"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नायगारा आणि अश्चिगच्या प्रतिसादावरुन पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचे पती गोपाळराव जोशींची गोष्ट आठवली. या माणसाने सकाळी बाप्तिस्मा घेउन संध्याकाळी पुन्हा संध्याकर्म पूर्ण केले.>>> खरें कि काय Proud Proud Proud

>>माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या धर्मांतरासाठी कोणी एवढे कष्ट घेतोय हे बघून मला तर बै गहिवरूनच येईल << नी सुपर खल्लास.. Lol

माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या धर्मांतरासाठी कोणी एवढे कष्ट घेतोय हे बघून मला तर बै गहिवरूनच येईल >>>>>>>>>>>
too good Happy :-))

गोत्रापासून रक्तगट->धर्म>धर्मांतर---------------> सुसाट सुटलीय गाडी.

मला पाच काका, त्यापैकी तीन काकांनी आंतरजातीय विवाह केला. आमच्या घरात ते कधी जाणवले पण नाही.
२५ टक्के चुलत मावस भावंडांचे आंतर्जातीय विवाह, आमच्या घरात तीनापैकी दोन आंतरजातीय... त्यामूळे
कुणालाच काहिही त्रास झालेला नाही.

किरण ..... नायगरा .....:खोखो:

माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या धर्मांतरासाठी कोणी एवढे कष्ट घेतोय हे बघून मला तर बै गहिवरूनच येईल >>>>> नी, जबरीच!!!! Lol

मला पाच काका, त्यापैकी तीन काकांनी आंतरजातीय विवाह केला. आमच्या घरात ते कधी जाणवले पण नाही.
२५ टक्के चुलत मावस भावंडांचे आंतर्जातीय विवाह, आमच्या घरात तीनापैकी दोन आंतरजातीय... त्यामूळे
कुणालाच काहिही त्रास झालेला नाही.>>>> छान ,असाच निकोप दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे. मायबोलीवरच्या 'विकृतीरक्षकांच्या' कमेंट्स फाट्यावर माराव्यात.

पण आंतरजातीय विवाहाला विरोध करण्यामागे काय तर्कसंगती/कारणे आहेत?>> स्वतःचीच जात इतर जातींपेक्षा महान कशी हे दाखवण्याचा अट्टाहास व त्यानुसार इतर जातींना खाली दाखवण्याचा दुसरा अट्टाहास!!!

मला तर लग्नासाठी नकार देण्याच्या कारणात माझी सासू म्हणालेली यांचे देवसुद्धा वेगळे असतात... Uhoh मला धस्स झालेलं... मी आठवतील तेवढ्या देवांची मनातल्या मनात उजळणी करून पाहीली

वास्ताविक पाहता माझ्या माहेरी जेवढे सणवार करतात तेव्हढे तर यांच्या घरी माहीतसुद्धा नाहीत. मंगळागौर म्हणजे काय विचारत होती...
डोहाळजेवण नाही, मुंज नाही,, पाचवीची पुजा नाही, गरोदरपणी बाजूच्या बाईच्या ओटीभरणाला जाऊन आल्यावर तिथे पंधरा वीस जणींनी विचारलं तेव्हा म्हणाल्या तिची माहेरची ओटी झालेय भरून आम्हीपण भरली पाहीजे काय... त्या हसल्या म्हणून माझं सासरचं ओटीभरण झालं तरी!!!

सगळ्यात मोठा जोक, यावेळी वटपौर्णिमेच्या पूजेला म्हणाल्या आपण दोघी एकच वाण ठेऊ कशाला दोन वाणांचा खर्च! मी म्हणाले दोघींचे नवरे वेगळे आहेत ना दोन वाणं वेगळी ठेवायला लागतील, खर्च झाला तरी!!!

अशी सगळी बोंब असताना आमचीच जात श्रेष्ठ आणि बाकीच्या जातींना रीतीरिवाज काSSSही कळत नाहीत अस्ला आव कशाला आणावा!!!

>>छान ,असाच निकोप दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे. मायबोलीवरच्या 'विकृतीरक्षकांच्या' कमेंट्स फाट्यावर माराव्यात.<<< +१००

दिनेशदा Happy

अरे . इथे धर्मांतरावर एव्हढी चर्चा का चालू आहे ? दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींना लग्न करायचे असल्यास त्यांनी आपापला धर्म बदलायची अजीबात गरज नाही. त्यातूनही जर धर्मांतराचा आग्रह होत असेल तर 'प्रेम' खोटे आहे हे नक्की.

