अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केजरीवालांना कडक शासन झालंच पाहिजे. ७० पैकी ६७ जागा जिंकून एक फाटका माणूस सगळ्या व्यवस्थेला वेठीस धरतो म्हणजे काय !
फटके मारणाऱ्या तीन यंत्रणा -
आजीमाजी सत्ताधारी पक्ष
पक्षातले माजी नाराज
मीडियातले तिरंदाज .शोधा म्हणजे वैगुण्य सापडेलच !

सफाई कामगारांच्या पगाराबाबत, केजरीवालांना टिवी वर बोलताना ऐकलं. ते म्हणतात - ३१ मे पर्यंत मी (दिल्ली सरकारने) पगार दिलेला आहे, यापुढे पगार द्यायला माझ्याकडे पैसे नाहित. कामगारांनी यापुढे पगार माझ्याकडे मागु नये, केंद्र सरकारकडे मागावा...

हा काय प्रकार आहे? माझ्यामते दिल्ली गवर्न्मेंट इज ग्लोरीफाय्ड म्युनसीपॅलिटी. त्यानुसार सफाई कामगारांची जबाबदारी त्यांची नाहि? हाय-टेक सिटी बनवण्याची स्वप्नं बघ्णार्‍यांना बेसिक सेवांकरता बजेट मधे तर्तुद करण्याचं भान नाहि???

हा काय प्रकार आहे? माझ्यामते दिल्ली गवर्न्मेंट इज ग्लोरीफाय्ड म्युनसीपॅलिटी. त्यानुसार सफाई कामगारांची जबाबदारी त्यांची नाहि? हाय-टेक सिटी बनवण्याची स्वप्नं बघ्णार्‍यांना बेसिक सेवांकरता बजेट मधे तर्तुद करण्याचं भान नाहि???>>>

हो त्यांचीच जबाबदारी आहे.
सगळीच जबाबदारी त्यांचीच आहे
केजरिवालांनी राजीनामा देउन टाकावा.
म्हणजे देशातील महागाइ संपेल, भ्रष्टाचार संपेल, चीन आणी पाकिस्तान घुसखोरी थांबवतील, जातीय दंगे संपतील, रोजगार मिळेल, बिल्डरची माजोरी थांबेल, टोल बंद होतील, रस्त्यावर खड्डे नसतील, पब्लिक ट्रास्नपोर्ट असेल, पेट्रोल/डिझेल किमती कमी होतील, पाउस वेळेवर आणी भरपुर पडेल, दुष्काळ पडणार नाहि, कोणी अपघातात मरणार नाहि, बुलेट ट्रेन धावतील, ३७० कलम रद्द होइल, काळा पैसा भारतात येइल, पाकचे आणी इसिसचे झेंडे कोणी काश्मीरात नाचवणार नाहि.
थोडक्यात रामराज्य असेल (राम मंदिर हि असेल)
एक फाटका माणूस सगळ्या व्यवस्थेला वेठीस धरतो आणी अराजकता पसरवतो म्हणजे काय (तेहि गेल्या ६८ वर्षांपासुन) !

माणुस,
रिलॅक्स. शांतीला धरा Happy
मला माहीत आहे प्रचंड चिडचिड होते असा अन्याय पाहिला की. पण इथे प्रश्न विचारणार्‍यांवर चिडून उपयोग नाही. टीव्ही चॅनेल्सने दिवसभर दिल्लीतील कचर्‍याचे ढीग दाखवताना दिल्लीतील प्रशासनातील गुंतागुंत आणि नगरनिगमच्या भ्रष्टाचारावर चर्चा करणं गरजेचं होतं. करत असतील तर माहीत नाही. माझ्या निरीक्षणात तरी आलं नाही.

तोमर-केसची गुंतागुंत पाहून आता एसीपी प्रद्युम्न आणि दयालाच पाचारण करावं असं वाटायला लागलंय. कुछ तो बहोत बडी गडबड है दया.
आज पोलिस तोमरला मुंगेरला घेऊन गेले होते. तोमरने LLB चं शिक्षण इथून पूर्ण केलं आहे हे ज्या प्रिन्सिपलने उच्च न्यायालयात शपथपत्रावर सांगितलं आहे त्यांच्यासोबत तोमरची ३ तासांहून जास्त वेळ चौकशी केली असं बातमीत म्हटलं आहे.
Fake degree row: Jitender Singh Tomar passing law examination confirmed, say officials
'officials present during the questioning of Tomar, who was brought from Delhi by police at Biswanath Law College in Munger, said on condition of anonymity that college registers revealed that the former minister had enrolled in it under roll number 10136 in 1994-95 session'
अ‍ॅनॉनिमिटी का? पोलिसांनी स्वत:च हे जाहीर का नाही केलं?

