अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल शिक्षकांना रंगेहाथ पकडल्यानंतर दिल्ली जलबोर्डाच्या ५ अधिकार्‍यांनाही अटक झाली आहे. त्यात चिफ इंजिनियरचाही समावेश आहे. >>>>>
मनाला थंडावा देणारी बातमी. Happy

भ्रष्टाचार २०-२५ टक्के जरी कमी झाला तर दिल्लीचे बजेट खुप सबसिड्या देवुन पण शिलकी असेल.

एकाने सत्तेवर आल्याबरोबर काम करण्याकरीता १० वर्ष लागतील सांगितले
तर एकाने येत्या ५ वर्षात ५०% कामे होतील असे सांगितले

ज्याने ५०% सांगितले त्याला बोलणी बसत आहे. मात्र ज्याने १० वर्ष सांगितली त्याला कोणी बोलत नाही

व्वा रे महिमा न्यारी. Rofl

नरेश माने,
कमी वाचा. जास्त ऐका आणि पहा - "लोगों की उम्मीदें बहोत ज्यादा है. ये जनता जो उपर चढाती है, पांच साल में जूतें भी मारती है. तो...लेकिन आज कॉन्फिडन्स है, के पांच साल के अंदर सौ % नहीं तो कम से कम चालीस-पचास % तो हम लोग पूरा कर ही लेंगे. और ये कोई बुरा नहीं होगा"

ह्या वाक्यांचा अर्थ "अपने वादों से मुकर गए केजरीवाल" असा होतो ? Uhoh

मिर्ची, मी आधी ह्याच धाग्यावर लिहीले होते की दिलेली सगळी आश्वासने जरी आआप सरकार पुर्ण करू शकले नाही तरी चालेल पण त्यांच्या पुर्ततेच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न आणि ती पुर्ण का झाली नाहीत याची कारणे ते जनतेला दाखवून देऊ शकतात.

मी ती बातमीची लिंक टाकली कारण, तुमच्या पोस्ट मधील खालील संवाद,

मिडिया : "क्या आप को लगता है सारे वादे पुरे कर पायेंगे?"
अके : "सारे वादों में से ५० % भी कर पाये तो भी बहोत बदलाव आयेगा, करेंगे तो सारे जी"

हा संवाद मला माहित नाही. आणि ऑफिसमध्ये तुम्ही दिलेली लिंक ओपन होत नाही.

आता तुमच्या दुसर्‍या पोस्टमधील हा संवाद पहा
"लोगों की उम्मीदें बहोत ज्यादा है. ये जनता जो उपर चढाती है, पांच साल में जूतें भी मारती है. तो...लेकिन आज कॉन्फिडन्स है, के पांच साल के अंदर सौ % नहीं तो कम से कम चालीस-पचास % तो हम लोग पूरा कर ही लेंगे. और ये कोई बुरा नहीं होगा"

तो मी दिलेल्या लिंकमधील बातमीशी जुळतोय. आणि तुमच्या पहिल्या पोस्टमधील संवादाचा आणि ह्या संवादाचा अर्थ नक्कीच वेगळा आहे.

आणि मी वरील संवादाला यु-टर्न म्हणणार नाही.

इवान, मी ते वाक्य उपहासाने लिहीलेले नाही. जरी त्यांनी ४०-५०% आश्वासनांची पुर्तता केली आणि इतर आश्वासनांच्या पुर्ततेसाठी १००% प्रयत्न केले तर तो यु-टर्न ठरणार नाही असे मला म्हणायचे आहे.

भाजपाचे सरकार दिलेल्या किती आश्वासनांची पुर्तता करेल आणि दिलेल्या किती आश्वासनांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने १००% प्रयत्न करेल त्याच्यावर त्यांच्या कामगिरीचे ५ वर्षानी मुल्यमापन होईलच.