धर्म ही एक संकल्पना आहे. ती काही नैसर्गिक गोष्ट नव्हे. अति धर्मांध व्यक्ती बघितल्या की मला पूजा भट्ट च्या 'जख्म' ची आठवण येते. त्या धर्माच्या आधारवर राजकारण करणार्‍या कार्यकर्त्याला अचानक कळते की त्याची आईच दुसर्‍या धर्माची आहे. हिन्दू वा मुस्लिम वा इतर कोणाही कट्टर धर्म वाद्याला जर अचानक कळ्ले की त्याचा जन्मदाता/ दाती वेगळ्याच धर्माची आहे तर?
बरे आणि अनाथ मुलाचा धर्म कसा ठरवणार? जे लोक दत्तक मूल आणतात अशा अ‍ॅडॉप्टेड मुलांचा खरा धर्म कसा ओळखणार ?? उद्या आपल्या मुलाने/ मुलीने शोधलेला जोडीदार अ‍ॅडॉप्टेड आहे असे कळले तर त्याच्या दत्तक पालकांचा धर्म, जात , ही त्याची जात असे मानणार का?

मुलीचे आई वडील म्हणुन विरोध फक्त विशिष्ठ धर्माला/ जातीला आहे का त्या धर्माला/ जातीला चिकटलेली जी गृहितके आहेत ( जसे मुस्लिम = मागसलेले , धर्मांध , स्त्रियांसाठी जाचक ) त्याला आहे ? मुस्लिम म्हणल्यावरच हे सगळे डोळ्यासमोर येते आणि नको वाटते. पण जर मुलीने/मुलाने निवडलाच असेल असा साथीदार तर खरी परीस्थिती बघायला नको का? केवळ आपल्या गृहितकांवर मुलांच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा?

माझ्यासाठी तरी मुलीने निवडलेल्या माणसाची विचारसरणी महत्वाची आहे. तो तिला आदराने , स्वतंत्रपणे जगू देईल का हे महत्वाचे. ठरवून केलेल्या अगदी दोन्ही पार्टी कोब्रा असलेल्या लग्नातही मुलीवर अत्याचार होऊ शकतात , झालेले आहेत. थोडक्यात काय तर सर्व जाती , धर्मात हुन्डा बळी किन्वा तत्सम परीस्थिती दिसतेच त्यामुळे त्यांच्याकडे असे होते , 'आम्ही' नाही हो त्यातले असे कोणी म्हणू नये.

माझ्यासाठी तरी मुलीने निवडलेल्या माणसाची विचारसरणी महत्वाची आहे. तो तिला आदराने , स्वतंत्रपणे जगू देईल का हे महत्वाचे.>> +१

माझ्या एका चुलत भावाचे लग्न होत नहिये कारण त्याला मुलगी तर कोब्रा हविच आहे पण त्याबरोबरच तिच्या आई आणि वडिलांचे आई-वडिलही कोब्राच हवेत अशी अट आहे.

अर्थात अशी कुटुम्बे बरिच असतिल पण जातीपातीचा एवढा विचार करणार्‍या मुलाशी लग्न करायची कोणत्याच मुलीची तयारी नाही.

सहजीकच आहे म्हणा.

>>>> माझ्या एका चुलत भावाचे लग्न होत नहिये कारण त्याला मुलगी तर कोब्रा हविच आहे पण त्याबरोबरच तिच्या आई आणि वडिलांचे आई-वडिलही कोब्राच हवेत अशी अट आहे. <<<<
माझी पण हीच्च अट होती Proud काय गुन्हा करीत होतो की काय?
फक्त अनेकानेक कारणान्नी (या कारणान्वर जाहीर फोरम पेक्षा कोब्रा कम्युनिटीमधे बोलणे मी जास्त पसन्द करीत) अशा कोब्रा मुलि मिळणे दुरापास्त झाले, सबब अटीला थोडी मुरड घालुन देब्रा बायको केली!
तिला माझ्या या पूर्वीच्या अटीची माहिती होती/आहे. कोब्रा पोरी का उपलब्ध होत नाहीत याचीही माझी कारणमिमान्सा तिला माहित आहे/पटलीही आहे.
अन अशा कोब्रा/देब्रा दाम्पत्याच्या संततीला आमच्यात तरी राजरोस पणे "हायब्रीड" असेच संबोधले जाते. Proud

अहो पण धाग्याचा विषय काहीतरि वेगळाच आहे ना? काय आहे? Wink

बापरे.........

