माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
पनीर चिवट होण्याची माझ्या मते
पनीर चिवट होण्याची माझ्या मते २ कारणं आहेत १]उकळत्या दुधाचे पनीर केले तर आणि २]पनीर थंडगार पाण्यात धुतले नाही तर पनीर चिवट होते.बाकी २% दुधाचे फारच छान मऊसर पनीर तयार होते.मी रसगुल्ले व रसमलई बर्याच्दा केली आहे.
सुलेखा, दूध उकळत असतानाच
सुलेखा, दूध उकळत असतानाच लिंबाचा रस टाकायचा ना? रस टाकल्याबरोबरच दूध साधारण मिनिटभरात फाटले अन मी लगेच आच बंद केली आणि भांडे उतरवून घेतले. रस टाकण्याआधीच आच बंद करायला हवी का? तुम्ही कसे करता ते मला नक्की सांगा - येत्या आठवड्यात रसगुल्ले करायचेच आहेत. तुमची खूप मदत होईल मला पुन्हा करताना. धन्यवाद! अमी
अमी, मी रसगुल्ले करतांना पनीर
अमी, मी रसगुल्ले करतांना पनीर असेच करते पण नंतर कुकर मध्ये ३:१ (कॉईलसाठी) आणि ४:१ (गॅससाठी) पाणी : साखर ठेवते आणि १ उकळी आली की १२-१३ रसगुल्ले टाकते. १ शिट्टी आली की गॅस बंद करते. छान मऊ रसगुल्ले होतात.
प्राजक्ता, सूचनेबद्दल
प्राजक्ता, सूचनेबद्दल धन्यवाद! हे नक्की करुन पाहीन. अमी
.
.
रसगुल्ले करताना, पनीर
रसगुल्ले करताना, पनीर करण्यासाठी आधी अर्धा लिटर दूधाचे नेहमीप्रमाणे पनीर करायचे. त्यावेळी जे पाणी गळते ते बाटलीत जमा करुन फ्रिजमधे ठेवायचे. दुसर्या वेळी पनीर करताना, दूध फाडण्यासाठी ते पाणीच वापरायचे. असे एका बंगाली बाईने
सांगितले होते. असे केल्याने पनीरला आंबट वास येत नाही. त्यांच्याकडे रसगुल्ल्याचे
पनीर मळताना, अरारुटची पावडर (एका लिटरच्या पनीरला एक चहाचा चमचा )
वापरतात.
त्या पाण्याला व्हे म्हणतात
त्या पाण्याला व्हे म्हणतात ना?
हो, त्यात खुप जीवनसत्व आणि
हो, त्यात खुप जीवनसत्व आणि क्षार असतात. आपण वाया घालवतो ते !
दिनेशदा, बराच व्हे उरला आहे
दिनेशदा, बराच व्हे उरला आहे मागच्या प्रयोगातून - आता तेच वापरीन. प्रमाण मला वाटतं ज्या प्रमाणे लिंबाचा रस त्याच प्रमाणे असेल. धन्यवाद!
तुम्ही सुचवल्याप्रमाणे जे तुकडे करुन पाकात बूडवून ठेवले होते ते त्या दिवशी तरी चिवट लागले पण दुसर्या दिवशी अजिबात चिवटपणा उरला नाही. एकदम मऊ झाले. सगळ्यांनी आवडीने खाल्ले.
अमी
त्या व्हे पाण्याचे प्रमाण
त्या व्हे पाण्याचे प्रमाण लिंबापेक्षा जास्त असते. ते थोडे थोडे घालत दूध ढवळत रहायचे, ज्यावेळी चोथा पाणी वेगळे होईल त्यावेळी ते पाणी घालणे बंद करायचे.
आज माझी साखि पुन्हा बिघडली..
आज माझी साखि पुन्हा बिघडली.. म्हणजे थोडी टणक झाली होती.

मागे इथे वाचल्याप्रमाणे साबुदाणे फक्त एका पाण्यातून काढून, ते बुडतील इतकं पाणि ठेवलं, अर्ध्यातासाने ते पाणि काढून टाकावे असे माझ्या खिचडी एक्स्पर्ट बहिणीने सांगितले होते म्हणून काढायला गेले तर पाणि सगळं शोषलं होतं साबुदाण्यांनी
फोडणित तेल जिरे मिरच्या टाकल्या आणी मंद आचेवर साबुदाणे परतले आणि झाकण ठेवलं... वाफ आल्यावर मीठ आणि साखर घातलं.. परतलं.. मग झाकण ठेवलं नाही. (मीठ साखर वाफ आल्यावर घालणे ही ओगलेबाईंची युक्ती आणि नंतर झाकण न ठेवणे ही माझ्या खिचडी एक्स्पर्ट बहिणीची)
मग माझं नक्की काय चुकलं?
अगं साबुदाण्या-साबुदाण्यात
अगं साबुदाण्या-साबुदाण्यात फरक असू शकतो. खिचडी करायच्या आधी बोटाने दाबून पहावा. जर कडक असेल तर परत थोडं पाणी शिंपडून १५-२० मि. झाकून ठेवावा. आणि तरीही वाटलं जरा तर दुधाचा हलका शिपकारा मारून मग वाफ आणावी. एकदम लुसलुशीत होते
दक्षिणा, मि साखि करताना
दक्षिणा, मि साखि करताना अजिबात झाकण ठेवत नाहि. रात्री साबुदाणा भिजवताना बोटाच एक पेर भिजेल एवढ पाणी घालते, मग अर्धा तासाने ते पाणी काढुन एकदम किंचित पाणी ठेवते. आणि बाकि फोड्णी तुझ्यासारखीच पण झाकण न ठेवता परतत राहायच
वरदा आणि अवंतिका धन्यवाद. पण
वरदा आणि अवंतिका धन्यवाद.

