मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जय आणी अदु जेवह साईट बघायला जातात तेव्हा रजनी आणी साई पण भोचकपणा करुन त्यान्च्या मागे तिकडॅ येतात. जय बाबु अदुला एका ढाब्यावर घास भरवत असताना रज्जु बघते, ती आधी तसे दाखवत नाही, पण अदुला साई बरोबर परत पाठवुन देते, स्वतः जय बरोबर भटकते, मग ढाब्यावर चहा-भजी घेताना जयला घास भरवायला जाते, जय ते नाकारतो. मग रज्जु भडकते आणी सर्व कबुल करते, पण जय तिचे प्रेम नाकारतो. मग ती पेटते.

जयला आजच्या भागात म्हसोबा आरोप लावतो की तू मुलीना नादी लावतोस ब्ला ब्ला ब्ला...

कालच्या भागात शोभडीने काकान्च्या मुलाने दिलेला वास फोडला आणी ते अण्णान्वर ढकलले कारण कुणी पाहीले नव्हते. शोभी त्याचाच फायदा घेतीय आता.

मी ही सिरियल पहात नाही . पण मालिका संपतेय म्हटल्यावर उत्सुकता वाटतेय की कशी संपवणार ,सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय असतील खरं समजल्यावर?

जयला आजच्या भागात म्हसोबा आरोप लावतो की तू मुलीना नादी लावतोस ब्ला ब्ला ब्ला... >>>> आणि त्यावर पहिल्यांदा जय तोंड उघडुन म्हसोबाला बोलला आहे.

हो ना... हे सगळा दीड वर्षापूर्वीच बोलायला हवा होता अधूने... जाउ दे लेट पण थेट ... Proud Proud

काल मी रिपीट थोडा बघितला एपिसोड, ती रजनीला सुनावते ते बघायला मिळालं, छान बोलते. मालिका संपत आलीना, आता जय-अदितीला कंठ फुटायला लागले बहुतेक. पुढे नाही बघितली, फक्त तो सीन बघितला.

मालिका संपत आलीना, आता जय-अदितीला कंठ फुटायला लागले बहुतेक. >>> बहुतेक नाही, म्हणुनच त्यांना कंठ फुटायला लागलेत.

या अभागिनीने प्रसन्न गट्टुला या नयनी पाहीला
कृपा म्हसोबाची होता मजवरी, आउ समजती सून मला

कन्ठ रजनी दे मला, दे दे कन्ठ तुझा, रजनी मला. ( दे दे कन्ठ कोकिळे मला या चालीवर वाचावे)

ती नवीन मालीका सुरु होस्तोपर्यन्त असन्ख्य प्रश्न फेर धरुन नाचणारेत. त्या नाचात नन्दिनी, रजनी, साईप्रसाद, जुई, सारीका, तिलोत्तमा ( उत्तमा) , नवरे, कदम काका, आउ, म्हसोबा, गट्टु हे सर्व सामिल आहेत. अदु बाळ आणी कुक्कुला जय मध्ये आहे. बाकी पेपर वाल्यानी ( मटा, लोकसत्ता वगैरे) बरेच कौतुक केलेय मालीकेचे. इथे येऊन वाचले तर झीट येईल त्याना.

संपत आली मालिका म्हणून काल एक भाग बघायची इच्छा झाली..
काका आणि जय मधील दुरावा( अबोला ) संपला काल इतकीच काय ती प्रगती...बाकी सगळं जैसे थे...

परवाच्या भागात अधु आणि गट्टु एकमेकांवर धडकतात आणि गट्टुच्या हातातला आयफोन खाली पडतो. फोन खाली पडल्यावर फोनवर कॅमेरा मारलाय, मोबाईल शोरुममध्ये डिस्प्लेवर ठेवलेले डेमो फोन असतात त्यातला एक डेमो फोन दिला होता गट्टुच्या हातात... कुंपणीचा मालक म्हणुन आयफोन नका दाखवु बजेट नसेल तर पण जे काय दाखवाल ते किमान खर तरी असुद्या....

मोबाईल शोरुममध्ये डिस्प्लेवर ठेवलेले डेमो फोन असतात त्यातला एक डेमो फोन दिला होता गट्टुच्या हातात.>> हे मीही नोट केलं होतं

रज्जुला कळल अधु आणि जय नवरा बायको आहेत ते. >>> ??? खरच ???