ईथल्या पोस्टी बघितल्यावर थेट सत्यमेव जयते च्या सेट वर बसल्यासारखे वाटते. टोकाच्या भूमिका आणि मग त्याला छेद देणार्‍या दुसर्‍या टोकाच्या भूमिकांवर टाळ्या.. (+१) Happy
काहीच नाही तर माझ्या कुटुंबात वा आयुष्यात मी कशी, किती पुरोगामी विचाराचा/ची आहे, माझी मुली बाळे कशी स्वतंत्र आहेत, याची अहमाहीका.. कुणाचे काय तर कुणाचे काय... तरी नशीब अजून "स्त्री स्वातंत्र्य न अर्हते" या मनू स्टेशनवर गाडी उलटी गेलेली नाही.

तरिही सत्यमेव जयते च्या सेट पेक्षा ईथला मायबोली जयते शो अधिक मसालेदार आहे हे खरेच.

गंमत म्हणजे आंतरजातीय विवाह नकोच त्यावर आंतरजातीय विवाह हवाच हे जसे तर्कसुसंगत नाही तसेच धर्म, जातपात ई. च्या नावे फोडलेले खडे देखिल तर्कविसंगत वाटतात. मुळातच भारतीय विवाह व कुटूंब पध्दती, त्यातील रूढी, परंपरा, वगैरे, वगैरे गेले अनेक हजार वर्षे चालत आलेले असल्याने त्याकाळची त्यामागची कारणमिमांसा वा चौकट समजावून न घेता थेट मुळासकट ऊपटूनच काढायचे ईथे वर अनेक प्रतिसादातून सूचित केले जात आहे त्याचे आश्चर्य वाटते. आजची स्त्री असे म्हणते "माझ्या मुलीने जोडीदार कोण्/कशा स्वरूपाचा शोधला याला महत्व जास्त" हेच बदलत्या काळाचे प्रतिक आहे. आधीच्या पिढ्यांमध्ये असा विचार मनात असला तरी ऊघड बोलायला धजावत असतील असे नव्हते, त्याही आधी असा निव्वळ विचार देखिल चाकोरीबाहेरचा होता. थोडक्यात त्या त्या काळानुरूप हे सर्व बदलतच राहणार आहे. (आता त्या काळी देखिल माझी आई पुरोगामी विचाराची होती, वडिलांनी विधवेशी विवाह केला वगैरे अशी ऊ.दा. देवू नयेत, मी सरसकट एका पिढीची व तत्कालिन समाजाची मानसिकता याबद्दल बोलतो आहे.). आता तर अर्धे जग फेसबुक वा ट्विटर वरून एकत्र येते तेव्हा जातीच काय अगदी आंतरराष्ट्रीय विवाह देखिल होतच आहेत.. (रिव्हर्स मायग्रेशन) तेव्हा कदाचित अजून दोन पिढ्यांनंतर "आतंतरजातीय विवाह" ते काय असतं? असले प्रश्ण ऐकायला मिळाले तर नवल नाही. किंवा "परतोनी पाहे"..? पण नेमकी कुठे परतायचे कारण एक दोन पिढ्यांनंतर अख्खी मुळेच दुसरीकडे रुजली असतील असेही होवू शकते.

याचा अर्थ आज जे आहे ते पूर्ण चूकच असा होत नाही. तद्वतच पारसी, मुस्लिम, हिंदू, ख्रिस्ती, प्रत्येक "समाजाने" गेली अनेक हजार वर्षे नियम, रिती स्विकारल्या आहेत आणि अर्थातच हे समाज आहेत तोवर यातील बर्‍याच रिती पुढेही रहातील.

