"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वदुर दुर्गम भागातील आणि अडलेल्या नडलेले आदिवासी धर्म परिवर्तन इतके सहज कसे करतात या प्रश्नाचा उलगडा वरिल प्रतिक्रिया वाचुन सहज होऊ शकतो. त्यांच्या (आदिवासी) सारख्या सामान्य माणसांच्या दारात त्यांचे धर्म परिवर्तन करण्यासाठी स्वत: मुल्ला मौलवी अथवा चर्च चे पादरी येत असतील तर ते बघुन त्या आदिवासीनाही किती गहीवरुन येत असेल.<<<<
त्यांनी धर्मांतर करू नये म्हणून सामान्य माणसांच्या दारात जायला हिंदू धर्माच्या ऑथोरिटीजना कुणी अडवलंय का?
त्यांचे अडलेनाडलेपण दूर करायला कोणी नको म्हणलंय का?

त्यांनी धर्मांतर करू नये म्हणून सामान्य माणसांच्या दारात जायला हिंदू धर्माच्या ऑथोरिटीजना कुणी अडवलंय का?
त्यांचे अडलेनाडलेपण दूर करायला कोणी नको म्हणलंय का?

१००००००००००००००००००००००००००००००००००००००० +

-आ. न.
कमला सोनटक्के

>>त्यांनी धर्मांतर करू नये म्हणून सामान्य माणसांच्या दारात जायला हिंदू धर्माच्या ऑथोरिटीजना कुणी अडवलंय का? त्यांचे अडलेनाडलेपण दूर करायला कोणी नको म्हणलंय का? <<

नीधपजी,

याचे उत्तर आहे दुकान!
प्रत्येकाला कोणत्याना कोणत्या प्रकारे दुकान चालवायचे असते.

पाद्री/मुल्लांच्या विरोधात नुसतेच गळे काढणार्‍यांचे, 'कुणी अडवलं आहे' बद्दलचं लॉजिक पुढे कसे चालते ते पहा:

आता असं बघा. त्या मुल्लांना आखातातून अन पाद्र्यांना अमेरिकेतून पैकं मिळ्त्यात का नै? तुम्हीच करंटे हिंदू तुमच्याच धर्माच्या ऑथोरिटिजना पैकं तर द्येतच न्हाईसा, वर्तून अस्ले सल्ले द्येता...
थूत तुम्च्या जिन्गानीवर! तुमाला काई धर्माफिर्माचा अबिमाण??
चला चेकबुकं काडा अन पैकं पाटवा. पैकं अस्त्याल तर आमीबी तिथे जाऊन, अवघे वनवासी एकदम मेन्स्ट्रीम हिंदू बनवून टाकू.
..
अर्र, काय म्हट्लात? त्ये आदीच हिंदू हाईत?
असो. अवांतर होते आहे खूपच.

त्यांनी धर्मांतर करू नये म्हणून सामान्य माणसांच्या दारात जायला हिंदू धर्माच्या ऑथोरिटीजना कुणी अडवलंय का?
त्यांचे अडलेनाडलेपण दूर करायला कोणी नको म्हणलंय का? >> वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून संघ आणि त्याचे स्वयंसेवक हेच काम गेली कित्येक वर्षे करत आहेत. पण इथे संघ म्हटले की बर्‍याच जणांचे टाळके सरकते किंवा त्यांना मिरच्या झोंबतात..

आता ह्यावर उसळून वार करत येतीलच नेहमीचे यशस्वी Happy

अर्र, काय म्हट्लात? त्ये आदीच हिंदू हाईत?

