What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India
आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.
पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.
मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.
मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.
त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.
एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..
असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!
** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.
पुण्यात दगडू हलवाईच्या
पुण्यात दगडू हलवाईच्या मंदिरात होते तसे. म्हणजे स्त्रियांचे अथर्वशीर्ष सहस्रावर्तन वगैरे. किंवा मुंबईत महालक्ष्मी आणि सिद्धिविनायकासमोर एक दोन किलोमीटर लांबीच्या रांगा लागतात तसे.>>>
किंवा केळशीच्या महालक्षमीच्या यात्रेला भरते तशी गर्दी
फरक इतकाच दगडूशेठ मंदिर ,
फरक इतकाच दगडूशेठ मंदिर , महालक्ष्मी मंदिर किंवा सिद्धिविनायक मधील पूजा आरती वेळी सर्वसामान्यांना त्रास होतो मान्य !
पण ते धार्मिक विधी उरकल्या नंतर इतर धर्मियावर दगडफेक झाल्याची एकही घटना सापडणार नाही .
विरूद्ध बाजू बद्दल खात्री ने असे कोणी सांगू शकत का ?
पण ते धार्मिक विधी उरकल्या
पण ते धार्मिक विधी उरकल्या नंतर इतर धर्मियावर दगडफेक झाल्याची एकही घटना सापडणार नाही . >> नाहीच सापडणार खात्री आहे.. कारण आता दगड सोडून स्फोटक रॉकेट फेकण्यापर्यंत आम्ही प्रगती केली आहे.
धर्म, अंडी, प्रोटिन्स,
धर्म, अंडी, प्रोटिन्स, सारासार विचार हे केवळ महान तर्कट आहे.
चांगलं भरपूर प्रोटिन खाऊन ५० मिलिअन लोकांनी एकदा न्हवे दोनदा ट्रंप सारख्या बाजारबुणग्याला मत दिलं. त्या मागा पब्लिकचे एकुणच विचार किंवा ते करता येण्याचा अभाव हा कुठल्या धर्माचा आणि खाण्या पिण्याचा सवयीचा भाग झाला?
बाकी खाण्यापिण्याच्या सवयी माणसाचे विचार ठरवतात या अगदी टिपिकल फार राईट विंग प्रोपगंडाची ही फार लेफ्ट आवृत्ती का?
मी उदय , एकदम बरोबर
मी उदय , एकदम बरोबर
दाऊद ने तर शेकडो किलो आर डी एक्स वापरले होते ...
दाऊद वरून आठवल !.
तो ही पाकिस्तान मध्ये आट्या साठी ट्रक च्या मागे पळत असेल का ?
गोडस्यानी तुंप वरण भात खाउन
गोडस्यानी तुंप वरण भात खाउन महत्म्याचा खून केला.
तुमच्या मुद्द्यातला फोलपणा
तुमच्या मुद्द्यातला फोलपणा दाखवून दिला की तुम्ही काही तरी अवांतर लिहिता.
विषय प्रार्थनास्थळांवर येणार्या भाविकांच्या वागणुकीचा आहे ना. तुम्ही म्हणाले हिंदू धर्मीय धार्मिक विधीनंतर ईतर धर्मीयांवर दगडफेक करत नाही. मी दसरा मिरवणुकीत जय श्रीराम म्हणत मशिदीवर रॉकेट दागणार्यांचे ऊदाहरण दिले तर तुम्ही भलतेच काही तरी बोलता.
दाऊदने स्फोट केले तर त्याला पकडावे. त्याचा ३० वर्षानंतर सातार्यातल्या मशिदीवर स्फोटके फेकण्याशी काय संबंध?
परत सर्व च चुकत आहेत.
परत सर्व च चुकत आहेत.
अनेक सिनेमात पण दाखवले आहे.
हिंसक कृती करून दंगल कोण स्टार्ट करतात
एकदा स्टार्ट झाली की सामान्य लोक नाईलाज नी त्या मध्ये ओढली जातात.
सर्व सामान्य भाविक मग ते कोणत्या ही धर्माचे असोत ते देवावर विश्वास ठेवणारे असतात.
मशिदी मध्ये जे मौलाना प्रवचन देतात ते हिंसा करण्यास प्रवृत्त करणारे असते .
असे ऐकले आहे.
नक्की माहित नाही.
आणि सर्रास तसेच सर्व ठिकाणी घडतं असेल असा पण दावा नाही.
हिंदू मंदिरात पुजारी असले प्रकार करत नाहीत .
