अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या, धन्यवाद.
पण पहिल्याच पानाला खडा आला घासात.
>>>> गाव सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन सुखानं नांदणारं <<<< शिन्च्या त्या भुताखेतान्च्या गोष्टीतल्या गावाकरता देखिल हे अस्ले "सर्वधर्मसमभावाचे" डिक्लेरेशन द्यावे लागावे म्हणजे कॉन्गी विशिष्टधर्मलान्गुलचालनाची दहशत किती आहे ते जाणवते!

गानुआज्जीला उचक्या लागत असतील सारख्या आता ..............ईतकी आठवण काढली आहे ईथे.

आता जरा अमानवीय किस्से येउ द्या लोकहो......

सगळ्यांचे प्रतिसाद/गोष्टी वाचल्या .छान आहेत रात्री कधी विचार केला घाबरायला होत .

माझ्या बाबतीतला किस्सा, अमानवीय होता का नाही सांगता नाही येणार.

गेल्या वर्षी, साधारण याच दिवसांमध्ये, माझा साखरपुडा होऊन ४-५ दिवसच झाले होते. माझी ऑफिसची दुपारची शिफ्ट होती. १० पर्यंत. पण त्यादिवशी काहीतरी इस्सु असल्याने मला रात्री निघायला १:४५ झाले होते. माझा ऑफिस महापे ला, आणि मी राहतो डोंबिवलीला. तर रात्री १:४५ ला माझ्या bike ने ऑफिसहून निघालो. डोंबिवलीला माझ्या घराजवळ पोचेस्तोवर साधारण २:३० वाजले. घरापासून आधीच्या गल्लीजवळ अचानक एक म्हातारी बाई रस्ता क्रॉस करून गेली. तिने पूर्वीच्या वेळच्या सारखा मळकट हिरवा असा लुगडं घातल होत आणि डोक्यावर पदर होता. मला पाठमोरी दिसल्याने चेहरा तर दिसला नाही मला. माझ्या मनात एक सेकंद भर विचार आला कि एवढ्या रात्री हि बाई इकडे की करतेय. पण मी काही जास्त विचार न करता घरी मार्गस्थ झालो. आता एकेकाचे किस्से वाचून मनात विचार येतोय कि काही अमानवीय नव्हत ना ???

राक्षसगण वाल्यांना भूत दिसत नाही म्हणतात Uhoh

माझ्याकडून अजून एक किस्सा अमानवीय नाही पण सिक्स्थ सेन्स बद्दल.

माझा शिक्षण संपून साधारण ४-५ महिने झाले होते. मी PG च्या CET ची तयारी करत होतो. मला त्या दिवसांमध्ये बरायचं वेळेला रात्री स्वप्न पडायचा कि मला एक फोन येतो आणि मला खबर मिळते कि नेहा( नाव बदलले आहे) गेली म्हणून. नेहा माझी चांगली college friend . त्याच्यामुळे अचानक घाबरून मी जागा व्हायचो आणि मग परत मला थोडा वेळ झोप लागायची नाही. असे साधारण १०-१२ वेळा झाले असेल. पण कोणाशी या विषयावर बोललो नव्हतो.

एक दिवस अचानक मी बाहेर क्रिकेट खेळत होतो तेव्हा मित्राचा फोन आला कि नेहा गेली म्हणून. मला माहित होता तो कोणाचा आवाज आहे ते पण मी कन्फिर्म करण्यासाठी विचारला कि कोण बोलतोय ते. मग पुढे कळला कि ती नेहा म्हणजे आमच्या जुन्या बिल्डींग मध्ये राहणारी नेहा. दोघींचीही नावे सेम. तिचा मृत्यू अचानक काहीशा आजाराने झाला होता बहुतेक ब्रेन फिवर का काहीतरी. मला एकाच वेळी दुःख हि झाला आणि त्याच वेळेला मनात हायस पण वाटून गेल कि मी जे विचार करत होतो ते तेवढा तरी नाही झाल. अर्थात जी नेहा गेली ती सुद्धा ओळखीचीच होती पण थोडक्यात.

