मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश, इब्लीस. आभार. पन इकड माझही बरखा चालू झालं. आता प्रॉब्लेम नाही. तुम्ही चांगले लोक आहात.

इब्लीस - दॉक्तर आहात हे माहीत नवतं. लहान तोन्डी मोठा घास घ्यायचा नव्हता मला. असं वाटल्यास माफी.

आज कुठल्या तरी गल्फच्या राजधानीत इंडीयन दूतावासाबाहेर स्फोत झाला. किसी की तो मौत आयी है | इतकी वर्ष न बोलनारे पीएम होते, त्यामुळं डेरिंग वाढली. उनको पता नही की अब .... मे क्या पडनेवाला है

वेलकम ब्याक हो इब्लिस भौ.
मागे राजस्थान,म.प. निकालांच्या वेळेस पण तुम्ही नेमेके प्रवासात होतात असं अंधूक सं आठवतंय . .

श्रीयु
आशा वेळीच पक्ष कार्यासाठी फिरावे लागते.
*
साधना,
ते उत्तर मंदार जोशींना होते, तुम्हाला नाही. मल्टिपल आयडी डिसऑर्डर आहे त्यांना. so unless you are one of his du-ids....

प्यारॉगॉन चपला घ्या, बर्या असतात, खुप चालतात, पायपीट करताना वापरायला बर्या.

पक्षाला Ground Level पासुन मदत करण्यासाठी बरीच मेहनत लागणार. मेहनत म्हंटल्यावर मायबोलीवर
टाईमपास करायला वेळ मिळणार नाही, तुमची कमी भासेल पण देशासाठी याची आम्हाला सवय करुन घ्यावी
लागेल.

आज कुठल्या तरी गल्फच्या राजधानीत इंडीयन दूतावासाबाहेर स्फोत झाला.
------ अफगाण मधे हेरात मधे हल्ला झाला.... पण ते गल्फ मधे येत नाही. गल्फ मधे कुठे काय झाले ?

किसी की तो मौत आयी है | इतकी वर्ष न बोलनारे पीएम होते, त्यामुळं डेरिंग वाढली. उनको पता नही की अब .... मे क्या पडनेवाला है
------- प्रत्येकाची काम कराण्याची शैली वेगळी असु असते तसेच मनमोहन सिन्ग यान्ची होती, मोदी यान्ची अजुन वेगळी आहे. अशा 'अव्हान' देण्याच्या भाषेमुळे नुकसान जास्त होईल म्हणुन साम्भाळुन लिहा.

अफगाण मधे हेरात मधे हल्ला झाला...
---------- Thanx for info.

अशा 'अव्हान' देण्याच्या भाषेमुळे नुकसान जास्त होईल म्हणुन साम्भाळुन लिहा.
-----------------???????

अफगाण मधे हेरात मधे हल्ला झाला...
---------- Thanx for info.

अशा 'अव्हान' देण्याच्या भाषेमुळे नुकसान जास्त होईल म्हणुन साम्भाळुन लिहा.
-----------------???????

बोम्ब फोडने हे आव्हन नाही का ? बोम्ब का बदला बोम्बच.

बॉम्ब उडव मनजे नश्ट होइल.

स्वताची पोस्ट उडवता येईना आणि चालला अफगाणिस्तान उडवायला

स्वताची पोस्ट उडवता येईना आणि चालला अफगाणिस्तान उडवायला<<< Rofl

वेलकम ब्याक हो इब्लिस भौ.
मागे राजस्थान,म.प. निकालांच्या वेळेस पण तुम्ही नेमेके प्रवासात होतात असं अंधूक सं आठवतंय . .<<< Rofl

ते उत्तर मंदार जोशींना होते, तुम्हाला नाही. मल्टिपल आयडी डिसऑर्डर आहे त्यांना. so unless you are one of his du-ids....<<< Rofl

बेजबाबदार कमेन्टबददल गोव्यात एकाला अटक.<<< Rofl

<< बेजबाबदार कमेन्टबददल गोव्यात एकाला अटक. >> गोव्यात निदान 'दारूच्या अंमलाखालीं' होता म्हणून त्याला संशयाचा फायदा तरी मिळूं शकतो !!! Wink

साधनाजी, या इब्लिसला सगळेच डूआयडी वाटतात. संताजी धनाजी सारखे सारखा एकच माणूस जिकडे तिकडे दिसतो. असो. आपण आपले धाग्याशी संबंधित पोष्टी लिहाव्यात. उगाच इब्लिस आणि त्याच्या डूआयडींसारखे पक्षाचा पराभव आणि नेत्यांचा पोपट झाला की प्रवासात राहून असंबद्ध आणि आचरट पोष्टी टाकण्याचे काम करु नये Happy

श्रीयू | 23 May, 2014 - 21:15
वेलकम ब्याक हो इब्लिस भौ.
मागे राजस्थान,म.प. निकालांच्या वेळेस पण तुम्ही नेमेके प्रवासात होतात असं अंधूक सं आठवतंय . Smiley

Proud Biggrin Lol Smiley

आशा वेळीच पक्ष कार्यासाठी फिरावे लागते.

