अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

vijaykulkarni,

>> तिचे एनकाउंटर झाले नाही हे ही नसे थोडके.

हाह! So naive of you, ViKu! मोदी काय येडे वाटले तुम्हाला? मोदींचं नाव देशभरात पोहोचलं ते तिस्ताछाप लोकांनी केलेल्या अकारण बदनामीमुळे. मोदींना फुकट प्रसिद्धी मिळाली, पुढे त्याचं मतांत रुपांतर केलं. तिस्ताचं एनकाउंटर झालं तर फुकट बदनामी कोण करणार! Proud

मोदी तिच्यावर खटला चालवायची धमकी देऊन बरोब्बर तिचा उपयोग करून घेणार. तिच्या जिवाची तुम्ही चिंता करू नका! Lol

आ.न.,
-गा.पै.

मनोज कुरीलच्या भडक आणि सवंग व्यंगचित्रांपेक्षा हे व्यंगचित्र छान आहे. पोलिस मात्र अगदी अपराइट दाखवला आहे. दिल्लीपोलिसाची दिल्लीकरांच्या मनातील प्रतिमा विचाराल तर ह्यातील प्रतिमेशी अगदी विसंगत आहे Wink

तोमरने राजीनामा दिला. गुड.
"केस जिंकून येईन आणि पुन्हा पक्षात काम करीन" असं त्यांचं विधान होतं.
तोमर केसमधले 'कनेक्ट द डॉट्स' करण्याचं मनात होतं. पण आळशीपणा. असो, कोर्टात काय ते कळेलच.

आता इराणी, निहालचंद किंवा ३३% खासदारांनीसुद्धा राजीनामा द्यावा अशी अपेक्षा करायची का?
की पुढील चार वर्षे काँग्रेसच्या आणि भाजपाच्या लोकांना क्लीन-चीट्स आणि आपचे नेते तुरुंगात??

बबन लोणीकर (भाजप) - मंत्री महाराष्ट्र

आधीच्या अ‍ॅफिडेवीट मध्ये पदवीधर असल्याचे सांगितले होते आणि नंतरच्या अ‍ॅफिडेवीट मध्ये पाचवी पास म्हणून दिलंय.

मंत्र्याला आपण किती शिकलेलो आहोत याबद्दलच शंका!

Maharashtra amends CrPC provisions; no FIR against MLAs, bureaucrat without approval

तोमर-अटकेच्या नाट्यानंतर लगेचच ही बातमी वाचल्यावर भाजपा सरकारांचा दुटप्पीपणा पाहून हसावं की रडावं तेच कळेना झालंय. धन्य !
ह्या अमेंडमेंटनुसार आता न्यायालयाने सांगितलेलं असेल तरीही आमदारावर किंवा सरकारी बाबुंवर पोलिस थेट गुन्हा दाखल करू शकणार नाहीत. आमदारावर गुन्हा दाखल करायला विधानसभेच्या स्पीकरची आणि बाबुवर गुन्हा दाखल करायला मुख्य सचिवाची परवानगी घेणं सक्तीचं आहे !

"They are clearly trying to shield both government servants as well as elected members. This will make it harder for government servants and public representatives to be made accountable," said Tiwari."
१००% सहमत. गुन्हाच दाखल नाही झाला तर पुढील तपास कसा होणार?

आपच्या जितेंद्र तोमर प्रकरणानंतर आपच्या आणखी एका नेत्याचा महाप्रताप.

आपचे नेते सोमनाथ भारती ह्यांच्या पत्नीने आरोप केलाय की सोमनाथ भारती तीला (पत्नि) पाच वर्षापासून बेदम मारहाण करत आहे. याची तक्रार तिने महीला आयोगात पण केलेय.

5 साल से पत्नी पर जुल्म ढा रहे AAP नेता सोमनाथ भारती?

तोमरनंतर आता पुढचे टारगेट्स सुरेंदर सिंग आणि सोमनाथ भारती आहेत असं दिसतंय. उडत-उडत बातम्या यायला सुरूवात झाली आहे.

Heed The Omens In Delhi: India Is Headed For A Constitutional Dictatorship

त्या लिंकमध्ये आशिष नंदीच्या एका आर्टिकलची लिंक आहे.ते उघडून वाचायला घेतलं आणि नुसतं चाळूनच बंद केलं. कोण आहेत हे? राजकीय वैमनस्यातून लिहिलं आहे का त्यांनी? कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा.

अहाहा....बातमी येऊन धडकली आहे तर.
६७ वजा २. अजून ६५ जणांवर ६५ आरोप काय लागतात ते बघायचं आता.
गुजरातमध्ये विरोधी पक्ष हा प्रकारच का नव्हता त्याची थिअरी ऐकली होती, डेमो दिसायला लागलेत.

