आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इश्श पण आम्हाला जॉईन झाली
इश्श पण आम्हाला जॉईन झाली
मध्यंतरी महेश कोठारेने
मध्यंतरी महेश कोठारेने भयकथांवर सिरीयल काढली होती. त्यात होती ही गानू आजींची गोष्ट.
मी वाचली गानू आजींची गोष्ट.
मी वाचली गानू आजींची गोष्ट.
वातावरण निर्मिती भन्नाट केली आहे जसे काही खराच अनुभव असावा.
अगदी शेवटपर्यंत एकदम नाट्यमय घटना घडतात. अशी भयकथा मी प्रथमच वाचली.
जे लोक वाचणार नाहीत ते नक्कीच काहीतरी मिस करतील.
वाचा सगळ्यांनी.. घाबरू नका..
मला पण एकदोन गोष्टी माहित आहेत. लिहिन मी पण. आमच्या घरात मात्र कोणालाही असे अनुभव आलेले नाहीत. त्यामुळे मला काही फार भिती वगैरे वाटत नाही.
ह मो मराठेंच्या 'बालकांड'
ह मो मराठेंच्या 'बालकांड' पुस्तकातही त्यांनी म्हटलयं की त्यांची आई तिच्या शेवटच्या दिवसांमधे अशीच खाटेवर पडलेली असायची आणि दोन हात पुढे ठेऊन चतुष्पाद प्राण्यासारखी चालायची आणि कुत्र्यासारखी भुंकायची. त्यांचीही कोकणात वाडी होती.
भुताखेतांच्या गोष्टींसाठी कोकण एवढे प्रसिद्ध असण्याचे काय कारण?
माधवी., >> भुताखेतांच्या
माधवी.,
>> भुताखेतांच्या गोष्टींसाठी कोकण एवढे प्रसिद्ध असण्याचे काय कारण?
माझा तर्क सांगतो. कोकण म्हणजे सापाचे वारूळ. नागलोकातून अनेक लिंगदेह कोकणात आकर्षित होतात. का ते माहीत नाही. त्यांनाच आपण भुते म्हणतो. नागलोकातून आल्याने त्यांच्या अंगी काही विशिष्ट सिद्धी/शक्ती असतात. त्यामुळे ती माणसाला घाबरवू शकतात.
साधारणपणे भूतयोनीतील अस्तित्व अडकलेले म्हणून केविलवाणे असते. बहुतांश भुते हीनदीन, दुर्बळ आणि पुढील गती मिळवण्यास उत्सुक असतात. नाग वा इतर लोकातून शक्ती मिळवून त्यांना कसंबसं या योनीतून सुटायचं असतं.
अशांना मदत करण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत.
१. नामस्मरण : यामुळे भुते माणसाला त्रास देत नाहीत.
२. श्राद्ध : यामुळे पूर्वजांना योग्य ती गती प्राप्त होते.
अर्थात, श्रद्धा पाहिजेच!
आ.न.,
-गा.पै.
हो गापै. नामस्मरण आणि
हो गापै. नामस्मरण आणि श्राद्धाबद्दल मी ही ऐकले आहे. धन्यवाद माहितीबद्दल.
आता ती स्टोरी वाचलीच पाहिजे
आता ती स्टोरी वाचलीच पाहिजे पण आता नाही. रात्रीच ऐकणार गानू आजींची अंगाई.
चांगली वातावरण निर्मिती झालेली असते.
मला रात्री भुतांच्या गोष्टी वाचाय/ऐकायला फार आवडतं.
बापरे माझ्याकडे ते अंधारवारी
बापरे माझ्याकडे ते अंधारवारी पुस्तक आहे. नवर्याने स्पेशल मागवले मायबोलीवरून! पण ते कव्हर पाहूनच मी १० फुट लांब असते त्यापासून. भयंकर असणारे पुस्तक!
आईशप्पथ... (ती गोष्टं वाचायला
आईशप्पथ... (ती गोष्टं वाचायला नको होती... भयंकर आहे.)
च्यायला काय डेंजर गोष्ट आहे
च्यायला काय डेंजर गोष्ट आहे ती.................. भर ऑफिसात टरकली..............
साला.... ते सुनंदनची आई
साला.... ते सुनंदनची आई त्याला घेऊन जातानाचे आणि नंतर नायक वाड्यात एकटा असण्याचे वर्णन फारच टरकवेबल आहे.
लोक लैच सिरियस झाले का ती
लोक लैच सिरियस झाले का ती स्टोरी वाचुन.
समजा सकाळ मध्ये मुक्तपीठ मध्ये ही स्टोरी आली असती तर लोकानी गानु आज्ज्जी असा आयडी घ्यायला कमी केलं नसतं.
असो.
अमानवीय अनुभवाकडे परत येउयात.
