विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयंक अगरवाल Lol Lol
मग रायडू चे काय त्याला डावलून विजय शंकरला घेतलेला ना? अगरवाल मधूनच कसा ऊगवला?
Indian dressing room is in great panic Lol

तुम्ही मॅचेस का जिंकलात हेच तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही का हरलात हे तुम्हाला कसे कळणार Proud

मला वाटतं आगरवाल ला निवडण्यात शंकरच्या दुखापतीइतका नसला तरी थोडा वाटा राहूल च्या कालच्या इंज्युरीमुळे तिसरा ओपनर निवडण्याचा असावा.

बांग्लादेश मॅच आणि दुसरी सेमी फायनल (बहुतेक ईंग्लंड विरुद्धच) कालच्याच बर्मिंगहॅम ग्राऊंडवरच होणार आहे तर मग लेगसाईड ५९ मीटर बाँड्रीचा फटका पुन्हा दोन्ही स्पीनर्सना बसणार नाही का? स्पीनर्स न घेण्याचे अजून एक कारण. बाँड्री साईझचा हा मुद्दा आपल्या डेटा क्रंचर्स आणि स्टॅट्स गुरूंना आधीच कसा लक्षात आला नाही हे एक नवलच म्हणावे लागेल.

भाऊ तुमच्या माहिती करता
२०११ चा वर्ल्डकप आपण तीन पेसर एक ऑफ स्पीनर आणि १ ऑलराऊंडर घेऊनच खेळलो होतो आणि ते सुद्धा भारतात - झहीर, श्रीसंत, मुनाफ (मिडीअम), हरभजन आणि युवराज.
२०१५ चा वर्ल्डकप सुद्धा आपण तीन पेसर एक ऑफ स्पीनर आणि १ बोलर कम ऑलराऊंडर घेऊनच खेळलो होतो आणि ते सुद्धा ऑस्ट्रेलियात - ऊमेश, शमी, मोहित (मिडीअम), अश्विन आणि जडेजा.

दोन स्पीनर्स बद्दलचे हे ऑब्सेशन २०१७ चँपिअन्स ट्रॉफी नंतर चालू झाले आणि आपण त्याच्या प्रेमत एवढे बुडालो आहो की, विटोरी म्हणाला तसं
They have become victim of their own success.

तर मुद्दा असा की तीन पेसर्स घेऊन खेळणे म्हणजे ईतर देशांचे अनुसरण करतोय ही तुमची समजूत अयोग्य आहे. २०११ आणि २०१५ पेक्षा आज आपले बोलर्स कायच्या काय टॅलेंटेड आणि ईफेक्टिव आहेत आणि बॅट्समन सुद्धा. टीम ईंडियाच्या सगळ्या डिसेजन मेकर्सना ह्या स्पिन-ट्विन प्रेमातून बाहेर पडायला पाहिजे.

ऊद्याच्या मॅचसाठी माझी टीम
राहूल, रोहित, विराट, पंत, कार्तिक, धोनी, पंड्या, जडेजा, भुवी, बुमरा, शमी.
(नंबर ९ पर्यंत बॅटिंग लाईन-अप)

चहलला आत घ्यायचे असेल तर धोनीला बसवणे योग्य.

*आता तो ईग्लंडमधल्या वेट आणि स्पंजी ट्रॅक्स वर मागच्या सात मॅच चालला नसतांना ईथून पुढे चालेल असे तुम्हाला का वाटते?* - अफगाणिस्तानने फिरकीच्याच जोरावर भारत व पाकिस्तान या फिरकीबहाद्दर देशांच्या सघांच्या तोःडाला फेंस आणला, तो इंग्लंडच्या याच टरॅकसवर ना. *काय शक्यता? * अशाच शक्यता.
तीन पेस गोलंदाज घेण्याबद्दल आक्षेप नाहीच. भुवीचा कदाचित फिटनेसचा प्रोब्लेम असावा.
*-- द्रुतगती' शब्द शंभरवेळा लिहायला सांगून त्याची फिरकीच घेतो. * - र्‍हस्व आणि दीर्घच्या चूका काढणं व दुरूस्त करून घेणं यावरच लक्ष केंद्रित करून, त्या नातवाची दुर्मिळ अशी भाषेची जाण व लेखनशैली दुर्लक्षित करणं, हें शहाणपणाचं वाटतं का ! Wink

My thread?? ओह, मी धागा उघडला म्हणून का? अर्थात हा "माझा" थ्रेड नाही. भाऊ, असामी, फेफ, त्रिविक्रम, स्वरूप, अँकी, फा, भा, कृष्णा, (इथे नसलेला) केदार हेच खरे क्रिकेट थ्रेडचे मानकरी. मला ह्यांच्या चर्चा वाचायला आवडतं. त्यामुळे चर्चा आता पुढे सरकू देत इतकच. Happy
तू ट्रोलिंग करत होतास हे मान्य केलस हे काय कमी आहे.. Proud
असो. and yes Go team India!!

