क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयवन, चांगला आढावा.

याआधीच्या सर्व विश्‍वकरंडक विजेत्या संघांना नमवून करंडक उंचावणारा भारत हा एकमेव संघ आहे.>>> हे लक्षात आले नव्हते.

but we have always been a one-dimensional team मास्तर! and we can't even force land-slide victories in India, so may be we are just half-dimensional.

>>> याआधीच्या सर्व विश्‍वकरंडक विजेत्या संघांना नमवून करंडक उंचावणारा भारत हा एकमेव संघ आहे.>>> हे लक्षात आले नव्हते.

या विश्वचषकात अजून बरेच विक्रम झाले.

स्वतःच्या भूमीवर विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला.

अंतिम सामन्यात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा भारतच (या आधी यशस्वी पाठलाग केलेल्या धावसंख्या होत्या १९९६ मध्ये २४२ आणि १९९९ मध्ये १३२. भारताने २७४ धावांचा यशस्वी पाठलाग केला).

अंतिम सामन्यात सर्वात कमी धावांचे रक्षण करणारा भारतच (या आधी यशस्वी रक्षण केलेल्या धावसंख्या होत्या १९७५ मध्ये २९१, १९७९ मध्ये २८१, १९८७ मध्ये २५३, १९९२ मध्ये २४९, २००३ मध्ये ३५९ आणि २००७ मध्ये २८२. पण भारताने १९८३ मध्ये १८३ इतक्या लहान धावसंख्येचे यशस्वी रक्षण करून अंतिम सामना जिंकला होता).

मी आधीच्या पानावर एका लेखाची लिंक दिली आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, द आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हेही ओन डायमेन्शनल आहेत असे त्या लेखाचे तथ्य आहे.

राहुल द्रविडबद्दल इंडियन एक्स्प्रेस मधील काही लेख :
१) डिअर द्रविड, थँक्यु : शेखर गुप्ता यातले काही स्टॅट्स लक्षणीय आहेत.
२) हर्ष भोगले
३) हरभजन : द्रविडच्या स्लीपमधल्या कॅचिंगबद्दल
४) डिकी बर्ड
५) मैदानाबाहेरचा द्रविड

boycott च्या लेखातले strauss चे मुद्दे dhonI बद्दल ऐकले होते असे नाहि वाटत का ? Lol थोडक्यात काय तर 'जो जिता वही सिकंदर'

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामधे काल बार्बाडोसला संपलेली टेस्ट आयपीएलच्या कोणत्याही मॅच पेक्षा भारी मॅच होती. ऑस्ट्रेलियाने खतरनाक खेळ करत आपण नं १ ला फक्त आपणच कसे लायक आहोत ते काल दाखवले. जे भारताने मागच्या वर्षी संधी असून केले नाही ते - थोडा रिस्क घेऊन विजयासाठी प्रयत्न करणे.

पहिल्या डावात पिछाडीवर असताना टेस्ट मधे वेळ कमी शिल्लक राहिला होता म्हणून लीड वगैरे न घेत बसता तसाच डाव घोषित केला क्लार्कने. त्याला आपल्या बोलर्सचा ही भरवसा असणारच. त्यांनीही पहिल्या डावात ४४९ केलेल्या विंडीज ला दुसर्‍या डावात लौकर गुंडाळले.

मग साधारण दोन सेशन मधे ऑसीज ना १९२ करायचे होते. टी पर्यंत २२ ओव्हर्स मधे फक्त ६२ रन्स केले पण फक्त एकच विकेट गमावली. मग टी नंतर २४ ओव्हर्समधे जवळजवळ १३० रन्स काढले, त्यात आणखी ६ जण आउट झाले. कोण कितीवर आउट झाले कोणालाही पुढे लक्षात राहणार नाही. लक्षात राहील ते ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी नक्की ड्रॉ होत असलेली मॅच खेचून आणली ते!

>>> लक्षात राहील ते ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी नक्की ड्रॉ होत असलेली मॅच खेचून आणली ते!

+१

>>> जे भारताने मागच्या वर्षी संधी असून केले नाही ते - थोडा रिस्क घेऊन विजयासाठी प्रयत्न करणे.

