विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहूल, विराट, धोनी व बुमराह अपरिहार्य>> रोहितचे एक नांव घालावे लागेल ह्यात आघाडीला दुसरा पर्याय नाही राहुल सोबत.. Wink

केदार अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करत नाही आहे. अफगाणीस्तान व इंग्लंड विरूद्ध खूप संथ खेळ. कर्णधाराचा त्याच्या गोलंदाजीवर विश्वास नाही. केदारराव तुम्हीच विचारा ना विराटला असे का? >> ६८ बॉल ५२ संथ (२२७ मधे)

इंग्लंडला तो आला तेव्हा ३० बॉल ७० होते .

स्टॅट्सवर बोला विक्रमसिंह राव Happy

६८ बॉल ५२ संथ (२२७ मधे)>> मॅच हरायला आलो होतो. १५० वर ५ असताना ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजने निदान तिनदा तरी ३०० पर्यंत्/वर स्कोर खेचलाय. नुसता डाव सावरणे हे समाधान देणारे नाही. माझे आधीही म्हणणे होते आणि आहे. विकेट डिफिकल्ट असेल तर केदार हवा. पण ३२५++ असेल तर ५ आउट १५० नंतर आपण मॅच खेचू अस सध्या तरी वाटण्यासारखी परिस्थिती नाही.

इंग्लंडला तो आला तेव्हा ३० बॉल ७० होते . >> मान्य, पण म्हणूनच १३ बॉल १२ पचत नाही. आणि पाचच विकेट गेल्या असताना. १३ बॉल २५ तरी निदान.

केदारसुद्धा अनफिट आहे की काय मला शंका येतेय. मिसफिल्ड करतोय, कॅचेस सोडतोय. फार नाही पण तरीपण असे पूर्वी त्याच्या कडून होत नव्हते.

*रोहितचे एक नांव घालावे लागेल ह्यात आघाडीला दुसरा पर्याय * - क्षमस्व. मला राहूल नाही, रोहितच म्हणायचं होतः. टायपिंग चूक.

पंत
शर्मा
कोहली
कार्तिक
धोनी
पांड्या
जडेजा
कुमार
शामी
चहल
बुमरा

हा माझा संघ आजच्या सामन्यासाठी !!!
भुवनेश्वर फिट नसेल तर कुलदीप.

केदार चौथा आला तर तो एक ऑप्शन चांगला आहे. पण आता पर्यंत धोनी, पांड्या, राहूल असे पर्याय झाले आहेत. याचा अर्थ संघ व्यवस्थापनाचा केदारवर विश्वास नाही.

केदारकडे निव्वळ फलंदाज म्हणून का पहात नाही याचे आश्चर्य वाटते.. त्याला आधी पाठवायला हवे. ४ थ्या क्रमांकावर. मुळात तो गोलंदाज नाही. एक बदल किंवा साईड बदलून देण्याच्या उपयोगाचा गोलंदाज त्यात चुकुन बळी मिळतात काहीवेळा ह्याला नशिबाने बर्‍याचदा मिळाले. मुळात हा यष्टीरक्षक फलंदाज महाराष्ट्र संघातील. त्याच्यातल्या फलंदाजाला हवा तितका वाव नक्कीच नाही मिळाला आजवर.
राहुल अजिबात खंबीर वाटला नाही अजुन पर्यन्त, जरी एक दोन अर्धशतक वा ३०-४० केले तरी. रोहितने आता पर्यन्त ४४० धावा जमवल्यात परंतु सुरुवातीची नशिबाची साथ मिळाली तिनही शतकी खेळ्यात मिळालेली आणि एकदा अश्वासक सुरुवात केली तर नशिबाने साथ न दिल्याने तिसर्‍या पंचांनी बाद केले. तसे पाहता कोहली सोडल्यास खंबीर उभा राहून खेळेलच ही खात्री वाटेल खेळायला आल्या पासून असा एकही फलंदाज संघात नाही हे माझे निरिक्षण.

दोन अपेक्षित बदल भुवी आत कुलदीप बाहेर.. कार्तिक आत जाधव बाहेर... तीन यष्टीरक्षक कायम संघात.. Happy

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी.

लोकेश राहुल साठी ही शेवटची संधी असावी. आज चांगली बॅटिंग केलीच पाहिजे त्याने आणि कॅचेस घेतलेच पाहिजेत...

आत्ता पर्यंत 3 हलवे टाकलेत त्याने ...

राहुल कंसिस्टंटली फेल गेलाय , पण त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही
>>>
बोला ना मै...

याचा अर्थ संघ व्यवस्थापनाचा केदारवर विश्वास नाही.>>>
लोकेश राहुल साठी ही शेवटची संधी असावी>>>

राहुल कोहलीचा लाडका आहे. त्याला संघात फिट करण्यासाठी इतरांच्यावर अविश्वास.
शेवटची संधी सलामीला. आजही फेल गेला तर पुढच्या सामन्यात मयांक आगरवालला ओपन करायला पाठवून राहुलला ४थ्या नंबरला आणातील.