पंत जर धोनीपेक्षा चांगला खेळत असेल तर धोनी टिममध्ये राहण्याचे प्रयोजन काय? विकेटकिपर म्हणून पंत काय धोनीपेक्षा खूप वाइट नाहिये. आणि धोनीच्या विकेटकिंपीगमुळे होणार इम्पॅक्ट व पंतच्या फलंदाजीमुळे होणारा इम्पॅक्ट यात वरचढ काय?

मी तू दिलेल्या यादीतल्या कुणाचाही हात धरलेला नाही लिहू नका म्हणून आणि तुला ह्याच लोकांची चर्चा हवी होती तर तसे स्पष्ट लिहायचे होतेस.
मी क्रिकेट शिवाय एकही वाक्य दुसर्‍या विषयाबद्दल लिहिलेलं नाही की दुसर्‍या मुद्द्यावर चर्चा करू नका असेही कुणाला म्हणालो नाही.

तू ट्रोलिंग करत होतास हे मान्य केलस हे काय कमी आहे.. Proud >> Whatever makes you happy. I know where you are coming from.

मला तुझाशी वाद घालायचा नाही. वरच्या यादीतल्या लोकांच्या चर्चा मला आवडतात एव्हडच मी लिहिलं आहे.. मुकुंद, टण्या, मैत्रेयी, हिम्या आणि तू सुद्धा (कधीकधी किंवा नेहमी) क्रिकेट बाफवर लिहिता पण ती यादी मला त्यावेळी ज्यांची नावं तेव्हा आठवली तशी लिहिली. मी तेव्हड्यांचीच चर्चा हवी होती असं कुठेही म्हटलेलं नाही. असो. ह्या विषयावरचं इथलं हे माझं शेवटच पोस्ट.

हा धागा तू ऊघडला आहेस म्हणून तू ईथे कोणी लिहावे, काय लिहावे, किती लिहावे ह्याचे मॉडरेशन करत आहेस असे मला वाटले.
जर तसे नसेल तर जोपर्यंत तुझ्याकडे क्रिकेटबद्दल बोलायला काही नाही तोपर्यंत तू तुझं तोंड बंद ठेऊ शकतोस की.

अग, माबोच्या धाग्यावरही पोस्टींची अतिवृष्टी झाली तर
चर्चेची गाडी रुळावरून घसरतेच !20190115_202756.jpg

काय भारी झाली मॅच- श्रीलंका-वेस्ट इंडिज.
निकोलस पुरन ने जवळजवळ एकट्याने खेचली होती मॅच. पण २ वर्षांनी कमबॅक करणाऱया एॅंजेलो मॅथ्यूजने गंडवलं !
आता जिंकणं अवघड आहे वेस्ट इंडिजचं..

स्टोक्सची खेळी हे अजून एक महत्वाचे कारण. तो येई पर्यंत आपण बर्‍यापैकी लगाम घातला होता. आणि आपल्यात स्टोक्स नव्हता. >> You nailed it. That was real difference maker. That took target out of our reach. जाधवला अजिबात न वापरण्याचे दिलेले कारण अजिबातच पटले नाही. कालच्या मॅच मधे काय बदल करायला हवेत हे बाद फेरीच्या आधी लक्षात आले हे योग्यच झाले.

मला वाटतं आगरवाल ला निवडण्यात शंकरच्या दुखापतीइतका नसला तरी थोडा वाटा राहूल च्या कालच्या इंज्युरीमुळे तिसरा ओपनर निवडण्याचा असावा. >> हे अगदीच obvious होते. शास्त्री किंवा कोहलीने धोनीचा बॅकप ह्यापलीकडे कार्तिक कडे बघायचे नाही असे ठरवल्यावर ओपनर म्हणून अग्रवाल किंवा शॉ कडे मोर्चा वळणार हे उघड होते. पंत ला आणले तसे शॉला आणतील असे वाटलेले पण त्याच्या साईड ऑन शॉटस खेळण्याच्या शैलीमूळे इंङ्लंड मधे नको असे विचार केला असेल का ?