हे 100% खरे आहे
उल्लेख केलेल्या धार्मिक
उल्लेख केलेल्या धार्मिक स्थळांबाबत बोलायचे सोडून तुम्हीच विषय भरकटवला.
त्या मुख्य स्थळांमधील धार्मिक विधी नंतर दगडफेक झाल्यात का ?
असे मी विचारले होते , काल पाकिस्तान मध्ये लहान हिंदू मुलींना पळवून नेवून मुस्लिम धर्मांतर करण्याचा विषय आणि भारतातील लहान मुले पळवून भीक लावण्याच्या प्रकाराशी जोडला होता .
दोन्हीही वेळेस तुम्हीच विषयांची सरमिसळ केली होती .
वर जाऊन बघा पुन्हा एकदा !
स्वतःच्या हिमतीवर चांगल्या नोकऱ्या मिळवणाऱ्या वरणभात प्रेमी वर जळाल्याने तुमच्या पिढ्यांचे भविष्य बदलणार आहेत का ? त्या पेक्षा आय क्यू वाढवायचे बघा !
इथे पिठमागे , गोडसे , वरणभात करणार पण उत्तम सर्व्हिस , उत्तम वैदाकिय उपचार ,स्वादिष्ट जेवण देणारी हॉटेल्स यासाठी मात्र जोशी अभ्यंकर कुलकर्णी आडनावे शोधत बसतात ....
मशिदी मध्ये जे मौलाना प्रवचन
मशिदी मध्ये जे मौलाना प्रवचन देतात ते हिंसा करण्यास प्रवृत्त करणारे असते .>>>>>>
१०० टक्के खर आहे !
शुक्रवारी दंगली भडकण्याची शक्यता जास्त असण्याचे कारण मौलानाच असतो .
तर हिंदू लोकं बऱ्याच वेळा मिरवणुकीत वादाचे प्रसंग निर्माण झाल्यास दंगली घडवतात .
पण देवळात जाऊन आले आणि दंगलीत भाग घेतला असे प्रकार होत नाही .
नाहीतर एखाद्या राजकीय नेत्याची सभा , तेथे एखादा भगवा साधू चिथावणीखोर भाषण देतो, मग दंगली उसळतात.
आता या मुद्द्यातील मौलाना दोष न देता फक्त भगव्या साधूचे चिथावणीखोर भाषण वरून मी उदय यांचा प्रतिसाद येईल बघा
'पाच कोटी लोकांनी अंडी वगैरे
'पाच कोटी लोकांनी अंडी वगैरे भरपूर खाऊन ट्रंपना मते दिली '
मला संबंध समजला नाही.
मला भारताविषयी बोलायचे होते. इथे धर्माने कित्येक गोष्टी खाणे पाप ठरवले आहे. बायकांनी पुढे होऊन स्वतः काही वेगळे करणे हे कुळाचाराच्या विरुद्ध असते. कुलाचार हा शेकडो हजारो वर्षांपूर्वीच्या धार्मिक रूढी, परंपरा ह्यांचे अवशेष आहेत. इथे पाचशे मिलियन लोक अर्धपोटी असू शकतात. आणि त्यातल्या दोनशे मिलियन स्त्रिया असतात. त्या कुपोषित असू शकतात. त्यांची मुले अशक्त, किरकिरी असतात. ती सुजाण, समंजस नागरिक बनणे कठीण. त्यांच्या हातून काही दैदीप्यमान घडणे आणि त्यातून देशाचे भविष्य उज्ज्वल होणे अथवा देशाची कीर्ती वाढणे हे अगदी अपवादात्मक. शाळेत दिली जाणारी अंडी धर्मानुसार किंवा कोण्या मूठभर लोकांच्या भावना दुखावतात म्हणून सरसकट सर्वांना देणे बंद करणे ही धर्माची लुडबूडच आहे. अशा काही निर्णयांमुळे वैयक्तिक कर्तृत्व गाजवण्याची क्षमता - शक्यता कमी होते. म्हणजे जागतिक दर्जाचे उत्तम क्रीडापटू, वैज्ञानिक, लेखक, कलाकार, प्रशासक, अभियंता,संशोधक, दार्शनिक वगैरे. अपवाद सापडतीलच. ते शोधू नयेत. त्याने नियमच सिद्ध होईल. .
