क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या देशातल्या खेळाडूंना तुमच्या देशात खेळताना home pitch advantage घेऊन हरवल्यावर chest beating नि self gloating करणे थांबवा.
आणि त्यांना 'गाढव' म्हणणे! तुमच्या देशात करत असतील तसे, पण आमचा काही विचार?
उद्धट, अरेरावी लोक लेकाचे.

>> अरे पिच sub continental आहे ना ?
sub continental असलं तरी वेगळं असू शकतं घरच्यापेक्षा! आपल्यापेक्षा श्रीलंकेच्या खेळपट्ट्या जास्त स्लो आहेत.

>> हे बाकी बरोबर आहे, युवराज, विराट, रोहित इत्यादी POMs सारखे क्रिजमधे राहून फिरकी खेळतात राव अरेरे
आरे बाहेर येऊन खेळले तर स्टंप होतील ना राव! Lol

स्टंप होतील ना राव!
का? तिथे काय शेलारमामा असतो का दोर कापून टाकायला?
तंगडी मागे सरकवता येत नाही? का बॅट? का मेलो तरी बेहेत्तर, पण एकदा पुढे गेलो तरी मागे येणार नाही असे ठरवले आहे? अहो तसे म्हणणे ठीक आहे, पण एकतर विचार करून पुढे पाउल टाका, नाहीतर मागे येण्याचा मार्ग मोकळा ठेवा!!
आयला, लोक मूर्खासारखे पैसे देऊन बघायला येतात म्हणून खेळाची सर्कस करायची?

sub continental असलं तरी वेगळं असू शकतं घरच्यापेक्षा! आपल्यापेक्षा श्रीलंकेच्या खेळपट्ट्या जास्त स्लो आहेत. >> तर ? पाकिस्तान नि इंग्लंडच्या दुबईमधल्या मॅचचा reference तूच दिला होतास ना ? तिथल्या विकेट्स ह्या england, Aus सारख्या आहेत कि sub continental आहेत ?

>>> >> अरे पिच sub continental आहे ना ?
sub continental असलं तरी वेगळं असू शकतं घरच्यापेक्षा! आपल्यापेक्षा श्रीलंकेच्या खेळपट्ट्या जास्त स्लो आहेत.

पाकड्यांना घरच्या गल्लीचा तसा थेट फायदा नाही हे बरोबर आहे. पण माझा सांगण्याचा हाच उद्देश होता की कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या व काही महिन्यांपूर्वीच आपल्या गल्लीत भारताला चारी मुंड्या चीत केलेल्या इंग्लंडची, दुसर्‍यांच्या गल्लीत गेल्यावर पहिल्याच सामन्यात दारूण अवस्था झाली. दोन्ही डावात मिळून इंग्लंडला फक्त ३५२ धावा करता आल्या (पर्थमध्ये भारताने दोन्ही डावात मिळून फक्त ३३२ धावा केल्या होत्या).

"प्रत्येक श्वान आपल्या परसात व्याघ्रासारखा पराक्रमी असतो, पण दुसर्‍याच्या परसात त्या श्वानाची शेळी होते" हे काही अपवाद वगळता बहुतेक वेळा सिद्ध झालेलं गृहीतक भारताप्रमाणे इंग्लंडच्या बाबतीत सुद्धा सिद्ध होतंय.

<<काही अपवाद वगळता बहुतेक वेळा सिद्ध झालेलं गृहीतक भारताप्रमाणे इंग्लंडच्या बाबतीत सुद्धा सिद्ध होतंय. >> चला, आतां आपला संघ दौर्‍यावर गेला कीं कसलंही टेंशन न घेतां एक डाव व किती धावानी आपण हरतों हें मस्त मजेत बघत बसायचं !!! Wink

चला, आतां आपला संघ दौर्‍यावर गेला कीं कसलंही टेंशन न घेतां एक डाव व किती धावानी आपण हरतों हें मस्त मजेत बघत बसायचं !!!
अगदी बरोब्बर! अनेक हिंदी सिनेमातल्यातल्या साईड किक्स नी सांगितलेच आहे -टेंशन नहि लेनेका, क्या!
आपण त्यांना भारतात बोलावू नि यथेच्छ धुवून काढू, म्हणजे आपल्यालाहि पैसे खर्च करायला मिळतील.

