अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला तरी कळला होता का आतापर्यंत! :फणकार्‍याने नाक उडवणारी भावली: Proud

'अभद्र' .<<< हाच शब्द !!!

आता काही दिवस तरी लहान पोरं पाहिली की ती भयाण अंगाई आठवेल. <<<<<<<
या वाक्यावरून अप्पोसिट् मूडचा एक शेर आठवला

तू बोबड्या डोळ्यांतुनी हसलीस अन् मी जाणले ;
भेटायची गोष्टीतुनी जी.. तूच ती छोटी परी !!!

हा शेर माझाच आहे . हा शेर समाविष्ट असलेली गझलही तयार आहे लवकरच मयबोलीवर वाचायला मिळेल
..हुश्श !!! झाली ब्वॉ एकदाची रिक्षा फिरवून मी चाललो ..............

हायला गानु आज्जी इतकी फेमस होईल असं वाटलं नव्हतं....माझ्याकडे काहिच अनुभव नव्हता बाकीच्यांसारखा पण ही गोष्ट आवडली म्हणुन इथे पोस्ट केली.....रच्याकने हा धागा मागे का पडलाय?? सर्वांचे अनुभव संपले?? मला आवडतो हा धागा... Happy

आमच्या ओळखीतल्या काकुंनी सांगितलेला किस्सा... काका-काकु, त्यांचे एक मित्र व त्यांची पत्नी असे चौघेजण पहाटे ४ वाजता गावी जाणारया बसमधुन उतरुन पायी आपल्या घरी चालले होते त्यावेळी त्यांना त्यांच्या ओळखीतील मृत पावलेली जुनी म्हातारी स्त्री अचानक समोर येताना दिसली. ती जमीनीपासुन थोडया वर हवेत तरंगत येत होती. काकुंनी सांगितले कि ती एवढया भरभर येत होती की जणु तिच्या पायाला चाके असतील. ती या चौघांच्या बरोबर मधुन न बोलता, यांच्याकडे न बघता झटकन निघुन गेली. या चौघांनीही काय ते समजुन काहीही न बोलता तिथुन काढता पाय घेतला.

यशस्वीनी :- आज्जी मॉर्निंग वॉकला चालल्या होत्या कि काय ?

फक्त काका असते तर एकवेळ विश्वास ठेवला नसता, पण काकू आणी सोबत अजुन एक स्त्री... हम्म... खरं असावं.

फक्त काका असते तर एकवेळ विश्वास ठेवला नसता, पण काकू आणी सोबत अजुन एक स्त्री... हम्म... खरं असावं.>>>>>>>>:G Biggrin Biggrin

हा दुसरा किस्सा माझ्या मैत्रिणीने सांगितला... यात अमानवीय काय आहे माहित नाही पण थोडे चमत्कारिक नक्कीच आहे. तिची आजी मृत पावल्यावर तिचे तेरावे करायला घरातील पुरुष मंडळी बाहेर गेली होती. ज्यावेळी आजींची तेराव्याची क्रिया चालु होती. इथे यांच्या घरातील एका भिंतीवर अचानकपणे काळ्या रंगाच्या मुंग्या प्रचंड प्रमाणात जमा झाल्या. तिने सांगितले कि जणु एखादे मधाचे पोळे असते तसे. तिने घरातील वास्तुत प्रथमच अश्या प्रकारे काळ्या मुंग्यांचा कळप बघितला. एवढया मुंग्या तिथे कधी आल्या व भिंतीला चिकटुन एवढा मोठा काळा ठिपका त्यांनी कधी तयार केला हे घरातल्यांच्या लक्षात देखील आले नाही आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर असा अनुभव त्यांना कधीच आला नाही.