"दबावाखाली यॉर्करऐवजी शमीकडून फुलटॉस टाकले गेले आणि आखूड टप्प्याचे चेंडूसुद्धा. पण त्या फॉर्मातही बेन स्टोक्स जसप्रीत बुमराला ठोकून काढू शकला नाही. म्हणून जसप्रीत बुमरा मोठा. त्याचा वेगातला आणि टप्प्यातला बदल वेड लावतो."

द्वारकानाथ संझगिरी ह्यांच्या लेखातल हे वाक्य पटलं अगदी.

शॉ ऑस्ट्रेलियातल्या इंज्युरीनंतर फारसा खेळलेला नाहीये. आगरवाल चे लिस्ट ए चे आणी मागच्या वर्षीचे इंग्लंड मधले ए टीम कडून खेळतानाचे स्टॅट्स चांगले आहेत. ह्यासगळ्या फॅक्टर्स मुळे आगरवाल ची शॉ च्या आधी निवड झाली असावी.

उद्या भारतानं पाच बॉलर्स खेळवले तर बरं होईल. जाधव ऐवजी जडेजा आणी चहल/यादव ऐवजी भुवनेश. बघू काय होतं ते.

आज मला नाही वाटत फारसे बदल करतील. कुलदीप किंवा चहल च्या जागी फिट असल्यास भुवी येईल. जर राहुल खेळू न शकल्यास तो एक बदल अग्रवाल पोहचला असल्यास तो किंवा कार्तिक. कार्तिक खेळल्यास आघाडीला पंतला पाठवतील .. केदार ऐवजी जडेजा शक्यता कमी वाटते कारण बांग्ला डावखुरी फिरकी बर्‍यापैकी खेळू शकतील पण दोन फिरकी हवेतच असे असल्यासच जाडेजा येऊ शकतो. आणि केदार व धोनीचे मागच्या डावातील संथ खेळणे ( टॅवरेगिरी) हे ५० षटके खेळून काढायचे आणि कमी फरकाने हारायचे हे शास्त्रीच्या इतिहासाला धरून होते असे मला वाटते.

विंडीज ची आजची बॅटिंग पाहून १९९५ मधली शारजा ची गेम आठवली. क्रिकइन्फो वर सुद्धा कोणीतरी आठवण काढली आज. विंडीज ने ३३३ मारल्यावर हसन तिलकरत्ने ने एक दोन भागीदार्‍या करत शेवटपर्यंत खेचून जवळजवळ जिंकली होती. ३२९ झालेले असताना त्याने मारलेल्या शॉटवर बाउण्डीलाइन वर कोणीतरी कॅच घेतला होता - नाहीतर त्याच शॉट वर ते जिंकले असते. त्यावेळेस फार वाइट वाटले होते लंकेबद्दल - एकतर तेव्हा विंडीज चा दबदबा अजूनही शिल्लक होता आणि लंका तोपर्यंत फारशी यशस्वी नव्हती.

ही ती मॅच १९९५ ची. हे स्कोअरकार्ड आता पाहताना जाणवते की पठ्ठ्याने शारजा च्या उन्हात तब्बल ७८ रन्स पळून काढले होते आणि तरीही १०६ बॉल्स मधे १०० मारले होते.

कल्पना करा - हे १९९५ मधले ३३३ होते. त्याकाळात भारताचा वन डे मधला सर्वोच्च स्कोअर २८१ होता. १९९८ मधे भारताने पाक विरूद्ध ३१८ चेस केले तोपर्यंत इतके मोठे स्कोअर सहसा चेस होत नसत. त्या पार्श्वभूमीवर ही किती भन्नाट मॅच असेल याची कल्पना येते.

"There is such a fine line between agony and ecstasy!" असे कोणीतरी कॉमेण्टेटर म्हंटलेला अजून लक्षात आहे त्या मॅच मधे. विंडीज च्या बाबतीत इथे इतके एका शॉट इतके क्लोज नव्हते पण साधारण तसेच वाटेल (आणि त्यांच्या त्या न्यूझीलंड विरूद्धच्या गेम मधे एकदम चपखल बसेल ते)

मात्र काही महिन्यांतच त्यांनी नंतर वर्ल्ड कप जिंकला.

फा, छान आठवण काढलीस! Happy

कालची विंडीजची फलंदाजी पाहून आपल्या फलंदाजानी किती तोकडे प्रयत्न केले हे जास्त प्रकर्षाने जाणवले...