म्हणजे पप्पू फेल गेला की पिंकीची मनधरणी करायला ना? Biggrin

गोव्यात निदान 'दारूच्या अंमलाखालीं' होता म्हणून त्याला संशयाचा फायदा तरी मिळूं शकतो <<< Rofl

बेफिकीरजी आता आपण जरा गंभीर होऊया Happy

मोदींनी देऊन टाकला आपला सगळाच्या सगळा पगार

मोदी मुख्यमंत्री या नात्याने एक रुपयाही पगार घेत नव्हते, हे अनेकांना माहिती आहे. मात्र नियमानुसार जो ठरलेला पगार होता, तो मात्र साठतच होता. हा सगळा पगार आणि इतर सगळे भत्ते मिळून सुमारे २१ लक्ष रुपये इतकी रक्कम भरत होती. मोदी आता कायमचे (!) दिल्लीला आले. तेव्हा जाता जाता त्यांनी ही सर्व रक्कम त्यांचे चालक, रक्षक इ. सेवकांसाठी देऊन टाकली. ही सगळी रक्कम खुद्द मोदींच्याच इच्छेने सदर मंडळींच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाणार आहे. केवढा दूरदर्शीत्वाचा, अक्षरशः नि:शब्द करून टाकणारा दैवी विचार आहे हा!

काय गंमत आहे ना! निरर्थक बरळणारा एक नेता गेले वर्षभर 'महिला सबलीकरण'चा पोकळ जप करत भटकत होता आणि त्यांच्या दृष्टीने 'मौत का सौदागर' असलेला एक नराधम मात्र महिलांच्या खऱ्याखुऱ्या सबलीकरणासाठी लक्षावधी रुपये सोडून गेला! मुद्दा दानतीचा आहे साहेब, मुद्दा दानतीचा आहे!!

एन्डिअ‍ॅ च्या मोदी सरकारवरील होणार्‍या विविध स्वरुपाच्या "हल्ल्यांबाबत" कुठे धागा उघडला गेलाय का? कुणी उघडणारे का? Happy

राजीव इन्दिरआ यान्नी प्राण दिलेले अहेत. २१ लाखापेक्षा त्याची किम्मत जास्त भरते.

>>>> झक्की हे मा बो वरचे नरेन्द्र मोदी आहेत <<<< ऑ??????
खर की काय?
मग लिम्ब्या हा मा बो वरचा अमित शहा आहे असेही लोक बोलतील....... दोघान्च्यात "विमानतळाचे" साम्य आहे! Wink

नरेन्द्र मोदींचे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे काम

नरेंद्र मोदींनी गुजरातचा मुख्यमंत्री या नात्यानेजाता जाता केलेलं शेवटचं काम कोणतं, माहिती आहे? त्यांनी एका फाईलवर स्वाक्षरी केली. गुजरातमधील वडनगर येथे तब्बल ११६ कोटी रुपये खर्चून बनणार असलेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पास परवानगी देणारी स्वाक्षरी होती ती! आणि मित्रहो, त्या मेडिकल कॉलेजचं नाव काय असणार आहे, माहितीये? ना गांधी, ना नेहरू, ना राजीव, ना इंदिरा! मित्रहो, कॉलेजचं नाव असणार आहे, 'वीर सावरकर मेडिकल कॉलेज'!!

आय .बी .एन .लोकमतवर एकंदर भारताचे परराष्ट्रीय धोरण यावरील चर्चा ऐकताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे थोडेफार वाचन असलेले आपल्या सारखे काही लोक या विषयात किती घोर अज्ञानी असतो. केवढा इंटरेस्तींग,महत्वाचा आणि गहन विषय आहे हा ,बापरे .भारताच्या दृष्टीने इतर आशियायी देशांचे महत्व, आपला देश प्रगतीशील करण्यासाठी त्यांच्याशी असलेल्या संबंधांचे महत्व. अमेरिकेसारख्या महासत्तेला आशियाखंडात ढवळाढवळ करू न देण्यासाठी महत्वाचा असलेला भारत .भारताने स्वकर्माने हातून घालवलेल्या संधीचा चीन ने करून घेतलेला उपयोग.

त्यातील एक वक्ता जेव्हा म्हणाला कि रशिया आणि अमेरिका यांच्या शीतयुद्धाच्या काळात देखील त्यांची अणु तंत्रज्ञान या विषयात सतत चर्चा चालू होती. मुठभर अतिरेकी आणि त्यांच्या दबावाखाली असलेल्या पाकिस्तानला या पासून भारतच मुक्त करू शकतो हा विचार तर मला खूप नवीन होता .नेहरूंच पंचशील धोरण आम्ही शाळेत ५ मार्कांसाठी फक्त ठेवल आहे .परराष्ट्रीय धोरण हा एखाद्या राज्ज्याचा विषय असूच शकत नाही .तामिळनाडूला काय वाटेल यावर श्रीलंकेशी संबंध ठरवणे गैर तद्वत बंगाल वर बांगलादेशाशी असलेले संबंध अवलंबून असू नयेत .एका राज्ज्यापुरत्या मर्यादित असलेल्या पक्षांना याचे काहीही सोयरसुतक नसते .

खरच नरेन्द्र मोदींनी सार्कच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण देऊन फार छान गुगली टाकली आहे. या विषयातील धोरणलकवा आता कमी होईल अशी आशा आहे.

खरच या विषयाचा सखोल अभ्यास करायला हवा .

राजीव इन्दिरआ यान्नी प्राण दिलेले अहेत. २१ लाखापेक्षा त्याची किम्मत जास्त भरते.>>>> ????

इंदिराजी व राजीवजींनी दिलेल्या बलिदाना बद्दल कोणीच काही बोललेले नाही आहे. पण नरेंद्र मोदींनी एक स्तुत्य काम केले आहे एवढचं.

श्री नरेश माने, अशा खोडसाळ पोष्टींना इग्नोर मारून आपण विषयाशी संबंधित लिहावे. त्याने धाग्यावर सकारात्मक लिखाण वाढायला मदत होते.

Pages