माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कपड्यांमधून घुसून ते किडे चावायचे.
>>
तुझ्या घराबाहेर ठेव तो पेपर आणि अर्ध्या तासाने भरुन टाक टोके कचर्‍यात. हे काम तुला आऊटसोर्स करावं लागेल हं.मी पण तेच केलं होतं. Proud

कडुनिंबाची पाने सुकल्यावर कडक होऊन त्याचा तांदळात चुरा होतो. तो निवडून काढणे कठीण जाते. तेव्हा जपून !
बोरीक पावडर किंवा पार्‍याच्या गोळ्या हाच चांगला उपाय आहे. धान्यसंरक्षक असे एक उत्पादन बाजारात असल्यावे इथेच वाचले होते, पण मी कधी वापरले नाही.

धारा, शक्यतो महिन्यापेक्षा जास्तीचा किराणा भरायचा नाही आपल्याकडच्या दमट हवेत. काहीही करा, लग्गेच खराब व्हायला लागतो हा अनुभव आहे. मी मोजून मापून महिन्याचे तांदूळ, डाळी, कणीक असं आणते. साखर मीठही इतकं लगेच पाझरतं की फार कटकटीचं होतं.... Uhoh

कडुनिंबाची पाने सुकल्यावर कडक होऊन त्याचा तांदळात चुरा होतो. तो निवडून काढणे कठीण जाते. तेव्हा जपून ! >>>> दिनेशदा, मी एग्झॅक्टली हाच्च विचार करून ऐनवेळी कडूनिंबाला नो म्हटले. ह्युश्श!?

एक छोटीशी शंका: बोरिक पावडर विषारी असते ना? Uhoh

आणि पार्‍याच्या गोळ्या म्हणजे विंग्रजीत दुकानदाराला काय सांगायचे?

वरदा, अगं आमच्याकडे १५-१६ माणसे ८-१० दिवसांसाठी यायची होती म्हणून एव्हढा किराणा भरला आणि त्यांचं येणं ३ दिवस आधी कॅन्सल झालं... तोपर्यंत आम्ही आणलेलं सामान - तेही बिग बझ्झारमधून. ते कसले परत घेताहेत? Sad बरंचसं इकडे-तिकडे हवं का, आमचं घ्या करत वाटलंय. बिस्किटं वगैरे प्रकार लग्गेच संपलेत त्यात, पण धान्य शिल्लक आहे. पुढचे ६ महिने नुसते एकेक डबे उघडून 'झाले का टोके?' करत डब्यांना भ्वॉक्क करणं आहे झालं. म्हणून तर किमान अन्पॅक्ड्वाले तरी प्लास्टिकमधले नीट राहिले असते, असं वाटलं होतं, पण त्यांना पण बाहेर काढावे लागणार. हा आठवडा हेच करण्यात जाणार Sad

हंम्म्म्म. अगदी हवाबंद पॅक असेल तर नीट रहातात डाळी वगैरे असा अनुभव आहे. पण बिग बझारवाल्यांचा किराणा मला एकुणातच फारसा आवडत नाही.... स्पेन्सर्सचं पॅकिंग बरं असतं त्यामानाने. तुमच्या इथे आरामबाग आहे का माहित नाही. आरामबागचं ग्रोसरी पॅकिंग चांगलं असतं.

साबु खिचडी बनवतांना साबुदाणा (तांदूळ धुऊन घेतो तसा) धुतला तर चालतो का?
धुतल्याने साबुतले जास्तीचे स्टार्च निघून जाते का?
साबु धुऊन घेतल्यावर तो भिजण्यासाठी १ सेमी पाणी वर येईल असे ठेवले पण साबुचा फार चिकट गोळा झाला.
साबु न धुता तेवढ्याच पाण्यात भिजवला तर चिकट न होता व्यवस्थित भिजतो.

तर साबु धुऊन घेतला तर चालतो का? धुऊन घेतल्यास भिजवण्यासाठी कमी पाणी लागते का? किती लागते?

साबुदाणा धुवून (म्हणजे चोळून नाही धुवायचा, नुसता पाण्यात रोळून घ्यायचा) घेतला तर एक्स्ट्रा स्टार्च जातो हे बरोबर.
साबुदाण्यांच्या वर १ सेंमी म्हणजे पाणी खूप जास्त झालं. साबुदाणे जेमतेम बुडतील इतकंच पाणी ठेवायचं.
(तरीही इथे मिळणार्‍या कुठल्याच ब्रॅन्डची मी गॅरेन्टी देऊ शकत नाही हे ही तितकंच खरं.)

