मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्शू,

मराठी जाहीरनाम्यात 'राम मंदिर निर्माण करण्याच्या सर्व संविधानिक पर्यायांना तपासले जाईल' असा उल्लेख आहे. प्रत्याक्ष्मन्दीर बांधलं जाईल की नाही यावर सुस्पष्ट भाष्य नाही.

http://www.bjp.org/images/pdf_2014/marathi_final%20highlights_april_22_0...

आ.न.,
-गा.पै.

हर्पेन | 22 May, 2014 - 12:10 नवीन
झक्की आपले निरिक्षण अगदी योग्य आहे पण म्हणून भारतात काही कोणी रस्त्यावरून चालणे सोडत नाहीत. चड्डी सोडून उकिडवे बसणार्‍यांना स्वतःची लाज वाटेल याची वाट बघायची, तोवर कानाडोळा करायचा आणि पुढे चालायचे स्मित>>>>> अनुमोदन..

घतना बद्लन्याच काम लवकर करने. ३७० कलम. आरक्शन वर विचार करने हे कामे सगल्यात आधि केल तर मतदारानचा विशवास ताकला त्यआच स!आर्तक होइल.

पाकमधे तालिबान वर इस्तराइल आनि अमेरिका मदत घेवुन द्रोन हमले करुन अतिरेकि तल उद्ह्वस्त करने. देश आकर्मक आहे हा मेसेज जगाला देने.

Deshat halle jhale tar 1 mahinyat atireki pakadale jatil ashi central agency banavane. State Govt ne jar pakadale naht tar te Govt barakhast karanara kayda banavane. atirekyana kortat aplee baju mandu dene, vakil dene ase fajil lad na karata sakhsha, purave pagun saral 2 mahinyat fasavar latkavane. ase kelyane jarab basel.

Dvesh pasaravanare likhan karanare yana pan cyber cell kadun tabyat ghene. tyana atireki ghoshit karane.

Andaman jail madhe ayyar ne kadhun takalela majkur parat basavane.

hee kame sarvat adhee kara.

MOST IMPORTANT

Tax madhun konala mafee nako. fakt 12 to 15% lok tax bhartat. tyanchya jivavar desh kasa chalnar ? 100% na tax cumpolsary karava.

shetila tax madhun sut nako. tax bharala tar sheti chi bharbharat hoil. shetkaryala confidence yeil.

tax bharala tar sheti chi bharbharat hoil. shetkaryala confidence yeil.
<<<
how?

दु.कान. - कृपया देवनागरीत लिहिणे.

आत्ताच एका तमिळ सहकार्‍याबरोबर चर्चा करत होतो, अगदी घणाघाती चर्चा.
(नारियल) तेल ओतायला एक केरळी पण होता बरोबर Happy
त्यांचे म्हणणे आहे की राजपक्षेंना बोलावणे, महत्व देणे चुकीचेच आहे, इ. इ.
खरेच काय आहे हे लंकेचे राजकारण ?
काँगी सरकारने राजीवच्या कारणामुळे लंकेविरोधात जाणे टाळले असा पण आरोप आहे तमिळांचा.
आणि आता भाजप सरकार का महत्व देत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अगदी जयललिता शपथविधीला जाणार नाहीत.
एवढे तिव्र मतभेद असतील तर नविन सरकारने असा निर्णय का घेतला असेल ?

तसेच न.शे. बद्दल पण आहे. काय तर म्हणे आधी कॉंग्रेसने बोलावले तेव्हा भाजपने आगपाखड केली होती,
आणि आता का बोलावत आहेत त्यांना ?

Mahesh ji - khamaswa. prayatna kartoy. speed kami aahe. pan jamtay. jast lihayacha asel tevha sadhya kahi diwas samajun ghya plz.

EBlis - pahile 3 pts baddala sahmat asalyane abhar.

ya prashnanachi uttare dya

lokani Tax bharayala pahije ka ?
Govt Tax ka gheta ?

pahile 3 pts baddala sahmat asalyane abhar.<<
काही सहमत वगैरे नाहिये,
ते शेतीबद्दल ट्याक्स चे तारे कसे तोडलेत ते लिहा.

btw mr. dukaan.
i can teach u how to use proxy AND still type in devnaagari. contact me in mail.

आता नाटक बन्द करा अन नीट लिहा.

>>>> पण बांग्लादेशमधून आलेल्या फक्त मुस्लिम लोकांना परत पाठवणार आणि हिंदूंना ठेवून घेणार हे न पटणारं आहे.

इस्रायेल च्या धर्तीवर हे पटले पाहिजे! जशी ज्युन्ना जगात कुठेही "स्वतःची" भूमि नाही, तशीच हिन्दुन्नाही जगात इतरत्र कुठेही भुमि नाही!

As many as 84 government departments have prepared 20-minute power point presentations for the new prime minister.

The meetings can be "at any time and any place", the officials have been warned. Sources say Mr Modi is keen to have one-on-one meetings with each secretary.

It is rare for secretaries of the government of India to meet the PM directly, officials told NDTV. The outgoing Prime Minister, Manmohan Singh, never had such meetings, they added.

चेंज ! गुड गव्हर्नंससाठीचे पहिले पाऊल. !

पाकिस्तानसहीत सर्व सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रण ही एक उत्तम स्टेप आहे.
यातील बहुतेक देशात भारताबद्दल अविश्वास आणि भिती आहे ती कमी करणे आणि सार्कला रिलेव्हन्स आणणे फार महत्वाचे आहे.

limbutimbu,

>> जशी ज्युन्ना जगात कुठेही "स्वतःची" भूमि नाही, तशीच हिन्दुन्नाही जगात इतरत्र कुठेही भुमि नाही!