इथे आधी लिहिलय का ते माहिती नाही पण माझ्या लहाणपणीची गोष्ट आहे.
माझा धाकटा मामा नोकरीला होता इचलकरंजीला. त्याचं लग्न होउन दोन तीन वर्षे झाले होते.
अजुन मुलबाळ नव्हतं त्याला. अधे मधे गावाला यायचा.
अशाच एका उन्हाळ्याचा सुट्टीत सगळे मामा, मावश्या, विथ फॅमिली आमच्या आजोळी होतो.
तेव्हा म्हणे मामाला झपाटलेलं. मी चवथी पाचवीत असेन बहुतेक.
मामा लुकडा होता. इतका की वार्याने वाहुन जाशील असे सगळे चिडवायचे. पण त्याला बाधा झालेल्या रात्री तो सगळ्या धष्टपुष्ट मामा, माझे वडील आणि इतर शेजारी पाजारी ह्यांच्या पकडीतुन सुटुन घराचा दरवाजा उघडुन एका ओसाड माळाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न करत होता. दोन तीन वेळा घराबाहेर पळाला होता. हे सर्व रात्री १ च्या पुढे. नंतर त्याला पकडुन आणलेलं. तेव्हा त्याने मामीच्या डोक्यात ताट मारलं. फारच विचित्र वागत होता.
दोन तीन दिवसानी नॉर्मल झालं सर्व. नेमकं काय झालेल देवच जाणे. (तो दारु वै ही प्यायचा नाही)
झकोबा, हा अशाच प्रकारचा
झकोबा, हा अशाच प्रकारचा किस्सा माझ्या आजीच्या बाबतीतही सांगतात.
माझी आजी शिक्षिका होती आणि तिची शाळा बरीच दुर होती. पण अनेक मैल चालत ती शाळेत जायची. वाटेत एक स्मशानभुमी लागायची. त्या वेळेला घराच्या डागडुगीचं काही तरी काम काढलेलं.गवंडी लोकं रोज सकाळी यायचे आणि संध्याकाळी काम करुन जायचे. रोज सकाळी परत यायचं असल्याने ते त्यांची अवजारं सोबत नेतं नव्हते.. घरीच ठेवायचे. एक दिवस असचं संध्याकाळी ते घरातुन निघाले आणि त्यांचा अॅक्सिडण्ट झाला. आणि ते मेले. अवजारं आमच्याच घरी राहीली.
तर एक दिवशी आजीला शाळेतुन निघायला उशीर झाला आणि रात्री साधारण १०च्या सुमारास ती त्या स्मशानभुमीला पास झाली. घरी आली तर कोणाशीच बोलायला तयार नाही. आईची मामी (तिला मी पण मामीच म्हणते) म्हणाली की जेवायला वाढते आणि तिने आजीला भाजी पोळी जेवायला वाढली. त्यावर आजी म्हणायला लागली, "हे असलं देतेस का मला जेवायला? तुला माहीत नाही का मला जेवणात कोंबडी लागते". अगदी सोवळं वगैरे पाळणारी आजी असं म्हणतेय म्हणल्यावर मामा, मामी काय समजायचं ते समजले. कोणी तरी धरलय ते कळतं होतं पण कोणी आणि का ते कसं ओळखायचं ते त्यांना कळेना. खुपदा विचारलं की तू कोण आहेस?
शेवटी अतिशय घाणेरड्या शिव्या देऊन आजी म्हणाली,'माझी आवजारं चोरली ते चोरली आणि परत मलाच म्हणतोस का मी कोणेय ते? जर आजच्या आज ती अवजारं आणि माझे पैसे माझ्या घरी पोहचली नाहीत तर कायमचं तुझ्या बहिणीला झपाटुन राहीन. जिवंत सोडणार नाही तिला". हे सगळं घाण घाण शिव्या देत आणि अशुद्ध बोलणं होतं ( मला तसेच्या तसे डायलॉग्स माहित नाहीयेत). मामा म्हणाला आत तुम्ही जा मी उद्या सकाळी नेऊन देतो त्यावर आजी (?) म्हणे,' मग मी पण उद्याच जातो. आत्ता जेवायला कोंबडी दे"
त्यावर त्याने खुप विनंती केली की आजच्या दिवस जा. मी खरचं उद्या नेऊन देईन. पण ते जे कोणी होतं ते ऐकायला तयार नव्हतं. तेंव्हा रात्री ११.३०-१२ ला मामाने गवंड्याच्या घरी पैसे आणी त्याची अवजारं नेऊन दिली तेंव्हा आजी बेशुद्ध पडली आणि उठली ती डायरेक्ट दोन दिवसांनी