डबल पोस्ट.
माझा लॅपटॉप अचानक गंडलाय. घरची मंडळी त्यांचे लॅपी उधारीवर द्यायला नाही म्हणत आहेत. सब मिले हुए है जी Wink

<<रुल नंबर १ केजरीवाल कधीही चुकीच वागत नाहीत
रुल नंबर २ केजरीवाल काहीही करु शकतात.
दुसर्‍या रुल समजला नसेल तर पहिला रुल परत वाचा.>>

हे झालं (तुमच्या मते) आप्टर्डसचं रूलबुक.
युरोंचं रूलबुक असं आहे ---
"रुल नंबर १ केजरीवाल कधीही बरोबर वागत नाहीत.
रुल नंबर २ केजरीवाल काहीच करु शकत नाहीत.
दुसरा रुल समजला नसेल तर पहिला रुल परत वाचा."

Proud Light 1

नगरनिगम, दिल्ली सरकार ह्या गुंत्याबद्दल लिहिते. जमलं तर आजच. नाहीतर उद्या.

मंदार, तुम्ही दिल्लीसरकारच्या कामावर खुष आहात हे वाचून समाधान वाटलं. झुळुक. Happy

सध्या दिल्लीकरांमध्ये केजरीवालांबद्दल कौतुक आणि सहानुभूती, नजीब जंगांबद्दल संताप आणि केंद्रसरकारबद्दल वैताग आहे असं एक प्रातिनिधिक निरीक्षण आहे. इकडे तिकडे असू शकतं.

भारतीताई +१००

अहो दिनेश्क, काहिहि काय! गुन्हे फक्त आप चे लोक करतात.
भाजपा आणी कांग्रेस चे नेते स्वछ आहेत.
म्हणुनच भारत सुजलाम सुफलाम आहे !

>>हो त्यांचीच जबाबदारी आहे. सगळीच जबाबदारी त्यांचीच आहे केजरिवालांनी राजीनामा देउन टाकावा.<<

भावनाविवश होऊ नका. उत्स्फुर्त भावना व्यक्त करुन रस्त्यावरचे कचरे उचलले जाणार आहेत का?

बाकि, दिल्लीकरांना आणि त्यांच्या टॉलरंसला मानलं बाबा. रस्त्यावरचे कचर्‍याचे ढिग आणि चाललेला तमाशा बघुन सुद्धा केजरीवालांचं अ‍ॅप्रुवल रेटिंग त्यांनी हाय ठेवलं आहे... Happy

<<बाकि, दिल्लीकरांना आणि त्यांच्या टॉलरंसला मानलं बाबा. रस्त्यावरचे कचर्‍याचे ढिग आणि चाललेला तमाशा बघुन सुद्धा केजरीवालांचं अ‍ॅप्रुवल रेटिंग त्यांनी हाय ठेवलं आहे... >>

काहीतरी कारण असेल म्हणून असं करत आहेत ना दिल्लीकर? लांबून आपल्याला मिडिया जेवढं दाखवते तेवढंच दिसणार. आणि मिडिया प्रो-आप दाखवणार नाही.

रच्याकने, मला दिल्लीची 'ऑनररी सिटीझनशिप' देऊ करावी म्हणून केजरीवालांकडे साकडं घालावं काय? दिल्लीत कुठल्या भागात कितीवेळ पॉवरकट झाला आणि कुठल्या भागातून पाण्याचा टँकर पाणी सांडवत चाललाय हेसुद्धा हल्ली मला माहीत असतं. Lol

आज दिल्लीसरकारने छापा मारून एकाच गोदामातून २१,००० क्विंटल डाळ आणि दुसर्‍या गोदामातून ५६०० क्विंटल डाळ जप्त केली आहे. स्टॉकलिमिट फक्त २००० क्विंटल आहे. इतकी डाळ आख्ख्या दिल्लीला ५ दिवस पुरेल म्हणे. असल्या जमाखोरीमुळेच कृत्रिम भाववाढ होते. गुड जॉब.

ई-रेशन कार्डनंतर अजून एक कल्पक योजना देशभरात पहिल्यांदा दिल्लीसरकारने राबवायला सुरूवात केली.
Delhi becomes 1st state to have GPS-enabled water tankers
"“During summers people are harassed by the tanker mafia in many colonies of the capital. Every day we receive several complaints regarding tankers. We believe that the GPS will end the crisis faced by residents, especially during summer,” Kapil Mishra, vice- president, DJB, told thestatesman.com."

तोमरच्या राजीनाम्यानंतर हे कपिल मिश्रा आता कायदामंत्री झाले आहेत. आपसरकारच्या कायदामंत्र्यावर दुसर्‍यांदा संक्रांत आली आहे. कपिल मिश्रांना शुभेच्छा.

