अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे भूत अनेक लोक आपल्या बागेच्या राखणीसाठी ठेवतात. Uhoh हे म्हणजे भूताला नोकरीला ठेवल्यासारखे झाले

अजुन एक किस्सा!

आमच्या गावी एक काकू होत्या. त्या एकदा राजापूरला आठवडा बाजारात गेल्या होत्या. घरी आल्या तेव्हा ठीकठाक होत्या. तिन्ही सांजा तब्येत बरी नाही म्हणून झोपल्या. थोड्यावेळाने त्यांच्या सुनबाई त्यांना जेवायला बोलावायल्या गेल्या तर त्यांची दातखिळी बसलेली! कसेबसे त्यांना उठवले. त्या काहीतरी भलतेच बरळत होत्या. एरवी शांत स्वभाव असणार्‍या त्या बाई मोठमोठ्याने ओरडू लागल्या.

हळूहळू ही खबर अख्ख्या वाडीत पसरली. जसजशी रात्र वाढू लागली तसे त्यांचे ओरडणे देखील वाढू लागले. नेहमी शुद्ध मालवणी बोलणार्‍या काकू हिंदी बोलू लागल्या, मध्येच उर्दू शब्दही येत होते.

११च्या सुमारास त्या पळून जावू लागल्या. त्यांना चार-पाच जणांनी धरुन ठेवले तरी सुद्धा त्या जुमानत नव्हत्या. त्या हेच म्हणत होत्या की "मला आताच्या आता राजापूरला घेऊन चल. माझा नवरा वाट बघतोय. वेळीच नाही गेले तर काही खरं नाही. मला सोडा नाही तर तुमचे घरदाराचा नाश करीन."
"मी राजापूरची आहे. हिला मी एस. टी. स्टँड जवळ धरलंय. मला परत तिथे सोडा. मी काही अपाय नाही करणार, जर नाही सोडले तर मात्र बघाच!"

अंगारे-धुपारे केले तरी काहीच फरक नाही. मग शेवटी नाईलाज म्हणून रिक्षाने त्यांना राजापूरला नेले. बरी झाली तर ठीक नाही तर तशीच दवाखान्यात नेऊ म्हणून.

राजापूर जवळ येताच काकू बेशुद्ध झाल्या. एस. टी. स्टँड ओलांडताच त्या शुद्धीवर आल्या. "काय झाले? मला इकडे का घेऊन आलात? पाणी द्या" असे बोलू लागल्या. तसेच पुढे दवाखान्यात नेले.

डॉ ने चेक केले तर सगळे नॉर्मल!

नंतर काकूंची चौकशी करताना उलगडा झाला, की राजापूरला बाजारपेठेतून एस. टी. स्टँडला जाताना मध्येच कबरस्तान लागते. काकू बाजार झाल्यावर रस्त्याने खातखात स्टँडकडे येताना त्यांना झपाटले होते.

हा सगळा प्रकार माझ्या भावाने प्रत्यक्ष बघितला होता.