काय करणार हो, भारतात इतका पैसा झाला आहे की, कसा खर्च करावा ही पंचाईत. तीच गोष्ट, इलेक्ट्रिसिटीची! एव्हढी प्रचंड प्रमाणावर उपलब्ध आहे सगळीकडे की उगाच वाया जायला नको, म्हणून संध्याकाळी मोठे मोठे दिवे लावून क्रिकेट खेळायचे!! कशाला ते खेड्यातले लोक ओरडतात उगाच, की अभ्यासाला दिवे नाहीत. अभ्यास कशाला करता? क्रिकेट बघा!!

आज क्रिकेटजगतात बर्‍याच घडामोडी घडल्या.

- भारताचा ऑस्ट्रेलियात व्हाईटवॉश व्हायची औपचारिकता आज पूर्ण झाली. १९९९-२००० मध्ये ऑस्ट्रेलियात भारत ३ सामन्यांची मालिका ०-३ असा हारला होता. आज १२ वर्षांनी भारताने पुन्हा इतिहास घडविला.

- किवीज वि झिंब्बाब्वे कसोटी सामन्यात आज तिसर्‍या दिवशी दीड तास खेळून किवीजने आपला पहिला डाव ७ बाद ४९५ वर घोषित केला. नंतरच्या ५ तासात झिंबाब्वेचे दोन्ही डाव ५१ (२८.५ षटके) व १४३ (४८.३ षटके) धावात संपले. एका दिवसात एकूण २२ विकेट्स पडल्या.

एकाच संघाचे दोन्ही डाव एकाच दिवशी संपण्याची ही इतिहासातील ही दुसरी घटना. एकाच दिवसात दोन्ही डाव संपणारा इतिहासातला पहिला देश अर्थात भारत आहे. १९५२ साली इंग्लंडच्या दौर्‍यावर गेलेल्या भारताचे, तिसर्‍या दिवशी दोन्ही डाव (सर्वबाद ५८ व सर्वबाद ८२) केवळ २१.४ आणि ३६.३ षटकांत आटोपले होते. याही सामन्यात एका दिवसांत तब्बल २२ विकेट्स पडल्या होत्या. (http://www.espncricinfo.com/ci/engine/match/62739.html)

झक्की, चिमण, भाऊराव इ. बुजुर्गांना हा सामना आठवत असेल. Happy

- इंग्लंड वि पाकड्यांचा दुसरा कसोटी सामना अत्यंत रंगतदार अवस्थेत आहे. पहिल्या डावात ७० धावांनी मागे पडलेल्या पाकड्यांनी दुसर्‍या डावात २१४ धावा करून इंग्लंडला विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य ठेवल्यावर आतापर्यंत इंग्लंडची अवस्था सर्वबाद ७२ करून लागोपाठ दुसरा कसोटी सामना जिंकला.

पहिल्या सामन्याप्रमाणे ह्या सामन्यात सुद्धा फिरकी गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. इंग्लंडच्या बाद झालेल्या २० पैकी १९ खेळाडूंना पाकड्यांच्या फिरकी गोलंदाजांनी बाद केले आहे. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर इंग्लंड संघात परत आलेल्या फिरकी गोलंदाज मधूसुदन पानसरेने पाकड्यांच्या दुसर्‍या डावात ६ बळी घेऊन आपले पुनरागमन साजरे केले.

