अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक स्त्री म्ह्णुन मला पण सुषमा स्वराजबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे.पण त्यांनी जेंव्हा

हिंदूचा धार्मिक ग्रंथ असलेला 'भगवत गीता' हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा असे म्हंटले होते तेव्हा मात्र आश्चर्य

वाटलेल.हिंदूच्या ग्रंथा प्रमाणे जर राष्ट्र चालवायचे म्हणालो तर किंवा चालले असते तर त्या आज परराष्ट्र मंत्री झाल्या असत्या का? भारतिय संविधान प्रमाणे आज प्रत्येकाला समान अधिकार मिळाले आहेत म्हणुन तेली(ओ बी सी )समाजाचे नरेंन्द्र मोदी पंतप्रधान होउ शकले,सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होऊ शकल्या.

एवढेच नाही तर मिर्ची तै मायबोली वर धागा काढू शकल्या सुरेख नावाचा आयडी तो धागा वाचू शकला

.मनुस्मृती प्रमाणे जिवन जगायची वेळ आली असती तर आम्हा स्त्रियांचे काय झाले असते?

माणुस१ | 14 June, 2015 - 13:16

meanwhile , इंटरेस्टिंग न्युज येती आहे.
सुषमा स्वराज वर आरोप (हे आतुन कोण करत आहे हे सांगायची गरज नाहि)
नेक्स्ट टारगेट राजनाथसिंग.
अंतर्गत विरोध समाप्ती.
जसवंत, मुरलीमनोहर, अडवानी आहेत तरी कोठे ?

> याच संदर्भात लोकसत्तामधिल संपादकीयाची खाली दिलेली लिंक वाचुन पहावी. झोके देता-घेता राजकारणाचे पाठ दिले-घेतले गेले असावेत. Wink

http://epaper.loksatta.com/c/5562445

दिल्ली में आज से महंगी हुई बिजली

दिल्लीतील जनतेला चौव्वीसतास वीजपाणी फुकट मिळेल असे सांगणारे आपचे नौटंकीबाज नेते आता कुठे गेले?

<<दिल्लीतील जनतेला चौव्वीसतास वीजपाणी फुकट मिळेल असे सांगणारे आपचे नौटंकीबाज नेते आता कुठे गेले?>>

उच्च न्यायालयात DERCच्या वीजदरवाढीविरोधात तक्रार करायला.
वीजदर सरकारने वाढवले नाहीयेत हे तुमच्या लक्षात येईल अशी अपेक्षा करावी का?

ललित मोदींना मदत करण्याच्या मागचे अनेक धागेदोरे पाहून माझ्या मनातील सुषमा स्वराजबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर मोडून गेला आहे. Ignorance is a bliss.

सुरेख१,

>>.मनुस्मृती प्रमाणे जिवन जगायची वेळ आली असती तर आम्हा स्त्रियांचे काय झाले असते?

जिजाबाई, ताराबाई, अहिल्यादेवी, झाशीची राणी या शूर स्त्रियांनी कधी मनुस्मृतीला नावं ठेवल्याचं ऐकलं नाही. तुमच्या अंगी पराक्रम दिसंत नाही. जरा बाणवून घ्यायला शिका.

आ.न.,
-गा.पै.

जिजाबाई, ताराबाई, अहिल्यादेवी, झाशीची राणी या शूर स्त्रियांनी कधी मनुस्मृतीला नावं ठेवल्याचं ऐकलं नाही. >> कोणी ऐकले नाही तुम्ही ? समजा दिले तरी त्याकाळात तुम्ही होतात का ऐकायला?

धन्यवाद

उच्च न्यायालयात DERCच्या वीजदरवाढीविरोधात तक्रार करायला.>> Kejriwal also needs to understand the problems of Power Companies. CAG report is just paperwork. Practically it may be difficult for power companies without rate increase. Otherwise the service will be affected and overall kejiriwal will loose popularity. No one complaints for such hikes if service is maintained. It is better than power cuts.

