मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर तिथे, "जर मी हे सगळं अविनाश सरांना सांगितल नाही तर " हे अॅड करुन ऐकलं >>> शाब्बास.. तरी पण हे कस शक्य आहे? कारण जरी तिने अविनाश सरांना सांगितल तरी त्या दोघांची नोकरी जाईल डिव्होर्स नाही होणार...

अरे !! थॅन्क्यु थॅन्क्यु .

अजरामर डॉन मधला डायलॉग आहे हा - जेजेचा !!!

मी तर तिथे, "जर मी हे सगळं अविनाश सरांना सांगितल नाही तर " हे अॅड करुन ऐकलं>>> मला वाटतं ती म्हणते - नाहीतर मी सगळं सराना सान्गेन म्हणून .

जय आणि आदिती काय अजूनही गट्टूला कळू नये, नोकरी जाऊ नये बघणार आहेत की लग्न वाचवणार आहेत.

मी शनिवारी आणि रविवारी बघेन. रविवारी लास्ट एपी आहे.

अरे तस नाही होणार कै. ती रज्जु म्हणेल की ज्जा मी सांगत नाही कुणालाच पण जर मी तुझ्याशी लग्न करु शकत नसेन तर तुम्हाला पण कायम हापिसात दुराव्यात ठेवणार कधीच एकत्र येवु देणार नाही : भ्रमिष्ठ बाहुली:
किसिको एक झटके में मारने से वह सुकुन नही मिलता जो उसे तडपाकर मारने से मिलता है

>> शाब्बास.. तरी पण हे कस शक्य आहे? कारण जरी तिने अविनाश सरांना सांगितल तरी त्या दोघांची नोकरी जाईल डिव्होर्स नाही होणार...>> अगं, रजनीचं ते वाक्य असं भस्सकन मध्येच आलं की ते अर्धवट आहे हे लगेचच कळत होतं त्यामुळे पटकन जे सुचलं ते अॅडलं मी. Proud

किसिको एक झटके में मारने से वह सुकुन नही मिलता जो उसे तडपाकर मारने से मिलता है >>>> शुकु एका तडपाने तो इफेक्ट येत नाही.. हे वाच आणि सांग काय फरक वाटला तो.

किसिको एक झटके में मारने से वह सुकुन नही मिलता जो उसे तडपा तडपाकर मारने से मिलता है...

काल काय झाले? आय मीन दाखवले?
टीव्हीवर सेरियल चालु होती, पण माझे लक्ष नव्हते, कामात होतो.

>>>> रविवारी लास्ट एपी आहे. <<<< २४ लाच संपवणार होते ना? वाढवलय का?

मुग्धा:अगदी अगदी ग Lol

काल रजनीने मस्त फिरकी घेतली त्या अर्विन काकांची, पण घोंगड भिजतच ठेवलय अजुन. आता आज कळेल ती काय करणार ते?
काल ती उगाचच मला अति पॉजिटीव्ह वाटली. सिरियल संपवायची म्हणुन मग एकदम स्वभाव चेंज?? सगळ्यांशी गोड वागते, बोलते. आदितिला जेंव्हा ती म्हणते की इतके दिवस वाटत होतं तू आमच्या मधे येतेयस पण मीच तुझ्या मधे येत होते तेंव्हा हिंदी सिनेमाप्रमाणे आता पुढे म्हणेल की काय?? ' जा आदिती, जी ले अपनी जिंदगी. आजसे जय तेरा'

स्मी, अग लग्नानंतरचे तोटे गट्टुला ज्ञात असतील Wink डेटिंग करताना तासभर एकत्र राहिलेलं किंवा गुडी गुडी राहिलेलं वेगळ आणि वेगळंस एकमेकांना सहन करा आणि वरती देव टुर्स मधे पण काम करा ही द्विरुक्ती होईल ना Lol

त्या तांगडेच पण लग्न नाही झालं आहे का?
पण लग्न करायला परवानगी नाही असं कसं ?? आउ , नवरे , उत्तमा , अरविन्द काका, दाभोळकर सागळ्यान्ची तर लग्न झाली आहेत की ..

