अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केजरीवालच्या हातात पोलिसयंत्रणा देणे म्हणजे "माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखे आहे." >>>> डोरेमोन, हि लहान मुलांची खेळण्याची चर्चा नाहिये. १५/२० वर्षानी या जरा अक्कलदाढ आल्यावर. Proud Wink

मोदीसाहेब एक एक पाउल पुढे टाकत आहेत आणीबाणीच्या दिशेने - दिल्लिच्या नाहि भारताच्या.

<<दिल्लीत आप ऐवजी दुसर्‍या कोणा पक्षाचे सरकार व मुख्यमंत्री असते तर, पोलिसयंत्रणा त्यांच्या ताब्यात दिली असती तर एकवेळ चालले असते. पण केजरीवालच्या हातात पोलिसयंत्रणा देणे म्हणजे "माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखे आहे.">>

------ एकवेळ चालले असते हे कशाच्या आधारावर ?
मोदी (प्रधान सेवक) आणि राजनाथसिह (केन्द्रिय गृहखाते) ह्यान्ची प्रशासनावर घट्ट पकड असतानाही व्यापम घडत आहे... , अनेक अनेक बळी गेले, हत्या सत्र थाम्बवू शकत नाही, थाम्बत नाही.

अगदी तशीच गत आसाराम प्रकरणात होत आहे. आता पर्यन्त किती साक्षीदारान्ची हत्या झालेली आहे ? रॉबर्ट वद्रा, किव्वा लाखो कोट्यावधी रुपयान्चा घोटाळा करणारे साधे एक प्रकरण तडीस नेलेले नाही. सर्व सत्ता, नियन्त्रण असतानाही हे काहीच काम करत नाही अशा परिस्थितीत यान्च्या हातात नियन्त्रण असले तरी काहीही उपयोग नाही.

कॉन्ग्रेसने ६५ वर्षात काय केले हे सर्वशृत आहे..... कोट्यावधी पाने लिहीता येतील.... ६५ वर्षान्ची "तुम्बलेली घाण" काढायला शहा हे "अजुन" २५ वर्षे मागत असतील केजरीवालान्ना द्या की सलग २० वर्षे सत्ता..
यान्ना २५ काय ५० वर्षे मिळाली तरी एक रुपया गेलेला काळा पैसा परत येणार नाही (वर्ष भरात जे दिवे लावले त्या आधारावर) हा भाग वेगळा.

उदयजी,

आपला परिचय जुना आहे. आय मीन, मी पहिल्या आयडीने माबोवर आलो तेव्हापासूनचा. म्हणजे, मला तुमची झालेली ओळख जुनी आहे. (मी तुमच्या खिजगणतीत असणे अलाहिदा.) तुम्ही, अन उदयन अशा दोन आयडीज मी कन्फ्यूज करीत असे त्या काळी.

आपण आपली मते अधिक डावी करीत आहात, व अधिक व्होकल होत आहात असे दिसते. आजकालच्या परिस्थितीत ते योग्य नव्हे. 'अपना आयडी बचाओ' अशी नवी कन्सेप्ट दृढ होते आहे आजकाल. तेव्हा बघा बुवा..

माणुस,
जौद्या हो. जपानच्या डोरेमॉनला हनुमान, त्याच्या शेपटीला लावलेली आग आणि त्या एकट्या 'माकडाने' उध्वस्त केलेली लंका ही गोष्ट माहीत नसेल Lol

उदय +१

दिल्लीच्या 'ठुल्ल्यांनी' दिलीप पांडेंवरच 'पोलिस ड्रायव्हरच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल उलटी FIR दाखल केली आहे. Uhoh
चुकलंच त्यांचं. एका जागी उभं राहून त्यांनी ड्रायव्हरला त्याचं काम करू द्यायला हवं होतं !
नेमकं काय झालं त्याचा ह्या व्हिडिओमध्ये अंदाज येतोय.

अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी वर एवढा मोठ्ठा धागा.

सुरवाति पासुन वाचायला घेतला आहे.नंतर प्र्तिसाद देता येतिल.

