आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता त्रिपुरीपौर्णिमेचा
आता त्रिपुरीपौर्णिमेचा अनुभव
स्थळ तेच कौण्डेश्वर, बदलापूर
प्रमोद केणेंच दिव्यत्वाची जेथ प्रचिती ऐकल्या व वाचल्यापासून आम्ही हा उद्योग आरंभलाय.
मी, मंदार, चंदु नेहमी असतोच, यावेळेस दीपक जो रुद्र म्हणतो, तो ही आलेला.
आम्ही चौघेच होत.
तिथे पोचताच लक्षात आल की वीज नाही व गेल्यावेळसारखा अचानक दिवे लागण्याचा ही संभव नव्हता.
विशेष म्हणजे इतर कुठलाही नसला तरी गाभाऱ्यातला दिवा मात्र मंद लागलेला होता.
याच अजून एक फायदा असा झाला की तिथे रहाणारे कामगार नव्हते पण त्यांची भांडीकुंडी अंथरूण पांघरूण मात्र तिथेच होती.
मंदार म्हणाला"स्वामिंनी सोय केलेय."
नेहमी प्रमाणे रुद्राभिक्षेक, ध्यान धारणा व पोट पूजाही झाली.
थंडी मी म्हणत होती. त्यामुळे खरतर परतीचा विचार रहित करून आम्ही तिथेच राहायचं ठरवलं.
चंदुने शाल आणलेली त्यात शिरून तो माझ्या उजव्या बाजूला गाभाऱ्याजवळ झोपला.
एका मोठ्या गोधडीत मी माझ्या डाव्या हाताला दीपक आणि त्याच्या पलीकडे मंदार असे झोपलो.
"तिथल पाणी कुप्रसिद्ध आहे उगाच इकडे तिकडे जाउ नकोस" ताईने फोन करून तंबी दिलेली.
बर झोपताना मंदारही सांगत होता की त्याचा एक मित्र घाबरलेला त्याला इथे कोणीतरी डोकावून बघताय अस वाटत होत.
झाल याचा परिणाम होउन अस्मादिकांची फाटली.
मला अस वाटलं की साधारण चार पाच जण मिळून गप्पा मारतायत त्यानंतर कोणी तरी काठी टेकत जातय.
ठरवलं की नाही हे सगळे मनाचे खेळ आहेत. दुर्लक्ष केल.
रात्री कधीतरी अतिरेकी भितीने मी चंदुचा हात गच्च पकडला.
त्याने तो अलगद सोडवून घेत, नीट झोप अश्या अर्थी माझा हात थोपटला.
मग मला जाग आली ती सहाच्या गजरानेच.
मी आणि मंदार लगेच निघणार होतो तर चंदु आणि दीपक झोपलेले.
"चंद्या मी रात्री घाबरून तुझा हात पकडलेला." थट्टा होण्यापूर्वी आपणच सांगाव म्हणून मी बोललो.
त्याने शालीतन हात बाहेर काढुन नाही अशी खुण केली. वाटलं झोपेत असेल किंवा गंमत करत असेल म्हणून सोडून दिल.
दुसऱ्या दिवशी मंदारनेही त्याला विचारलं. तो नाहीच म्हणाला. आम्ही पुन्हा भेटल्यावर मी विषय काढला
"तू ऐकलेले माणसांच्या बोलण्याचे आवाज मी पण ऐकले कधी कधी कातकरी रात्रीचे अंघोळीला येतात, पण खात्रीने तू माझा हात पकडलेला नव्हतास कारण एकतर मी पाठीवर झोपतो, थंडीने मी शालीतन हात बाहेर काढण शक्य नाही त्यात तुझ्या माझ्यात अंतरही होत आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे मला झोपच लागली नाsssही."
मग मी चंदुचा हात परत दाबला. तर मऊ नाजूक.
मी धरलेला हात तर मेहनतीची काम व्यायाम करणारा चांगला भक्कम होता.
मग तो हात कोणाचा…
बाप रे गुगु
बाप रे गुगु
बाप्रे! बरं झालं नीट नाही
बाप्रे!
बरं झालं नीट नाही वाचला वरचा प्रसंग पण इतक्यातच अंगावर काटा आलाय
बाप रे! सगळे किस्से भयानकच
बाप रे! सगळे किस्से भयानकच
अवनी ही भयकथा कुणी वाचली आहे
अवनी ही भयकथा कुणी वाचली आहे का ?
जर वाचली नसेल तर नक्कीच वाचा, अप्रतिम आहे.
पहील्या भागाची लिंक देतोय, तिकडे आपणास दुसर्या आणि पुढच्या भागांची लिंक मीळेल.
पहीला भाग
https://manaatale.wordpress.com/2011/04/07/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A8%E...
वाचली आहे......डोक्यात
वाचली आहे......डोक्यात भुणभुणणारा भुंगा ची ना.....मस्त आहे..