भाऊ पाउस थांबला बरे. :). काळजी करू नका. आपल्या सगळ्यांचा उद्देश एक आहे हे लक्षात घेतल की झालं. Happy
केदार ऐवजी कार्तिकला संधी. तेवढच हातात आहे सध्या बॅटींगच्या बाबतीत. मयांक लगेच आजच मैदानात उतरवतील असे वाटत नाही.

कुलदीप जरी खूप यशस्वी झाला नसला तरी सेट बॅटसमनला आउट करू शकतो. (बाबर आझम ची विकेट). चँपियन्स ट्रॉफीला आश्विन, बुमरा, जडेजा हे करू शकले नव्हते. लेग स्पिनरला जास्त वेरिएशन एकाच अ‍ॅक्शन मधे शक्य असल्याने ते यशस्वी होत आहेत. कुलदीप व चहल डावे उजवे असल्याने एकाच प्रकारचे आहेत असे म्हणता येणार नाही. जडेजाला घेतील अस म्हणत आहेत पण माझ्यामते ती डिफेन्सिव चाल असेल. त्याची अजून जरूर नाही. कोहलीने मात्र १० ओव्हर्सच्या आधी स्पिनरना आणायला नको. दोनच फिल्डर असताना बाहेर मारण सहज शक्य होत. मग बेअरस्टोव सोकावतो.

तिसरा ओपनर चौथ्या नंबरला खेळतो
रेग्युलर ओपनर इंज्युअर झाल्यावर आलेला बदली खेळाडू (५ मॅचेस खेळलेला) कीपर-मिड्लऑर्डर बॅट्समन
चौथ्या नंबरचा (९ मॅचेस खेळलेला) थ्रीडी ऑप्शन बाद झाल्यावर त्याच्याजागी (टोटल नवखा) ओपनर येतो...

२०१५ वर्ल्डकप नंतर चौथ्या नंबरच्या प्रयोगात सर्वाधिक रन्स करणारा राहणे, हॅम्पशायर डेब्यूला १०० मारतो, सर्वाधिक सर्टनटी असलेला रायडू सब्स्टिट्यूट्समधे नाव असूनही हात चोळत बसतो, एका टी२० इनिंग्ज मुळे लाइमलाईट मधे आलेला डीके थोडेफार मौके मिळूनही वर्ल्डकप मधे अंडी उबवतो अन मनोज तिवारी नी श्रेयस अय्यरचं कुणी नावही काढत नाही.
केवळ कोहलीचा लाडका म्हणून राहुल मात्र चौथ्या नंबरला फ्लॉप होऊनही ओपनर म्हणून टीम मधे स्कोप नसला तरी खाली खेळतो.

एम.एस.के.प्रसाद अन शास्त्रीबुवा नक्की काय खाउन / फुंकून स्ट्रॅटेजी बनवतात कोण जाणे.

मनोज तिवारी नी श्रेयस अय्यरचं कुणी नावही काढत नाही. >> आणि मनिष पांडे

नक्की काय खाउन / फुंकून >> नक्की काय खाउन / फुंकून/ पिऊन Happy

अंबाती रायडू ने निवड समिती विरुद्ध जे काही बोललं होतं कदाचित त्यामुळे त्याचा विचार केला नाही.
श्रेयस अय्यर चा नक्कीच विचार करायला हवा होता.

सगळ्यांचा एवढा केदार वर राग का ? एक ७ धावांची मॅच सोडली तर तो कुठे फेल झाला आहे ?
त्याला बॅटींग मिळालीच नाही तर त्याचा दोष काय ? कोणी सांगेल काय प्लीज ?

केदार अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करत नाही आहे. अफगाणीस्तान व इंग्लंड विरूद्ध खूप संथ खेळ. कर्णधाराचा त्याच्या गोलंदाजीवर विश्वास नाही. केदारराव तुम्हीच विचारा ना विराटला असे का? Happy

धवन व राहूल यांच्या अनुपस्थितीत माझः संघाचं कंपोझिशन - 5 फलंदाज ( धोनी धरून), 2 गोलदाजी करणारे फलंदाज + 4 स्पेशालिस्ट गोलंदाज ( बुमराह धरून). राहूल, विराट, धोनी व बुमराह अपरिहार्य. बाकी निवडीत लवचिकता. जर गोलंदाजी करणारे फलंदाज फिरकी गोलंदाजी करत असतील, तर 3 सपेशालिटी पेस गोलंदाज अपरिहार्य.

Pages