सोमनाथ भारतींवरचे आरोप खरे नाहीत असं मी अजिबात म्हणत नाहीये. But something is just not adding up.

आपचे नेते सोमनाथ भारती ह्यांच्या पत्नीने आरोप केलाय की सोमनाथ भारती तीला (पत्नि) पाच वर्षापासून बेदम मारहाण करत आहे. याची तक्रार तिने महीला आयोगात पण केलेय.
<<
>>

भाजपाने सोमनाथ भारती ह्यांच्या पत्नीला पैसे वगैरे दिले असतील, असे आरोप करायला. Proud

----
ये तो बहोत बडी साजिश है मोदि की हमारे दिल्ली सरकार के खिलाफ. :-
रडण्याची एक्टिंग करण्यात एकता कपुरच्या "बहु"ना ही मागे सोडणारा आणि महानौटंकी बाज 'आशुतोष'

तोमरनंतर आता पुढचे टारगेट्स सुरेंदर सिंग आणि सोमनाथ भारती आहेत असं दिसतंय. उडत-उडत बातम्या यायला सुरूवात झाली आहे.
>>>>

आपच्या लोकांचे प्रताप उघड झाले की ते टार्गेट्स आणि इतर सर्वजण खात्रीलायक दोषी?
याला दुटप्पीपणा म्हणतात.

केजरीवाल की 'जंग' और 'बदलापुर' की याद!
"या बीजेपी केजरीवाल को सरकार के पिंजरे में कैद करने के मास्‍टर प्‍लान में व्‍यस्‍त है! अगर ऐसा है तो यकीन मानिए वह खुद के पांव में कुल्‍हाड़ी नहीं मार रही है, बल्कि पांव को आरा मशीन में डाल रही है, जहां से कोई पांव वापस नहीं आता।"

"अगर दिल्‍ली को यह संदेश गया कि आपकी सरकार के चलते उसके काम अटके हैं, तो इसका असर बिहार और उत्‍तर प्रदेश की आगामी परीक्षाओं (चुनाव) में बेहद निगेटिव हो सकता है।"

संपूर्ण लेखाशी सहमत.
प्लीज जस्ट वर्क अ‍ॅण्ड लेट केजरीवाल वर्क. केजरीवालांना राजकारणात हरवायचं असेल तर उलट त्यांना सगळं पुरवा. तरीही काम नाही केलं तर त्यांनी केलेल्या अवाढव्य आश्वासनांचे जाब लोक स्वतःच मागायला लागतील आणि तेव्हा त्याचं भांडवल विरोधकांना करता येईल.
आणि त्यांनी आश्वासनं पूर्ण केली.....तर मग तेच हवंय ना मोदींनाही? त्यांचीही स्वप्ने आहेत ना देशाच्या विकासाची? मग अडचण काय आहे?

पण असा रडीचा डाव आणी नौटंकी सतत करित राहीला तुमचा पक्ष तर कोण त्यांना सहकार्य करेल. स्वातंत्र्यानंतर जशी काय पहिल्यांदाच दिल्लीत निवडणुक झालेय आणि आप हा पहिला पक्ष सत्तेवर आलाय इतक्या अडचणीतुन सरकार चालवायला, जसे काय पुर्वी कुणी सरकार चालवलेच नाहीत.

<<पण असा रडीचा डाव आणी नौटंकी सतत करित राहीला तुमचा पक्ष तर कोण त्यांना सहकार्य करेल. स्वातंत्र्यानंतर जशी काय पहिल्यांदाच दिल्लीत निवडणुक झालेय आणि आप हा पहिला पक्ष सत्तेवर आलाय इतक्या अडचणीतुन सरकार चालवायला, जसे काय पुर्वी कुणी सरकार चालवलेच नाहीत.>>

व्यवस्थित चालू असलेलं भ्रष्टाचाराचं नेक्सस दिल्लीत मोडत चाललंय म्हणून खोटे आरोप केले जात असतील अशी पुसटशीही शक्यता नसेल का?
तोमरची BSc ची डिग्री खोटी होती, तर त्यांना LLB ला प्रवेश कसा मिळाला?
LLB ची डिग्री खोटी होती तर इतकी वर्षे बार कौन्सिलने त्यांना वकिली कशी करू दिली? मागच्या निवडणूकीत ह्या खोट्या डिग्र्या प्रशांत भूषणच्या नजरेतून कशा काय सुटल्या?

पुन्हा एकदा लिहिते आहे की डिग्री आहे की खोटी ह्यावर मी टिप्पणी करतच नाहीये. तो न्यायालयाचा विषय आहे. आणि डिग्री खोटी असेल तर 'स्मृती इराणी आहेत ना मंत्रीपदावर, मग तोमर का नाही चालत?" असला प्रश्नही विचारणार नाही. जस्ट किक हिम आउट इफ ही इज फ्रॉड.

