अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए किती भयानक आहे हे ब्लॉग प्रकरण !!!!

शाब्ब्ब्बास रिया शाब्ब्ब्बास !!!

मीही आताच झोडपून आलो ...
सर्व माबोकराना विनंती की जास्तीत्जास्त संख्येने तिथे भेट द्यावी हा पकार पाहता क्षणीच तिथे त्या व्यक्तीला खडसावून मनातली भडास काढावीत

कोणास शक्य असल्यास मला त्या व्यक्तीचा फोन नंबर द्यावात प्रत्यक्ष संभाषणातून हा मुद्दा जास्त यशस्वीपणे सॉल्व करता येईल

~वैवकु

त्या ब्लॉगवरती निंबूडाने अनुवादित केलेल्या दोन शेरलॉक होम्सच्या कथा पण आहेत.

कमेंट देतच आहे तिथे.

हिला चोरायला चाफ्याची "भिती" कथाच मिळाली होती????

असं कितीतरी जणांच आख्खंच्या आख्खं लिखाण चोरीला जात असेल नाही...? Sad

पण लाज कशी नाही वाटतं या लोकांना असं दुसर्‍याने लिहिलेलं बेधडक स्वतःच्या नावावर खपवायला...??

https://www.facebook.com/MyHorrorExperience?ref=stream

हे मला अनिश्काने लक्षात आणून दिले....
हा निखिल पवार कोण आहे त्याने अमानवीय ची आख्खी पोस्टच ढापली आहे....
वर कसलाही उल्लेख न करता स्वताच्या नावाने प्रकाशित केली आहे....
मी आणि रियाने त्याला खडसावले तर पुढे काहीच नाही....
निर्लज्जपणा

,

काय पण लोक आहेत Angry

स्वतःचा ब्लॉग असण्याची एवढीच हौस असेल तर काहीतरी स्वतः खरडावे ना, जमेल कधीतरी आयुष्यात, पण नाही! जनाची कसली ह्यांना मनाची पण लाज नसणार असेच खेदाने म्हणावेसे वाटते.

जे लोक चांगले लिहितात त्यांनी काय, नंदिनी म्हणते तसे, गुगल करत बसायचे का आपले लेख कोणी चोरलेत का बघायला? Sad

मला तर मधे मधे मायबोलीवरचे लेख इमेल मधे यायचे, एवढी मोठी फॉरवर्ड लिस्ट असायची की कोणी सुरु केले ते कळणे पण अवघड!

मायबोलीवरच्या "अमानवीय" कथांची लिंक इथे टाकता येइल का? विनोदी लेखांचा जसा तो एक मामींचा धागा आहे तसा इथे करता येइल का?

मायबोलीवरच्या "अमानवीय" कथांची लिंक इथे टाकता येइल का? विनोदी लेखांचा जसा तो एक मामींचा धागा आहे तसा इथे करता येइल का?

अदिती योग्य सूचना

मामीना सांगा त्याना अश्या लिंका गोळा करून एका जागी द्यायचा अनुभव आहे

मध्यंतरी गूढकथा हव्या आहेत असा एक धागा आला होता ना ? या बाईंचा तर नाही तो ?
एक्स्पायरी डेट ही कादंबरी कॉपी करताना अधून मधून मायबोलीच्या लिंक्स तशाच कॉपी केल्यात. कुणीतरी मुद्दामून चावटपणा करतंय असं वाटतंय.

मध्यंतरी गूढकथा हव्या आहेत असा एक धागा आला होता ना ? या बाईंचा तर नाही तो ?>>>>>>>>>तो धागा माझा होता ...आणि मी असले फाल्तु काम करत नाही. मला गुढ कथा वाचायला आवडतात म्हणुन एकत्र मागवल्या होत्या.. एका धाग्यावर असतील तर सगळ्यांनाच उपयोगी पडेल हा उद्देश होता बस ....

Kiranu

http://www.maayboli.com/node/41182

हि आहे ती लिन्क आणि यात काय गैर आहे ते दाखवा जरा.

चटकन नाव घेण्याआधी विचार करावा .... It hurts ..

तुमचा धागा होता का तो? माफ करा. मी विचारलं होतं याच बाईंचा होता का ? माझ्या लक्षात नव्हतं आणि लिंकही सापडत नव्हती. त्या ब्लॉगवर सगळ्याच गूढकथा असल्यामुळं साहजिकच शंका आली.

तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला या पानावर जाता येणार नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही असा संदेश येतो. कदाचित त्यामुळेच सर्च दिल्यावर सापडले नव्हते. तुमचे नाव मात्र मी घेतलेले नाही.

तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला या पानावर जाता येणार नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही असा संदेश येतो>>>>>>>> आत्ता बघु शकता

तुमचे नाव मात्र मी घेतलेले नाही.>>>>>> धाग्या बद्दल बोललात तर एकच अर्थ झाला नाहि का ? आणि मला स्वतला लिहीता येतं तेव्हा इतरांच लिखाण मी फक्त वाचन म्हणुन उपयोगात आणत असते....संपुर्ण सन्मानाने..हे यापुढे लक्शात असु द्या ...

इथे भांडू नका रे Proud
किरण्या मयींनी तो धागा कथा एकत्रीत करण्यासाठी टाकलेला, ज्याचा आज कदाचित उपयोग झाला असता Uhoh
असो गैरसमज बाजूला ठेवा..
मध्यंतरी फेसबुकवर आख्खं एक पेज विशालच्या कथांच्या जीवावर जगत होतं, तिथे अनेकांनी हल्लाबोल करून ते बंद पाडलं..
या वर उल्लेखलेल्या ब्लॉगवर मायबोली आणि मनोगतींच्या कथा दिसताहेत, निंबूडाचे अनुवादीत शॅरेलॉक होम्स सोबत मनोगती स्व. आदितीचेही अनुवादीत लेखन तिथे दिसतंय..

धाग्या बद्दल बोललात तर एकच अर्थ झाला नाहि का ? आणि मला स्वतला लिहीता येतं तेव्हा इतरांच लिखाण मी फक्त वाचन म्हणुन उपयोगात आणत असते....संपुर्ण सन्मानाने..हे यापुढे लक्शात असु द्या ...???

कोण लागून गेलात तुम्ही ? तुम्हाला नीट उत्तर देतो आहे याचा अर्थ समजत नाही का ? अशा प्रकारचा एक धागा होता इतकंच लक्षात होतं. तेच तुम्हाला सांगतोय. शेंबड्या पोरालाही समजेल पण तुम्हाला तरीही वाईट वाटलं असेल तर गेलात उडत.. !!!

या मयी नावाच्या आयडीला खुमखुमी आल्याचं दिसतंय.>>>> ती खूमखूमी नाही रे कळवळ आहे, आता टैम प्लिज, तो विषय बाद...

आश्चर्य आहे आधी कुठलेही काही माहिती नसतांना धाग्या बद्दल धागाकर्ता बद्दल माहिती न काढता आरोप लावायचे ….वरून जे केलय त्याची चूक मानायची सोडून आणि वरून उद्धट बोलायचे… विचित्र आहेत हि अशी लोक … अन दिसतेय खुमखुमी कशाची अन कुणाला आलीये ते...

आणि शहानिशा केल्याशिवाय अस सरसकट येउन आरोप लावू नये हे सुद्धा शेंबड्या पोराला कळतं जे तुम्हाला कळले नाही

Pages