बोरिक पावडर तशी विषारीच असते, म्हणून तांदूळ धुताना नेहमीच स्वच्छ धुवून घ्यायचे असतात. उलट लॉजिक म्हणजे तांदूळ आपण घुवून घेतो, म्हणूनच त्याला बोरिक पावडर लावता येते. ती गव्हाला लावून चालत नाही.

तांदळातले टोके / किडे घालवायला किंवा होउच नयेत म्हणून अजुन एक सोप्पा उपाय म्हणजे तांदळाला एरंडेल तेल लावायचे. (पाच एक किलोला चमचाभर एरंडतेल पूरे) हे असे केल्याने किंवा बोरिक पावडर ने किडे तांदळा बाहेर पडायला सुरुवात होते.. घरभर किंवा इतरत्र पसरतात.. तेव्हा तांदळाचा डबा किंवा ते भांडे एका मोठ्या पाणी भरलेल्या परातीत किंवा ताटात ठेवायचे. म्हणजे तांदळाबाहेरचे किडे सगळीकडे न पसरता त्या परातितल्या पाण्यात बुडुन मरतात. Happy
थोडक्यात पण महत्वाचे असे काहीसे नाव असलेल्या पुस्तकात मी वाचले होते कधीतरी.. Lol

दिनेश, कडुनिंबाच्या पानांचा चुरा तांदुळ धुताना निघुन जातो.

बोरिक पावडर विषारी असते ना?
>>
'धान्यात घालायला बोरिक पावडर हवीय' असं सांग दुकानदाराला. ही वेगळी असते. बो पा घातलीस की तांदुळ घेताना नीट पाखडुन घे. टोके तांदळाचा भुगा करतात तो भुगा खाली बसतो आणि तांदुळ काढलेस की थोडाफार तांदळात येतो. धुवुन घेतानाही ३-४ वेळा/ जोवर पाणी स्वच्छ दिसत नाही तोवर धुवुन घे.

@ चमन - साबुदाणा भिजवताना थोडं जास्त पाणी घालून १० एक मिनिट्स ठेवून दे.. मग अगदी जास्तीचं पाणी काढून टाक.
कोमट पाणी असेल तर फायदेशीर...

दिनेश, कडुनिंबाच्या पानांचा चुरा तांदुळ धुताना निघुन जातो.>>> होय. बोरिक पावडर लावल्यावर जितक्या जास्त वेळ तांदूळ धुवायला लागतात त्यापेक्षा कमी वेळात हा चुरा निघूनही जातो. शिवाय राहीलाच आणि पोटात गेला तरी हानीकारक नाही, जितकी बोरिक पावडर आहे.

तसंही इतकाही चुरा होत नाही म्हणा. माझ्याकडे मी टाकलेत पानं ती सुकलीयत तरी अख्खीच राहीलीयत. निवडताना ती अख्खीच पानं पुन्हा डब्यात टाकायची. हा का ना का.

शर्मिला जबरदस्त अनुमोदन.

ह्या धाग्याच्या हेडर मध्ये कृपया लिहून ठेवावे कि बोरिक पावडर आणि पार्‍याच्या गोळ्या विषारी असतात. कितीही धुतले तरी अंश पोटात जाण्याची शक्यता आहे. हानिकारक आहे. हा सल्ला नेहमी विचारला जातो. अशी माझी प्रशासनास नम्र विनंती आहे.

शर्मिलाने लिहीलेलंच लिहणार होते. कडुलिंबाच्या चुर्‍याबाबत. उलट धनत्रयोदशीला ही पाने, धणे आणि गूळ खावा लागायचा लहानपणी असे आठवतेय.
बो. पा. पण थोडी लावायची अगदी. आणि अगदी अंशतः (च) पोटात गेली तर हानी होत नाही. (लहानपणी कॅरम खेळताना यापेक्षा जास्त गेली असेल पोटात Happy ) पण तांदुळ स्वच्छ धुवून घ्यावेत.
क. पा. हे हर्बल आणि बो.पा. हे अ‍ॅलोपॅथिक मेडिसिन्स मधे वापरतात (असे ऐकून आहे)..
पार्‍याच्या गोळ्यांची मला भिती वाटते. फुटली ती गोळी धान्यात तर रिस्की आहे.
एरंडेल उत्तम पण कटकटीचे..
एक इंजेक्शन पण मिळते धान्याच्या सॅकमधे द्यायचे. गव्हाला चालते म्हटल्यावर तांदळाला पळेल. आणि बहुतेक पिशवी न फोडताही देता येईल.

