अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अनुभव भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरच्या कॉलनीतला. आम्ही ४ ट्रेनी (मुकेश, सचिन, नितिन आणि मी + मालक) एका ३ रुमच्या ब्लॉकमध्ये राहत होतो. मुकेशला त्यादिवशी दिल्लीला जायचे म्हणुन तो ५-६ च्या दरम्यान रेल्वे स्टेशनला गेला. पण काही कारणाने (आता आठवत नाही) त्याची ट्रेन जी रात्री १०-११ च्या दरम्यान सुटणार होती, ती कॅन्सल झाली. रात्री स्टेशनवर बसण्याऐवजी घरी जावे म्हणुन तो (बहुदा) शेवटच्या लोकलने परत आला. मानखुर्द स्टेशनपासुन कॉलनीत आंत भरपुर झाडी आहे, आणि इतक्या रात्री (रात्रिचा १ वगैरेचा सुमार असेल), एकटं येताना त्याला भिती वाटत होती, पण शिवस्तोत्र म्हणत तो कसाबसा पोचला. समोरच्या खोलित झोपलेल्या सचिनला त्याने आवाज दिला. सचिनने दरवाजा उघडला अन किंचाळुन तो खाली पडला. काय झालं म्हणुन आम्ही तिघं बाहेर आलो. (मी घरमालक आणि नितिन) तर नितिनही घाबरुन पांढराफटक पडलेला. मुकेशला कळेचना की हे दोघं त्याला पाहुन घाबरले का. तो घरात आला अन एखादी मोठी काच फुटावी तसा मोठा आवाज झाला. तो मला आणि मालकांनाही ऐकू आला. मी थोडा घाबरलो पण घरमालकाने पटकन दार लावले. सचिनला आणि नितिनला तोंडावर पाणी मारुन उठवले. ते घाबरुन दरवाज्याकडेच पहात होते. काही वेळाने त्यांनी सांगितले की मुकेशच्या अगदी मागे एक बाई होती, तिने तिचं शिर स्वत:च्या हातात घेतलं होतं. आणि उजव्या हातात तलवार होती. पण दरवाज्यातुन आंत येवु शकत नाही म्हणुन थयथयाट करत होती.

मला आणि घरमालकांना मात्र काहीच दिसलं नाही. घरमालक देवीचे प्रचंड भक्त होते. त्यांनी दुसर्‍या दिवशी एक मोठी पुजा केली आणि सचिन आणि नितिनला प्रसाद दिला. त्यानंतर ते दोघे नॉर्मल झाले.

बापरे सहज म्हणुन टाकलेली गानु आज्जींची लिंक ईतकी लोकप्रिय झालिय?????? सही आहे...पण वाचताना नॉर्मली आपण ते विझ्युअलाईज ( मला दुसरा शब्द आठवत नाहीये ) करत अस्तो ......तसच मी ही केलं आणि माझी पण टरकली...म्हणुन इथे शेअर केली....... Happy

अवांतर :

अनिश्का.,

विझ्युअलाईज = कल्पनाबद्ध ...?

आ.न.,
-गा.पै.

अनिश्का,
मी सुध्दा अनेक हितचिंतक मित्रांना टरकाविण्यासाठी त्याची लिंक मेलवर दिली आणि रात्री बारा वाजता एकट्याने वाचून दाखवा म्हणून चॅलेंज दिलं (सूड घेण्याचे असेही मार्ग असतात). खरोखरंच बर्याच जणांची तंतरली.

मी एक भयकथा पुस्तक प्रकाशित केलय.
नातू आजोबांच्या वाड्यात गानू आज्जींचे आगमन आणि त्यामुळे चिडलेल्या खातू आज्जींच्या करण्याकवटाळ्या आणि सब ईन्स्पेक्टर लागू यांनी केलेला रोमहर्षक तपास.

प्रकाशक -मिळेल तो
प्रकाशन संस्था -आपल्याच बापाची.

प्रथमावृत्ती -द्वीतायावृत्तीच्या आधी
किंमत- कवडीमोल

The Conjuring सिनेमा पाहिला का.. नेहमीचा फॉर्मुल्या तरीपण एकदम भ्भार्री.. आवर्जुन पहा.. किळसवाणाचा अतिरेक होईल असा कुठलाही प्रकार दाखवला नाहीये.. थोडक्यात जास्त धडकी भरेल असा परिणाम साधला आहे.. त्या सिनेमात जे काय दाखवलेय ती खरी घटना आहे का यांवर सगळीकडे चर्चा सुरु आहे.. नि त्या सिनेमात जे झपाटलेले घर दाखवलेय त्या घराला पाहण्यासाठी आता म्हणे गर्दी होतेय नि त्याचा त्रासच तिथे आता राहणार्‍यांना होतोय.. इति..

व्यक्ती आणि किरण तुमचा निषेध.
तुमच्य पोस्टींमुळे येथे आता निळ्या ऐवजी पिवळ्या स्मायली पडायला लागल्यात. लोकांची भीती गायब व्हायला लागलीये. भुताखेतांवरची श्रद्धा लोप व्हायला लागलीये. पडलेली पोस्ट ही कोणाचे स्वप्न असेल आणि त्यातील भीतिदायक भुत हे एक स्वप्नच राहील अशी भावना बळवायला लागलीये
एका भयान, गुढ, अगम्य धाग्यावर हास्याची कारंजी उडायला लागलीये
Light 1

मुक्तपीठवर लुनावाले ब्रह्मे आले आणि मुक्तपीठाची वाट लागली ,इथे गानु आज्जी आल्या आणि धागा विनोदी झाला. Biggrin

हे वाचा,,, वाचाच बसेल तुमची

http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4977775965214237294&Se...मुक्तपीठ&NewsDate=20130803&Provider=डॉ. हर्षवर्धन मोडक&NewsTitle=अपघातानंतरचे धक्के (मुक्तपीठ)

अमानवीयसारखा मुक्तपिठीय धागापण काढला पाहीजे.

@अनिश्का,
पण वाचताना नॉर्मली आपण ते विझ्युअलाईज ( मला दुसरा शब्द आठवत नाहीये ) करत अस्तो >>>> सहसा आपण ते डोळ्यापुढे आणत असतो.

प्राची, मायबोलीवर नाही मिळाली पण इथे http://hivaatdurjate.blogspot.de/2013/08/blog-post_2383.html हीच कथा कॉपी-पेस्ट केलेली दिसली. मात्र त्याच ब्लॉगवर मायबोलीवरील काही अमानवीय कथाही कॉपी-पेस्ट केलेल्या दिसल्या. ब्लॉग संग्रहण हेडिंग खाली.. लेखकांचे नाव असले तरीही मायबोलीची लिंक नाही. मूळ कथांवर हाच मजकूर लिहून आले आत्ताच.

त्या ब्लॉग वर शिव्या कशा घालायच्या?
मला काही दिसत नाहीये तिथे उपाय
मुर्ख बाई कुठली
बिनडोक , बेआकल Angry

रिया, ज्यांच्या ज्यांच्या ज्या ज्या कथा आहेत, त्या खाली त्या ब्लॉगमध्ये जिथे ती कथा आहे, तिथली लिंक दे. चाफ्याची मी आता देणार होते, पण ती जुन्या मायबोलीवर आहे. त्यामुळे ते शक्य नाही.

हेहे Proud

Pages