लहानपणी माझी कोकणातली आजी मला बर्‍याच भूताच्या गोष्टी सान्गायची. कोकणात असल्यामुळे तिच्याकडे बरेच किस्से होते असे.
त्यातला एक मला ईथे टाकत आहे.
एकदा त्याच्या गावचे दोघेजण मन्दिरातले कीर्तन सम्पल्यावर उषिरा घरी येत होते. ३-४ KM चा नेह्मीचा रस्ता होता. त्यादिवषी पाऊस असल्याने त्यानी प्रत्येकी एक छ्त्री घेतली होती. वाटेत एक बाई एकटीच जात होती.
ती याना म्ह्णाली मी पण तुमच्याच वाडीवर कुणाच्याकडे तरी राहायला आली आहे. मी पण तुमच्याबरोबर येते. माझी आणि माणसाची चुकामुक झाली आहे.
मग यानी तिला एक छ्त्री दिली आणि आपण ए़का छत्रीत असे घ्र्री जाऊ लागले. वाडी जवळ आली अस वाटत असताना त्या बाईने ईथून थोडे आत गेले की तिचे घर येते तिला तेवढे घरापर्यत सोडा .
हे बिचारे निघाले तिच्याबरोबर. बराच वेळ झाला तरी तिचे घर काही यायला तयार नाही. आता मात्र याना वाटायला लागल काहीतरी गड्बड आहे. पण करणार काय छ्त्री तिच्याकडे त्यामुळे मागच्यामागे जाव तर तस पण नाही. Finally ए़कदा तिच घ्रर आल. आजुबाजुला कुठ्लही घर नाही. हे तिच्याकडे छ्त्री परत मागणार तर ही बाई आत गेली. घ्र्राबाहेर एका कन्दीला चा प्रकाश होता ओसरीत लावलेल्या. कमितकमी ओसरीत जाउन तरी छ्त्री मागायला लागणार. घ्ररात तर कोणाचा मागमूस दिसेना ती बाइपण आत गायब. आवाज देउन पण कोणी येइना आता मात्र त्याना जाम भिती वाटू लागली होती . छ्त्री तर ठेवलेली दिसत होती. पट्कन घेउन जाव असा विचार करून हे दोघे पुढे गेले. आणि काय झाल कुणास ठाऊक त्यान एकदम वाट्ल की काही झाल तरी आपण घ्र्रात जायच नाहीये. ते प्रन्चड घाबरून मागे पळत सुट्ले. एकाने मागे वळून बघितले तर ते घ्र्र पेट्ले होते धडाधडा.
हे दोघे कसेबसे रस्ता शोधत घरी परतले. दुसर्‍यादिवषी उठून सकाळी त्या जागी शोध गेले, तर तिथे फक्त जळ्लेला छ्त्रीचा सान्गडा होता कुठेही जळ्लेल्या घ्र्राचे अवषेश मिळाले नाहीत.
................

रिया तू वाचलीस म्हणजे आता मलाही वाचायला हरकत नाही Happy
पण नवरा घरी असेल तेव्हा.. आज इथे पाऊस, ढगाळ वातावरण आणि मी एकटी नकोच रे बाबा

अरे वा! सगळ्यांनी गानू आजीची गोष्ट वाचली!
रिया तुझे किस्से भन्नाट आहेत.
लिंबुभाऊंनी जे लिहिलयं नाशिकच्या आठवणी त्यात अमानवीय काय आहे? Uhoh

अंजली नक्की वाच पण ब्रेक घेत घेत आणि अधुन मधुन आजुबाजुला माणसं आहेत हे पाहत, स्वतःच्या मनाला बजावत वाच! मग नाही भिती वाटत Happy

खरं सांगु तर मला या गानु आजीच्या गोष्टीपेक्षा विशालदादाची ते शैलीची गोष्ट( बहुदा मी परत येईन अस नाव होतं गोष्टीचं) ती वाचुन जास्त घाबरायला झालेलं. मी त्याच्या ब्लॉग वर वाचलेली

लिंबुभाऊंनी जे लिहिलयं नाशिकच्या आठवणी त्यात अमानवीय काय आहे?