Kapil&AK.png

Proud
कपिल मिश्रा छान काढलेत. अके मात्र मनोज कुरीलच्या चित्रातल्यासारखे हिंस्त्र दिसतायेत. मला केजरूवॉलची चित्रे आवडतात. एकदम क्युट चित्रे काढते ती मुलगी.

भावनाविवश होऊ नका. उत्स्फुर्त भावना व्यक्त करुन रस्त्यावरचे कचरे उचलले जाणार आहेत का? >>>> भावनाविवश नाहि हो, किव येते आहे आणी वाइट वाटत आहे.

म्हणुनच म्हणले भारत सुजलाम सुफलाम आहे. फक्त दिल्ली मध्ये सर्व प्रश्न आहेत केजरिवाल मुळे.
उरळीकंचनचा प्रश्न ६८ वर्षापुर्वी सुटलाच आहे.

बाकि, दिल्लीकरांना आणि त्यांच्या टॉलरंसला मानलं बाबा. रस्त्यावरचे कचर्‍याचे ढिग आणि चाललेला तमाशा बघुन सुद्धा केजरीवालांचं अ‍ॅप्रुवल रेटिंग त्यांनी हाय ठेवलं आहे.
<<
आदरणीय राजभाई यांना दिल्लीतील रस्त्यांवरची परिस्थिती खडान खडा ठाऊक आहे, तेही दिल्लीत बसून, हे पाहून ऊर भरून आला. डोळे पाणावले.

*
आदरणीय माणुस१जी,
आपण शांतीस धरावे अशी विनंती वर वंदनीय मिर्चीबेन यांनी केलेली आपण पाहिली नाही काय?

>>आदरणीय राजभाई यांना दिल्लीतील रस्त्यांवरची परिस्थिती खडान खडा ठाऊक आहे, तेही दिल्लीत बसून, हे पाहून ऊर भरून आला. डोळे पाणावले<<
धन्यवाद. असं प्रामाणिक मत व्यक्त करणारी माणसं माबोवर दुर्मिळ झाली आहेत... Proud

साती दिनेश्क , काय फरक पडतो ?

त्याची डिग्री खरी कि खोटी यात कोणाला इटरेस्ट आहे ? पोलिसांनी पकडले, ड्रामा झाला, आप कशी इतर पार्टीसारखी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला हे महत्वाचे होते.

आता त्याची डिगी खरी जरी असेल तरी ती धावती न्युज चैनेलच्या खालच्या पट्टीत येइल किंवा येणारहि नाहि.

म्हणुन विचारले. डिग्री खरी खोटीने काही फरक पडत नाही परंतु काही विशिष्ट लोकांची तोंड बंद होतील. इतर पक्षातील लोकांनी किती उलटसुलट डिग्री दिल्यात तरी ती गोष्ट महत्वाची या लोकांसाठी महत्त्वाची नसते.
किमान खर काय आहे ते लोकांसमोर यावे

धन्यवाद

<<आता त्याची डिगी खरी जरी असेल तरी ती धावती न्युज चैनेलच्या खालच्या पट्टीत येइल किंवा येणारहि नाहि.>>

अगदी अगदी.
आता तोमरच्या बातमीच्या उसातून मिळणारा टीआरपीचा रस संपल्याने त्या बातमीचं चिपाड झालंय. (अगाईग..:हाहा:)

आता मिडियाने नवीन विषय घेतलाय. काल DERC ने दिल्लीत वीजदर ६% ने वाढवायची घोषणा केली आहे. दिल्लीसरकारला हे मान्य नाही.
ह्यामुळे केजरीवालांनी 'वीजेची बिलं भरू नका' असं आवाहन केल्याचं ट्वीट केलंय अशी तद्दन खोटी बातमी न्यूजचॅनेल्सच्या हॅण्डल्सवर फिरायला सुरूवात झाली आहे.
"बढ़े हुए बिजली के बिल न भरें दिल्ली के लोगः दिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल ने किया ट्वीट " Uhoh

त्यामुळे कदाचित आज प्राइम-टाइमला "आखिर क्यों देश में अराजकता फैलाना चाहतें हैं केजरी" असं चर्चासत्र असू शकतं.
आणि हो, केजरीवालांचं हे ट्वीट सामान्य जनतेला दिसू शकत नाही. त्यासाठी भाजपाने गळा आवळल्यामुळे येणारी राष्ट्रवादी दिव्य दॄष्टी असावी लागते !

तोमरने मिस्लीड करून भरवशाचा गैरफायदा घेतल्याने केजरीवाल नाराज आहेत, आपने तोमरला पक्षातून हाकलायचा निर्णय घेतला आहे, आपचे एच. एस. फुलका ह्यापुढे तोमरची केस लढवणार नाहीत असं काल वाचण्यात आलं होतं.
पण तोमरच्या डिग्रीबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत थांबणं हा एकच समंजस मार्ग दिसतो आहे.

Pages