पण मंदार,
ऑडिटचा निकाल येईपर्यंत दर वाढवायची घाई कशाला पाहिजे? ऑडिट पूर्ण झालं आहे. फक्त ते जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मिळायची वाट पहाणं चालू आहे.
ऑडिटमध्ये काही निघालं नाही तर वीजदर वाढवता येईलच ना?

आपण खरंच नुकसान सहन करत कंपन्या चालवत आहोत, त्यामुळे ऑडिटमध्ये काही वावगं निघणारच नाही ह्याची खात्री असेल तर कंपन्यांनी त्यांची याचिका मागे घ्यायला हवी.

<< Otherwise the service will be affected and overall kejiriwal will loose popularity. >>

I feel that he will lose his popularity only if he starts taking decisions & form the policies just to maintain the popularity. Happy

संघर्ष अटळ आहे. संघर्ष झाल्याशिवाय व्यवस्था बदलणार नाही. कंपन्यांनी आडमुठेपणा करून वीजकपात करायला सुरूवात केली तर केजरीवाल कंपन्यांच्या दुप्पट आडमुठेपणा करून त्यांच्यावर दंड आकारतील....आकारायला हवा.
ह्या सगळ्या रस्सीखेचीत थोडाफार त्रास झाला तरी दिल्लीकरांनी दूरचा विचार करून केजरीवालांची साथ द्यावी असं मला वाटतं.

मग कंपन्यांनी असंच मनमानी करत लुटावं का? वीजकंपन्या PPP तत्वावर चालू आहेत. नुकसान होत असेल तर कंपन्या आणि पब्लिक दोघांनी वाटून घ्यायला हवं. तसंच फायदा होत असेल तर तोसुद्धा दोघांनी वाटून घ्यायला हवा. हे होणार नसेल तर वीजकंपन्यांचं खाजगीकरण केलंच कशाला?

नुकसान होतंय की फायदा हे कळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ऑडिट. ऑडिट तयार आहे. पण ते जाहीर करायला कंपन्या का तयार नाहीत, हे माझ्या इवल्याशा मेंदूमध्ये घुसतच नाहीये.

ऑडीट जर राज़्य सरकारच्या आदेशावरुन झाले असेल तर त्याची प्रत राज्य सरकार कडे न जाता कंपन्यांकडे कशी गेली. राज्य सरकार कडे काही मालकी भाग असेल तरी त्यांना ऑडीट प्रत मिळायला हवी, ती ते मागु शकतात. मग कंपन्यासाठी थांबण्याची गरज काय?

अत्ता वाढवुन दिलेले वीजेचे दर; झालेले किंवा चालु असलेले ऑडीट डावलुन केलेले आहेत?

आधी तुमच्या म्हणण्या प्रमाणे नियामक मंडळाच्या भाववाढी कडे राज्य सरकार कानडोळा करत असे आणि परवानगी देत असे अता तर तसे असण्याची काही गरज नाही.

म्हण्जे नियामक मंडळ या सगळ्या व्यवस्था याला काहीच अर्थ नाही केजरीवाल ठरवतिल तेच खरे आणि अंतीम असे आहे काय?

म्हण्जे नियामक मंडळ या सगळ्या व्यवस्था याला काहीच अर्थ नाही केजरीवाल ठरवतिल तेच खरे आणि अंतीम असे आहे काय?

ऑडीट जर राज़्य सरकारच्या आदेशावरुन झाले असेल तर त्याची प्रत राज्य सरकार कडे न जाता कंपन्यांकडे कशी गेली. राज्य सरकार कडे काही मालकी भाग असेल तरी त्यांना ऑडीट प्रत मिळायला हवी, ती ते मागु शकतात. मग कंपन्यासाठी थांबण्याची गरज काय? >>>> कठीण आहे. जरा अभ्यास करावा मग शाइ टाकावी हि नम्र विनंती.