आजीला हे असले अनुभव बर्याचदा येतात ( देव गण असुनही). मागे याच मामाच्या लग्नात घरात खुप पाहुणे होते तेंव्हा कोनी तरी अंगणात झोपा अस आजी सांगत होती. आमच्या अंगणात एक भयाण दिसणारं चिंचेच झाड आणि आड-विहिर आहे. त्या विहिरीमध्ये खुप वेळ डोकावुन पहाणार्या प्रत्येकाला आत मधुन कोणी तरी आपल्याला बोलावतय असा भास होतो. आणि तरिही माणूस मंत्रमुग्ध झाल्यासारखं त्यातच पहात रहातं.मी स्वतःही अनुभव घेतलाय हा. त्यामुळे कोणीही त्या अंगणात झोपायला तयार नव्हतं. आणि बहुदा अमावस्या जवळ आलेली तेंव्हा. शेवटी वैतागुन म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा किंवा घरात तिच मोठी असल्याने जबाबदारी आणि निरुपायाने म्हणा पण आजी अंगणात झोपायला तयार झाली. साधारण १२-१२.३० च्या सुमारास तिला कोणी तरी छातीवर बसुन गळा दाबतय असं वाटायला लागलं, ओरडता येईना, श्वास घेता येईना तेंव्हा तिने जवळचा तांब्या दरवाज्यावर फेकुन मारला आणि लोकं बाहेर आले. बघितलं तर आजी घामाघुम.( वाई मध्ये नोव्हेंबरच्या सुमारास रात्री कोणी फक्त गरम होतंय म्हणून घामाघुम होईल अस मला वाटत नाही). आणि डोळे पांढरे होण्याची वेळ आलेली.ओरडायचा प्रयत्न करतेय तरी तोंडातुन आवाज येत नव्हता. शेवटी मोठी आजी (तिची आई) पळत घरात गेली आणि देवा पुढचा अंगारा आणुन तिला लावला आणि सगळ्यांनी जोर जोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली तेंव्हा आजी जोरात किंचाळली.आणि चक्कर येऊन पडली. पुढे ५-६ तासाने शुद्धीवर आल्यावर तिने सांगितलं की कोणी तरी तिचा गळा दाबत होतं आणी जेंव्हा या लोकांनी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली तेंव्हा त्या "कोणीतरी"ने गळा सोडला आणि जोरदार कानाखाली वाजवली आणि मग पुढचं तिला आठवत नाही कारण तिला चक्कर आलेली
हे सगळं काय आहे माहीत नाही पण जे काही आहे ते इतक्या जवळच्या व्यक्तीने अनुभव घेतल्याने खोटं म्हणवतं नाहीये. आणि इतकं सगळं होऊन पण आजीला अजुनही गावाला गेल्यावर अंगणात झोपायची हौस असते
आईशप्पथ... (ती गोष्टं वाचायला
आईशप्पथ... (ती गोष्टं वाचायला नको होती... भयंकर आहे.) >हे सगळे वाचून गोष्ट वाचायची ईच्छा होतेय . हॉरर पिक्चर बघून घाबरायची नाहीतरी होस आहेच मला.
रिया कसले भयंकर अनुभव आहेत ग.
गानुआजीची अंगाई इथे कुठे
गानुआजीची अंगाई इथे कुठे पोस्ट केलीये का? असेल तर् लिन्क द्या बर.
सामी, मला पण इच्छा होतेय.. पण
सामी, मला पण इच्छा होतेय.. पण लोकं बघ ना कसं म्हणतायेत... भिती वाटली... टरकली वगैरे

कसं वाचु मी?
बाप्रे.... भयानक! <<त्या
बाप्रे.... भयानक!
<<त्या विहिरीमध्ये खुप वेळ डोकावुन पहाणार्या प्रत्येकाला आत मधुन कोणी तरी आपल्याला बोलावतय असा भास होतो. आणि तरिही माणूस मंत्रमुग्ध झाल्यासारखं त्यातच पहात रहातं.मी स्वतःही अनुभव घेतलाय हा<< रिये चक्क तु???
हो ग तायडे, लहानपणी म्हणजे
हो ग तायडे, लहानपणी म्हणजे सहावी-सातवीत असताना मी खुप धीट होते

तेंव्हा पहायचे जाऊन त्या विहिरीत...कोण बोलावतं नेमकं ते
पण काही क्षणातच पाठीत आई, आजी, मामी नाही तर कोणाच्या तरी ओळखीतल्या कोणाचा तरी पाठीत धपाटा पडायचा.....
गानू आज्जीची गोष्ट कुठाय?
गानू आज्जीची गोष्ट कुठाय? वाचायला द्या.