इथे पिठमागे , गोडसे , वरणभात
इथे पिठमागे , गोडसे , वरणभात करणार पण उत्तम सर्व्हिस , उत्तम वैदाकिय उपचार ,स्वादिष्ट जेवण देणारी हॉटेल्स यासाठी मात्र जोशी अभ्यंकर कुलकर्णी आडनावे शोधत बसतात>>>
कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिन्घ
खलिल बातमीत अपराधी कोण आहेत असे वाटते तुला?
https://www.indiatoday.in/india/story/muslim-boy-assaulted-for-not-chanting-jai-shri-ram-in-madhya-pradesh-youth-booked-2315315-2022-12-30
https://www.indiatvnews.com/sports/cricket/rohit-sharma-reacts-to-jai-shri-ram-chants-for-mohammed-shami-during-4th-test-in-ahmedabad-2023-03-14-854407
https://www.timesnownews.com/india/maharashtra-mosque-imam-brutally-thrashed-his-beard-cut-for-refusing-to-chant-jai-shri-ram-article-99071215
मग भटकळ , खान , अफजल गुरू
मग भटकळ , खान , अफजल गुरू मूळे सगळे मुस्लिम अतेरिकी समजायचे का ?
एका औरंग्या ने संभाजी महाराजांचा हाल करून खून केला त्या म्हणून उरलेले सगळे औरंग्या ठरतात का ?
नाही म्हणजे गोडसे आणि वरण भात चा उल्लेख तु ब्राह्माण ना टार्गेट करण्यासाठीच केला असे दिसतंय म्हणून विचारले !
तुला काय ठरवायचे आहे ते
तुला काय ठरवायचे आहे ते ठरवायला तू मोकळा आहेस. माझं मी ठरवलं आहे
जोशी अभ्यंकर कुलकर्णींचे युग
जोशी अभ्यंकर कुलकर्णींचे युग संपत आले आहे. पुण्यापुरते मर्यादित प्रमाणात असेलही पण निदान मुंबईत ते संपले आहे. मुंबईत मराठी माणूसही संपला आहे. तिथे जोशी अभ्यंकरना काय घेऊन बसायचे?
विस्तारलेल्या पुण्यातही तेच होणार आहे.
आपली देवळातली व्यवस्था वेगळी
आपली देवळातली व्यवस्था वेगळी आहे. तिथे पुजारी प्रवचन करीत नाहीत. ते तिन्ही त्रिकाळ मूर्ती/ विग्रह/ प्रतिमेची पूजा अर्चा करण्यात, तिला खाऊ घालण्यात, निजवण्यात, जागे करण्यात मग्न असतात.
कीर्तनकार ही वेगळी व्यवस्था आहे. आणि अलीकडे काही कीर्तनांतून परधर्म द्वेषाचा संदेश मिळू लागला आहे.
मुंबईचे मलाही माहित नाही , पण
मुंबईचे मलाही माहित नाही , पण पुण्यातील कोणत्याही नामांकित हॉस्पिटल मध्ये गेले तर तुम्हाला तेथे एक्स्पर्ट डॉक्टर जोशी अभ्यंकर कुलकर्णी असण्याचे प्रमाण जास्त दिसते , हे सत्य नाकरूच शकत नाही .
त्या हॉस्पिटल्स च्या मॅनेजमेंट ला वेड लागलंय का विशिष्ठ जातीतील डॉक्टर्स घ्यायला ?
शेवटी क्वालिटी महत्त्वाची !
म्हणून झांपु ला सांगितले ब्राह्मणांना कितीही टार्गेट करायचा प्रयत्न केला तरी त्यांची बुद्धिमत्ता तू नाकारू शकतच नाही .
पुण्यातील मुस्लिम बहुल भागात एकही नामांकित हॉस्पिटल नाही , किंवा इतर पुण्यातील नामांकित हॉस्पिटल मध्ये एक्स्पर्ट मुस्लिम डॉक्टर्स का नसतात ?
आरक्षणामुळे शैक्षणिक सुविधांचा लाभ घेवू शकलेल्या पैकी एक तरी नामांकित डॉक्टर झालाय का ?
आय टी कंपन्यांचे वारे देखील ब्राह्मण वर्गानेच पूर्वी ओळखले ,
इतरांना जरा अमंळ उशीरच झाला .
खंपू , थोडक्यात वरणभात खावून ब्राह्माण वर्गाने उच्च आय क्यू दाखवला आहे .....
वर मी उदय यांच्या बरोबर
वर मी उदय यांच्या बरोबर चर्चा करताना थोडीशी आकडेवारी द्यायची राहिली होती !