-

मधूसुदन पानसरे - मॉन्टी उपाख्य मधूसुदन पानेसर
अजागळ श्रीनाथ - जवागळ श्रीनाथ
नेहरू - आशिष नेहरा
बुद्धिमाना साहा - वृद्धिमान साहा
आन्द्या आगाशे - आंद्रे आगासी
कारकून - मायकेल क्लार्क
शिंपी - रॉस टेलर

इंग्लंड वि पाकडे कसोटी सामने जबरदस्त इंटरेस्टिंग अवस्थेत सुरू आहेत. पहिले दोन्ही कसोटी सामने जिंकताना पाकड्यांनी इंग्लंडचा दुसर्‍या डावात ७२ धावात खुर्दा केला होता. पण आता तिसर्‍या कसोटीत उपाहाराच्या आतच पाकड्यांची अवस्था ६ बाद ३९ अशी झाली आहे. हाही सामना रंगणार असं दिसतंय.

एक वाईट बातमी. युवराजला कर्करोग झाला असण्याची शक्यता आहे. पण आजार प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे १०० टक्के बरा होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात युवराजची उणीव नक्कीच भासत आहे.

http://www.espncricinfo.com/india/content/current/story/552170.html

पाकड्यांनी लागोपाठ तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडला धूळ चारून ३ सामन्यांच्या मालिकेत ३-० असा जबरदस्त व्हाईटवॉश दिला. पाकिस्तानचे नवीन होमपिच बनलेल्या दुबईमध्ये नंबर १ इंग्लंडची अजिबात डाळ शिजली नाही.

अर्जुन तेंडुलकरने नाबाद ६५ मारले अंडर-१३ मधे दोन दिवसांपूर्वी.
http://www.dnaindia.com/sport/report_tendulkar-jr-comes-good-with-the-ba...

सचिन-अर्जुन ओपनिंग जोडी बघायला मजा येइल ना? Happy

२००९-२०१० या आर्थिक वर्षात बीसीसी आयचे उत्पन्न ९६४ कोटी रुपये असून त्यावर सरकारने दणदणीत ४१३ कोटी रुपये कर लावला आहे! म्हणजे ४२.८४ टक्के!!
अहो, १०० मधले ४२ सरकारला दिले तर खायचे काय? तरी बरे कसे बसे जवळपास ४२ कोटी रुपये भरले आहेत, त्यावर समाधान नाही का?
खरे तर खेळाडू इतके मरे मरेस्तवर उन्हातान्हात खेळून पैसे उभे करतात, ते सरकार फुकट खाणार! हा कुठला न्याय?
सरकारने काय दिले बीसीसीआय ला?
आणि मूर्खासारखे हे प्रसिद्ध कशाला केले? चार पाच कोटी त्या आयकर खात्यातल्या अधिकार्‍याला दिले असते. 'आपसमे मामला मिटा दो यार!' तो लिहून देईल 'बाकी चुकती' म्हणून. भारतातली पद्धतच आहे तशी! उगाच जगजाहीर कशाला? एव्हढ्या मोठ्या संस्थेची बदनामी!! अहो वर्ल्ड कप जिंकला होता आम्ही!! काही अभिमान आहे की नाही?
आता आशा आहे शरद पवार काहीतरी करून हा कर रद्द करतील.

बी सी सी आय ही charitable organisation म्हणून पुनः घोषित करायला पाहिजे! अहो लोकांना स्वस्तात तिकीटे नाही का दिली त्यांनी मागे?

जय भारत!!
Proud Proud Proud

'राहुल शरद द्रविड' हा आधारस्तंभ निवृत्त होणे ही अत्यंत दु:खद बातमी आहे. १-२ चांगले डाव खेळून मग निवृत्त व्हायला पाहिजे होता. २०११ संपेपर्यंत तो चांगलाच फॉर्मात होता. विश्वचषकानंतर इंग्लंड व विंडीजविरूद्ध खेळलेल्या ७ कसोटीतल्या १३ डावात त्याने १०३*, ३६, ११७, ६, २२, १८, १४६*, १३, ५४, ३१, ११९, ८२, ३३ असा तब्बल ७८० धावांचा रतीब ओतला होता (सरासरी ७०.९०, ४ शतके, २ अर्धशतके). पण ऑस्ट्रेलिया दौर्‍याने घात केला. एक अतिशय भरवशाचा, तंत्रशुद्ध आणि सभ्य खेळाडू ही त्याची ओळख कायम राहील. त्याची जागा भरून काढणे अत्यंत अवघड आहे. निदान वर्तमानातल्या खेळाडूंमध्ये तरी त्याची जागा भरून काढणारा कोणी दिसत नाही.