आऊ तर मालकीण आहेत.

नवरे चं लग्न झालय पण लपवलयं, अरविंद काका विधुर आहेत आणि आणखी कुणीतरी एक जण घटस्फोटित आहे.

बाकी आज काहीतरी अनाउंसमेंट करणार आहे अविनाश..
कदाचित लग्न अलाउड आहे असं सांगेल बहुतेक

लग्न अलाउड आहे असं सांगेल बहुतेक>> Lol
लगेच जय अदिती, तांगडे, नवरे पण गौप्यस्फोट करुन मोकळे होतील मग.

शुके Lol

एकूण मालिका पटली नाही. जय-अदिती खोटारडेपणा करतात आणि त्यांना त्याची काही शिक्षा मिळेल असं दिसत नाही. रजनी एक आगाऊ आहे पण जुई जयमध्ये गुंतली आहे आणि गट्टू अदितीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे हे दिसत असूनही हे दोघं त्यांना काही स्पष्ट न सांगता एक प्रकारे उत्तेजनच देत राहतात.
हवं तसं आणि हवं तितकं खोटं बोला..त्यात काही गैर नाही...अशा पध्दतीची विचारसरणी दिसते.

तडकाफडकी संपवतायत ते बरं आहे...नवीन येणारी मालिका बरीच उजवी वाटते आहे. विशेषतः हिरो (हर्ष सक्सेना) तर कायम काँस्टिपेटेड दिसणार्‍या सुयश टिळकपेक्षा खूपच चांगला वाटतो आहे आणि मराठी नसूनही मराठी प्रोमोजमध्ये अगदी सहज अभिनय करतो आहे.

जय-अदिती खोटारडेपणा करतात आणि त्यांना त्याची काही शिक्षा मिळेल असं दिसत नाही. >>> हो ना

त्यान्चा खोटारडेपणा , त्यान्च्या चांगुलपणामुळे दुर्लक्षिला जाईल . उलत त्यानी कसा त्याग केला तेच गळी उतरवला जाईल . गट्टु आणि जुईचा कोणी विचार ही करणार नाही . आदू आणि गट्टुच्या लग्नासाठी जयलाच प्रयत्न करायला सांगणार्या आउं ना काय वाटेल ? त्यान्च्या मनावर केवढा आघात होईल ? किती गिल्टी वाटेल त्याना .
बर या दोघाना मदत करणार्या अरविन्द काकांचे काय ????

कायम काँस्टिपेटेड दिसणार्‍या सुयश टिळकपेक्षा >>>> Rofl

रजनी एक आगाऊ आहे पण जुई जयमध्ये गुंतली आहे आणि गट्टू अदितीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे हे दिसत असूनही हे दोघं त्यांना काही स्पष्ट न सांगता एक प्रकारे उत्तेजनच देत राहतात.>>> नै तं कै..
तो जय त्या रजनीला सांगताना दाखवला कि ईतके दिवस तु मस्करी करतेयस, फ्लर्ट करतेयस असं समजुन गप्प होतो! Uhoh

मला वाटते रजनी जयला सांगेल की माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे म्हणून मी तुझं नुकसान करणार नाही. ते दोघे एकमेकांचे तूमाखमि/मै होतील. रजनी जयचं गुपित फोडणार नाही. तोपर्यंत सुभा लग्नाच्या परवानगीचं अनाउन्स करेल. मग अँड दे लिव्ड हॅपिली. पण यात शोभाचं, दाभोळकरांचं भांडं फुटणार की नाही, नाहीतर दाभोळकर सांगायचे की जय इरेस पेटावा म्हणूनच मी हे सगळं कारस्थान केलं. त्यानं काहीतरी करून दाखवावं म्हणून.

Pages