निसर्गाच्या गप्पा आणि अरविंद केजरीवाल हे धागे छान वाटत आहेत वाचायला.

<<आपण आपली मते अधिक डावी करीत आहात, व अधिक व्होकल होत आहात असे दिसते. आजकालच्या परिस्थितीत ते योग्य नव्हे. 'अपना आयडी बचाओ' अशी नवी कन्सेप्ट दृढ होते आहे आजकाल. तेव्हा बघा बुवा..>>
----- मी आहे तिथेच आहे.
डावा, उजवा हे मला खरोखरच माहित नाही. समोर आलेल्या माहितीच्या आधारावर मत बनवत जातो.

प्रामाणिक पणे जे वाटते ते लिहीले नाही तर स्वतःला फसवले असे वाटेल. काहीच गमावण्याची भिती नाही...

विशालदेव,
माझा आणि तुमचा कुठलाही संपर्क , कुठल्याच माध्यमातून आतापर्यंत कधीही झाला नाही. मी केंव्हा तुम्हाला (किंवा कुणालाही) सूचना केली होती?

क्षमस्व.
अर्थाचा अनर्थ झाला वाक्यावरून Happy

वेबमास्तर यांनी राजकिय पुढार्‍यांवरून वैयक्तिक टिप्पणी नको असे एके ठिकाणी लिहिलेले.

<<अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी वर एवढा मोठ्ठा धागा.
सुरवाति पासुन वाचायला घेतला आहे.नंतर प्र्तिसाद देता येतिल.>>

निसर्गचक्र,
ह्या महापुराणाचा पहिला खंड इथे आहे Proud -- अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

आज समस्त आप्टर्डस गालातल्या गालात (किंवा फिदीफिदी) हसत असतील. २०१३ मध्ये आपने रेल्वेभवनासमोर निदर्शने केली त्याच्यावरून वाट्टेल तशी बोलणी ऐकून घेतली आहेत. पण निदान ती निदर्शने दुसर्‍या सरकारविरुद्ध आणि काहीतरी रास्त मागणी घेऊन तरी केली गेली होती. आज भाजपाच्या खासदारांनी संसदेत बसून निदर्शने केली. कोणाकडे मागणी करत होते हे 'धरणाकुमार'??? स्वतःकडेच ??
As BJP Protests at Parliament, a Question: 'Are They Appealing to Obama?'
एग्जॅक्टली !
संसद चालवायला दर मिनिटाला २९,००० रूपये खर्च होतो म्हणे. वाया घालवलेली रक्कम खासदारांच्या पगारातून का कापून घेऊ नये ?

"जिन को धरना करना आता है, उन्हें जंगल भेज दे और जिन को सरकार चलानी आती है, उन्हें सरकार चलाने दे" "There is no place in Delhi for anarchists. If you creating anarchy, go to the jungles and join the Naxals,"
-- इति मोदी.

त.टी.- मी निदर्शनांच्या विरुद्ध नाही. तो नागरिकांचा हक्क आहे. पण आजच्या निदर्शनांमागचं लॉजिकच समजलेलं नाही.

<<पण आजच्या निदर्शनांमागचं लॉजिकच समजलेलं नाही.>>

----- लॉजिक (जे बहुतेकवेळा सापेक्ष असते) असायलाच हवे का?

उदय,
सापेक्ष का होईना, काहीतरी कारण तर असेल ना. त्यांच्या हातातल्या फलकांवर उत्तराखंड, केरळ इथल्या काँग्रेसच्या घोटाळ्यांबद्दल लिहिलं होतं. घोटाळे आहेत ना? मग कारवाई करा की. सीबीआय, आयबी, सरकार सगळं ह्यांच्याचकडे आहे. कारवाई दुसरं कोण करणार?