गेलं वर्ष दीड वर्ष टीममधे राहुलला खेळवायचंच हा कोहलीचा अट्टाहास सुरू आहे.

आज ज्या न्यायानी केदारला बाहेर ठेवलं तोच न्याय धोनीला का लावला नाही??

आज ज्या न्यायानी केदारला बाहेर ठेवलं तोच न्याय धोनीला का लावला नाही??>> ग्राउंडवर थोडा थंड मेंदूही लगतो याची विराट आणि रवी ला कल्पना आहे. Happy
आज व्हॉअ‍ॅ वर एक चांगला होता.
भारतीय टीम मधील अपेक्षित बदल. धोनीच्या जागी कार्तिक कीपर. शास्त्रीच्या जागी धोनी कोच. आणि मांजरेकरच्या जागी शास्त्री कोमेंट्री साठी. Happy

काय हे . महान बॅटिंग चे १२ वजले पुन्हा. ४-५ ओवर्स च्या आधी ३५०-७५ ची स्वप्नं बघत होते, आता मला २७५ ची चिंता वाटू लागली आहे Uhoh

जलदगती गोलंदाजांच्या त्याच खेळपट्टीवर फिरकी स्पेशालिस्ट भारतिय फलंदाजीसमोर शकीबने १० षटकात केवळ ४१ धावा देऊन पंतला टिपले.....

धोनी ३ वेळा एकेरी धाव नाकारून शेवटी झेल देऊन परतला... समोरच्या खेळाडूच्या हातात बॅट आहे हे माहिती नसते का त्याला?
शेवटच्या षटकात केवळ ३ धावा झाल्या... आणि ३ बळी गेले.....

कोहलीला सध्या बांगलादेश विरूद्ध काय प्रॉब्लेम आहे? गेल्या ४-५ वर्षांत तो फारसा खेळल्याचे लक्षात नाही त्यांच्याविरूद्ध.

अरे वा, आज ३-३ यष्टीरक्षकांना घेउन खेळले!
मला अजून धोनीचे संघातील स्थान समजत नाहिये. पंत धोनीपेक्षा वेगाने/आत्मविश्वासाने खेळतोय. तो यष्टीरक्षणपण साधारण तितक्याच सफाईने करतो (थोडा मागे असेल). मग धोनीऐवजी पंतच का मुख्य यष्टीरक्षक म्हणोन खेळवत नाहीत? धोनीपेक्षा चांगला फलंदाज खेळवता येईल ना त्यामुळे.

मी क्रिकेट धाग्यावर काही महिने आधीच धोनी आणि त्याच्या फलंदाजीविषयी लिहिले होते. पण तेव्हा कोणीच ऐकायला तयार नव्हते. त्याच्या फलंदाजीमुळे आपण चांगल्या गोलंदाजीसमोर बाद फेरीत हरू, ही माझी तेव्हाची भीती आता जास्तच जोर धरून आहे.

जलदगती गोलंदाजांच्या त्याच खेळपट्टीवर फिरकी स्पेशालिस्ट भारतिय फलंदाजीसमोर शकीबने १० षटकात केवळ ४१ धावा देऊन पंतला टिपले..... >> आपण फिरकी स्पेशालिस्ट होतो.

भारतीय संघाचा मोमेंटम त्या अफगाणिस्तान विरुद्ध च्या मॅच नंतर सॉलिड गंडलाय. पहिल्या ३ मॅचेस विश्वविजेत्याच्या थाटात खेळल्यावर आता मॅचगणिक अडखळणं वाढलय. कुठल्यातरी मार्गानं हा मोमेंटम परत मिळायला हवा.

दुसरं म्हणजे गेल्या कित्येक मॅचेस मधे (वर्ल्डकप च्या आधीपासून) भारताकडून कुणी डायरेक्ट हिट करून रन-आऊट केल्याचं पाहिलं नाहीये. शास्त्रीगुरूजींनी तो विषय ऑप्शन ला टाकलाय का?

*शास्त्रीगुरूजींनी तो विषय ऑप्शनला टाकलाय का?*- आपलं क्षेत्ररक्षण इतकं चांगलं होत असताही, त्याच्यातही आतां उणीवा काढून काय साध्य करायचंय? या धाग्यावर कुणालाच या संघाचं कौतुक करणयासारखं कांहींच दिसत नाही का ? त्या रोहितने तीन शतकं झळकावलीं तरी त्याचंही अप्रूप नाहीं . उलट, कुतसितपणा सुरूच ! कां इतकं नकारात्मक असावं आपण आपल्याच संघाबद्दल ! अहो, तो जाॅणटी रहोडसही म्हणतो इंडिया फायनलला येईलच व त्यात त्यांच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाला मोठं श्रेय असेल !!

*भाऊ चार शतकं.* - चौथ्यावर अजून ही कुसकी काॅमेंट यायची आहे - ' ह्या: ! तो सुरवातीचा झेल सुटला म्हणून.. ' !!

Pages