हा मुंग्यांचा किसा 'अमानवीय' आहे (केवळ व्याख्येनुसार )

१)त्या भिंतीखालीच पीठ आणि दिवा असेल म्हणून वासाने आल्या असतील
२)पावसाचे दिवस असतील पाणि वारुळात शिरल्याने बाहेर आल्या असतील
३)तेराव्याचे जेवायला आल्या असतील

वरील घटना अगदीच नाही होत असे म्हणता येणार नाही...माझे वडिल २००५ नोव्हेंबर मधे वारले..कसे ते काहीच कळु शकले नाही..कंपनीत डोक्याला मार बसला..कोणी म्हणे लीडर होते म्हणुन त्यांना मारलं तर कोणी म्हणे जेवल्यावर हात धुवायला गेले तेव्हा ब्लड प्रेशर लो होउन ब्रेन हॅमरेज झाले ....हे झाल्याच्या नंतर १५दिवस कोमा मधे होते आणि लग्नाच्या २० व्या वाढदिवशीच ते गेले....असो...अंतिम संस्कारा साठी आम्ही त्यांना गावाला घरी नेले...त्या दिवसा पासुन १३ दिवस घरात सतत विंचु, घोणी, पाणविंचु, काही वेगळ्या प्रकारचे किडे सतत दिसु लागले....त्या आधी कधी ही कुठल्या ही प्रकारचा किडे किटकांचा त्रास आम्हाला झाला नव्हता....माझ्या आत्याने वैतागुन शेवटी देवाला गार्‍हाणं घातलं की हेबंद होउदे आम्ही नारळ चढवु वगैरे....पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बंद झालं.........काही गोष्टी आकलना पलिकडच्या असतात.....

मी, माझे आई-बाबा शुक्रवारी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो ऑस्टीनला २-३ दिवस रहायला. माझा मित्र फिनिक्सला गेलेला त्यामुळे त्याच्या घरात मी आणि आई-बाबा. त्याच्या घरी पोहोचेपर्यंत रात्र झाली, रात्री मला स्वप्न पडले की त्या घरात प्रेत आहेत आणि एक काळी मांजर त्या प्रेतांवरुन फिरत आहे, दुसर्यादिवशी सकाळी मी हे आईला सांगितले तर आईलाही स्वप्नात प्रेतं दिसली. बाबांना रात्री घरात एका कृष्णवर्णीयाचे भास्/अस्तित्व जाणवत होते असे ते म्हणाले. दुसर्या रात्री कसे बसे झोपलो आम्ही, त्याही रात्री आईला स्वप्नात साप दिसला. आईला आणि मलाही फारशी स्वप्ने पडत नाहीत. काल रात्री १२ वाजता बाबा अचानक उठले आणि म्हणाले की कोणीतरी त्यांचा गळा दाबत होते, (त्यांना Sleep paralysis माहित आहे, आणि त्यांच्या म्हणन्यानुसार त्यांनी जे अनुभवले ते Sleep paralysis नाही)हे सगळं लिहिताना अंगावर काटा येतोय. त्यात पौर्णिमेची रात्र, दुरवर पसरलेली झाडे आणि भयाण शांतता. मित्राने रात्री १:१५ ला फोन केला की त्याची फ्लाईट कॅन्सल झालीये, त्याला भेटुन निघायचं ठरवलं होतं. अजुनच दडपण आलं, आख्खी रात्र तिथं काढणं जीवावर आलं होतं. काहीतरी अनुचित घडेल असं सारखं वाटत होतं, घरातले सगळे लाईट चालु ठेवले. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच २ रात्र घरातले सगळे लाईट चालु ठेवुन झोपलो. डोळे कसेबसे मिटले पण उघडले की कोणीतरी दिसेल असे वाटत होतं सारखं. मग फॅनकडे बघत राहिलो बराच वेळ तरीही घड्याळाचा काटा पुढे सरकेना. शेवटी आई बाबांना म्हणालो आता मला असह्य होतय इथे निघुयात लगेच, पाचेक मिनिटात घर सोडलं रात्रीचे १:४५ वाजले असावेत. तरीही दडपण होतच मनावर. गाडीही जड जाणवत होती, ऑस्टीनपासुन साधारण ३० मैल आल्यावर एका गाडीचे लाइट्स रिअर व्ह्यु आरस्यात दिसत होते, थोड्यावेळाने ती गाडी माझ्या गाडीमागे खुप जवळ असावी आणि नंतर एकदम दिसेनाशी झाली, मी आश्चर्याने मागे वळुन पाहिले तर मागे दुरवर काहीच नव्हते. Sad चांगलीच तंतरली, नंतर थोड्यावेळाने मात्र एकदम रिलॅक्स वाटलं आणि गाडीचाही जडपणा निघुन गेला.