कोकणात अशा गोष्टी जास्त प्रचलित असण्याचे कारण म्हणजे बहुतेक घरं ही एकमेकांपासून लांब असतात. कोकणात भलीमोठी गावे नाहीत. छोट्या छोट्या वाड्या मिळून गाव बनतं. शिवाय घराच्या आजूबाजूला आंबे, फणस, काजू, विहीर अशा अनेक (भूतप्रिय) गोष्टी असायच्या. त्यात चार महिने कोसळणारा पाऊस. त्याने वातावरण अजून भितीदायक. घराच्या बाजूला जंगल असल्याने साप, नाग, वाघ. तरस, बिबट्या अशी जंगली श्वापदं सर्रास आढळायची. (फार जुनी कथा कशाला? आमच्या एका वर्गमैत्रीणीच्या घरात बिबट्या आला होता. सातीला माहित असेल कदाचित!!!) पूर्वी तर दळणवळणाची फारशी साधने नाहीत. अशावेळेला करमणुकीला वगैरे अशा भुताखेताच्या गोष्टी हमखास चालू व्हायच्या. शिवाय कोकणामधे भगतगिरी, करणी वगैरे अंधश्रद्धादेखील पूर्वीपासून आहेतच.
भन्नाट किस्से. रि तुला कालच
भन्नाट किस्से.
रि तुला कालच सांगितलय मी की अंगाईची गोष्ट गोड आहे म्हणुन
बिन्धास्त वाच
बाप्रे त्या चिखलभाताच्या पुढे
बाप्रे त्या चिखलभाताच्या पुढे वाचवेना माझ्याच्याने
वाचा गं पोरींनो... पण ब्रेक
वाचा गं पोरींनो... पण ब्रेक घेत घेत वाचा. थोडं थोडं वाचुन झालं की आजुबाजुला लोकं आहेत याची खात्री करुन घ्या. म्हणजे भिती नाही वाटणार. (मला तितकीशी भिती नाही वाटली)
मी ती कथा वाचली... पण भिती
मी ती कथा वाचली... पण भिती वगैरे काही वाटली नाही.... जर तुम्ही इथे पोस्ट केलेले किस्से वाचु शकता तर ती कथा देखील आरामात वाचु शकता. एवढी काही भितीदायक नाही आहे ती कथा फक्त रंगवुन रंगवुन सांगितली आहे इतकेच.... त्यामुळे बिनधास्त वाचा.... ज्यांना खरोखर भिती वाटते त्यांनी रामरक्षा म्हणा बघु
गानू आजीची गोष्ट एकदम भारी!
गानू आजीची गोष्ट एकदम भारी! काल वाचली, आज परत वाचणार. भयकथा असावी तर अशी!
इथे पण बर्याच जणाना चकवा
इथे पण बर्याच जणाना चकवा लागतो. मग ते माबोच्याच एका बाफ मधून दुसर्यात तिसर्यात असे फिरत परत पहिल्यात येतात आणि फिरतच रहातात बाहेर पडणं कठीण होतं.
आणि शिवाय माबो-विपुंचा चकवा लै ड्यांजर असतो. एका विपुतून दुसर्या विपुत जायला लागलं की काळावेळाचं भान नाहीसं होतं.
>>>>
गानूआजी दोन वर्षांपूर्वी नवल किंवा धनंजय मध्ये झळकल्या होत्या. लै भारीये ती गोष्ट!
फक्त एका ठिकाणी तपशीलात एक छोटीशी चूक झालीये. नायक एकदा म्हणतो की त्याचं कुटुंब सरपणीत चार वर्षं राहिलं तर नंतरच्या हनुमान जयंतीचा जो परिच्छेद आहे त्यात सहा-सात वर्षं सरपणीत घालवली असा उल्लेख आहे. अर्थात यामुळे त्या गोष्टीत काहीही 'बाधा' येत नाही.
भारी! भारी! फारच भारी गोष्ट
भारी! भारी! फारच भारी गोष्ट आहे ती गानू आजींची अंगाई! कित्येक दिवसांनी एक विश्वास बसावा अशी भयकथा वाचली!! अत्युच्च वातावरण निर्मिती केली आहे. मस्त.
इतक्या पोस्टी पाहुन असं काय
इतक्या पोस्टी पाहुन असं काय अमानवीय झालं ते पहायला आले!
गानुआज्जींची गोष्ट मस्तच.
अत्युच्च वातावरण निर्मिती केली आहे. >>++
चला गानू आजीची गोष्ट वाचायला
चला गानू आजीची गोष्ट वाचायला एक गटग भरवूया...
पण खरोखर अश्या भूताच्या गोष्टी वाचण्यापेक्षा ऐकायला मज्जा येते... ते पण रात्रीच्या वेळी ...
सामी, जा वाच एवढी काही डेंजर
सामी, जा वाच
एवढी काही डेंजर नाहीये
चाफा, विशालदादा, कौतुकदादाच्या कथा वाचल्या असशील तर फारसं काही वाटणार नाही
पण ब्रेक घेत घेत वाच
लिंक द्या गानु अज्जींची
लिंक द्या गानु अज्जींची
Pages