नक्कीच. मागच्या वर्षी ३ र्‍या कसोटीत जिंकण्यासाठी भारताला कोणतीच रिस्क घ्यावी लागणार नव्हती. ४५ षटकांत १८० च्या आसपास धावा सहज शक्य होत्या. पण धोनी व कंपनीने शेपूट घातली होती.

त्यांनीही पहिल्या डावात ४४९ केलेल्या विंडीज ला दुसर्‍या डावात लौकर गुंडाळले.>>हे थोडा अधिक वाटतेय रे. 2 bad hours caused the collapse ह्यावर सगळ्यांचे एकमत झाले. काल संपूर्ण दिवस्भर west indies ने बर्‍याच चुका केल्या. योग्य वेळी offensive झाले नाहित नि वॅटसन खेळत असताना नको तेव्हढे defensive झाले. कदाचित अशा situations चा पुरेसा अनूभव नसल्यामूळे असू शकेल. aus अशा चूका करणे निव्वळ अशक्य आहे. ह्सी प्रचंड शांत डोक्याने खेळला.ड्तो थोडा अधिक लवकर बाद होता तर अजून चित्र वेगळे असू शकले असते.

हो असामी, बरोबर आहे. पण क्लार्क ने घोषित करून "इंटेन्ट" दाखवला. हे मला सर्वात महत्त्वाचे वाटते.

पहिल्या डावात हिलफेनहॉसला बाद करता न आल्यामुळे गोची झाली वेंडीजची.. ऑसीज शेपटानी चांगलीच लढत दिली.. आणि नंतर क्लार्कचा डाव घोषित करायचा जुगार बरोबर चालला.. वेंडीज मध्ये सध्या अनुभवाची थोडी कमी जाणवते आहे.. चंदरपॉल सोडल्यास भरपूर टेस्ट मॅच खेळलेला खेळाडू बहुतेक नाहीच्चे.. तिथेच मार खातात बिचारे..

परवापासून क्रिकइन्फो साईटला काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. परवा बराच वेळ ती साईट ओपन होतच नव्हती. कालपासून ओपन होत आहे पण ओपन झाल्या झाल्या, 'हार्मफुल वेब साईट', असा अ‍ॅन्टीव्हायरसचा अखंड मेसेज येत आहे. आज ओपन केल्यावर असाच मेसेज येत आहे. इतर कोणाला असा काही अनुभव आला आहे का?

विंडीज-ऑसीज च्या दुसर्‍या कसोटीतही दोन्ही कर्णधारांनी अत्यंत सकारात्मक खेळ केला. पहिल्या डावात ५४ धावांचे आधिक्य मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाने ५ व्या दिवशी दुसर्‍या डावात फक्त २१४ धावांनी पुढे असताना व ६१ षटकांचा खेळ शिल्लक असताना डाव घोषित करून विंडीजला ६१ षटकांत २१५ धावा करण्याचे काहीसे अवघड पण अशक्य नसलेले आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकलेली असताना सुद्धा हे धाडस केले. विंडीजने आव्हान स्वीकारून ११ षटकांत २ बाद ५३ धावा केल्यावर पावसामुळे खेळ थांबला व शेवटी त्याच धावसंख्येवर सामना अनिर्णित राहिला. विंडीजचा पहिला फलंदाज बाद झाल्यावर कर्णधार सॅमी ३ र्‍या क्रमांकावर खेळायला आला व त्याने २६ चेंडूत नाबाद ३० धावा करून सामना जिंकण्यासाठीच आपण खेळणार असल्याचा निर्धार दाखवून दिला.

मायकेल क्लार्कच्या जागी धोनी किंवा इतर कोणताही भारतीय कर्णधार असता तर, मालिकेत १-० ने पुढे असताना प्रतिपक्षाला ६१ षटकांत २१५ धावांचे फारसे अवघड नसलेले आव्हान देऊन २-० ने पुढे जाऊन मालिका जिंकण्याची संधी किंवा १-१ अशा बरोबरीचा धोका पत्करला असता का? तसेच सॅमीच्या जागी धोनी किंवा इतर कोणताही भारतीय कर्णधार असता तर, मालिकेत ०-१ ने मागे असताना ६१ षटकांत २१५ धावा करण्याचे आव्हान स्वीकारून मालिकेत ०-२ ने मागे पडण्याचा (व पर्यायाने ३ सामन्यांची मालिका हरण्याचा) धोका पत्करला असता का किंवा १-१ अशा बरोबरीची संधी घेतली असती का?