<<महापुराण रचियेत्या मिर्ची मॅडमला सां प्रणाम.>>

हे उपरोधातून लिहिलेलं नाही अशी आशा बाळगून धन्यवाद देते.
(किंवा सां प्रणाम केलाच आहे तर आशिर्वाद देते - वत्सा, तुजप्रत कल्याण असो :हाहा:)

कमिशनर बस्सी साहेब एकदम खुल के बोलायला लागले आहेत.
Delhi Police coming under AAP government will be unfortunate: Top cop BS Bassi
पोलिस असं 'कुठल्या सरकारसोबत काम करायचं' हे ठरवू शकतात का ? कमिशनर पदाचा राजीनामा देऊन सरळ राजकारणातच जावं ना त्यापेक्षा. आणि पंप्रंची एवढी बाजू घेण्याचं कारणच काय? विकासराज्यामध्ये स्टेट मशिनरीचा किती 'सदुपयोग' केला जायचा हे सर्वश्रुत आहे.

'मी म्हणजेच सरकार' असं विधान केलेल्या नजीब जंगांच्या एकदम विरोधी मत असणारं पत्र सरकारने पुढे केलं आहे.
"At a time when Delhi Chief Minister Arvind Kejriwal and Lieutenant Governor (LG) Najeeb Jung, through the Centre, are locked in a bitter turf war over who runs the state administration, NDTV has accessed a letter by a former Home Minister that opines that "Government of Delhi" represents the elected government."

साहजिक आहे. लोकशाही असलेल्या देशात लोकांनी निवडून दिलेलं सरकार म्हणजेच खरं सरकार. एका व्यक्तीच्या निर्णयांवर सरकार चालवायचं तर 'हुकूमशाही आहे' म्हणून सरळ जाहीर करून टाकावं.

कमिशनर बस्सी जे काहि बोलले ती केवळ सुरवात आहे असे वाटते आहे. नोकरशाही सरळ सरळ आपली पोलिटिकल allignment बद्द्ल बोलत आहे (तेहि कमिशनर सारखी उच्च पदावरील व्यक्ती) हे कांग्रेसमध्ये देखील इतके ओपन नव्हते. आणी मिडियाही त्याबद्दल काहि बोलत नाहि (हे देखील काहि वेगळे नाहि खरेतर )

मोदिंनी आज सरळसरळ बिहार जनतेला धम्कीच दिली आहे कि भाजपाला निवडुन आणले नाहि तर ५०००० कोटी मदत विसरुन जा.

ते सगळीकडे तेच सांगत फिरत आहे. भाजपाची सरकार केंद्रात राज्यात असेल तर समन्वय साधला जाईल अन्यथा दिल्लीसारखे हाल करून ठेवेन.
अशी भाषा गेल्या ६५ वर्षात कुठल्याही पंतप्रधानपदी असणार्‍या व्यक्तीने वापरली नाही.

बस्सींनी मुख्यमंत्र्यांनाच ओपन डिबेटचं आव्हान दिलंय. उद्या सैन्याच्या सरसेनापतींनी मोदींना असं आव्हान देऊ नये म्हणजे मिळवली !
आपने आव्हान स्वीकारलंय. मोदींचे प्रवक्ता म्हणून बस्सी असतील तर अकेंचे प्रवक्ता म्हणून कुमार विश्वास येतील असं विधान पक्षाने दिलंय. होऊन जाऊदे. फुल्ल टु करमणूक Lol

आजची एबीपीवरची अकेंची मुलाखत.

दिल्लीकरांचा भ्रमनिरास -

Part - 1 - http://www.newsroompost.com/222185/10-reasons-delhiites-getting-disillus...

Part - 2 - http://www.newsroompost.com/222185/10-reasons-delhiites-getting-disillus...

Part - 3 - http://www.newsroompost.com/222185/10-reasons-delhiites-getting-disillus...

Part - 4 - http://www.newsroompost.com/222185/10-reasons-delhiites-getting-disillus...

Part - 5 - http://www.newsroompost.com/222185/10-reasons-delhiites-getting-disillus...

Part - 6 - http://www.newsroompost.com/222185/10-reasons-delhiites-getting-disillus...

Part - 7 - http://www.newsroompost.com/222185/10-reasons-delhiites-getting-disillus...