कायदा आदीवासीना हिंदु मानत नाही..... ( हिंदु नाहीत म्हणजे त्याना गोत्रही नसनार.. हिंदुनो, खुशाल आदिवासींशी लग्नं करा.. )

-आ.न.
कमला सोनटक्के

नेहमीचे यशस्वी >>>>>>>>>>>>>>> स्वतः ला अयशस्वी समजत आहात म्हणजे... Lol
असो.
.
.
.
या धाग्याचा विषय कोणता आहे......आणि विषय चालला कोणता आहे........ जास्त विषयांतर न करता... धाग्याला मुळपदावर आणुया.........अजुन ४ दिवस धागा चालवायचा आहे...... उगाच गळा दाबुन ठार मारत जाउ नका....

>>> शाहरुख आपल्या मुलांना कुराण चे पाठ तर देतच आहे बरोबर भगवदगीता सुध्दा वाचुन दाखवतो..

Uhoh

ऐतेन !

शाहरूख चतुर्थीचा उपवास करतो आणि श्रावणात श्रावणी करून नवीन जानवे परिधान करतो हे ऐकल्यावर सुद्धा आता आश्चर्य वाटणार नाही.

>>> शाहरुख आपल्या मुलांना कुराण चे पाठ तर देतच आहे बरोबर भगवदगीता सुध्दा वाचुन दाखवतो.. <<<

क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्कौंन्तेय Proud

अस कीक्कॉय?

नारदा, लोक मोक्ष मिळावा म्हनुन गीता कुराण वाचतात.. तु तर चिरंजिवी , म्हनजे तुला कधीच मरण/ मोक्ष नाही.. मग तु नारायण नारायण का करतोस? त्यातुन तु ब्रह्मचारी, तुला लग्नाच्या विषयाचं का रे आकर्षण?

-आ.न.
कमला सोनटक्के

वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून संघ आणि त्याचे स्वयंसेवक हेच काम गेली कित्येक वर्षे करत आहेत.<<
चांगलंय की मग.
संघ म्हणले की मला मिरच्या बिरच्या झोंबत नाहीत. अजिबात.

फक्त कायद्याने सज्ञान व्यक्तीला दिलेले अधिकार परंपरा नाही म्हणून नाकारण्यात येतात तेव्हा डोक्यात जातं. बाकी काही नाही Happy

जाती न पुछो साधु की पुछ लिजिये ग्यान!
मोल करो तलवार का पडि रहने तो म्यान!! - कबीर!

>>> शाहरुख आपल्या मुलांना कुराण चे पाठ तर देतच आहे बरोबर भगवदगीता सुध्दा वाचुन दाखवतो.. <<<
-------- हा कुठल्या चित्रपटातला सिन आहे?

सलमान बाबत व्यक्त केलेल्या मताशी सहमत.

झोपतो आता..

स्वप्नात नायगारा धबधब्यावर उलटे लटकलेले अनेक चेहरे दिसतील. इथं एकानेही उत्तर दिलं नाही. तिथं नक्की देतील Biggrin

उत्तर काय देणार डोंबल. असं उलटं लटकवलं तर भितीनेच जीव जाईल... कसलं धर्मांतर अन कसलं काय. हे सिरीयस उत्तर.
आणि हेच सगळ्यांचं उत्तर असणार. ज्यांचं नसेल ते शूरतेचा आव आणतायत Wink

अशातही धर्म न बदलणारे धार्मीक असु शकतील. पण फारच थोडे.
मी पण नाही बदलणार, पण ते वेगळ्या कारणामुळे - मला धर्मच नाही.

प्रेम आणि धर्म या परपेण्डीक्युलर डायमेन्शन्स आहेत. एकाचा दूसर्‍यावर काहिही प्रभाव नसावा.

मी पण नाही बदलणार, पण ते वेगळ्या कारणामुळे - मला धर्मच नाही.
---- तुम्हाला धर्म नाही आहे असे तुम्ही मानाल... किरणच्या धटिंगण अर्नोल्डने त्या क्षणी तसे मानायला हवे ना. अशा परिस्थितीत मी धर्म बदलणार कारण माझ्याकडे पर्याय नाही आहे म्हणुन.