धोनीने किंवा इतर कोणत्याही भारतीय कर्णधाराने असे आव्हान दिले नसते किंवा दिलेले आव्हान स्वीकारले नसते असेच वाटते. दोन्हीपैकी कोणत्याही भूमिकेत, भारतीय फलंदाजांनी अत्यंत संथ फलंदाजी करून सामना अनिर्णित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता.

मास्तुरेजी, या दुसर्‍या कसोटीत असं व्हायला कदाचित पावसाची दाट शक्यता हेंच कारण असूं शकते; नक्की कोणते सामने तें आठवत नाही, पण भारताबरोबरच्या मालिकेत पूर्णपणे वरचढ असतानाही ऑसीजनी डाव घोषित करताना यत्किंचितही धोका न पत्करलेलीं अलिकडचींच उदाहरणंही आहेत . भारत असं डेअरींगबाज डिक्लेरेशन करत नाहीं कारण आपली गोलंदाजी निश्चितच भेदक नाही आणि आपल्याविरुद्ध ऑसीजही तसा धोका पत्करत नाहीत कारण आपली फलंदाजी फॉर्मात नसली तरीही तीची अंगभूत गुणवत्ता अचाट आहे ही जाणीव ऑसीजनाही आहे . मला तरी असं वाटतं, बघा तुम्हाला पटतं का.

विंडीज वि इंग्लंड पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आहे. आजच्या ५ व्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी एकूण १९१ धावा हव्या असून कालपर्यंत त्यांची धावसंख्या २ बाद १० आहे. एकंदरीत आपल्या तुलनेत विंडीज इंग्लंडला इंग्लंडच्या भूमीवर जास्त चांगली झुंज देत आहे.

या कसोटीत चंद्रपालने ८७* व ९१ अशा धावा केल्या. मागील ९ कसोटीतील १५ डावात त्याची जबरदस्त कामगिरी अशी आहे -

२३, ११६*, ४९, १८, ५९*, ११८, ४७, ४, ४७, १०३*, १२, ९४, ६८, ६९, ८७*, ९१ (१५ डावात एकूण १००५, सरासरी - ९१.३६, शतके - ३, अर्धशतके - ६). त्याने मागील लागोपाठ ६ डावात अर्धशतक केले आहे.

चंद्रपॉल वे.इंडीजच्या संघात १९९४पासून आहे व ५० च्यावर सरासरीने त्याने १०,०००वर कसोटी धांवा केल्या आहेत; आणि, वयाच्या ३८व्या वर्षीं अशी कामगिरी ! खरंच कौतुकास्पद !!!

>>> मास्तुरेजी, आजच्या आयसीसी क्रमवारीत [ कसोटी फलंदाजी] चंद्रपॉल पहिल्या स्थानावर आला आहे !!!!

चंद्रपाल महान फलंदाज आहे. तो विंडीजच्या पूर्वीच्या धडाकेबाज फलंदाजांच्या तुलनेत (लारापर्यंत) फारसा महान नसेल, परंतु जवळपास १६-१७ वर्षे तो सातत्याने धावा करत आहे.

<< चंद्रपाल महान फलंदाज आहे. >> अगदीं खरंय. वेगवेगळ्या परिस्थितीत व खेळपट्ट्यांवर अगणित सामने जिंकण्यात व वांचवण्यात त्याने वे. इंडीजसाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे. मला वाटतं तो 'लो प्रोफाईल' ठेवणारा खेळाडू असल्याने त्याची इतकी भरीव कामगिरीही सहज लक्षात येत नसावी. केवळ आंतराष्ट्रीय क्षेत्रात १६ वर्षं सातत्य राखणं हेच वे. इंडीजच्या इतर महारथींच्या तुलनेत अधिक कौतुकास्पद आहे.

शिखर धवन, रहाणे आणि अभिनव मुकुंद विंडीज-अ विरूद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात अपयशी ठरलेत. रहाणे ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावरील सुरवातीच्या २ सराव सामन्यातल्या तीनही डावात अपयशी ठरला होता. एकंदरीत तो फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यांचा व ट-२० सामन्यांचाच खेळाडू आहे काय ही शंका येत आहे. तो आणि शिखर धवन नुकत्याच संपलेल्या आयपीएल तमाशात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते, पण या ४ दिवसांच्या कसोटी सामन्यात ते अपयशी ठरलेले आहेत.