बाय द वे,

भ्रष्टाचारविरोधाचा गजर करणारे केजरीवाल बिहारमध्ये लालू, नितीश यांच्या युतीसाठी प्रचार करणार आहेत! नितीश एकवेळ स्वच्छ आहेत असे मानले तरी लालू यात असताना केजरीवाल प्रचारास जाणार? आणि ज्या काँग्रेसच्या शीला दिक्षीतांवर एवढी बोंबाबोंब केली त्या काँग्रेसचा या सगळ्याला आशीर्वाद आहे बिहारमध्ये!

एकूण केजरीवालांचा बुरखा फाटला हे बरं झालं!

ये मेसेज दिल्ली के पड़पडगंज से आया है एक
आदमी सुबह जैसे ही नहाने गया
नल के अन्दर से पहले 700 लीटर
पानी आया फिर फुस्स फुस्स की आवाज के
साथ 2 बाल्टी वाई- फाई से भर गई,
आदमी डर के पीछे हट गया की अब कही नल से
बिजली न आ जाए
इस चमत्कार से प्रभावित होकर उसने
केजरीवाल के नाम से 50 पर्चे छपवा कर बांटे
तो उसके नोकिया 1100 मोबाइल में भी wifi
के सिग्नल पकड़ने लगे....
एक औरत ने 200 पर्चे छपवाये तो बेसिक फोन में ट्विटर और व्हाट्सअप चलने लगा
एक व्यापारी ने इसे झूठ समझ कर पर्चे को फाड़ दिया तो उसके घर में ही रोमिंग लगने लगी
जिसे भी ये मेसेज मिले वो 24 घंटों के अंदर पर्चे छपवाकर बांटे या नेट से मेसेज फैलाये।
तुरंत फायदा मिलेगा।
मफलर को राष्ट्रीय वस्त्र घोषित किया जाए
और खाँसी को राष्ट्रीय बिमारी ।।
जरूरी नहीं है कि चार सप्ताह से अधिक समय तक खांसी आना
टीबी का ही संकेत हो ।
यह मुख्यमंत्री बनने का लक्षण भी हो सकता है।
So keep coughing

एकूण केजरीवालांचा बुरखा फाटला हे बरं झालं! > ज्याने वरिल लेख लिहिलेला आहे त्याने स्वतःचे नाव देण्याची क्रुपा करावी. जरा author लिस्ट बघा न्युजररुमपोस्ट ची. बाकि सगळा लेख विनोदी आहेच.

<<भ्रष्टाचारविरोधाचा गजर करणारे केजरीवाल बिहारमध्ये लालू, नितीश यांच्या युतीसाठी प्रचार करणार आहेत! नितीश एकवेळ स्वच्छ आहेत असे मानले तरी लालू यात असताना केजरीवाल प्रचारास जाणार? आणि ज्या काँग्रेसच्या शीला दिक्षीतांवर एवढी बोंबाबोंब केली त्या काँग्रेसचा या सगळ्याला आशीर्वाद आहे बिहारमध्ये!>>

कुठून कळली ही बातमी?

<<एकूण केजरीवालांचा बुरखा फाटला हे बरं झालं!>>

गेल्या २-३ वर्षांत तो किमान शंभरेक वेळा तरी फाटला असेल, हो ना? Wink

बाकी, त्या न्युजरूमच्या पोस्टबद्दल लिहीन तितकं कमीच आहे.
१-२ उदाहरणे देते--
१. "Such level of AAP-LG confrontation has never been before and who is to blame for this… is anybody’s guess. However, experts believe there is nothing wrong in Najeeb Jung exercising his administration control."

कुठले एक्स्पर्टस म्हणत आहेत की जंगांचं बरोबर आहे म्हणून? एखादं तरी नाव?? अनेक वकीलांनी, इतकंच काय तर उच्चन्यायालयाने सुद्धा सांगितलं आहे की जंग त्यांच्या अधिकारांच्या बाहेर जाऊन हस्तक्षेप करत आहेत.