हे सगळं नक्की काय होतं माहित नाही, पण जे काही वाटलं, अनुभवलं ते भयानकच

अजुनही हा धागा रंगतोय वाह!!!
" आणि तिथे मुंडक नसलेली बाई दिसली तिने माझा हात पकडला"
हिलेरीअस ....
तिला मुंडक नव्हत तर कस ओळखत रे!!! बाई आहे ते!!!
लब्बाड!!!!!

माझे वडिल आत्ताच वारले ३ महिन्यापुर्वी. दुर्दैवाने मी नव्हते तेव्हा तर माझी चुलत बहिण सांगत होती की बाबा गेले रात्री ८ वाजता पण सगळे नातेवाईकांना कळून ते येईपर्यंत मध्यरात्र झाली मग सकाळिच लवकर न्यावे असे ठरले. तर रात्री २ वाजल्यापासुन एक कावळा आवारात असलेल्या आंब्याच्या झाडावर येऊन ओरडत राहिलेला ते सकाळी बाबांना नेईपर्यंत Sad

बाबा गेले त्यानंतर माझ्या स्वप्नात पण आले होते पण असे दिसले की मधे काहीतरी कुंपणासारखे आहे आणि मी त्यांना हात नाही लावू शकत, पोहोचू शकत नाही. ते म्हणतायत मी वाट पाहिली तुझी Sad

काय आहे हे सगळे?

अंजली वाचुन खूप वाईट वाटले. तुझी मनस्थिती काय असेल ते समजू शकते. पण आता सावर. बाबांच्या फोटोला नमस्कार करुन पुढची वाटचाल कर. तुझी भेट शेवटी होऊ शकली नाही हा सल त्यांच्या मनात जातांना आणी आता तुझ्या मनात आहे. देव तुझ्या आणी तुझ्या घरच्यांच्या कायम पाठिशी राहो.

अंजली
वाईट वाटलं. गेलेल्या प्रिय व्यक्तीबद्दल अशी स्वप्नं अनेक दिवस पडत राहतात. भासही होतात. हळूहळू कमी होईल ते.

टुनटुन आणि किरण थँक्स. सध्या आई बरोबरच आहे मी. पण आईने फोटो मुद्दाम लावला नाहीये घरात. मला फार अस्वस्थ वाटतं त्यांचा फोटो बघून.

गेलेल्या प्रिय व्यक्तीबद्दल अशी स्वप्नं अनेक दिवस पडत राहतात. भासही होतात. हळूहळू कमी होईल ते.

>> +१

नको ती आठवण.. Sad

अंजली_१२, तुमची मनस्थिती समजू शकतो. "श्री गुरुदेव दत्त" हा नामजप जास्तीत जास्त करा. निदान रोज ३ माळा तरी. प्रत्येक माळेत १०८ मणी असतात म्हणजे रोजचा किमान ३२४ वेळा जप व्हावा. या जपाने पितरांना पुढे जायची गती मिळते. बाबांचा दुवा घ्याल अशाने.
आ.न.,
-गा.पै.

गानु आज्जी.........................छान पण नारायण धारप बाप...............................''काळि डाकिण " वाचा...............

अंजली तुमच्या दु:खात मी सहभागी आहे .... जवळपास इतक्याच दिवसापूर्वी माझ्यावरही असा प्रसंग आला माझी आई गेली तेव्हा मीही जवळ नव्हतो ...... पण मी शक्य तितका प्रयत्न करतो वाईट न वाटून घेण्याचा

..तरी तुम्ही सुदैवी तुमच्या बाबानी तुम्हाला स्वप्नात येवून भेट घेतली ...माझी आई आलीच नाही मला भेटायला Sad

बहुतेक तिने माझा हा शेर वाचला असेल.........

तू नकोस परतू आई थोपटून देण्यापुरती
रडरडून काळिज माझे अत्ताच झोपले आहे.......... Sad

Pages