मास्तुरे मला वाटते थोडा धीर धरून दौर्‍याच्या शेवटी अशी judgement pass करणे अधिक योग्य ठरेल. वेगळ्या खेळपट्ट्या नि वेगळ formart आहे. adjust व्हायला वेळ लागू शकतो. तसेच धवन अजून नाबाद आहे Happy

नुकत्याच संपलेल्या आयपीएल तमाशात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते, >> तो जर तमाशा होता तर त्यात कोणी किती धावा केल्या नि त्याप्रमाणे त्याच्या नंतरच्या दौर्‍यांमधे त्यांना त्याप्रमाणे judge का करा Wink

हो. धवन अजून नाबाद आहे (नाबाद १३). पण मुकुंद दोन्ही डावात शून्यावर बाद झाला तर रहाणेने पहिल्या डावात ० व दुसर्‍यात ५ धावा केल्या. बघूया धवन किती करतो ते. भारताला जिंकण्यासाठी एकूण १८६ धावा करायच्या आहेत. भारत आता ३ बाद २२ आहे.

शेवटी पुजाराच्या नाबाद ९६ धावांमुळे भारताने २ गडी राखून पहिला कसोटी सामना जिंकला. पुजाराने पहिल्या डावात ५० धावा केल्या होत्या. धवन कालच्याच १३ धावसंख्येवर बाद झाला. रोहीत शर्माने पहिल्या डावात ९२ व दुसर्‍या डावात २३ केल्या. धवन, रहाणे व मुकुंद दोन्ही डावात अपयशी ठरले. एकंदरीत द्रविडच्या जागेवर बसण्याची पुजारा तयारी करत आहे. रहाणेबद्दल आशा होत्या. पण तो ट-२० व मर्यादित षटकांव्यतिरिक्त इतर सामन्यात अजून चमकलेला नाही. धवन व मुकुंद त्याच अवस्थेत आहेत.

मस्त खेळलेला दिसतोय पुजारा काल. नाहीतर बार्बाडोस आणि सुरूवातीची गळती पाहिल्यावर मला त्या ९७ च्या कसोटीची आठ्वण होत होती Happy ८१ वर ऑल आउट!

पुजारा कधीतरी एकदा कसोटीत खूप चांगला खेळल्याचे आठवते. शोधायला पाहिजे.

रहाणे, मुकुंद आणि धवन विंडीज-अ विरूद्धच्या दुसर्‍या कसोटीतही दोन्ही डावात अपयशी ठरले. जिंकायला २२० धावा हव्या असताना भारताच्या ४ थ्या दिवशी ४ बाद ५७ धावा झाल्या आहेत.

>>पुजारा कधीतरी एकदा कसोटीत खूप चांगला खेळल्याचे आठवते. शोधायला पाहिजे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत. भारताच्या दौर्यावर ऑसिज असताना.

दुसर्‍या कसोटीत भारत्-अ सर्वबाद ९४. भारत १२४ धावांनी सामना हरला. एकंदरीत रहाणे व मुकुंद ला कसोटीत स्थान मिळणं अवघड वाटंतय. रहाणे एकदिवसीय व ट-२० मध्येच चांगला खेळतो. इतर सामन्यात अजूनतरी त्याला २० च्या पुढे धावा करता आलेल्या नाहीत.

१५ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या गेलने जोरदार पुनरागमन केलंय (आजच्या एकदिवसीय सामन्यात ५१ चेंडूत ५३ धावा, त्यात ३ चौकार आणि ५ षटकार). पण विंडीज सामना हरले.

दुसरीकडे विंडीज-अ संघाने भारत-अ विरूद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकून २-१ अशी आघाडी घेतली आहे. तीनही सामन्यात मुख्यत्वेकरून कर्णधार पुजारा, साहा आणि मनोज तिवारीने बर्‍यापैकी फलंदाजी केली. शमी अहमदने व अक्षय दरेकरने चांगली गोलंदाजी केली. पण अभिनव मुकुंद, अजिंक्य रहाणे व शिखर धवन सर्व डावात अपयशी ठरले.

Pages