मी लहान असताना प्रत्यक्ष अनुभवलेला हा अमानवीय कीस्सा............
अवघं शे-दिडशे घरे असलेलं माझं गाव कोल्हापुर जिल्ह्यात आहे.मी तिसरीच्या वर्गात शिकत होतो त्यावेळी माझे काका नवीन घर बांधत होते.त्या घराचा पाया खनताना त्या जागेत काहीतरी सापडले होते.साहजीकच आम्हा लहान मुलांना त्याबाबत काही कळु दीले नाही मोठ्यांनी,पण मला माझ्या मोठ्या बहीणीकडुन इतकेच समजले की तिथे कसलीतरी(बहुतेक मानवी) हाडे सापडली होती.ही घटना अशुभ मानुन घरच्यांनी पुजार्‍याला बोलवुन एक प्रकारची पुजा म्हणजेच शांती करवुन घेतली होती.त्यानंतर काही महीन्यात घर बांधुन तयार झाले.पण अजुन वास्तुशांतीचा मुहुर्त बराच लांब होता.त्या घरात बरेचसे काहीबाही साहीत्य होते,ते चोरीला जावु नये यासाठी काकांनी मला व अजीतला (माझा चुलत भाऊ) तीथे रात्री जावुन झोपायला सांगितले.खरेतर मला तीकडे जावुन झोपायची इच्छा न्हवती पण अजीत माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे त्यामुळे माझ्यावर त्याचा अधिकार त्यावेळी चाले.मला तिकडे जावुन झोपावेच लागले आणी तेव्हाच ते अमानवीय चक्र चालु झाले.सुरवातीचे तिन-चार दिवस शांत झोप लागली. त्यानंतरच्या रात्री मला अचानक जाग आली मी तसेच पांघरुणात डोके घालुन झोपलो होतो.मला कोणाचातरी चालण्याचा आवाज ऐकु आला.मी प्रथम अजीत माझ्या बाजुला झोपलेला आहे याची खात्री केली व पांघरुन थोडेसे उघडले व आजुबाजुला पाहीले,अंधारात मला काहीच दिसले नाही.घरातलं इलेक्ट्रीकचं काम अजुन बाकी होतं त्यामुळे आम्ही झोपलो होतो त्या एकाच खोलीत विजेचा दिवा लावलेला होता व त्याचे बटनही अजीतच्या बाजुला होते.मी परत पांघरुनात शिरलो.थोड्या वेळाने मला तोच आवाज आला,त्यापाठोपाठ त्याच रुममधील प्लास्टीकची खुर्ची बेडपर्यंत ओढत आनल्याचा आवाज येवु लागला.तो आवाज अगदी माझ्या जवळ आला.कोणीतरी का ‘काहितरी’ माझ्या अगदी जवळ येवुन उभे होते.भीतीने माझं हृदय धडधडत होतं.सर्वांगाला घाम आला होता.ती खुर्ची परत माझ्यापासुन लांब ओढुन नेन्यात आली.परत चालण्याचा आवाज.त्या खोलीनंतर आणखी एक खोली होती व त्यापुढे टेरीसवर चढण्यासाठी जीना होता.जीन्यावरुन कोणीतरी पाय आपटत जाण्याचा आवाज येवु लागला.त्यानंतर टेरीसवर कोणीतरी इकडे-तिकडे धावत आहे असा आवज येवु लागला.त्या शांततेत ते आवाज भयानक वाटत होते. मी अजीतला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही.दुसर्याी दिवशी सकाळी मी घरच्या सर्वांना विचारले की कोणी आले होते का रात्री पण सर्वांनी नकार दिला.तसेच झालेल्या घटनेवर कुणीच विश्वास ठेवला नाही.अजीतने तर मला वेड्यात काढले.तो दिवस गेला.मी रात्री तिकडे झोपायला नकार दिला पण सर्वांना वाटले की मी तिकडे झोपायला न जाण्याचा बहाणा बनवत आहे.मला जबरदस्ती तिकडे झोपवण्यात आले..रात्री परत तेच चालण्याचे आवाज,खुर्ची सरकवण्याचे आवाज,टेरीसवर धावण्याचे आवाज येवु लागले.माझ्या ताईने सांगीतले होते कि असे काही झाले तर श्री रामाचे नाव घेत रहा.पुढचे सात-आठ दिवस मी तोच अनुभव घेत तीथे झोपलो.तसे आवाज येवु लागल्यावर मी सतत श्रीराम नाम घेवुन त्या आवाजांकडे दुर्लक्ष करत असे पण एकदाही पांगरुनाबाहेर पाहण्याचे धाडस त्यावेळी झाले नाही कारण मला असे वाटायचे की मी जर पांघरुनाबाहेर आलो तर “ते’’(जे काही होतं ते) माझ्यावर झडपच घालेल व फार भीती वाटायची.एक नक्की होतं की घरच्यांपैकी किंव्हा शेजारच्यापैकी असं कुणी प्रत्येक रात्री उठुन करनार नाही.रोजच होणार्याक त्या आवाजांच्या त्रासाला कंटाळुन व अजीतच्या विरोधाला न जुमानता मी तीकडे झोपणे बंद केले.त्यानंतर अजित तीथे एकटाच झोपु लागला.(आता पुढे हा त्याने सांगीतलेला तिथलाच कीस्सा)
त्यावेळी आमचा मोती नावाचा कुत्रा होता.अजीत मोतीला सोबतीला घेवुन तिकडे झोपु लागला.एका रात्री मोतीच्या भुंकण्याने त्याला जाग आली.अंधारात त्याने दरवाज्याजडे पाहिले.दरवाजा उघडाच होता.बाहेरच्या स्ट्रिटलँपच्या अंधुक उजेडात त्याने पाहिले की कोणीतरी माणुस आत आला व अजीत झोपला होता त्या बेडजवळ येवुन थांबला.भयंकर माणुस होता तो.अंधुक उजेडातही तो त्याला स्पष्ट दिसत होता.‘तो’ टक लावुन समोर झोपलेल्या अजीतकडे पहात होता. अजीतला तर सगळे शरीर गोठल्यासारखे वाटत होते,हलताच येईना त्याला. प्रयत्नाने त्याने तिथेच असलेले दिव्याचे बटन दाबुन दिवा चालु केला.पण तीथे त्याला कुणीच दिसले नाही.त्याने उठुन दरवजा बंद केला.मोतीही काहीवेळ भुंकत राहीला.अजीतने ती रात्र जागुन काढली.तसा तो फार धाडसी आहे.एवढे होवुनही पुढचे काहि दिवस तो तिथेच झोपला.
टेरीसवर होनारे पायांचे आवाज मी आणि माझ्यानंतर अजीतने तसेच इतरही जनांनी एकले होते.पुढे घराची वास्तुशांती झाली नंतर मात्र तीथे तसे अनुभव कुनालाच आले नाहीत.त्यानंतर काकांच्या घरचे सर्वजण बाहेरगावी वैगैरे गेले असताना मी त्या घरी बर्याकचदा एकटाच झोपलो पण मला परत तसा काही अनुभव आला नाही.