>> त्यांनी ते अगदी लहानपणीच्या गोष्टी आठवतात याचे उदाहरण म्हणुन लिहीले आहे.

पियु परी लिंबू भाऊ सांगत आहेत ते अमानवीय नसले तरी सामान्य मानवाला अनुभवास येणारेही नाही !!
इतक्या लहान वयात ,,जे घडते आहे ते काय आहे ते नक्की समजणे व्च पुढे शब्दात सांगता येणे हे नक्कीच वेगळे आहे !!

नांव नाही आठवतं पण त्यातल्या लहान मुलाची आजी वामपंथी असते आणि तो एकदा तीच्या हातात एकटा सापडतो, तेंव्हाही त्याच्या आईनं काहीतरी `हस्तर येईल' असं काहीतरी सांगितलेलं असतं, त्याच्यानं तो वाचतो, कमी शब्दात प्रचंड भयनिर्मिती केलीय त्यात.

मलाही त्या कथेमध्ये वातावरणनिर्मिती आवडली........ आणि एकट्याने वाचावी अशीच आहे ती.....(प्रिया, उगाच शेजारी लोक असताना वाचत नको जाऊस अश्या गोष्टी..... त्यात काय मजा राहणार मग?)

या गुप्तेंची एक दगडांशी रिलेटेड गोष्ट मागे नवल मध्ये आली होती. ती कोणती? भन्नाट होती ती ही.

निखिल, एकट्याने वाचायची हिंमत नाही माझ्यात <<<< मी येवूका तुझ्या सोबत वाचायला रिया
मला भुते बिते घाबरतात त्यामुळे तुला अजिबातच भीती-बीती वाटणार नाही ...अर्थात भुतांची!!

..माझी भीती वाटल्यास विठ्ठल विठ्ठल म्हणायचे !! ...होत काही नाही तेवढेच देवाचे नाव घेवून होते आपले जाताजाता

येवूका मी ? Wink

Lol

वैवकु
मीच मागतोय Lol
जुने नवलचे अंक आणले होते भावाने. त्यालाही दहा वर्षं झाली. त्यात एक कथा वाचली. अतिशय परिणामकारक भयकथा होती. नाव आठवत नाही. पण एका महिलेला वाड्यात खेळणारी लहान मुलं दिसायची आणि ते तिचे मनाचे भास आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं असतं असं कथानक होतं.

<<निखिल, एकट्याने वाचायची हिंमत नाही माझ्यात >>
मुद्दाम वाचायचे एकट्याने. मी तेव्हढ्यासाठी काल उशिरा एकटा थांबलो हापिसात......:P
वेळ सार्थकी लागला...... Wink

मस्त आहे गानू आजीची गोष्ट... शेवटपर्यंत ट्वीस्ट आहेत कथेत.
मला तर ती हातभर लांबीची लाल भडक वळवळणारी जीभच आठवतेय कालपासनं Sad

नांव नाही आठवतं पण त्यातल्या लहान मुलाची आजी वामपंथी असते आणि तो एकदा तीच्या हातात एकटा सापडतो, तेंव्हाही त्याच्या आईनं काहीतरी `हस्तर येईल' असं काहीतरी सांगितलेलं असतं, त्याच्यानं तो वाचतो, कमी शब्दात प्रचंड भयनिर्मिती केलीय त्यात. >> हस्तरच नाव होते ना बहुतेक ?

मला तर ती हातभर लांबीची लाल भडक वळवळणारी जीभच आठवतेय कालपासनं > >एकदा धारपांची शपथ वाचून घे मग एकदा Wink

Pages