपल्या जाळ्यात ओढलंय अश्या बातम्या (यांचा सोर्स कोण हे सांगायला नकोच) भारतीय न्युज चॅनेलनी चालवल्या. या ब्लॅकमेलमुळेच नेपाळचे पंप्र चीनवि रुद्ध बोलत नाहीत म्हणे. (तसे तर भारताचे पंप्रसुद्धा चीनविरुद्ध काही म्हणजे का ही बोलत नाहीत. ; )

सांगायची गोष्ट ही की या असल्या बातम्या बघून नेपाळच्या केबल वाल्यांनी भारतीय न्युज चॅनेल्स दाखवणार नाहीत असा निर्णय घेतला.

तुम्ही जे पिचपिच्या असं लिहिता त्याला रेसिझम म्हणतात. पण ते सांगून उपयोग नाही. कारण, "आम्ही नाही का काळ्या रंगाच्या सौथ इंडियन्ससोबत राहत ? मग आम्ही वर्णद्वेष्टे कसे असू असं विचारणार्‍या भाजपच्या तुम्ही पाठिराख्या आहात.

काँग्रेस मधून भाजपात गेलेले पुढील नेते मुख्यमंत्री झाले
आसाम - हिमंत बिस्वा सर्मा
मध्य प्रदेश - सिंदिया
महाराष्ट्र - नारायण राणे
कर्नाटक - एस एम कृष्णा.

काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता नाही तेव्हा जिथे लोण्याचा गोळा मिळेल तिथे जावे असा विचार असणारे लोक जितक्या लवकर काँग्रेस सोडून जातील तितकं बरं. पुढचा नंबर मिलिंद देवरांचा आहे.

वर संजय झाचा उल्लेख झाला. काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं म्हणून त्यां ना पदमुक्त केलं असं म्हटलं गेलं.
अशा सगळ्या पक्षसोड्यांचा इतिहास पाहिला की पक्ष सोडा यच्या आधी ही मंडळी पक्षाच्या धोरणावि रोधात बोलू लागतात हे दिसतं. सिंदियांची मे २०१९ पासुनची वक्तव्य साक्ष आहेत.

Pages