माझ्या आईने सांगितलेली तिच्या लहानपणीची (सातवीला असताना) गोष्ट:

आईच घर मालवणला भरड नाक्यावर. तिथून हाकेच्या अंतरावर कन्या शाळा (आता संपुर्ण जमीनदोस्त झाली आहे) आणि तिथून आणखी २ मिनिटांवर एस टी डेपो. हा मालवणातील हमरस्ता आणि दिवसभर वर्दळ असते.

असेच एके दिवशी घरी पाहुणे आले होते. दुपारी जेवण वगेरे करून पाहुणे परत आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. मग आजीने माझ्या आईला पाहुण्यासोबत एसटी डेपो मध्ये पाठवले. दुपारची वेळ होती, त्यावेळी मालवणला आता सारखी वर्दळ नव्हती. शहरामध्ये मोजक्याच गाड्या होत्या आणि दुपारी तर रस्ता निर्मनुष्य होऊन जायचा.

साधारण १२- १२.३० ची वेळ असावी. घरापासून कन्या शाळेच अंतर साधारण दोनएकशे फुट असेल. कन्या शाळेसमोर कूणकवळेकरांच घर आहे. त्या घरातल्या माई आजी दारातच उभ्या होत्या, त्यांना हाक मारून आई आणि ते पाहुणे थोडेसे पुढे निघाले. तेव्हढ्यात माझ्या आईच लक्ष शाळेच्या आवारात असलेल्या आंब्याच्या झाडाकडे गेलं. त्या झाडाखाली आंब्यांची रास पडली होती. लगेच तिने पाहुण्याना एस टी डेपो मध्ये सोडले आणि धावत पळत शाळे जवळ आली.

