मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वस्ति,, मी उद्याच्या भागाची झलक पाहिली.. अदू बाळ वडिलांना म्हणतं, 'पप्पा तुम्ही बद्ल्ला नाहीत..!!'

आणि जयला डायारेक्ट पार्ट्नरशिप गट्टूच्या हाफिसात...इतका चांगलं काम करतो जय..!! Uhoh

सुबोध भावे दिग्दर्शकाच्या छातीवर बसून विचारत होता कि मला वेड्यात का काढलंय या सिरीयलमधे ? मी आजवर कुणाला इतकं वाया घालवलेलं नाही जितका तुम्ही माझा पोपट केलाय. आता माझ्या करीयरचं काय ?

दिग्दर्शकाचा जीव जातोय असं पाहून निर्मात्यांना आश्वासन द्यावं लागलं की शेवटच्या भागात सनी देवलने दामिनी खाल्ला तसंच ही मालिका तुझ्या खिशात टाकण्यात येईल.

त्यामुळे बहुतेक शेवट असा होईल की सुभाने ही विचित्र अट कुणातरी कर्मचारिणीच्या प्रेमात तोंडावर आपटी खाल्ल्याने टाकलेली असते. त्यामुळे कायदा लागू होण्याच्या आधीच्यांना माफी असणार. आता ही अट टाकण्यामागे सुभा आणि अदितीचा मार्ग मोकळा व्हावा असा हेतू असेल असे आउंना वाटत असणार (शक्तीकपूरला एकदा तरी बोलवा आउ म्हणायला ). आदितीचे पप्पा तिच्यावर दबाव टाकताहेत की हीच संधी आहे जयला सोड आणि सुभाशी लग्न कर. भेंडी नको ऑम्लेट खा टाईप सल्ले देताहेत ते.

पण शेवटी सुभा म्हणणार की मला माहीत होतं की जय आदिती लग्नाळलेले आहेत. मी पण गंडलो होतो. पण माझ्या लक्षात त्यांची अडचण आली. मीच वेडा कि अशी अट टाकली. मुंबईत इतर ठिकाणी नोक-या उपलब्ध नसताना त्यांनी जावे तरी कुठे ? त्यांना खोटं बोलावं लागण्याचं कारण माझं सटकेश्वर डोकं आहे. मी माझ्या क्रशचा राग सर्व जगावर काढला. सर्वांना क्रश करून टाकलं माझ्या सणकीपणाने. पण आता रिव्हर्स सणकीपणा करून प्लस अधिक मायनस बरोबर झिरो करणार आहे.

मी जयला डायरेक्टर बनवलेलं आहे. आता राजीनामा देऊन दाभोळकरांना घेऊन हिमालयात हरी हरी करायला चाललो आहे. जयहिंद ! भारतमाता की जय !!

कापोचेदादाच्या पोस्टला..... १०००००+

काल काय झाले होते? मी म्याच बघत होतो त्यामुळे सिरियलमधले कळले नाही
(आय मीन, लिंबी म्याच बघत होती, त्यामुळे मलाही बघायला मिळाली.... काये ना माणसाने नेहेमी पूर्ण सत्य बोलावे, "मी बघत होतो" हे अर्धसत्य, "लिंबी बघत असल्यामुळे मी देखिल बघत होतो" हे पुर्ण सत्य... Proud )

कालच्या भागात गट्टूने अधुला सांगितल "तुम्ही मला आवडता. मला तुमच्या भुतकाळाविषयी सगळ माहित आहे त्यामुळे तुम्हाला हवा तितका वेळ घ्या आणि मला उत्तर द्या" इकडे अधु हापिसात येउन खरतर जयला सांगणार असते हे सगळ, पण पप्पांना सांगते तर पप्पा तु गट्टुचा विचार कर वै वै ऐकवतात आणि अधुच्या डोक्यात प्रकाश पडतो की आपले पप्पा बदलेले नाहीत.. केतकरांकडे जय आणि काका आदितीने नोकरी सोडावी की नाही या मुद्द्यावर चर्चा करत असतात. काका म्हणतात खेळ तुम्ही सुरु केला आहे आणि त्याचा शेवटही तुम्हीच करायचा, पण मी तुमच्या बरोबर आहे...