आता एखाद्या जोडप्याने सर्वांच्या विरोधाला न जुमानता लग्न करून "टिंबकटू" वर संसार थाटला तर त्यांच्या आयुष्यात व ईतरांच्याही तीळमात्र फरक पडणार नाही. कारण मुळात आपल्या/भारतीय विवाह वा कुटूंब पध्दतीचा "सर्वांनी मिळून एकत्र" (एकाच छत्रछायेखाली असे नव्हे) रहाणे हाच पाया आहे. त्यामूळे दैनंदीन व्यवहारात एकंदर समाज, भोवताल, अन एक ठरवून दिली गेलेली चौकट या सर्वांचा संबंध येत असल्याने अगदी छोट्याश्या गोष्टींमध्ये देखिल कधी कधी संघर्ष अटळ असतो. (ऊ.दा: मुला/मुलीला ईंग्रजी माध्यमात का मराठी माध्यमाच्या शाळेत घालावे..? ) दोन पिढ्या एकत्र नांदण्यासाठी ही किंमत मोजावीच लागते.. आपली/माझ्या वयाची पिढी तसे पाहिले तर सर्वात जास्त या घर्षणातून जात आहे- कारण आधीच्या पिढीची जुनी मानसिकता, नविन पिढीची संपूर्णपणे बदललेली मानसिकता, अशी अक्षरश: दोन टोके माझी पिढी बघत आहे अनुभवत आहे.. आणि दोन्ही ची सांगड घालून संतुलन राखण्याच्या खटाटोपात माझी पिढी पोळून निघत आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये! (हे प्रातिनिधीक आहे असे समजतो). आजच्या युगात "जनरेशन गॅप" अक्षरशः ५-१० वर्षे ईतक्या कमी अंतरावर येवून ठेपली आहे.

पण म्हणून, दर वेळी मी कुठलीतरी एकच बाजू घ्यायला हवी हाच आग्रह ईथेही पाहून आश्चर्य वाटले.

भारतात मात्र दुर्दैवाने चित्र असे आहे की "अनेक वर्षांपासूनचे ज्वलंत प्रश्ण आजही तितकेच ज्वलंत आहेत"... हुंडाबळी, खाप पंचाईत, लैंगीक शोषण... एक ना अनेक... त्यामूळे एखाद्या वैश्विक रोगाच्या साथीप्रमाणे दर काही वर्षांनी कुणी एक आमिर खान हे मुद्दे पुन्हा आपल्या समोर आणतो. आणि कृती करण्या ऐवेजी निव्वळ सर्वर स्पेस वाया घालवण्यात आपण धन्यता मानतो...

त्यामूळे निव्वळ वरवरची चर्चा वा चूक का बरोबर एव्ह्डाच फोकस "सत्यमेव जयते" सारख्या कार्यक्रमातून पुढे येतो असे मला वाटते. अगदीच नाही तर "मी पत्र पाठवणार आहे तुम्ही सही करा" या पलिकडे काही गाडी जात नाही. "प्रबोधन" नक्कीच होते आहे जे गरजेचे आहे आणि जे महत्वाचे आहे.. पण शेवटी त्याचे व्यवहारातील फायदे दिसून यायला बराच काळ जावा लागेल, विशेषत: त्याला पूरक अशी समाज, कायदा रचना होत नसेल तोवर हे सर्व "कळते पण वळत नाही" याच मार्गाने पुढे जात आहे.
आणि नेमकी ईथेच मला वाटते गाडी अडली आहे, आजच्या झटपट युगात या सर्व पुरोगामी व समाज, कायदा, पर्यायाने देश सुधारक ऊपाययोजना करायला द्यावा लागणारा वेळ, संयम, आमच्याकडे नाही. जो होता तो एव्हाना संपला आहे असेही). आणि ज्यांनी तो वेळ द्यावा यासाठी ज्यांना निवडून दिलेले आहे त्यांच्याकडे नेमके याच गोष्टींसाठी वेळ नाही असल्या दुष्टचक्रात आजची पिढी अडकून पडली आहे. त्यामूळे "अमूलाग्र" बदल हवे असतील तर एका पिढीला स्वार्थत्यागाशिवाय पर्याय नाही... आज आपण जे स्वातंत्र्य ऊपभोगतो आहोत तेच मुळात आपल्या आधीच्या पिढीच्या स्वार्थत्यागाचे फळ आहे हे लक्षात घेतले तर "तुझे काय चूक, माझे काय बरोबर" असल्या व्यर्थ वादात न पडता सर्वांनी मिळून हे कसे बरोबर करता येईल या दिशेने पावले टाकता येतील.
"कोणे एक काळी" ईथेच मायबोलीवर शहर, गावातून सर्वजनिक शौचालये (स्वछ) यांची अपुरी सोय, नव्हे तर गैरसोय, वि. स्त्रीयांसाठी असा एक काहीतरी "ज्वलंत" मुद्दा चर्चिला गेला.. त्याचे पुढे काय झाले.? (असेच अनेक ज्वलंत प्रश्ण "ड्रेन" मध्ये गेले आहेत... आणि दर वेळी त्याकडे लक्ष वेधून घायला वा गाडी पुढे ढकलायला कुणी आमिर खान, सचिन, अण्णा.. लागत असतील तर ऊरलले आपण सर्व निव्वळ सुशिक्षीत मेंढरे आहोत हे मान्य करावे लागेल. थोडक्यात गुलामगिरी अजूनही आपल्या रक्तात आहे, स्वताच्या देशाचे मालक व चालक आपण स्वतः होत नाही तोवर "सत्यमेव जयते"...!)