२. "Toeing the line of other political parties, the AAP government also launched canteens and clinics after its name. AAP government took this idea reportedly from Amma canteens (as run in Tamil Nadu) and sought to popularise its name. This move sends clear message of AAP government’s intent and objective and amounts to cheap publicity."

आम आदमी कॅन्टीन्स हे तामिळनाडूच्या कॅन्टीन मॉडेलचा अभ्यास करून आखलेले आहेत. तिथे हे यशस्वी झालेत. दिल्लीतही आणले आणि त्याचा फायदा लोकांना झाला तर काय वाईट आहे त्यात?
इथे सविस्तर वाचा--AAP Delhi Government to begin rollout of Aam Aadmi Canteens based on Tamil Nadu model

मोहल्ला क्लिनिक्स जर व्यवस्थित राबवले गेले तर खूप उपयुक्त उपक्रम ठरेल तो. अर्थात प्र चं ड विरोध आणि अडथळे येणार त्याला. कारण छोट्यामोठ्या आजारांसाठी मोठी हॉस्पिटल्स गाठावी लागली नाहीत तर तिथला वर्कलोड आपोआप कमी होणार. त्यामुळे तिथे केल्या जाणार्‍या ऑपरेशन्ससाठी महिनोनमहिने नंबर लावावे लागणार नाहीत. पण मग पंचतारांकित हॉस्पिटल्नी मांडलेल्या दुकानांचं काय??
Here are the features of the Aam Aadmi Party-led Delhi Government’s Mohalla Clinic
अन्न, आरोग्य ह्या आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी सरकारने खर्च करणं ह्याला चीप पब्लिसिटी का मानावं?
बरं, महाराष्ट्र सरकारने गेल्या एक वर्षात असला पॉप्युलिझ्म पोसला नाही तर मग वाचलेल्या पैशातून वेगळं काय भरीव काम केलं? की नुसतीच चिक्की खाल्ली ? Wink

३. "Recently, Kejriwal’s electricity bill running into lakhs created enough flutter."

ह्या विषयावरचं दिल्लीसरकारचं अधिकृत प्रेस रिलीज नजरेला पडलंच नाही वाटतं ह्या लेखकुंच्या.
अकेच्या घराचं वीजबिल--सुमारे १५,००० प्रतिमहिना. मुख्यमंत्री निवासाचा एक भाग (वेगळं मीटर लावून) इतर कामकाजासाठी वापरला जातो. उदा.-जनता दरबार. त्या भागाचं बिलसुद्धा अकेच्या बिलातच मिसळायचं म्हणता? बरं तर बरं, कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या घरचं वीजबिल त्यात धरलं नाहीये !
जरा इथला खालचा तक्ताही पाहून घ्या आणि मत मांडा.

खडीसाखर,
तुमची खाँसी आणि मफलरची पोस्ट वाचून मला लगेच 'ब्रह्मांड आठवले'. माझा अंदाज बरोबर असल्याचं तुम्ही सांगितलंत तर 'पॅराजंप' करीन.

Are Bassi’s attacks on AAP part of a larger plot?
लेखाशी सहमत.

@मिर्ची
मला काही म्हणजे काहीही कळ्ळं नाही. Happy काहीही आठवतंय हय, इथे फट म्हणता ....... व्हायची !

>>So keep coughing<<
हा हा! यातलं काहि (मेसेज फाॅरवर्ड, मफलर गुंडाळणं, खोकणं इ) एनआराय नी केलं तर एखादं फळ मिळेल का? Proud

राहू द्या खडीसाखर. तुमचा जुना आयडी ओळखण्यासाठी माझा खडा अचूक लागला नाही.

<<हा हा! यातलं काहि (मेसेज फाॅरवर्ड, मफलर गुंडाळणं, खोकणं इ) एनआराय नी केलं तर एखादं फळ मिळेल का?>>
राजभौ, तुम्हाला ह्यातलं काहीच न करता घसघशीत फळ मिळू शकेल. सध्याच्या केंद्रात ओळखपाळख काढली असेल की...

Pages