ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही लोकांना मोठे झाले तरी त्याच शाळकरी गप्पा, बढाया यात रमायला आवडतं. शत्रु व त्यांचे सेनापती सगळेच प्रचंड मूर्ख, भित्रे, अंगशक्तीने लेचेपेचे तर आपल्याकडील रस्त्यात गस्त घालणाऱ्या गुरख्यापासून सगळेच प्रचंड महापराक्रमी अशा गप्पा करणे, त्या अनुशंगाने विनोद व किस्से रचणे, ते ऐकणे ऐकवणे यातुन त्यांना खूप समाधान मिळत रहाते. त्यांना अशा बातम्या फार आवडतात. >> +९९.९९

>पहलगाम येथे २६ निरपराधी भारतीयांची हत्या करणार्‍या ४-५ राक्षसांना पकडले का? त्यांना काय कठोर शासन मिळाले?

असले प्रश्न विचारू नयेत. इतके छान चमचमीत युद्ध चलू आहे, इस्लामाबाद वर तिरंगा फडकत आहे, कराची उध्वस्त झाले आहे, शहबाझ शरीफ व असीम मुनिर पळून गेले आहेत, इस्लामाबाद चे नाव बदलून इश्वरपूर होत आहे, पाकिस्तानी जनरल्स फ्लील्ड मार्शल आर्नब समोर गुढगे टेकून शरण येत आहेत, असे असताना असे प्रश्न विचारून मजा किरकिरा करू नये.

On a serious note, चीन म्हणजे स्वस्त व तकलूपी माल करणारा देश ही प्रतिमा आता मागे पडली आहे व चीन च्या मिसाईल्स नी खरेच राफेल पाडले असेल तर unfortunately it is a big boost for china.

करणारा देश ही प्रतिमा आता मागे पडली आहे व चीन च्या मिसाईल्स नी खरेच राफेल पाडले असेल तर>>> No one is confirming or denying this claim. India is silent and Pak Minister is giving proof of social media Happy

< मजा किरकिरा करू नये. > विकु, काय हे तुमचं मराठी?

पहलगामच्या दहशतवाद्यांना पकडायचं किंवा मारायचं कामही मीडिया करून टाकेल. पूंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या मार्‍यात मौलाना मोहम्मद इइक्बाल नावाचा शिक्षक मारला गेला. त्याला आपल्या देशभक्त चॅनेल्सनी पुलवामा हल्ल्यातला दहशतवादी - लष्कर ए तोयबाचा कमांडर ठरवून टाकलं आणि पी ओ के मधल्या कँपमवर भारताने केलेल्या हल्ल्यात मारून टाकलं.

DISTRICT POLICE POONCH
@Poonch_Police
Poonch Police refutes fake news circulating about the death of Maulana Mohd Iqbal in cross-border shelling. He had no terror links. Misreporting causes panic and Legal action will follow against those spreading misinformation

ट्विटर हँडल्स, न्युज पोर्टल्स वर बंदी येते.पण फेक न्युज पसरवणार्‍या देशभक्त न्युज चॅनेल्सना गालावर थोपटून असं नाही हं करायचं बाळ असं सांगितलं जातं.

९९.९९>>
०.०१ कशासाठी कापले हपा?

तुमचे नाही कापले. मला ०.०१ टक्के वेळा अशा बातम्या आवडून घ्यायची हुक्की येते म्हणून तेवढा कमी केला.

मानव , ती पोस्ट छानच आहे.

बाकी इस्लामाबाद ताब्यात वगैरे वाचून मराठ्यांनी जसं दिल्लीच्या तख्तावर बाहदूरशहाला बसवले तसं होतंय बहुतेक असं वाट्तंय.
उद्या अफगाणिस्तान, मग पुढे खैबर खिंडीतून तुर्कस्तान आणि मग युरोप काबीज करायला कितीसा वेळ लागणार ?

प्रेस कॉन्फरेन्स बघितली, काल आपण पाकिस्तान चा ड्रोन हल्ला परतवून लावला आणि त्यांची Air defence system target केली. बाकी कराची, इस्लामबाद, पेशावर, रावलपिंडी, f16 सगळ्या थापा होत्या.

काल आज तक आणि सगळ्या च चॅनल्स वर पाक वर पूर्ण कब्जाच मिळाल्यासारखा जल्लोष सुरु होता. या सिचुएशन मधे कसं रिपोर्टिंग करु नये याचे उदाहरण. रिडिक्युलस क्लेम्स होते एकेक. आणि खोटी ग्राफिक्स आणि व्ह्डिओ पण सोबत . कुठून आणतात हे लोक या अपडेट्स हा प्रश्न आहे!! काहीच प्रोटोकॉल्स नाहीत का यांना ?
व्हॉअ‍ॅ ग्रुप्स मधे चॅनल्स वर विश्वास ठेवू नका म्हटले तर मलाच उलट वेड्यात काढत होते लोक. प्रत्येक बाबतीत अविश्वास दाखवायला पाहिजे का? असे एक मैत्रिण म्हणाली Happy
एवढे करून आता मला खरे काय स्टेटस नक्की आहे हे समजतच नाहीये. प्रेस कॉन्फरन्स बघायला मिळाली नाही कालपासून.

ग्राफिक्स आणि व्ह्डिओ.. AI generated असे बारके लिहिलेले पाहिले मी दोन तीन ठिकाणी.. तर एका व्हिडिओवर प्रतीकात्मक असे लिहिले होते. कोणाला कळला अर्थ तर ठीक..

सगळ्याच प्रतिसादांमधील भावनांशी आपणही सहमत बुवा! मीडिया स्वतःच जग जिंकल्याच्या आविर्भावात आहे. कलकलाट, गोंगाट, निरर्थक उन्माद, युद्धज्वर वगैरे मीडियाकडून येणे नको झाले आहे.

ते एक असो! इथे सध्या मीडियावर राग काढणे सुरू आहे तर!

काही जवान शहीद झाले त्यांची नावासह श्रद्धांजली पोस्ट व्हॉट्सअपवर पाहिली. देव करो ती सुद्धा खोटी असो.

इतका लो क्वालिटी मीडिया दुसऱ्या कुठल्या देशात असेल असं वाटतं नाही.
इलेक्ट्रॉनिक पेक्षा वर्तमानपत्रे बरी म्हणायची, लेखनात कायच्या काय चुका असल्या तरी कानठळ्या तरी बसत नाहीत

सगळ्यांनी टीव्ही न्यूज चॅनेल्स बघणं सोडून द्या बरं काही दिवस. त्यांची डोकी फिरलीत.... आपलीही फिरवतील. आत्ता डोकी ठिकाणावर राहणं खूप गरजेचं आहे.

फक्त आणि फक्त सरकारी ब्रिफींग बघा आणि त्यावरच विश्वास ठेवा. बघायचंच असेल तर सरकारच्या व सैन्याच्या हॅन्डल्स, accounts वरून जे सांगितलं जाईल ते सोडून बाकी काहीही सिरियसली घेवू नका.

सगळी एनर्जी आत्ता एकजुटीने तिन्ही सरक्षण दलांच्या पाठीशी लावा _/\_

पाकिस्तानने परत जम्मूवर ड्रोन हल्ले सुरु केले आहेत. आणि भारतीय हल्ल्यासाठी शिल्ड म्हणून कराची ते लाहोर नागरी विमानोड्डाण सुरु आहे.

Pages