<<भ्रष्टाचार २०-२५ टक्के जरी कमी झाला तर दिल्लीचे बजेट खुप सबसिड्या देवुन पण शिलकी असेल.>>

शिलकीला वेळ लागेल अजून. सबसिड्या सुद्धा कायमस्वरूपी नाहीयेत. डिस्कॉम्सच्या तपासण्या चालु आहेत.
ते योया जाता-जाता आपचा वकील पण घेऊन गेले. आता वकील कोणाच्या बाजूने केस लढवतात त्यांनाच माहीत. रिलायन्सविरुद्धच्या केसच्या मागच्या हिअरिंगला प्रभु उपस्थित नव्हते असं वाचण्यात आलं होतं.

परवा बवानामध्ये पाण्याचा नवीन प्रकल्प चालू झाला. आपसरकारच्या दोन महिन्यातील हा दुसरा प्रकल्प. २० एमजीडी क्षमता आहे, सध्या ६ एमजीडी पुरवठा चालू झाला आहे. साधारण ६ लाख लोकांना ह्या प्रकल्पामुळे पाणी मिळणार आहे. १२ वर्षांपूर्वी बांधलेला प्रकल्प अजून बंद का होता ह्याचं उत्तर शीलाबैंना माहीत असेल.
त्या कार्यक्रमात स्थानिक रहिवाशांनी पाण्याच्या बाटल्या भरून दाखवायला आणल्या होत्या.
ndtv च्या तिथे उपस्थित नसलेल्या पत्रकाराचं ट्वीट - "Hearing that someone has thrown sewage water at Delhi CM, Arvind Kejriwal... As he inaugurates a water treatment plant in Bawana #AAPBreakUp" Lol

वरील कार्यक्रमाचं रिपोर्टिंग करणार्‍या दोन बातम्या -
Bawana plant starts; water woes to end
आणि ही दुसरी - Too much politics found in Bawana water supply

पहिली बातमी माहिती पुरवतेय, दुसरी गॉसिप करतेय आणि ndtv च्या सोनलतै काय करत आहेत हे त्यांचं त्यांनाच माहीत !

माने,
आधी लिहिलेला संवाद ह्याआधी अनेकदा ऐकला आहे. मी अकेंचं कुठलंही भाषण, मुलाखत शक्यतो चुकवत नाही. नेमक्या कुठल्या कार्यक्रमात ऐकला आहे हे सापडलं की लिंक देईन.

<<तो मी दिलेल्या लिंकमधील बातमीशी जुळतोय.>> ओक्के. मी असहमत.

५ वर्षांमध्ये ५० टक्के झालीत तरी खूप झालीत (माझ्यामते सरकार विशेष प्राविण्य श्रेणीत पास!) . इकड काय होतंय त्याचा पत्ता नाही. बाकी १०३१ सुरु होऊन कारवाई चालू झाल्याबद्दल दिल्ली सरकारचे अभिनंदन.

>>"लोगों की उम्मीदें बहोत ज्यादा है. ये जनता जो उपर चढाती है, पांच साल में जूतें भी मारती है. तो...लेकिन आज कॉन्फिडन्स है, के पांच साल के अंदर सौ % नहीं तो कम से कम चालीस-पचास % तो हम लोग पूरा कर ही लेंगे. और ये कोई बुरा नहीं होगा"<<

ह्म्म्म, काला धन विदेशो.से वापस लाना ये भाजपाका चुनावी जुमला था, तो ये क्या आप का चुनावी जुमला है? Happy

कालच्या सभेत घडलेल्या घटनेबद्दल अगदीच घाणेरड्या पद्धतीचं राजकारण चालू आहे. 'गुजरात मॉडेल' बद्दल जे भयंकर ऐकलं/वाचलं होतं ते आता देशभर दिसायला लागलंय. आत्महत्येचे खोटे आकडे दाखवणं, धडधडीत खोटं बोलणं, पोलिसयंत्रणा वेठीला धरून विरोधकांचा काटा काढणं....असह्य आहे सगळं.