भेंडी नको ऑम्लेट खा Lol

काल सुभा कसला मस्त बोलला. मस्तपैकी प्रपोज केलं त्याने. एकदम मॅचुअर मॅन. Happy पण समोर ती अधु होती. Sad

अरे ए... असे प्रतिसाद नाही लिहायचे रे... ऑफीसमध्ये आहे मी, जोरात हसताही येत नाहीये... Proud
काल सुभा कसला मस्त बोलला. मस्तपैकी प्रपोज केलं त्याने. एकदम मॅचुअर मॅन. स्मित पण समोर ती अधु होती >>> वादळवाटपासून आवडतो मला सुभा (आणि चिमा पण)...:इश्श:
ती अदिती खरच अधू आहे यार.. तो जय तर १ नंबर मख्ख.. माशीपण हलत नाही चेहे-यावरची.. शाहरूखची अॅक्टिंग करतो खूप ( दु:खी प्रसंगात तर अगदी शेम टू शेम.. )

अधु ने नक्की मागच्या जन्मी पुण्य केलं असलं पाहिजे जे सुभा नं तिला (पडद्यावर का होईना) प्रपोज केलं.

अरे हां सुभाने कस प्रपोज केल? नेमक त्यावेळेस मी किचनमध्ये होते.. सांगा की जरा..

बादवे सध्या कलर्सवर सुभा ज्या प्रोग्रॅमच अँकरींग करतोय (नाव विसरले) त्याची झलक येतेय.. त्यात सुभाच्या चेहर्‍यावर सूज दिसतेय.. कळकळीने सांगाव वाटल बाबारे काळजी घे रे..

Kahitarich gundalat ahet hi serial ..at least last kahi episodes tari effective vhayla havet .....tya Addu la swatahun ch kalte tiche papa change zale nai te..tyapeksha direct Jay shi to mhasoba ase boltana adu ne pahayla have hote ...thode effective zale aste ....n subodh bhave na tar seriously vaya ghatla ahe ....tyane accept ch nko karayla hoti serial

आज शेवटचा भाग आहे रात्री ९.३० ला.

तो गट्टू आता काहीच्या काही दिसतो ब्वा. मला आवडतो तरीही. दात केवढे काळे झालेत, आधीपण वाटायचे. जाडीपण वाढत चाललीय.

अधु जय सगळ्यांची माफी मागून निरोप घेत असतात. मग कदम काका पण देव टुर्स सोडून जायला निघतात तेवढ्यात गट्टु येतो. आणि ऑफिसमधला अविवाहीत कर्मचार्‍यांबद्दलचा नियम काढुन टाकतो. जय अधुला नोकरी न सोडण्याचे आदेश देतो. वर जयला कंपनीत पार्टनरशीप पण देतो.
आऊ म्हसोबाला समजावतात की आदूचं सुख जय आणि ते दोघांसोबत आहे. शेवटी नंदिनी-अर्विन, साई-जुई अशा जोड्या लागतात. जयधु सगळ्यांना केक भरवतात व शेवटी एकमेकांना भरवत असताना शिरेल संपते (एकदाची) Happy

मग रजनीने स्वतची जोडी गट्टु बरोबर लावुन घ्यायची ना. जय ऐवजी गट्टुलाच शोभली असती अशी फटाकडी.:फिदी: सिरीयल लवकर गुन्डाळल्या सारखी वाटली. शेवट अपेक्षीत होताच.

सुबोध भावेची मुलाखत घेताना मी त्याला कारेदु ही मालिका का केलीस असा प्रश्न विचारणार आहे :रागः

त्या प्रश्नाला मिळालेलं उत्तर अनएडिटेड व्हर्जनमध्ये इथे आणि फेसबूकवर लिहिणार नक्कीच.

Pages