<<ऑडीट जर राज़्य सरकारच्या आदेशावरुन झाले असेल तर त्याची प्रत राज्य सरकार कडे न जाता कंपन्यांकडे कशी गेली. राज्य सरकार कडे काही मालकी भाग असेल तरी त्यांना ऑडीट प्रत मिळायला हवी, ती ते मागु शकतात. मग कंपन्यासाठी थांबण्याची गरज काय?>>

"दिल्लीसरकार आमचं ऑडिट करू शकत नाही, आम्ही CAG च्या कक्षेत येत नाही. सरकारचं ऑडिट बेकायदेशीर आहे" अशी याचिका वीजकंपन्यांनी उच्चन्यायालयात दाखल केली होती. ह्या याचिकेनंतरही न्यायालयाने दिल्लीसरकारचा आदेश स्थगित केला नाही आणि वीजकंपन्यांना ऑडिटला सहकार्य करण्याचा आदेश दिला.

"Justice Manmohan had on January 24 refused to stay a Delhi Government order asking the power distribution companies to get their accounts audited by the CAG.
However, the court had directed the auditor not to submit the report on these companies to the Delhi Government without its permission."

<<अत्ता वाढवुन दिलेले वीजेचे दर; झालेले किंवा चालु असलेले ऑडीट डावलुन केलेले आहेत?>> अर्थातच.

<<आधी तुमच्या म्हणण्या प्रमाणे नियामक मंडळाच्या भाववाढी कडे राज्य सरकार कानडोळा करत असे आणि परवानगी देत असे अता तर तसे असण्याची काही गरज नाही.>>

एकदा आधीच्या धाग्यावरचं हे डोळ्याखालून घालून घ्या. तुम्हाला तेव्हाही फारसं पटलेलं दिसलं नव्हतं. आता पटतंय का बघा --दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा

शेवटच्या वाक्याच्या उत्तरादाखल ह्या धाग्याच्या ५४ व्या पानावरचं 'युरो-रूलबुक फॉर केजरीवाल' रेफर करा Proud

मिर्ची जरा त्या लिपिका मित्रा बाईंना पण थोडीफार मदत करा . >>> नक्कीच करतील त्या. एकदाच मोदिंनी जशोदाबेनना बोलावले की.

<<मिर्ची जरा त्या लिपिका मित्रा बाईंना पण थोडीफार मदत करा.>>

नोप Happy
जी बाई आपल्या घरचं गार्‍हाणं घेऊन आपल्या नवर्‍याच्या शत्रुकडे जाते, पत्रकार परिषद करते, ह्यासगळ्या प्रकारात मुलांच्या मनावर काय परिणाम होईल ह्याचाही विचार करावासा तिला वाटत नाही अशा स्त्रीला माझी सहानुभूती नाही.
ती उच्चशिक्षित आहे, MNC मध्ये काम करते, गेल्या तीन (की पाच?) वर्षांपासून वेगळं राहत आहे. नवर्‍याने मारलं तर आधी पोलिसात जाऊन गुन्हा दाखल करावा, घटस्फोटासाठी अर्ज दाखल करावा हे तिला कळू नये ह्याचं आश्चर्य वाटतंय.

बाकी, दिल्ली महिला आयोग आणि त्याच्या प्रमुखपदी असलेल्या आदरणीय वंदनीय बरखा सिंगबद्दल लिहायचं आहे. बघू, कधी वेळ मिळतो ते.

त.टी.-- सोमनाथ भारतींनी मारहाण केलीच नसेल, लिपिका प्रेग्नण्ट असताना त्यांचा लॅब्रॅडॉर कुत्रा तिच्या अंगावर सोडलाच नसेल, ते निर्दोषच आहेत असा माझा अजिबात दावा नाही.

भागलपूर विद्यापीठातून हरवलेलं टॅब्युलेशन रजिस्टर सापडलं म्हणे. डिग्री मिळण्यासाठी तोमरने केलेला अर्ज नाही सापडला, पण त्यासाठी लागणारी फी भरल्याचं रेकॉर्ड सापडलं.

"Application of Tomar is missing, but the application fee was submitted, said the pro-VC adding the processing for the degree certificate of Tomar was done on September 13, 2012, and the degree was issued on September 15, 2012, as per the records."

"We will definitely look into the various aspects of manipulations and forgery besides omission and commissions in issuing of degree to Tomar. We are also seized with the issue related to missing page of the original tabulation register (TR) and later on recovery of the torn page," Roy said."