काल ह्या धाग्यावरची चर्चा वाचून आणि मिडियावरचे तुटक-तुटक व्हिडिओज पाहून असं मत तयार होत होतं की गजेंद्रसिंग आत्महत्या करत होता आणि आपचे कार्यकर्ते नुसते उभे होते, नेते भाषण देत होते.
जॉइंट कमिशनर मुकेशकुमार मीना काल म्हणाले - "It was not our duty to bring him down from tree"
आणि आज गुन्हा नोंदवताना लिहिलंय की आपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कामात अडथळा आणला !

हाच का तो अडथळा ???
AAP volunteers on tree.jpg
पोलिसांनी करायची कामं कसलंही प्रशिक्षिण नसलेल्या लोकांना करायला लागतायेत आणि वरून खोटे आरोप? निर्लज्ज पोलिसयंत्रणा Angry
केजरीवालांनी सगळ्या घटनेचा तपास मॅजिस्ट्रेटकडून केला जाईल असं सांगितलं. पण दिल्ली पोलिसांनी मॅजिस्ट्रेट चौकशीला नकार दिलाय.
कहर म्हणजे देशाचे गृहमंत्रीच भर संसदेत खोटं बोलत आहेत !

इस देश का कुछ नहीं हो सकता.....आपच्या नेत्यांनी आपला वेडपट प्रयत्न सोडून द्यावा आणि आमच्यासारखंच परदेशात जाऊन रहावं. आपलं आयुष्य आरामात जगावं. भारतीयांना खोटारडे आणि गुन्हेगार नेतेच हवे आहेत. ते त्यांना लखलाभ असोत. दुसर्‍यांच्या घरात लागलेली आग स्वतःपर्यंत पोहोचत नाही तोवर त्यांचे डोळे उघडणार नाहीत.

FIR मध्ये पोलिसांनी लिहिलंय की आपचे कार्यकर्ते खाली उभे राहून टाळ्या वाजवत होते आणि त्याला आत्महत्या करायला प्रोत्साहन देत होते.

volunteers.jpg

टाळ्या वाजवत आहेत की विनवण्या करत आहेत??

मिडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणे. नालायक आहे आपला मिडिया. गॉसिपिंग शिवाय दुसरं काही आवडत नाही त्यांना.
Supari media.jpg

“Latak Gaya?”: Did Kumar Vishwas and Kejriwal Murder Gajendra, the Farmer?

कुमार विश्वास के तेवर लटक गया?

https://www.youtube.com/watch?v=yhvV9M1F70U&feature=youtu.be

सगळे खोट्टे !! आआप तेव्हढी खरी,

मग वरचा व्हिडीओ बघा ! त्यातला कुमार विश्वास चा हावभाव ? तो पण खोटा का ?

व्हिडीओ एडिट केलेला
फोटो मॉर्फ केलेले
डोळ्यांदेखत बघितलं असे लोक खोटे

अधिकाधिक हास्यास्पद होत चालले आहे हे रिझनिंग

Rofl

अप्पाकाका, शक्य झालं तर त्या हसर्‍या स्मायल्या टाकू नका प्लीज. चीड येतेय. थोडा काळ तरी गांभीर्य पाळा.

मिडियाकडे रॉ फुटेज असेलच. नेहमीप्रमाणे कालही आपच्या रॅलीचं थेट प्रक्षेपण झालं होतं. इथे त्याचा व्हिडिओ पाहता येईल. आशिष खेतानचं भाषण झाल्यावर कुमार विश्वास बोलायला आले. त्यावेळी गजेंद्रसिंग झाडावर चढण्याचा गोंधळ सुरू झाला. २:००:०० पासून पुढे पहा. आणि मग ठरवा कोण खरं बोलतंय ते.

तुम्ही पाळताय का गांभीर्य? तुमच्या हास्यास्पद कारणमिमांसेने इतरांना चीड येऊ शकते त्याची तुम्ही पत्रास बाळगता का?

बरं बरं तुम्चं खरं हां आम्हीच खोटे. दुनिया खोट्टी. फक्त फक्त आपवाले खरे. बाकी सगळे खोटे. खोटे खोटे खोटे त्रिवार खोटे. बस्स्स? Proud

चालुद्या तुमचं.