इकडे तिकडे पाहिलं, माई पण परत घरात गेल्या होत्या आणि रस्त्यावर सुद्धा कोणीही दिसत नव्हत. मग आईने हळूच आवाज न करता शाळेच गेट उघडल आणि आत गेली. एकदा त्या आंब्याच्या झाडाकडे बघितलं आणि खाली पडलेले आंबे आपल्या परकराच्या ओच्यामध्ये गोळा करू लागली. खूप वेळ झाला तरी ती आंबे भरतच होती पण काही केल्या परकराचा ओचा काही भरत नव्हता. ओचा भरायचा आणि परत थोड्या वेळाने तो रिकामी व्हायचा.

आंबे गोळा करण्याच्या नादात हि गोष्ट प्रथम तिच्या लक्षात आली नाही. थोड्या वेळाने भानावर आल्यावर ती एकदम सावध झाली आणि तीच लक्ष झाडावर गेल. तिला तिथे एक पांढरी आकृती बसलेली दिसली आणि आईच लक्ष गेल्यावर त्या आकृतीने झाडावरूनच आपला हात आईच्या दिशेने पुढे केला. त्यासरशी भीतीने आईची बोबडी वळली आणि किंचाळून ती तिथेच बेशुद्ध होवून पडली. तिची किंकाळी एकूण कूणकवळेकरांच्या माई धावत बाहेर आल्या आणि आवाजाचा शोध घेत असताना त्यांना समोरच शाळेच्या आवारात माझी आई बेशुद्ध होवून पडलेली दिसली.

मग त्या कालानुरूप देव-देवस्की सारखे सोपस्कार होवून तब्बल एक महिन्यानंतर तिच्या अंगातल भूत निघून गेल अशी आमची आजी सांगते.

बापरे, 28/Nov /2009 पासुन 29/ Oct /2013 पर्रन्त हा धागा चालु आहे. मि सर्व प्रतिसाद वाचले,
आग्दि गानु आज्जी चि सुध्धा कथा वाचलि.Horrible........

गमभन च्या किस्स्यावरून आठवल:

मी एफवायला असतानाचा हा मजेशीर किस्सा:

मी, संजय आणि सतीश असे तिघेजण एकाच वयाचे होतो आणि रोज व्यायामशाळेत जायचो, बाकी दोघेजण मला सिनिअर होते आणि दोघेही चांगलेच बलदंड होते. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे रस्त्यावर उभे राहून याची त्याची टिंगलटवाळी चालू होती आणि झालच तर एखाद्या मुलीकडे पाहून तिरका कटाक्ष टाकत बसलो होतो.

अचानक भोईर काकींचा किंचाळण्याचा आवाज आला आणि पाठोपाठ त्या घराच्या बाहेर धावत आमच्या समोरच आल्या आणि आम्हाला त्यांच्याबरोबर घरी ओढत घेवून गेल्या. तिघेही तिथे गेल्यावर तिथले दृश्य पाहून पहिल्यांदा मनातून घाबरलोच. भोईर काका हातामध्ये मिळेल ती वस्तू दिसेल त्याच्या वर भिरकावत होते आणि तोंडातून गुरगुरण्याचा आवाज करत होते. पहिल्यांदा काय करायचे ते सुचलेच नाही कारण सेकॅन्दापूर्वी एक तांब्या माझ्या कानशिलाच्या बाजूने सुं सुं करत गेला होता.