जागरूकतेने टॅब्यु.रजिस्टरची प्रत काढून ठेवणार्‍या आणि पुरावे मिटवण्याची जी काही भामटेगिरी चालली होती (असेलच तर) त्याला उघडं पाडणार्‍या मुंगेर कॉलेजच्या प्रिन्सिपलचं अभिनंदन.:)

<<कठीण आहे. जरा अभ्यास करावा मग शाइ टाकावी हि नम्र विनंती.>>

माणूस१ तुमच्यावर शाई उडाली असेल तर माफ़ करा.

the court had directed the auditor not to submit the report on these companies to the Delhi Government without its permission."

लिंक आहे २०१४ ची त्या नंतर पुन्हा केजरीवाल सत्तेत आले आणि परत ही प्रक्रीया सुरु झाली त्याच काय झाल?

युरो,
कंपन्या अजूनही तयार नाहीत. न्यायालयाने ऑडिट जाहीर करण्याचा आदेश अजून दिलेला नाही. मार्च २०१५ ची बातमी आहे.

"Earlier, the city government had told the court that a CAG audit of the private discoms here was necessary as these companies discharge a “public function”.
It had said the government was not trying to stop their (discoms) functioning or interfere in it but was only trying to bring them under public audit, as 49 per cent stake in the discoms was held by the Delhi government which has also infused capital in these companies. "
एक्झॅक्टली माय पॉइंट.

केजरीवालवर चोहोबाजूंनी होणार्‍या हल्ल्यांमागे हीच समस्या आहे... ''ये बंदा कुछ ले-दे के सेटिंग क्यों नहीं कर लेता?"
आपल्या व्यवस्थेला नियमांची आणि प्रामाणिक+हट्टी प्रशासकांची सवय राहिलेली नाही. असो.

दिल्लीसरकारने वीजदरातील वाढीचा आदेश मागे घेण्यासाठी DERCला काल पत्र लिहिलं आहे. इच्छुकांना इथे वाचता येईल.
पान १
पान २
पान ३
पान २ वाचताना तुम्हाला आपोआप मानेचा व्यायाम घडला तर क्रेडिट मला द्यायला विसरू नका Wink

नुसत्या लिंका देणार्‍यांना अ‍ॅडमिनभौ रागवणार आहेत.

डिग्र्या खोट्या असल्याचं तोमरने कबूल केलं आहे असं बातम्यांमध्ये लिहिलं आहे. काही प्रश्न पडलेत--
१. मुंगेर कॉलेज आणि भागलपूर विद्यापीठामध्ये तोमरचे रेकॉर्डस सापडले आहेत त्यांचं काय स्पष्टीकरण?
२. तोमरने जर गुन्हा कबूल केला आहे तर चांगली गोष्ट आहे की. पण मग ही कबूली न्यायालयात ग्राह्य धरली जाणार नाही असं का म्हणत आहे??? गुन्हेगाराची कबूली हा त्याच्याविरुद्ध मोठ्ठा पुरावा नाही का?
After keeping silent for over a week, Tomar confessed that he had procured his BSc and LLB degrees from agents in Delhi and Munger, sources said. The confession, however, will not be admissible in court.
३. पोलिस मारहाण करत आहेत असा तोमरचा आरोप आहे. (खोटा असू शकतो. पण मूळात फेक-डिग्री प्रकरणात त्याला कोठडीत डांबायची गरजच काय आहे? ह्याआधी कुठल्या मंत्र्याबाबत असं घडलंय का?)
४. पोलिस घरात घुसून मला आणि मुलांना त्रास देत आहेत असा तोमरच्या पत्नीचा आरोप आहे.

तोमरच्या डिग्र्या खरंच खोट्या आहेत की कुठल्या दबावाखाली त्यांच्याकडून वदवून घेतलं जातंय?
डिग्र्या खर्‍या आहेत हे सिद्ध झालं तर दिल्लीपोलिस आणि केंद्रसरकारचं नाक कापलं जाणार आहे. त्यामुळे पोलिस काहीही करू शकतात.

Pages