परवा तर खूप रडारड करत होती . माझ तुझ्यावर प्रेम आहे म्हणून.
तिकडे गट्टु पूरा लट्टु .

तिची रियॅक्शन अशी आहे की ती उद्या सकाळी ऑफिसमधे जाऊन अविनाश सरांना सांगणार आहे हे सगळं तिच्या जवळ सगळे पुरावे आहेत या दोघांच्या लग्नाचे.
शोभडीला पुरावा म्हणुन उभ केलं हापिसात तर अजुन धमाल येइल हे नक्की.

किती ती भोचकपणा करतेय ती दुसर्‍यांच्या आयुष्यात? आदितीला म्हणते की तुला घरी जायला भीती वाटते म्हणुन तुझ्यासोबत साईरामला घेऊन जा.
ही बया कोण ठरवणार परस्पर की कुणी कुणाबरोबर जायच ते? काहीही दाखवतात यार आणि ही स्वत: त्या जयच्या गळ्यात पडते, लाडे लाडे करते ते चालत का? रस्त्यावरच्या तिर्‍हाइताला ओरडते की माझ्या आणि जयच्या मधे यायच नाही म्हणुन आणि स्वतः मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात लुडबुड करते. बहुत नाईंन्साफी हय हे अविनाश Lol

बाकी काल तिला जेंव्हा कळ्ळ की आदु+जादु नवरा बायको आहेत तेंव्हा तिच्या चेहर्‍यावर राग्+फसवले गेल्याची भावना यापेक्षा जास्त जय हातातुन निसटला आपल्या हेच भाव जास्त होते.

थॅंक्स मुग्धा आणि शुभांगी.

आता बाकीच्या लोकांच्या काय रिअॅक्शन असतील .!
विशेषतः आऊ आणि अविनाश सर.!

तिची रियॅक्शन अशी आहे की ती उद्या सकाळी ऑफिसमधे जाऊन अविनाश सरांना सांगणार आहे हे सगळं तिच्या जवळ सगळे पुरावे आहेत या दोघांच्या लग्नाचे.
शोभडीला पुरावा म्हणुन उभ केलं हापिसात तर अजुन धमाल येइल हे नक्की. >>> ती म्हणते शेवटी -- " उद्याही मला जे योग्य वाटतेय मी तेच करणार " म्हणजे ती सांगणार नाही.

"मैं अदितीसे ईतनी नफरत नही करती ,जितनी तुमसे मोहोब्बत करती हूं , जय !! "

तिला सगळ कळल्यावरसुद्धा ती जयला म्हणते "बोल लग्न करशील माझ्याशी?" Uhoh म्हणजे काय? मला वाटतय या दोन डायलॉग्जच्या मध्ये कैतरी असाव अजुन जे एडिट करताना कापल गेलय.

उद्याही मला जे योग्य वाटतेय मी तेच करणार " म्हणजे ती सांगणार नाही. >>>>> करेक्ट. कारण जयने तिला इमोशनली ब्लॅकमेल केल तु माझी चांगली मैत्रिण आहेस वै वै म्हणुन..

बादवे अधु लेट येण्यावरुन काय चालु होत? गट्टु चिडला का अधुवर?

क्या बात !स्वस्ति!
रजनीने फाईलींवर अधू जादू चे नाव नी अधू च्या नावावर मारलेल्या फूल्या पाहून ती मानसिक रूग्ण दाखवणार वाटतं शिरेल संपताना!

"मैं अदितीसे ईतनी नफरत नही करती ,जितनी तुमसे मोहोब्बत करती हूं , जय !! ">>>
दिपीका पदुकोण 'ओम शांती ओम' मधे 'एक चुटकी सिंदूर' ज्या स्टाइल मधे म्हणते, त्या स्टाइल मधे इमॅजिन करुन पाहिलं Biggrin

तिला सगळ कळल्यावरसुद्धा ती जयला म्हणते "बोल लग्न करशील माझ्याशी?" म्हणजे काय? मला वाटतय या दोन डायलॉग्जच्या मध्ये कैतरी असाव अजुन जे एडिट करताना कापल गेलय.>> +१ मुग्धा. मी तर तिथे, "जर मी हे सगळं अविनाश सरांना सांगितल नाही तर " हे अॅड करुन ऐकलं. Happy

मैं अदितीसे ईतनी नफरत नही करती ,जितनी तुमसे मोहोब्बत करती हूं , जय !! ">> Lol

Pages