जगात २४ टक्के मुस्लिम लोकसंख्या असताना फक्त १३ नोबेल ( सर्व विभागात ) विजेते आहेत तर ०.२ लोकसंख्या ज्यू ची असताना १०० पेक्षा जास्त नोबेल ( फक्त फिजिक्स , केमिस्ट्री)विजेते आहेत , इतर विभागात देखील भरपूर आहेत .
ज्यू लोकं शास्त्र विज्ञानिष्ठ होत गेले आणि मुस्लिम धर्मनिष्ठ होत गेल्यामुळे हा फरक पडला असावा का ?
म्हणून मुस्लिम लोक समधर्मीयांना देखील शुक्रवारच्या दिवशीच अल्ला ला भेटायला पाठवत असतील का?
पाकिस्तानी मिलिटरी , राजकीय नेत्यांनी देखील गेल्या सत्तर वर्षात तेथील सामान्य लोकांना मदरसे आणि मौलाना च्या ताब्यात ठेवून धर्माच्या अफू गोळया देवून झुलवत ठेवले आणि जनतेलाही अक्कल नव्हती तेही स्वतःला झुलवत बसले.
त्याचा परिणाम दिसतोयच ट्रक च्या मागे पीठासाठी धावपळ .
पाकिस्तान पेक्षा भारताची औद्योगिक प्रगती भरपूर जास्त झाली , त्याचे श्रेय येथील शिक्षण पद्धतीला द्यावेच लागेल.
सर्व धर्मियांनी देव धर्मांच्या नादी न लागता विज्ञननिष्ठ शिक्षण घेतले म्हणुनच प्रगतीची फळे चाखता आली .
ब्राह्मण वर्ग पहिल्यापासूनच
ब्राह्मण वर्ग पहिल्यापासूनच शिक्षण आणि शैक्षणिक माहितीत आघाडीवर होता. शेकडो हजारो वर्षे. level playing field निर्माण झाल्यावर दोनेकशे वर्षांनंतर परिस्थिती बदललेली दिसू शकेल. शिवाय तोपर्यंत आजच्या जोशी अभ्यंकरांची खापरटिपर पणतवंडे अमेरिका ऑस्ट्रेलियामध्ये आपला जम बसवून असतील. इथे नाही.
.
आज पूर्वीच्या अधिसूचित जातीजमातींपैकी सध्याचे नवबौद्ध हे बऱ्यापैकी प्रगती करीत आहेत. ( हे माझे निरीक्षण फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे)
दुर्दैवाने इतर ठिकाणी निम्न जातींमध्ये पुरेसे जागरण झालेले दिसत नाही. उत्तरेतली सरंजामशाही आणि वर्चस्ववाद ह्यामुळे उप्र, बिहार, झारखंड, ओडिशा ह्या टापूतून लोंढेच्या लोंढे मुंबईत येतच आहेत. मात्र वीस पंचवीस वर्षांपूर्वी इथे आलेल्यांची मुले आता इंग्लिश/ हिंदी माध्यमात शिकतात. त्यांना चांगल्या नोकऱ्याही मिळू लागल्या आहेत. मराठी आणि उर्दू शाळा बंद पडल्या आहेत. इंग्लिश आणि हिंदीची चलती आहे.
परिवर्तन होत च जाणार.त्या
परिवर्तन होत च जाणार.त्या परिवर्तन ना बरोबर आपण पण स्वतः मध्ये बदल करून व्यवस्थेचा फायदा उचलत प्रगती करत जायचे असते.
100 वर्ष पूर्वी ची हिंदी ,मराठी आणि ची हिंदी ,मराठी फरक आहे.
आता ok chya okay आले..
इंग्लिश पण बदलत आहे.
आता ज्यांचे वय 50,. आहे त्यानं आताचे नवीन इंग्लिश शब्द माहीत पण नसतात.
प्रतेक शब्दाला पर्यायी शब्द निर्माण झाला आहे.
Ai सर्व दूर पसरली तर भाषा च वाचेल की नाही.
ह्याची शाश्वती नाही.
म्हणून तर वर मी lihale आहे.
जुने सोडा,विसरा आता
<< पाकिस्तान पेक्षा भारताची
<< पाकिस्तान पेक्षा भारताची औद्योगिक प्रगती भरपूर जास्त झाली , त्याचे श्रेय येथील शिक्षण पद्धतीला द्यावेच लागेल.