थोड्या वेळाने संजयने हिम्मत करून घरात प्रवेश केला आणि काकांवर अक्षरशः झडपच घातली. लागलीच मी आणि सतीशने त्यांचा ताबा घेतला आणि त्यांना जमिनीवर लोळवले आणि तशाच उताण्या अवस्थेत त्यांना दाबून ठेवले. काकांची तर तोंडाची टकळी चालूच होती. मला सोडा, नाही तर एकेकाला बघून घेईन. आज त्यांचा आवाज बदलला होता. दुसराच कोणीतरी त्यांच्या तोंडातून बोलत असल्यासारख वाटत होत. आम्ही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या प्रयत्नांना यश येत असल्यासारखं वाटत असतानाच काकांच्या अंगात एकदम बारा हत्तींच बळ संचारलं आणि त्यांनी जोरात ''जय बजरंग बली'' अस म्हणून आम्हा तिघांना अक्षरश उडवून लावले आणि ते सरळ बाहेर पळत सुटले. आम्हा तिघानाही हसाव कि घाबराव तेही कळत नव्हत.

काकांची काटकुळी शरीरयष्टी, त्यांनी २ मिनिटांपूर्वी दाखवलेली ताकद, सगळ्यात वरताण म्हणजे त्यांच्या तोंडातून निघालेले ते शब्द "जय बजरंग बली''. आम्ही विचार करू लागलो असेल ''देवभक्त'' भूत.

आता ''किले का रहस्य' संपून 'ये जो है जिंदगी' सुरु झाल होत.

थोड्या वेळाने त्यांना पकडून परत घरात आणलं आणि शांत केल. नंतर आम्हालाच विचारायला लागले तुम्ही काय करताहात इथे म्हणून.

आम्ही विचार करू लागलो असेल ''देवभक्त'' भूत.
आता ''किले का रहस्य' संपून 'ये जो है जिंदगी' सुरु झाल होत.
>> Lol

गमभन.. कोकणी किस्से नेहमीच भारी असतत.. तश्या आकृत्या माझ्या काकीला पण दिसायच्या नि मग ती भोवळ येउन पडायची..

किले का रहस्य!! अरे देवा या सिरीयलचं नामांकनाचं संगीत आठवतेय? कित्तीतरी वेळा पांघरूणात दडी मारली होती तो आवाज ऐकून.... अजूनही त्या आठवणीने काटा येतो अंगावर... वो भी क्या दिन थे!!! हल्लीच्या भुतांचं नी हॉरर शोज, चित्रपटांचं काय विशेष वाटतच नाही.

माझ्या ताईने मला सांगीतलेला हा किस्सा,
त्यांच्या गावातली काही मुले नदिवर पोहायला गेली होती.तशी ती मुले नेहमीच तिकडे जायची पण त्या दिवशी आक्रितच घडलं.सगळेजण पोहत होते.पोहताना त्यांना जाणवत होतं कि कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे.अस्वस्थता जाणवत होती.म्हणुण सगळेजण नदितुन बाहेर येवु लागले.शेवटचा मुलगा बाहेर येतोय तोच त्याच्या पायाला कशानेतरी पकडले आणि त्याला नदित खेचु लागले.तो मुलगा ओरडला.सगळेजण भयभीत होऊन पहात होते.(त्यांची हातभर.....) काठावरच्या मुलांना फक्त तो मुलगाच दिसत होता,त्याला कोण ओढत आहे ते दिसत न्हवतं.तो मुलगा पाण्याखाली बुडला.तो मुलगा कुठे गेला हे पाण्यात उतरुन पहायचं, इतकं धाडस काठावरच्या एकाचही झालं नाही.बातमी गावात गेली.गावकर्यांोनी पोलिसांना बोलवुन घेतलं.पोलिसांनी शोध घेतला.त्या मुलाचं प्रेत पाण्याखालच्या चिखलात रुतुन बसलेलं आढळलं. प्रश्न उद्भतात-1) नेहमी तिथेच पोहणारा तो मुलगा पाण्यात बुडलाच कसा ? 2)तो पाण्याच्या प्रवाहात वाहुन जाण्या ऐवजी खालच्या चिखलात कसा रुतुन बसला ?