पुढचं टारगेट मनिष सिसोदिया आहेत असं अनधिकृत सूत्रांकडून कळलं.

परवा भाजपा नेता (बहुतेक सतिश उपाध्याय) म्हटले होते की "आपसरकार को अब हम चारों तरफ से घेरेंगे"
तेव्हा समस्त आप्टर्डसनी "तीन लोग चारों तरफ से कैसे घेरेंगे?" म्हणत हास्याची कारंजी उडवली होती.:हाहा:
जोडगोळी नेमकी काय चीज आहे ह्याचा अंदाज आला असेल आता !

मिर्ची.

जितेंद्र तोमरना कोर्टाने त्यांच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकल्यानंतरही पोलिस कस्टडी का दिली?
का कोर्ट भी मिला हुआ है जी?

तोमरची डिग्री खरी आहे तर योगेंद्र यादव म्हणतात त्याप्रमाणे दिल्ली सरकार ती जाहीर का करत नाही?

तोमरची डिग्री प्रशांत भूषणच्या नजरेतून सुटली तेव्हा भूषण आपमध्येच होते ना? याचा सरळ अर्थ आपचा सदस्य म्हणून भूषणनी जाणिवपूर्वक डोळेझाक केली असा होत नाही काय?

<<जितेंद्र तोमरना कोर्टाने त्यांच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकल्यानंतरही पोलिस कस्टडी का दिली?>>

कारण पोलिसांनी अजामिनपात्र कलमे लावली होती. कोर्टाने पोलिसांना फटकारल्याचं मिडियाने दाखवलं का माहीत नाही.
'Even though the court sent Tomar to police custody, they also hauled up the Delhi Police by questioning the urgency of the arrest. The court termed it a "farcical exercise" on behalf of the police."

Farce चा अर्थ माहीत असेलच.

<<तोमरची डिग्री खरी आहे तर योगेंद्र यादव म्हणतात त्याप्रमाणे दिल्ली सरकार ती जाहीर का करत नाही?>>

अहो, ती कागदपत्रेच खोटी आहेत असा आरोप आहे तर जाहीर करण्याचं काय आलं? आता त्यांचं रेकॉर्ड शोधून काढावं लागेल. जे त्यांनी काढून कोर्टात जमासुद्धा केलं. वर माणूसने फोटो टाकलाय.

<<तोमरची डिग्री प्रशांत भूषणच्या नजरेतून सुटली तेव्हा भूषण आपमध्येच होते ना? याचा सरळ अर्थ आपचा सदस्य म्हणून भूषणनी जाणिवपूर्वक डोळेझाक केली असा होत नाही काय?>>

तसं असेल तर मग ते सुद्धा तितकेच दोषी आहेत. खोट्या आणि चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देण्याचं कोणालाच काहीच कारण नाही.

केजरिवालने चुका केल्या असतील, तोमरची डिग्री फेकहि असेल, पण ज्या पद्धतीने सर्व चालले आहे ते चांगले नाहि.

आताच ब्रेकिंग न्युज पाहिली की म्यानमारने आपल्या बोर्डर मध्ये भारतीय सैनिकांनी कारवाइ केली हे नाकारले आहे
http://www.ndtv.com/india-news/myanmar-denies-india-killed-militants-ins...

कारण पोलिसांनी अजामिनपात्र कलमे लावली होती. कोर्टाने पोलिसांना फटकारल्याचं मिडियाने दाखवलं का माहीत नाही.
'Even though the court sent Tomar to police custody, they also hauled up the Delhi Police by questioning the urgency of the arrest. The court termed it a "farcical exercise" on behalf of the police."
>>>>

लिंक द्या. व्हिडीओ लिंक!

जितेंद्र तोमरपाठोपाठ आणखीन एक खोटी डिग्री!

http://www.indiatvnews.com/politics/national/surender-singh-issued-notic...

आप आमदार कमांडो सुरेंद्र सिंग यांची डिग्री खोटी असल्या प्रकरणी हायकोर्टाने त्यांना नोटीस पाठवली आहे. आर टी आय कायद्या अंतर्गत मागवलेल्या माहितीत सिक्कीम युनिव्हर्सिटीने आपल्याकडे सुरेंद्र सिंग नावाच्या कोणत्याही विद्द्यार्थ्याचं रेकॉर्ड नसल्याचं जाहीर केलं आहे!

याच सिक्कीम युनिव्हर्सिटीतून आपण २०१२ मध्ये डिग्री घेतल्याचं सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या अ‍ॅफीडेव्हीट मध्ये नमूद केलं होतं.

हायकोर्टाच्या पहिल्या नोटीसीला सिंग यांनी उत्तरच न दिल्याने त्यांना पुन्हा चार आठवड्याची मुदत देण्यात आली आहे!

admin च्या सूचनेनुसार संपादित केले आहे. फक्त दुवा देत आहे.

http://www.loksatta.com/mumbai-news/fake-degree-row-bjp-mla-babanrao-lon...