सर्व धर्मियांनी देव धर्मांच्या नादी न लागता विज्ञननिष्ठ शिक्षण घेतले म्हणुनच प्रगतीची फळे चाखता आली . >>
----- विज्ञाना आणि तंत्रज्ञानाचे अनन्यसाधारण महत्व भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी ओळखले होते, त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताची येथवर प्रगती झाली.
यूपी ची लोक उद्योग
प्रतेक देशाची,राज्याची एक कुवत असते त्या पलीकडे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवू नका.
काही ही केले तरी भारत कोरिया,जपान,अमेरिका ,फ्रान्स सारखा विज्ञान तंत्रज्ञान मध्ये दिव्य असे काही करू शकणार नाही.
किंवा त्यांच्या सारखा समाज भारतात निर्माण होणार नाही.
मुंबई मध्ये मराठी लोकांची संख्या कमी झाली की .
तिचा दर्जा पण खाली येणार.
प्रतेक समाजाची पण ठराविक कुवत असते.
प्रशासन च दर्जा खराब होत जाईल आणि बेबंद शाही वाढत जाईल जसे यूपी,बिहारी लोकांची संख्या वाढत जाईल तशी.
फक्त मराठी लोकांची संख्या वाढली की उद्योग व्यवसायात हे शहर कमी पडत जाईल.
यूपी मधून भारताचे जास्त पंतप्रधान निवडून आले आहेत.
पण ते यूपी चे नागरिक नाहीत.
Vp sing आणि चंद्रशेखर सोडून.
त्यांनी काय काय दिवे लावले ते वेगळे लिहायला नको.
Mandal आयोग, atrocity कायदा.
जी जातीय वादी मानसिकता यूपी,बिहारी लोकांची असते ती च त्यांनी दाखवली.
देशात जातीय वाद वाढवला.
काश्मीर मध्ये पण वेगळेच दिवे लावली
विज्ञान आणि तंत्रज्ञान ना
विज्ञान आणि तंत्रज्ञान ना मध्ये कट्टर धार्मिक पण एक्स्पर्ट असतात.
सर्व हिंदू वादी,मुस्लिम वादी,इत्यादी सर्व वादी.
ते सर्व हे शिक्षण घेत असतात.
पण मानसिकता कट्टर च असते.
ती बदलायची असेल तर जोडीला मूल्यधरित शिक्षण पण लागते.
समाज पण तसा च बदलाव लागतो.
<<
<<
मुंबईचे मलाही माहित नाही , पण पुण्यातील कोणत्याही नामांकित हॉस्पिटल मध्ये गेले तर तुम्हाला तेथे एक्स्पर्ट डॉक्टर जोशी अभ्यंकर कुलकर्णी असण्याचे प्रमाण जास्त दिसते , हे सत्य नाकरूच शकत नाही .
त्या हॉस्पिटल्स च्या मॅनेजमेंट ला वेड लागलंय का विशिष्ठ जातीतील डॉक्टर्स घ्यायला ?
शेवटी क्वालिटी महत्त्वाची !
म्हणून झांपु ला सांगितले ब्राह्मणांना कितीही टार्गेट करायचा प्रयत्न केला तरी त्यांची बुद्धिमत्ता तू नाकारू शकतच नाही .
पुण्यातील मुस्लिम बहुल भागात एकही नामांकित हॉस्पिटल नाही , किंवा इतर पुण्यातील नामांकित हॉस्पिटल मध्ये एक्स्पर्ट मुस्लिम डॉक्टर्स का नसतात ?
आरक्षणामुळे शैक्षणिक सुविधांचा लाभ घेवू शकलेल्या पैकी एक तरी नामांकित डॉक्टर झालाय का ?
आय टी कंपन्यांचे वारे देखील ब्राह्मण वर्गानेच पूर्वी ओळखले ,
इतरांना जरा अमंळ उशीरच झाला .
खंपू , थोडक्यात वरणभात खावून ब्राह्माण वर्गाने उच्च आय क्यू दाखवला आहे .....
Submitted by फुरोगामी on 13 April, 2023 - 19:58
>>
------ समान संधी मिळाल्यास परिस्थिती अगदी वेगळी दिसेल.
आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असली तरी अभ्यासाचे महत्व सांगणारे आपल्या आसपास असतात. डोक्यावर छत असते, एक वेळचे व्यावस्थित जेवण अशा ' सुविधा ', दरमहा एक ठराविक रक्कम घरी पगार म्हणून येणे. अशा सुरक्षित कोषात वाढल्यावर एखादा डॉक्टर झालाच तर खूप काही मोठा पराक्रम केला आहे असे मानत नाही. सर्वांनाच अशा सुविधा मिळत नाही. प्रत्येक वेळी आरक्षणावर टिका करण्यापेक्षा थोडे आत्मपरिक्षण करायला हवे. आपण/ आपल्या पुर्वजांनी एका मोठ्या गटाला शेकडो/ हजारो वर्षे अमानवी वागणूक दिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर एका मोठ्या घटकाला आरक्षण दिले म्हणजे सहा दशकांत त्यांच्यातला प्रत्येक व्यक्ती डॉक्टर होणार नाही... थोडे थांबा.
शक्य असेल तर त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करा पण द्वेषाने त्यांच्या प्रगतीमधले अडथळे बनू नका.
तुमच्याकडे बुद्धी होती तर हजारो वर्षात गाय, गोबर, कर्मकांडे, अमावशा, पोर्णिमा या व्यतिरिक्त दिवे लावले? मागच्या १००० वर्षांत किती/ कुठले महत्वाचे शोध भारतात लागले?
भारतात पुढचे हजार वर्ष पण
भारतात पुढचे हजार वर्ष पण नवीन काही शोधले जाणार नाही.
साध शुद्ध तूप पण भारतात मिळेल ह्याची शाश्वती नाही.
शुद्ध दूध बाजारात मिळेल ह्यांची बिलकुल शास्वती नाहि.
भेसळ युक्त च मिळणार.
बाकी गोष्टी सोडून च ध्या
उदय, सहमति.
उदय, सहमति.
भाषेतही बदल घडतील. बहुजनांना सरासरीने आपलीशी वाटेल ती प्रमाणभाषा होईल. सध्याही बहुजनांकडून मराठी आणि हिंदी साहित्यात भरपूर आणि मोलाची भर पडते आहे. पण अभिजनवर्ग अशी पुस्तके वाचत नाही. त्यामुळे परिघाबाहेर काय चालले आहे ते त्यांना कळत नाही. मेडीसीनमध्येही पुष्कळ बहुजन आहेत. पण अभिजनवर्गास ते ठाउक नसते. पुन्हा कारण तेच. परिघाबाहेर पाहाण्याची वृत्ती नाही.
ज्या प्रदेशात शांतता आहे,
ज्या प्रदेशात शांतता आहे, ज्या देशात शिक्षण व्यवस्था उत्तम आहे, कायदा सू व्यवस्था आहे.
त्या देशात /प्रदेशात च शोध लागले आहेत.<<<<< हे नाही पटत. उलट युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक उलथापालथ जास्त अशा कायदा अव्यव्स्था अशा भागात जास्त शोध लागले असावेत.
https://twitter.com/pakistan
https://twitter.com/pakistan_untold/status/1640279172072476673?s=19
पाकिस्तानी जनतेला नेत्यांनी असे भडकावून उपाशी राहण्याची ट्रेनिंग दिलेली आहेच तर ते जगाकडे भीक का मागत आहेत ?
परिस्थिती, आर्थिक उलथापालथ
परिस्थिती, आर्थिक उलथापालथ जास्त अशा कायदा अव्यव्स्था अशा भागात जास्त शोध लागले असावेत.
जेव्हा माणूस स्थिर झाला, रोज युद्धाचे प्रसंग संपले तेव्हाच माणसाची प्रगती सुरू झाली.
तांत्रिक प्रगती आपण बघितली तर ह्या 100 ते 150
वर्षात च झालेली आहे असे दिसेल.
त्या मध्ये ज्या राष्ट्रात शासन व्यवस्था उत्तम आहे,शांतता आहे त्याच देशात शोध जास्त लागले आहेत किंवा तांत्रिक प्रगती जास्त झालेली आहे असे दिसेल.
ज्यू लोकं शास्त्र विज्ञानिष्ठ
ज्यू लोकं शास्त्र विज्ञानिष्ठ होत गेले आणि मुस्लिम धर्मनिष्ठ होत गेल्यामुळे हा फरक पडला असावा का ? >> पत्रकार, अॅक्टिविस्ट, सेलिब्रिटी मुस्लिम महिलांची नग्न चित्रे तयार करून त्यांचा लिलाव मांडण्यासाठी मोबाईल अॅप तयार करून तिचा सर्वदूर प्रसार करणारे हिंदूत्ववादी कुठल्या विज्ञानवादी दृष्टीकोनाशी निष्ठावान असतील https://en.wikipedia.org/wiki/Bulli_Bai_case
Pages