१००% सहमत. 'बाहेरचा तो बाहेरचा' हे विधान असंवेदनशील आहे. बांगलादेशी मुस्लिम घुसखोरच आहेत. बहुतांश बांगलादेशी हिंदू मात्र राजकीय शरणार्थी आहेत. गेली दोन वर्षे हिंदूंचा छळ वाढला आहे (इंग्रजी दुवे) :
http://en.wikipedia.org/wiki/2013_Bangladesh_Anti-Hindu_violence
http://en.wikipedia.org/wiki/2014_Bangladesh_anti-Hindu_violence

आ.न.,
-गा.पै.

माेदी सरकार आणि सजग जनता
हे नाव कसे वाटते?

बेफ़िकीर | 22 May, 2014 - 01:08
मोदी हे पोचलेले .......
थोडे सैलपणे म्हणायचे झाल्यास, सव्वाशे वर्षाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष,>>>>>>>>

इंदिराजींनी काँग्रेस विसर्जित करून गायवासरू हे चिन्ह गाोठवून हात हे चिन्ह असलेला काँग्रेस (I) हा पक्ष काढला ना. मग काँग्रेसला सव्वाशे वर्षाची परंपरा आहे असे कसे म्हणता येईल आणि तसे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सव्वाशे वर्षाची परंपरा आहे असे म्हणावे लागेल.

>>>>यातील बहुतेक देशात भारताबद्दल अविश्वास आणि भिती आहे ती कमी करणे आणि सार्कला रिलेव्हन्स आणणे फार महत्वाचे आहे.<<<<<

आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण आवश्यक. बाकी कुठल्याही देशात भारताबद्दल अविश्वास आणि भीती नाही. तशी व्हावी असे भारताने काहीही केलेले नाही. तेव्हा हा मुद्दा हास्यास्पद.

सार्क नेहमीच रिल्हेवंट होता आणि राहील. आजही सार्क देशातल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलती असतात. बाकी अनेक गोष्टी आहेत.

(१) आमंत्रण देऊन मोदींनी पाकिस्तानला विलक्षण पेचात टाकले आहे. शरीफ आले तरी लोचा नाही आले तरी प्रॉबलेम.
(२) उद्या पुढे मागे पाकिस्तानने काही आगाऊपणा केला तर आक्रमक उत्तर देताना आपल्याला सांगता येईल की बघा आम्ही आधी शांततेनेच घेतले होते.
(३) सार्क देशांसमोर शक्तीप्रदर्शन करणे हा हेतू साध्य होईल. भारत आक्रमक देश नसला तरी उपखंडात भारतच मोठा भाऊ आहे हे दाखवणे (शो देम हू इज द बॉस).

इंदिराजींनी काँग्रेस विसर्जित करून गायवासरू हे चिन्ह गाोठवून हात हे चिन्ह असलेला काँग्रेस (I) हा पक्ष काढला ना >>>

नाही, आधीचे चिन्ह होते दोन बैल. (नेहरू काळातले) मग काँग्रेसमध्ये फुट पडल्यावर आधीच्या पार्टीने ते दोन बैल असलेले चिन्ह वापरू दिले नाही. (काँग्रेस ओ) म्हणून त्याशी साधर्म्य असलेले चिन्ह म्हणून इंदिरा गांधींनी गाय वासरू आणले पण जनतेने त्याची खिल्ली उडवली. ( गाय म्हणजे इंदिरा आणि वासरू म्हणजे संजय गांधी) मग १९७७ च्या काँग्रेस फुटीत त्यांनी पंजा हे चिन्ह निवडले आणि गाय वासरू सोडून दिले. गमतीची गोष्ट अशी की नेहरूंच्या इलेक्शन मध्ये पंजा हे चिन्ह नेहरूईन काँग्रेसच्या ऑपोझिट लढले होते !

थोडक्यात काँग्रेस अनेकदा फुटली आहे. आजची काँग्रेस आणि १८८५ ची काँग्रेस सोडा, १९४७ ची काँग्रेस पण सेम नाही.

btw mr. dukaan.
i can teach u how to use proxy AND still type in devnaagari. >>> please teach me.

आता नाटक बन्द करा अन नीट लिहा.
>>> hi kasalee bhasha ? mazi comment neet vacha.

यातील बहुतेक देशात भारताबद्दल अविश्वास आणि भिती आहे ती कमी करणे आणि सार्कला रिलेव्हन्स आणणे फार महत्वाचे आहे. >>>

कोणत्या देशाला भारताची भिती आहे? आणि का?

सार्क रिलेव्हंट कधी नव्हती?

सार्क हा एक मुर्ख पणा आहे. नेहरुंच्या चाली वर चालू केलेला.

मोदींनी नवाझ शरिफ ला बोलवायला नको होते. अगदीच अपेक्षाभंग केला. हे असेच चालणार असेल तर काय अर्थ आहे?

अरेवा इब्लिस आता निकालानंतर खूप दिवसांनी परत अ‍ॅक्टिव्ह झाले. कुठे गेले होते की बरे वगैरे नव्हते.

(१) आमंत्रण देऊन मोदींनी पाकिस्तानला विलक्षण पेचात टाकले आहे. शरीफ आले तरी लोचा नाही आले तरी प्रॉबलेम.
<<<

शरीफ यांनी घरून येतांना आपला डबा बांधून आणावा की झाले. मग बिर्याणी खाऊ घलण्याचा खर्च नाही

Pages