पण मी अगणितवेळेला प्रयत्न करूनही माझी साखि फसतेच
दक्षिणा, साबुदाण्या
दक्षिणा, साबुदाण्या साबुदाण्यातलाच फरक याला कारणीभूत आहे.
ज्यावेळी, साबुदाण्यात आपण कूट वगैरे मिसळतो, त्याआधी त्यात बोटे फिरवून बघायची. बोटाना पाणी लागता कामा नये, तसेच एखादा साबुदाणा तोंडात टाकून बघावा. तो विरघळला पाहिजे, आत कडक कणी नको.
बोटाना पाणी लागले तर पाणी जास्त झालेले असते. अशा साबुदाण्याची खीर करता
येते किंवा थोडावेळ फ्रिजमधे ठेवून, पाणी जिरतेय का ते बघायचे.
दाताला कणी लागली तर मात्र परत पाण्याचा हबका मारुन, आणखी अर्धा तास थांबायचे.
हे अडाखे एकाचवेळी पारखून घेतले तर पुढच्या वेळी त्याच ब्रांडचा आणि त्याच नंबरचा साबुदाणा आणायचा.
माझ्या सासुबाई खिचडीला बाहेर
माझ्या सासुबाई खिचडीला बाहेर फोडणी देतात माग ति आर्धी क्कच्ची ओव्हन मध्ये गरम करतात. मस्त मउ लुसलुशीत होते.
मी पुण्यात ग्राहक पेठेचाच
मी पुण्यात ग्राहक पेठेचाच साबुदाणा वापरते. कलकत्त्यात खिचडीयोग्य साबुदाण्याचा शोध ही एक ग्रीक वळणावर जाणारी शोकात्म आणि शोकांत कहाणी असल्याने इथूनच जाताना किलो-दोन किलो घेऊन जाते. संपला की पुढच्या ट्रिपपर्यंत हरी हरी!
दक्षिणा मला वाटत्त की मीठ
दक्षिणा
मला वाटत्त की मीठ आणि साखर घातल्यावर गॅस ऑन ठेवू नये. तसे केल्यामुळॅ खिचडीला मीठामुळे पाणी सुटते व ती चिवट होते. एकदा अगदी थोड्या प्रमाणात करून बघा.
साबुदाणा कमी भिजला असेल तर फोडणीला घातल्यावर थोडा पाण्याचा हबका मारायचा आणि एक वाफ काढायची. नीट ढवळून कूट घालायचा. चवीप्रमाणे मीठ साखर घालून लगेचच गॅस बन्द करायचा.
निवि, मग मीठ आणि साखर नीट
निवि, मग मीठ आणि साखर नीट मिक्स कशी होणार?:अओ:
पण करून पाहिन हा ही प्रयोग
आगामी आकर्षण, माझे साखिचे
आगामी आकर्षण,
माझे साखिचे प्रयोग.... ले. दक्षिणा !!
साखि करताना चुकूनही झाकण घालू
साखि करताना चुकूनही झाकण घालू नये.. नक्की चिकट होते..
मी रात्री साबुदाण्याच्या
मी रात्री साबुदाण्याच्या अंगाबरोबर पाणी घालून ठेवते. सकाळी मस्त (योग्य) भिजलेला असतो. तो हाताने मोकळा करुन घेते. त्यातच मीठ, साखर, दाण्याचं कूट, किंचितसं दूध घालून मिक्स करुन घेते. कढई तापत टाकून त्यात तूप घालून जीरं, मिरच्यांचे तुकडे घालते (फोडणी). जीरं मिरच्या तडतडल्या की साबुदाणा घालते. भस्सकन न टाकता हळू हळू घालावा. नंतर कालथ्याने चांगलं ढवळायचं. साबुदाण्याचा रंग पांढर्याचा जरा बदलू लागला की गॅस बंद. खोबरं कोथिंबीर हवी असेल तर गॅस बंद करायच्या आधी थोडावेळ घालायची. मस्त मऊ होते.
दक्षिणा वाफ काढ्ल्यानन्तर ती
दक्षिणा
वाफ काढ्ल्यानन्तर ती बर्यापैकी गरम असते तेवढी उष्ण्ता पुरे होते .साखर ही चवीपुरतीच घालायची (हवे असल्यास पिठी साखर घालावी)
.
.
साखि मायक्रोवेव्हमधे करणे
साखि मायक्रोवेव्हमधे करणे बेश्ट. चांगली मऊ वगैरे होते.
माझी पण अश्विनी सारखीच
माझी पण अश्विनी सारखीच रेसेपी. छान होते साखि.
नंदिनी साखिची मावेची रेस्पी
नंदिनी साखिची मावेची रेस्पी सांग की मग.
दक्षिणा, इथे वाच. मनिषा
दक्षिणा, इथे वाच. मनिषा लिमयेने लिहिली आहे.
मंजुडी थँक्स सो मच
मंजुडी थँक्स सो मच
मी आलू प्राठे करण्यासाठी
मी आलू प्राठे करण्यासाठी बटाटा मॅश केले पण ते सारण थोडे सैल झालए.परठे लाटताना फुट्त आहे
काय केल की पराठे चांगले होतील ?
धन्यवाद.
Pages