तुमची चूक नाही ती. ज्यांच्या मागे चालत आहात ते तुमचे म्होरके त्यात चँपियन आहेत.
बरं तुम्हाला वाचायला आवडत नसेल तर कशाला इथे येऊन पिंका टाकता उगीच? तुमच्या धाग्याचा उद्देश कळल्यावर मी फिरकले का तिकडे?
आता ह्यावरही तुम्ही काहीतरी पाणचट वाक्य टाकून हसर्‍या बाहुल्या नाचवणार. चालू द्या. तुम्ही स्वतंत्र आहात हवी तितकी निष्ठुरता दाखवायला.

आम्ही कुठे जाऊन पोष्टी टाकायच्या तुम्ही कोण ठरवणार? वा रे वा!! बरं एकदा म्हटलं ना आमचं खोट्ट तुमचंच खरं!! और आनेदो.

अहो मिर्ची ताई - नका देऊ उत्तरे. कोणी माथेफिरु प्रसिद्धी साठी किंवा कोणी पैसे दिले म्हणुन कोणाच्या तरी रॅलीत जाऊन ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. त्यात त्याचा अंदाज चुकल्यामुळे मरतो. त्यात केजरीवाल आणि आपचा काय दोष? तो माणुस कुठल्यातरी अँगल नी दुष्काळग्रस्त किंवा परीस्थितीनी गांजलेला वाटतो का?

परवा बवानामध्ये पाण्याचा नवीन प्रकल्प चालू झाला. आपसरकारच्या दोन महिन्यातील हा दुसरा प्रकल्प. २० एमजीडी क्षमता आहे, सध्या ६ एमजीडी पुरवठा चालू झाला आहे. साधारण ६ लाख लोकांना ह्या प्रकल्पामुळे पाणी मिळणार आहे. १२ वर्षांपूर्वी बांधलेला प्रकल्प अजून बंद का होता ह्याचं उत्तर शीलाबैंना माहीत असेल.>>>>>>>

हा प्रश्न जुन ते डीसेंबर राष्ट्रपती राजवट चालवणार्‍यांना पण विचारला पाहीजे.

महाराष्ट्र सरकारनी ६ महीने झाले तरी अजुन एक सुद्धा मोठा फरक घडवणारा निर्णय घेतला नाही. आधीच्या राष्ट्रवादी राजवटीत आणि देवेंद्र राजवटीत काही दिसेल असा फरक वाटत नाही. मागच्या पानावरुन पुढे चालू आहे.

<<कोणी माथेफिरु प्रसिद्धी साठी किंवा कोणी पैसे दिले म्हणुन कोणाच्या तरी रॅलीत जाऊन ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. त्यात त्याचा अंदाज चुकल्यामुळे मरतो. त्यात केजरीवाल आणि आपचा काय दोष?>>

एवढं सरळ नाही दिसत सगळं. कालपर्यंत मलाही तो अपघातच वाटत होता. पण आज पोलिस आणि गृहमंत्र्यांच्या वागण्यावरून तसं वाटत नाहीये.
दिल्लीत अकेच्या पोस्टरवर 'हत्यारा' लिहिणं, इफिजी जाळणं असले प्रकार चालू आहेत. राजीनाम्याची मागणी चालू झाली आहे. काँग्रेस-भाजपा हातात हात घालून मोर्चा लढवत आहेत.
आधीही लिहिलं होतं. कसल्याही दबावाखाली येऊन केजरीवालने अजिबात राजीनामा देऊ नये. ह्या चोरांना तेच हवंय.

NDTV ने त्यांच्याकडे असलेलं फूटेज दाखवलं आहे.

झी न्यूजने व्हिडिओ एडिट करून 'लटक गया' म्हणताना दाखवणं समजण्यासारखं आहे, नुकतीच ३३ कोटीचा चुकवलेला टॅक्स भरायची नोटिस नाही का मिळाली !

बर, बर NDTV ने फक्त खरी बातमी दाखवलेय, बाकी जगातील यच्चयावत प्रसारमाध्यम मोदिंना घाबरुन बातम्या संकलीत करुन दाखवतायत. Lol

Pages