बीए ची परीक्षा दिली म्हणजे आपण पदवीधर समजले जातो का???? नापास होऊन सुद्धा प्रतिज्ञापत्रात पदवीधर असल्याचे खोटेच नमूद केले. वरील स्व-कथनात या मंत्र्यांनी स्वतःच गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आणि मंत्रीसाहेब सर्वाना वैयक्तिकरीत्या भेटून लोकांचे गैरसमज दूर करणार आहेत. मुख्यमंत्री कधी कारवाई करणार आहेत कि आपल्याच सरकारची आणखी बेअब्रू होण्याची वाट पाहतायेत.

सुनटून्या,

यात एक महत्वाचा मुद्दा लोणीकरांनी सोईस्करपणे गाळलेला आहे तो तुमच्या ध्यानात आला का?

पाचवी पास असलेल्या माणसाला थेट बी ए च्या पात्रता परिक्षेस बसता येते?

माझ्या माहितीप्रमाणे डिग्रीच्या परिक्षेसाठी अ‍ॅडमिशन घेण्यापूर्वी किमान १२ वी पास असावं लागतं किंवा दहावी नंतर तीन वर्षाचा डिप्लोमा लागतो. इथे एकदम पाचवी पास नंतर बी ए ला अ‍ॅडमिशन?

बराच मोठा घोळ असावा हा!

देवेंद्र फडणवीसांनी सर्वप्रथम लोणीकरांचा राजीनामा घ्यावा आणि पूर्ण चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी ही अपेक्षा आहे.

'करप्शन के खिलाफ जंग' पर झूठ बोल रही है केजरीवाल सरकार?

एक आरटीआई में पूछे गए सवालों के जवाब में दिल्ली की ऐंटी करप्शन ब्रांच (एसीबी) की तरफ से खुलासा किया गया है कि हेल्पलाइन 1031 के शुरू होने से लेकर 27 मई 2015 तक इसके जरिए 261 शिकायतें मिलीं। इनमें आरोपियों के खिलाफ 7 मामले दर्ज किए गए और 7 आरोपियों को ही तब तक गिरफ्तार किया गया था। दूसरी तरफ शहरभर में जगह-जगह लगे आप सरकार के पोस्टरों को देखें तो उनमें अब तक 35 के करीब अधिकारियों के गिरफ्तार होने और 155 के आसपास अधिकारियों को सस्पेंड किए जाने का दावा किया जा रहा है।

बातमीचा दुवा:-

सर्वांसाठी एक सूचना. इथे इतर संकेतस्थळांवरचा मजकूर कॉपी पेस्ट करू नका. फक्त दुवा पुरेसा आहे. पण त्याचबरोबर ही जागा बाहेरचे दुवे एकत्र करण्याची जागा नाही हे लक्षात ठेवा.

तिथला मजकूर कॉपी पेस्ट करण्यापेक्षा त्यावर तुमची मते मांडलीत तर जास्त चांगलं.

<<मुख्यमंत्री कधी कारवाई करणार आहेत कि आपल्याच सरकारची आणखी बेअब्रू होण्याची वाट पाहतायेत.>>

सुनटुन्या,
कालची बातमी वाचलीत का? कारवाई सोडा, उलट मुख्यमंत्र्यांनी समस्त आमदार आणि बाबूंना कवचकुंडले दिली आहेत.

ओके अ‍ॅडमिन. वरची मोठी पोस्ट एडिटते.

मधुकर देशमुख

बातमीनुसार ते म्हणतात की त्यांनी आधी पात्रता परीक्षा दिली आहे. यशवंतराव विद्यापिठाच्या नियमानुसार हे शक्य असावं वाटतंय.

सुनटून्या,

पाचवी पास असलेल्याला पात्रता परिक्षा देऊन थेट बी ए ला प्रवेश देत असतील तर य च म मुक्त विद्यापीठाच्या पात्रतेविषयी शंका घेण्यास वाव आहे. उद्या कोणीही शाळा सोडून थेट डिग्रीची पात्रता परिक्षा देईल!

जे लोक परिस्थितीपायी अथवा वैयक्तिक कारणासाठी शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत, त्या व्यक्ती यशवंतराव विद्यापिठाच्या सहकार्याने पदवी मिळवू शकतात. वर्षानुवर्षे एकाच खात्यात काम केल्यावर कामाचा अनुभव गाठीशी असतोच पण पुरेसे शिक्षण पदरी नसल्याने बढती मिळत नाही म्हणून साधारणतः शासकीय कर्मचारी बढतीसाठी याचा उपयोग करतात आणि हे शासनमान्य आहे. खासगी संस्थांमध्ये या पदवीला किंमत नाही.

Pages