त्याच्या निवृत्तीमुळे सचिन व लक्ष्मणवर निवृत्ती जाहीर करायचा दबाव वाढणार हे निश्चित.

द्रविड सचिनला आपल्या निवृत्तीबद्दलच्या समारंभांना अजिबात बोलावणार नाही.

का?

कारण द्रविड विचारात पडेल की मी चाललोय म्हणून लोक जमले आहेत की हा आलाय म्हणून Happy

>>कारण द्रविड विचारात पडेल की मी चाललोय म्हणून लोक जमले आहेत की हा आलाय म्हणून
किमान बंगलोरात तरी त्याला असा प्रश्न पडणार नाही..... नक्कीच!

आशिया चषकासाठी कोणीतरी नवीन धागा काढा. नाहीतर मलाच काढावा लागेल. पण माझा हातगुण चांगला नसल्याने इतरांना विनंती करत आहे. उद्यापासून स्पर्धा सुरू आहे.

हे आहे आशिया चषक (२०१२) स्पर्धेचे वेळापत्रक

सर्व सामने दिवसरात्र असे खेळले जातील व सामने भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे दुपारी १:३० वाजता सुरू होतील.

१) रविवार ११ मार्च - बांगला वि पाकडे (माझा अंदाज - पाकडे जिंकणार)
२) मंगळवार १३ मार्च - भारत वि श्रीलंका (माझा अंदाज - श्रीलंका जिंकणार)
३) गुरूवार १५ मार्च - पाकडे वि श्रीलंका (माझा अंदाज - श्रीलंका जिंकणार)
४) शुक्रवार १६ मार्च - भारत वि बांगला (माझा अंदाज - भारत जिंकणार)
५) रविवार १८ मार्च - भारत वि पाकडे (माझा अंदाज - भारत जिंकणार)
६) मंगळवार २० मार्च - बांगला वि श्रीलंका (माझा अंदाज - श्रीलंका जिंकणार)
७) अंतिम सामना गुरूवार २२ मार्च (माझा अंदाज - भारत व श्रीलंका अंतिम फेरीत येऊन श्रीलंका जिंकणार)

>>७) अंतिम सामना गुरूवार २२ मार्च (माझा अंदाज - भारत व श्रीलंका अंतिम फेरीत येऊन श्रीलंका जिंकणार)

मग आता वेगळ्या धाग्याची गरज आहे का..? Wink

द्रविड ला शुभेच्छा! आता हा राम गेल्यावर लक्षमण कसली वाट पहात आहे..?
(आशिया कप मध्ये १०० झाले की सचिन एकदिवसीय ला राम राम करेल यात तीळमात्र शंका नाही!)

मास्तर, परत तोंडघशी पडणारेस. ही मालिका भारत जिंकणार! वरचा १८ मार्चचा पाकीस्तान विरुद्धचा सामना सोडता सगळे भारत जिंकणार!

महाशतक झालं आणि कोनीच फिरकल नाहिये????

सचिन वेल डन. Happy

ये बजाव...
धंदड ततड धंदड ततड धंदड ततड धंदड ततड धंदड ततड
धंदड ततड धंदड ततड धंदड ततड धंदड ततड धंदड ततड
धंदड ततड धंदड ततड धंदड ततड धंदड ततड धंदड ततड
धंदड ततड धंदड ततड धंदड ततड धंदड ततड धंदड ततड

Pages