>.>> "कोणे एक काळी" ईथेच मायबोलीवर शहर, गावातून सर्वजनिक शौचालये (स्वछ) यांची अपुरी सोय, नव्हे तर गैरसोय, वि. स्त्रीयांसाठी असा एक काहीतरी "ज्वलंत" मुद्दा चर्चिला गेला.. त्याचे पुढे काय झाले.? (असेच अनेक ज्वलंत प्रश्ण "ड्रेन" मध्ये गेले आहेत... आणि दर वेळी त्याकडे लक्ष वेधून घायला वा गाडी पुढे ढकलायला कुणी आमिर खान, सचिन, अण्णा.. लागत असतील तर ऊरलले आपण सर्व निव्वळ सुशिक्षीत मेंढरे आहोत हे मान्य करावे लागेल. थोडक्यात गुलामगिरी अजूनही आपल्या रक्तात आहे, स्वताच्या देशाचे मालक व चालक आपण स्वतः होत नाही तोवर "सत्यमेव जयते"...!) <<<<
अगदी बरोब्बर Happy

Happy

माझ्या एका चुलत भावाचे लग्न होत नहिये कारण त्यालामुलगी तर कोब्रा हविच आहे पण त्याबरोबरच तिच्या आई आणि वडिलांचे आई-वडिलही कोब्राच हवेत अशी अट आहे.>>>हा कोब्रा फुसफुस कोब्रा कि इतर कोणता प्राणी आहे ? Proud

>>>> माझ्या एका चुलत भावाचे लग्न होत नहिये कारण त्याला मुलगी तर कोब्रा हविच आहे पण त्याबरोबरच तिच्या आई आणि वडिलांचे आई-वडिलही कोब्राच हवेत अशी अट आहे. <<<<
माझी पण हीच्च अट होती काय गुन्हा करीत होतो की काय?>>>

गुन्हा नाही हो पण लग्नाच्या हवे अटींमध्ये ह्यापेक्षा इतर कितितरी महत्वाच्या गोष्टी येऊ शकतात.

अहो पण धाग्याचा विषय काहीतरि वेगळाच आहे ना? >>>
फारसा वेगळा नाही. लग्नाच्या अनुशंगाने जात आणि धर्माचे महत्व. अर्थात ह्यात प्रेम. खाप पंचायत, विरोध, मारहाण एत्यादी गोष्टी नाहीत. Happy

<गंमत म्हणजे आंतरजातीय विवाह नकोच त्यावर आंतरजातीय विवाह हवाच हे जसे तर्कसुसंगत नाही . तसेच धर्म, जातपात ई. च्या नावे फोडलेले खडे देखिल तर्कविसंगत वाटतात. मुळातच भारतीय विवाह व कुटूंब पध्दती, त्यातील रूढी, परंपरा, वगैरे, वगैरे गेले अनेक हजार वर्षे चालत आलेले असल्याने त्याकाळची त्यामागची कारणमिमांसा वा चौकट समजावून न घेता थेट मुळासकट ऊपटूनच काढायचे ईथे वर अनेक प्रतिसादातून सूचित केले जात आहे त्याचे आश्चर्य वाटते>

तर्कसंगती, कारणमीमांसा जाणून घेण्यास अत्यंत उत्सुक आहे. मागच्याच पानावर तसे नोंदवून झाले आहे. वाट बघतोय.

योग ने हा सूर का लावला Happy

लग्न जूळवताना ते टिकावे अशी इच्छा असली तरी त्याची गॅरंटी कुणी देऊ शकत नाही,

ना प्रेम, ना पत्रिका, ना जात, ना धर्म... त्यांमूळे दोन्ही बाजू शेवटी या मुद्द्यावर अडतीलच !
स्वतःच्या मनाने जोडीदार निवडल्यास, जर तो परंपरे(?)ला मान्य नसेल तर वडीलधार्‍यांनी सल्ला, संभाव्य धोके याची कल्पना जरूर द्यावी व निर्णयापर्यंत यायला मदत करावी (धमक्या देऊ नयेत) आणि नंतरही जर
काही प्रश्न निर्माण झालेच तर, बघा आम्ही सांगत नव्हतो, असा पवित्रा घेण्यापेक्षा, शक्य तितका मानसिक
आधार द्यावा.