नवे किस्से मस्त आहेत
असो
दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्याना

चालुद्या .......

बापरे, 28/Nov /2009 पासुन 29/ Oct /2014 पर्रन्त हा धागा चालु आहे>> Uhoh

सगळ्या अमानवीय मानवीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

.

"मनी वसे ते (स्वप्नी ) जागेपणी दिसे " असे म्हणण्यासाठी माझा ही एक अनुभव लिहितो. अर्थात भुताचा जन्म
कसा होतो याचीच खात्री त्या रात्री मला पटली. मी व माझा एक मित्र दिलीप जगताप , आमचे मूळ गाव धुळे
येथून मुम्बई ला सायकलीने जाण्यास निघालो होतो अन्तर होते ३४५ किमीचे ! ! पण त्याकाळी ( १९६२ साली)
असे करणे म्हणजे एक साहस होते. यापूर्वीही सायकलीने प्रवास केला होता , पण ५० ते ६० किमी पावेतोच!
आमचे वय १४ /१५ च्या आसपास ! रात्री इगतपुरी येथे ११.३० वाजता हॉटेल मध्ये जेवण घेवून आम्ही कसारा घाटात साधारणत: १२ वाजेच्या सुमारास प्रवेश केला. ती अमावास्येची रात्र होती हे मला ठावूक होते , पण कसारा घाटात शिरेपर्यन्त मित्राला ठावूक नव्हते. कसारा घाट हा पाच किमी चा सलग घाट होता , आणि त्यात अनेकवेळा ट्रकचे अपघात झाले होते. ड्रायव्हर्स मरण पावले होते . मी मित्राला म्हणालो , " या घाटात अनेक ड्रायव्हर्स मेले आहेत ,आणि आज नेमकी अमावास्येची रात्र आहे. पाहूया आपल्याला त्यापैकी कोणाचे भूत
भेटते का !! " आमच्या जवळ एकच टॉर्च होता. घाट उतरत असताना ,मागुन पुढुन ट्रक्स जात येत होतेच
त्या काळी रस्ते फारसे रुन्द नसायचे. त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला , हातात सायकली धरून पायी पायी सुद्धा चालावे लागत होते. आमच्या डाव्या हाताकडे उन्च डोन्गर होता , तर उजव्या हाताकडे खोल खोल दरी होती रस्त्याच्या डावीकडे ,डोन्गराचा भाग आहे हे समजावे म्हणून थोड्या थोड्या अन्तरावर पान्ढरा रन्ग वापरून पट्टे मारले होते आमच्या टॉर्च चा झोत प्रथमच दूर अन्तरावरील पट्ट्यान्वर गेला त्यावेळी असे वाटले कि तेथे कोणीतरी उभे आहे .ख॑र म्हटल तर आम्ही दोघे त्या क्षणी खूपच घाबरलो होतो . मित्र मला म्हणू लागला की ' आज अमावस्या आहे हे जर तुला माहित होते तर आपण रात्री येथे घुसायलाच नको होते
आता परत फिरू या का ? " मी पहिल्या धक्क्यातून थोडा सावरलो होतो कारण भूताच्या भीतीतून हातातील
टॉर्च बन्द झाला होता. आजुबाजुला ट्रक्स पण जास्त दिसत नव्हते . पुन्हा एकदा टॉर्च सुरु करुन त्याच बाजुला
प्रकाश झोत टाकला पुन्हा तसाच भास ! ! पण मी मित्राला म्हटले , " समजा जर तेथे भूत असेल , तर ते ह्या
ट्रक वाल्याना काही करणार नाही काय? आपल्यालाच काही तरी का करील? " पण मित्राचे काही समाधान होइना.त्याचे आपले सारखे " धोका नकोच , आपण परत जावूया " अर्थात माझा भूताखेतावर असाही विश्वास
नव्हता मी पुन्हा एकदा धाडस करून टॉर्च सुरु केला आणि त्याच बाजुला प्रकाशझोत टाकला . मग माझ्या लक्षात आले कि ज्याला आम्ही " भूत " समजत होतो , तो पान्ढरा पट्टा होता . भयाण अन्धारात , टॉर्च च्या प्रकाशात , एकदम चमकून जात असल्याने , तेथे " कुणीतरी " आहे असेच आम्हाला वाटत होते एकदा खरा प्रकार लक्षात आल्यावर आम्ही पुन्हा पुन्हा टॉर्च पेटवून , तेथे किन्वा जवळपास कोठेही ' भूत ' नाही याची खात्री केली मित्रालाही हा प्रकार लक्षात आला आणि तशाही स्थितीत ' आमची कशी जाम टरकली होती ' याची
आठवण काढून आम्ही दोघेही खूप हसलो आणि अशा प्रकारे एका भूताचा जन्म होण्यापूर्वीच आम्ही त्याला खतम केला. तेथुन पूढचा प्रवास पहाटे तीन वाजेपर्यन्त पूर्ण केला.म्हणुन म्हणतो की " मनी वसे ते जागेपणी
भासे "