नवीन वर्षात आवडीचा धागा वर
नवीन वर्षात आवडीचा धागा वर
भुते बी यायला हवीत ना नवीन
भुते बी यायला हवीत ना नवीन नवीन.:खोखो:
नाथ पाटील धन्यवाद अवनीच्या लिन्कबद्दल. भयकथा मस्त आहे. बाकी निवान्त वाचावे लागेल. सगळे भाग वाचले जबरी आहेत.
<<<नाथ पाटील धन्यवाद अवनीच्या
<<<नाथ पाटील धन्यवाद अवनीच्या लिन्कबद्दल. भयकथा मस्त आहे >>>
इतक्यात वाचलही ???
मी पण वाचली कालच.. मधे मधे
मी पण वाचली कालच.. मधे मधे ब्रेक घेत होत
हो मला ती गोष्ट आवडली आणी
हो मला ती गोष्ट आवडली आणी उत्सुकता वाढल्याने न थान्बता वाचतच गेले.
सध्या भुते सुटटीवर की काय ? ?
सध्या भुते सुटटीवर की काय ? ? ?
माझ्या वडिलांनी अनुभवलेला हा
माझ्या वडिलांनी अनुभवलेला हा किस्सा
माझ्या गावापासुन तिन चार किलोमीटरवर आमची ऊसाची शेती आहे.उन्हाळ्याच्या दिवसात रात्री-अपरात्री ऊसाला पाणी देण्यासाठी वडीलांना जावे लागते.अशाच एका रात्री घडलेला हा प्रसंग.त्या संध्याकाळी वडिलांच्या गावातल्याच एका मित्राच्या नातवाचं बारसं होतं.बाबा तिकडेच गेले होते व तिथला कार्यक्रम आटोपल्यावर तिकडुनच शेतात जानार होते.बाबा शेताकडे जायला निघाले तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते.बाईकवरुन दहा मीनीटात ते शेताजवळ पोहचले.मुख्य रस्त्यापासुन एक छोटा रस्ता शेताकडे जातो.तो रस्ता फार अडचणीचा असल्यामुळे बाबांनी तिथेच रस्त्याकडेला बाईक पार्क केली व टॉर्च घेऊन जवळच असलेल्या शेतात गेले.शेतातलं काम आटोपायला रात्रीचे जवळ-जवळ अडीज वाजले होते.बाबा परत यायला निघाले.तिथुन बाईकजवळ पोहोचायला त्यांना फारतर पाच-दहा मीनीटे लागली असती पण पंधरा-विस मीनिटे चालुनही ते पोहचेनात.हे त्यांच्या लक्षात आले व अचानक त्यांचा स्वतःच्या शरीरावरील ताबाच गेला.वाट सोडुन ते शेतात उतरले व इकडे-तिकडे भटकु लागले.हे सगळं त्यांच्या इच्छेविरुद्ध घडत होतं.त्यांना कळत होतं कि आपण विणाकारण भटकत आहोत पण ते काहिच करु शकत न्हवते. आमचं शेत ज्या टेकडीच्या पायथ्याशी आहे त्याच्या बाजुला तशाच आणखी दोन टेकड्या आहेत व मुख्य रस्ता त्या दोन्ही टेकड्यांना वळसा घालुन पुढे जातो.बाबा भटकत-भटकत पहिल्या टेकडीच्या टोकाला आले.तिथुन खाली उतरले व दुसरी टेकडी चढायला लागले.काट्या-कुट्यांची, झाडा-झुडपांची कसलीच पर्वा नसताना ते तंद्री लागल्यासारखे चालत होते.त्याच नादात त्यांच्या पायातली चप्पलही कुठेतरी पडली.काहीतरी लागुन त्यांच्या एका पायाला जखम झाली तरीही ते चालतच होते.दुसरी टेकडी चढुन-उतरुन ते पुढच्या रस्त्यावर पोहोचले व अचानक त्यांना भान आले.एरीया ओळखीचा होता.त्यांना लगेच समजले की आपण कुठे आहोत.बाईक शेताजवळ पार्क केली होती त्यामुळे त्यांना परत तिकडे चालत जाणे भाग होते.बाबा रस्त्याने चालत चालत बाईकपाशी पोहचले इतक्यात परत त्यांचा स्वतःच्या शरीरावरील ताबा गेला.पहिल्यासारखे ते शेतात भटकु लागले.दोन्ही टेकड्या चढुन पुढे रस्त्यावर गेले तेंव्हा त्यांना भान आले.परत बाईकपाशी पोहचताच पुन्हा तोच प्रकार.तिसर्या वेळी मात्र त्यांना पहील्या टेकडीच्या टोकाला पोहचल्यावर भान आले.चालुन चालुन दमुन गेले होते.पुढे गेल्यावर परत तसेच होईल म्हणुन त्यांनी हातातली टॉर्च जमीनीवर फेकली व एका दगडावर बसले.अर्धा तास विश्रांती घेतल्यावर त्यांना हायसे वाटले.मग ते बाईक घेऊन घरी निघुन आले......हे सगळं घडत असताना घरी मी चक्क निद्राअवस्थेत होतो.हा प्रकार मला सकाळी समजला.मी जाऊन पाहीले बाबांना,ते फार थकलेले दिसत होते.पायाला जखम झाली होती.आणि त्यांना बराच ताप आला होता.रात्री बाबा ज्या परीसरात भटकले होते तिथुन जवळच एक Accident Point आहे व तिथे बर्या.च जणांचे मृत्यु झालेले आहेत.