माझ्याच घरचे उदाहरण.
मोठ्या बहीणीचे लग्न. ठरवून पत्रिका बघून झाले. लग्न ठरल्यानंतर लक्षात आले कि जी जन्मतारीख दिली होती, ती चूकीची लिहून घेण्यात आली होती( अकरा ऑक्टोबरच्या जागी दहा नोव्हेंबर ) त्यांच्या यशस्वी लग्नाला आता ३३ वर्षे झाली.

मोठ्या भावाचा आंतरजातीय प्रेमविवाह. आईच्या आग्रहाखातर पत्रिका बघितली. अजिबात जूळत नव्हती.
माझ्या हट्टाखातर आणि आग्रहाखातर विवाह झाला. आज त्या यशस्वी लग्नाला २६ वर्षे झाली.

आणि माझा, आंतरजातीय तरी पत्रिका बघून. ५ महिन्यात आटोपला.

आणि तरी मी या गोष्टींवर विश्वास ठेवावा ?

काही वर्षांपूर्वीपर्यंत जरठ विवाह, केशवपन, सतीची प्रथा, स्त्रीस शिक्षण बंदी या ही दिव्य भारतिय प्रथा होत्याच कि ! त्या मुळापासून उखडून काढल्या म्हणून कुणी कसे गळे काढत नाही ?

>>प्रेम आणि धर्म या परपेण्डीक्युलर डायमेन्शन्स आहेत. एकाचा दूसर्‍यावर काहिही प्रभाव नसावा.
"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे"...
ही कुठली डायमेंशन आहे मग..? का तो काटकोनात आखलेल्या (धर्म, प्रेम) दोन रेषांना एकत्र बांधणारी तिसरी बाजू समजुयात..? Happy याचाच पुढे बॉलीवुड मध्ये प्रेम त्रिकोण फॉर्म्युला बनवला गेला काय..? Happy

असो. धर्म, धर्मांतरे, आणि त्या अनुशंगाने विवाह ई. हे विषय अनादी अनंत आहेत.. ते करून, पचवून, पुनः लोकांना ग्यान वाटायला तुम्ही आमिर, सैफ, ई. असाल तर तुमच्याकडे लक्ष दिले जाईल हेच फक्त सत्य आहे. वक्त वक्त की बात है. सर्व प्रकारच्या चर्चांच्या मुळाशी (पोट, सत्ता, राजकारण, इतीहास, भूगोल, आंतरराष्ट्रीय समस्या, विवाह, श्रध्दा, संस्था, आंतरजालावरील कुजबूज, ई.) धर्म मात्र कायम आहे. अगदीच धर्मनिरपेक्ष व्हायचे तर सर्वांची नावे मनुष्यप्राणी १, मनुष्यप्राणी २,.. ई. केली जावीत. ना रहेगा बांस...

भारतिय परंपरा म्हणून कशाचाही पुरस्कार करण्यात अर्थ नाही. आपण आपली इनिंग खेळली. नवे खेळाडू आलेत. त्यांना मंत्र द्या हवा तर.. पण प्रत्येक बॉल कसा मारावा हे सांगण्यात अर्थ नाही.

>>अगदीच धर्मनिरपेक्ष व्हायचे तर सर्वांची नावे मनुष्यप्राणी १, मनुष्यप्राणी २,.. ई. केली जावीत. ना रहेगा बांस...

योग Proud Rofl

भाजपाचे दोन खासदार सर्वश्री धर्मेन्द्रसिंह देओल आणि हेमामालिनी यांनी मुस्लिम धर्म स्विकारून लग्न केलंय. बाबाराव सावरकर म्हणतात येशू हिंदू होता, पु ना ओक म्हणतात मुहम्मद पैगंबर हिंदू होता आणखी एक वर्तक म्हणून विद्वान म्हणतात कि येशू हाच कृष्ण आणी क्रूसावर चढवल्यावर तोच पैगंबर बनला. गौतम बुद्ध कृष्णाचा अवतार आहेच..

सबब : धर्म बदलला तरी धर्मांतर होत नाही Wink

Pages