जयन्त आबा

जयन्त आबा, हा अमानवीय अनुभव वाटत नाही. त्यामुळे धाग्याच्या हेतूशी ही कथा जुळत नाही. हे माझं वैयक्तिक मत.
आ.न.,
-गा.पै.

गामाजी , ¶
स.न.

धाग्याचे पहिलेच वाक्य आहे कि भुताखेतावर तुमचा विश्वास आहे का ? तोच धागा मी पकडला, यात काही चुकले का ?
जयन्त आबा

अगदी ताजा किस्सा
आम्ही कोंडेश्वराच्या देवळात गेलेलो. तिथेच रहायचा कार्यक्रम होता.
हे मंदीर माहीत नसेल तर सांगतो बदलापूर जवळ पावसाळ्यातल्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.
मी म्हटलेलं मित्राला हा कुठला मुहूर्त सर्वपित्रीचा.
आम्ही पंचामृती अभिषेक केला. एका मित्राने रुद्र म्हटलं त्यावर खूप सुंदर ध्यान झाल.
त्यानंतर श्री श्री रवीशंकरांच एक शिव मेडीटेशन केल.
एकानी आफळे बुवांची प्रवचन लावली. ती ऐकताना निजानीज सुरू झाली.
मी आणि माझा मित्र मंदार फक्त जागे होतो.
गाभार्यातला आणी बाहेरचा सोडला तर सर्व दिवे बंद केलेले.
अचानक हॉ ल मधली एक ट्यब चकमकली आणि
चक्क लाSSSगSSSली.
अस काही नव्हत की ती गेलेली होती कनेक्शन लूज होत आणी व्होल्टेज फ़्लक्चुएशन वगैरे होउन लागली. आम्ही तिच्या प्रकाशात जेवण केलेली. आमच्या बरोबर दोन electricians होते. सगळ्या आयुधांसकट. जरा जरी fault असता तर ते दोघे बसले असते.
त्यांच्या पैकी एकानेच झोपताना रीतसर सर्व दिवे मालवलेले मी पाहीलेले
मी थक्क होउन मंदार कडे बघतोय तो हसून म्हणाला 'अरे जा!!! बंद कर ते आले असतिल'
तिथे त्याचे गुरू अनेक वर्ष रहात होते. नदी पलीकडे त्यांची समाधी आहे.
मी बंद करायला गेलो तेव्हा बटन लूज नव्हत पण on होत.
आणि मी मालवल्यावर मात्र ती परत नाही लागली.

या त्रिपुरीला परत जातोय येताय का??

मध्यंतरी कोथळीगडावर गेलो असतांना बरोबर असलेल्या ज्युदोच्या मास्तरांनी सांगितलेला स्वतःचा 'अमानवीय' किस्सा!