नाथ पाटील, >> एका दगडावर
नाथ पाटील,
>> एका दगडावर बसले.
यावरून वाटतं की त्यांना जबरदस्त चकवा लागला होता. एका खात्रीच्या माणसाकडून उपाय ऐकलाय की बूड जमिनीला टेकल्यावर चकवा नाहीसा होतो.
वडील घरी सुखरूप परत आले हे चांगलं झालं.
आ.न.,
-गा.पै.
अवनी वाचली.. मस्त आहे.
अवनी वाचली.. मस्त आहे.
https://www.facebook.com/ashi
https://www.facebook.com/ashishnimalkar
इथल्या कथा पण छान आहेत.
तो मायबोलीवरचा कवठीचाफा आहे.
तो मायबोलीवरचा कवठीचाफा आहे.
>>>वडील घरी सुखरूप परत आले हे
>>>वडील घरी सुखरूप परत आले हे चांगलं झालं.<<< हो, हे अगदिच खरे.
<धागा वर काढण्या साठी>
<धागा वर काढण्या साठी>
धागा वर काढण्या
धागा वर काढण्या साठी>>>>>>>एखादा किस्सा टाका.:फिदी: कुणाकडे व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने एखाद्या प्रेमळ भुतणीचा किस्सा नाहीये का?
प्रेमळ भुतणीचा किस्सा नाहीये
प्रेमळ भुतणीचा किस्सा नाहीये का? >>>>>
हा हा हा
आमचे घर ग्राउंड फ्लोरला होते.
आमचे घर ग्राउंड फ्लोरला होते. आणि बिल्डिंगच्या मागे मोकळ मैदान होतं. रात्रीच्या वेळी घरातले सगळे म्हणजे मामा, आजी, आई, मोठी बहीण वै रेडिओवर बेला के फुल हा गाण्यांचा कार्यक्रम ऐकत असत. मी गाढ झोपलेली असे. तर त्या दिवशी डफलीवाले डफली बजा हे गाणं सुरु होतं आणि सगळे गप्पाही मारत होते. आणि मामाला अचानक जाणवलं की बाहेर घुंगरांचा आवाज येतोय. गाण्याचा आवाजाबरोबरच कुणीतरी पायात घुंघरु घालुन नाचावं असा आवाज येत होता. आणि लगेच ह्हीच जाणीव सगळ्यांनाच एकदम झाली. मामाने पटकन रेडिओ बंद केला आणि सगळे झोपुन गेले. सकाळी उठुन ही चर्चा सुरु होती तेव्हा मी ऐकलं. तसही रोजच रात्री मैदानात आणि मग बिल्डिंगच्या जिन्यावर कुणीतरई घुण्घरु घालुन चालायचे / धावायचे आवाज यायचे म्हणे.
परवाच्या रात्री २.३० वाजता
परवाच्या रात्री २.३० वाजता आमच्या बेडरुमच्या खिडकीत कावळे जोरजोरात ओरडु लागले आणि लगेच कुत्रे पण भुंकू लागले. हा गोंधंळ १० ते १५ मि. चालु होता. रात्री कावळे ओरडत नाही ना? यात काही अमानविय नाही ना?
कारण आजी सांगायची पशुपक्षांना 'ती' जाणिव असते.
हेडफोन कानाला लावून तसेच
हेडफोन कानाला लावून तसेच झोपला असाल..
ग्रेथि
ग्रेथि
(No subject)
(No subject)
अच्छा सगळ्यांचे हसुन झाले
अच्छा सगळ्यांचे हसुन झाले असेल तर मला या प्रश्नाचे उत्तर द्या ना की रात्री कावळे ओरडतात का?
नाहितर पुन्हा रात्री आवाज आला तर सकाळी मीच कावळ्याच्या जन्मात
निल्सन तुम्हाला आलेला अनुभव
निल्सन तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला आमच्या परिसरात देखील जाणवला आहे
पण वेळ रात्रि साडेदहा ते अकरा होती
मला वाटले हा कावळे-कुत्रे
मला वाटले हा कावळे-कुत्रे काकु ऑर्केस्ट्रा आमच्याकडेच मध्यरात्री असतो, पण कॉमन दिसतोय.
Pages