हा प्रश्न आता खुप वेळा विचारला जातोय. मध्यंतरी टोके फार कमी असायचे धान्यात, आता हवामान बिघडलेय कि मूळातच लागट धान्य बाजाराय यायला लागलंय ? आता तसे साठवणीचे प्रमाणही कमीच असते, पुर्वी तर कणग्या भरुन धान्य असायचे घरात.

मराठवाड्यात माझ्या घरी कोरड्या हवेत गहू नुसते कडकडीत उन्हात ३ दिवस वाळवून भरून ठेवायचे .. काहीही खराब होत नसे. शेंगदाणे, रवा काहीच न करता संपेप्र्य्न्त खराब होत नसे. तांदुळ काय करत होते आठवत नाही. डाळी सुध्दा साठवलेल्या आसायच्या. थोडक्यात दुध-दही शिवाय काहीच ख्राब व्हायचे नाही.

मुंबैला, अ'बाद ला सगळे जपावे लागते. सध्या मी तूर डाळ तेली साठवते. अन गहू, चावल - दिवेल लावते. शेंगदाणे, रवा भाजून ठेवावे लागते. डाळी मू.डाळ, फोतरावाली जास्त घेतली तर दिवेलच..

अनघा, मुंबईची हवा दमट असल्याने असे होतेच. अगदी कोल्हापूरी मसाला पण मुंबईला टिकू शकत नाही.
पण मुंबईच्या हवेत कडधान्याला मोड लवकर येतात Happy

तांदळावर कशाला, थेट्च (तोंडात) टाकायचे ! Happy

आपल्याकडे पटकन शिजणारा तांदूळ लोकप्रिय असल्याने असे (म्हणजे किड लागणे) होत असेल का ?
भारताबाहेरचा स्थानिक तांदूळ जो मी खाल्ला आहे, तो शिजायला कठीण असतो ( दाणा जास्त टणक ) पण त्यामूळे त्याला कधी किड लागलेली दिसत नाही.

रच्याकने, कुठलाच किडा तांदळाला आरपार भोक पाडू शकत नाही, म्हणून त्याला अक्षत / अक्षता म्हणायचे.

मदत करा मदत करा मदत करा
आज माझ्याकडे रव्याच्या [ओले खोबरे घालुन ] लाडवाचा दगड आहे कढईत. आणि बर्‍याच प्रमाणावर केलाय. नेहमीच्याच कृतीने . कधी बिघडला नाही आजवर आणि आज एकदम दिड किलो रव्याचा करायला घेतला [ढिगभर बेदाणे काजु आणि केशर घातलय त्यात ] तर दगडच केला मी Sad अर्थात ठिसुळ दगड आहे दात तुटायचे नाहीत असा. Proud पण दगडच. Sad
आणि खातानाही रव्याचे कणकण कडकड लागते आहे दाताला. बहुतेक रवा फारच जास्त भाजला गेलाय.

दुधात घालुन खा या व्यतिरिक्त काही उपाय.दगडापासुन लाडु पुन्हा करता येतील का/ कसे?
प्लिज लोक्स मदत करा

पाक पक्का झालाय बहुतेक ...थोडे(१/२ वाटी) पाणी कडकडीत करुन घातले तर दगड मऊ होईल Happy पण लाडू फार दिवस टीकणार नाहित.

हेकाय्नीतेकाय, सेम पिंच! मी पहिल्यांदा आणि शेवटचे केले होते रव्याचे लाडू तेव्हा हा पराक्रम केला होता. मग बराच त्रागा करून झाल्यावर, सगळ उचलून फ्रिजमधे ढकलल. रोज सकाळी २चमचे दुधात उकळून पॉरिज म्हणून खपवल . प्रमाण फार नव्हत म्हणून लवकरच संपलं . सढळ हातानी सुकामेवा, केशर टाकलं होतं , मस्तच लागंलं पॉरिज म्हणून पण.

Pages