रात्रीची वेळ .. घाटरस्ता होता. दोन्ही बाजूस किर्र्र्र्र्र्र जंगल..! कारमध्ये दुसरं कुणीही नाही. गेले ५ तास मी एकटाच ड्राईव्ह करत चाललो होतो.. आणि अचानक .. समोरुन पंधराएक फुट उंच असलेली मानवाकृती दोन्ही हात पसरुन वेगाने माझ्या दिशेने येतांना दिसली. त्या आकृतीच्या कंबरेखाली पाय वगैरे काहीही नव्हतं. अंगात मात्र पांढरा सदरा होता. एसी फुल्ल होता तरी मला दरदरुन घाम फुटला. त्या आकृतीचा वेग मात्र सलग एकच होता. ती वेगाने माझ्या दिशेने येत होती. तो पहाता, मला गाडी मागे न्यायला/ वळवायला अजिबात वेळ नव्हता. क्षणार्धात मी निर्णय घेतला, आकृती जवळ आली की लगेच बाजुला वळवून सुस्साट पुढे निघायचे नि मागे वळूनही पहायचे नाही..! त्याप्रमाणे केलं.. आकृती जवळ आली तेव्हा अक्षरशः डोळे मिटले आणि सराईतपणे गाडी वळवली. काहीही झालं नाही. गाडी पुढे आली. समोर स्वच्छ झालं होतं.
ठरवलं नव्हतं तरीही मागे वळून पाहिलं आणि ....
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
एक माहूत हत्तीवर बसून जातांना दिसला..!
Happy Happy

एका मैत्रिणीच्या आजीला आलेला अनुभव, तेव्हा मैत्रिणीचे वडील लहान होते. त्यांचे बैठे घर गल्लीच्या एका टोकाला होते. ,घरासमोर अंगण आणि अंगणापुढे रस्ता. आजी सवयीने भल्या पहाटे उठून, अंगण झाडून सडा रांगोळी करत असत.
त्या दिवशी अशीच त्यांना जाग आली, अजून अंधारच होता पण चार साडेचार वाजले असावेत असे समजून त्या अंगणात झाडू लागल्या. त्यावेळी समोरच्या रस्त्यावरून एक बाई पळत जाताना त्यांनी पाहिली. कोणी असेल म्हणून त्यांनी एवढे लक्ष दिले नाही, पण काही वेळातच ती बाई परत समोरून विरुद्ध दिशेने पळत गेली.
मग आजींना जरा कुतुहल वाटली म्हणून त्या पुढे येऊन बघू लागल्या, तर ती बाई परत वळून गल्लीच्या दुसर्‍या टोकाकडे पळायला लागली. आजींनी पाहिले त्या बाईने राखाडीसर रंगाची साडी नेसली होती, कंबरेपर्यंतचे केस मो़कळे सोडले होते, एकूणच तिचा अवतार भेसूर होता.
ती काही क्षणातच दुसर्‍या टोकाला पोचली व परत उलट्या दिशेने पळायला लागली. तिच्या पळण्याचा वेग असामान्य होता. अतिशय कमी वेळात ती आजींसमोरून पाच सहा वेळा पळाली. असेच पळताना ती सतत आजींकडे बघू लागली, तिच्याशी नजरानजर झाल्यावर आजी खूप घाबरल्या व हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे हे त्यांच्या लक्षात आले, त्या लगेचच घरात गेल्या, अजून कोणीही उठले नव्हते. त्यांनी दार लावून घेतले व बैठकीच्या खोलीतील घड्याळात बघितले तर रात्रीचे दिडच वाजले होते. आणि जाग आल्यामुळे पहाट झाली असे समजून त्या तेव्हाच अंगणात आल्या होत्या. त्यानंतर आजींना चार पाच दिवस सडकून ताप आला. तरीहि नंतर भल्या पहाटे उठून बाहेर सडा रांगोळी करणे त्यांनी काहि सोडले नाही.

Pages