तुमच्या तीर्थरूपांना विचारा

माझ्या तीर्थ रुपाना हे माहीत अस्तं तर तेच हातात तुण्तुणं घेऊन नारायण नारायण करत नसते का फिरले?

-आ.न.
कमला सोनटक्के

उदय, ठीक, शब्दांशीच खेळायचे असेल तर मी जिवंत राहण्यापुरता हवा तो धर्म स्विकारीन. त्या धर्मामुळे स्वर्गात सूख मिळेल, जिवंत राह्यल्यामुळे कदाचीत भुतलावरच हवे ते मिळेल. पण ही चर्चाही परपेण्डीक्युलर आहे धाग्याला.

लव्ह कमांडोज हेच धर्माऐवजी प्रेमाबद्दल म्हणत होते. प्रेम कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे.

व्हय जी, पन जवा कंदी या ड्यायमेंशन येका बिंदवाशी एकत्र येतात तवाच लग्न नावाची गोस्ट घडते असं म्हनत्यात हितले भगवे लोक!

पाहिला एपिसोड! त्या खापवाल्यांनी ते इंग्लंडच काय( आणी का?)उदाहरण दिले त्याचा काही संदर्भच लागला नाही..आता सुद्धा राजघराण्यातल्या राजकुमाराने (विल्यमने) रॉयल परंपरा नसलेल्याच घरातल्या मुलिशि लग्न केलेय कि..खापवाल्यांना आमंत्रण नसल्याने माहीत नसेल कदाचित.

प्राजक्ता,
संदर्भ असा होता:
खाप पंचायतवाले सांगत होते की परंपरांना आम्ही जास्त भाव देतो. कायद्यापेक्षाही. आमीर म्हणत होता की कायदाच भारी पाहिजे, जो 'लिखित संविधान' आहे.
तो खापवाला म्हातारा म्हटला, की इंग्लंडचा कायदा लिखित नाही असे माझ्या ऐकीवात आहे. म्हणजे तेही रूढ परंपराच मानतात, पक्षी, तुमच्या देशाचा, (रच्याकने, आमिर याला हिंदूस्थान म्हणतोय नेहेमीच, जे चुकीचे आहे) कायदा जो इंग्लंडच्या कायद्यावर बेतलेला आहे, तो परंपरेपेक्षा मोठा कसा?

नीधप

जेव्हां सांगकाम्या लोकांना कामावर घ्यायचे असेल तेव्हा नायगाराचा प्रश्न मुलाखतीत विचारायचा. हो असं उत्तर आलं कि कामावर ठेवून घ्यायचं. पण जेव्हां स्मार्ट आणि प्रसंगावधान असलेले लोक हवे असतील तेव्हां नाही हे उत्तर जे देतील त्यांनाच कामावर ठेवून घ्यावे.

कारण..
१. जान सलामत तो धरम पचास...
२. धर्म बदलला तरी धर्मांतर होत नाही Proud

<<<<<<जेव्हां सांगकाम्या लोकांना कामावर घ्यायचे असेल तेव्हा नायगाराचा प्रश्न मुलाखतीत विचारायचा. हो असं उत्तर आलं कि कामावर ठेवून घ्यायचं. पण जेव्हां स्मार्ट आणि प्रसंगावधान असलेले लोक हवे असतील तेव्हां नाही हे उत्तर जे देतील त्यांनाच कामावर ठेवून घ्यावे.>>>>>>

त्या तेच करत आहेत असे आढळत आहे

या प्रतिसादावरून

Proud

आंतरधर्मीय विवाहाला काहींचा विरोध आहे हे समजू शकतो. पण आंतरजातीय विवाहाला विरोध करण्यामागे काय तर्कसंगती/कारणे आहेत?

नायगारा आणि अश्चिगच्या प्रतिसादावरुन पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचे पती गोपाळराव जोशींची गोष्ट आठवली. या माणसाने सकाळी बाप्तिस्मा घेउन संध्याकाळी पुन्हा संध्याकर्म पूर्ण केले.

Pages