विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेन्शन आहे बुवा.> चंचल, होनाईच मांगता. साक्षात लंकेश्वर ईथे आला तो एवढ्यासाठीच!!!!!!!!
असा असतो वाघांचा हमला.

शेवटी वानरसेना ती वानरसेनाच.

आता आपली बॅटिंग जी जगात सगळ्यात पॉवरफुल आहे असे म्हणतात त्या बॅटिंगवर सगळी दारोमदार आहे..

हॅट्स ऑफ टु जयवर्धने...कुलसेखरा व परेरासुद्धा जबरी खेळले...झहिर २००३ फायनलमधे खेळला तसाच खेळला... टोटली विल्टेड अंडर प्रेशर जस्ट लाइक इन २००३.... सम पिपल आर नॉट मेड टु हँडल द प्रेशर... झहिर इज वन ऑफ देम....

बॅटिंग ऑर्डर आपलीच दणकट आहे, पण सगळेच बेभरवशी. सेहवाग सुरुवात दणक्यात करतो आणि आऊटही तितक्याच दणक्यात होतो. गंभीर व धोनी फॉर्ममध्ये नाहीतच. सगळाच अनिश्चित मामला. कठीण आहे.

आता आपली बॅटिंग जी जगात सगळ्यात पॉवरफुल आहे असे म्हणतात त्या बॅटिंगवर सगळी दारोमदार आहे..> पण पुढे वाघांची सेना उभी आहे. आज परत एकदा लंकादहना ऐवजी वानरसेना दहनच होणार........

जे लोकं आपल्या प्लेयरांना शिव्या देतात त्यांना खरच लाज वाटायला पाहिजे. You really need to grow up.

टफ फाईट देऊन हरले जरी तरी वांदा नाही. सुरवातीच्या ओवर्स मध्ये ढिसाळ कारभार करुन जर आणखिन शेवटी इतके रन दिले असते तर मग एक वेळ ठीक होतं. चांगल्या चांगल्या बॉलरांची वाट लागते डेथ ओवर्स मध्ये. आता असं आहे, फ्री फोरम आहे त्यामुळे थोबाड कसंही चाललं तरी कानफटात द्यायला कोणी येणार नाही पण फक्त आपल्याला टेन्शन आलं म्हणजे दुसर्‍याला शिव्या द्यायचं लायसन्स नाही मिळत. !@#$ing Idiots!

४० व्या ओवर ला १८० रन होते....! आणी शेवट्च्या ओवरला २७४. म्हणजे ४.६० चा रन रेट सरळ ९.४ झाला... हद्दच झाली Angry

मुकु >> आपलेही खरं आहे.

चांगल्या चांगल्या बॉलरांची वाट लागते डेथ ओवर्स मध्ये>> अगदी बरोबर. ४७.४८ व्या ओवर मधे जीवावर उदार होउन खेळतातच लोक.

लंकेश्वर तुम्ही साधारण २ तासानी परत या आणि प्रतिक्रिया लिहा. आता कशाला वाफ दवडताय.

आपण चँपियन आहोत व चँपियनसारखे खेळणार आहोत ! माझा विश्वास आहे !! खेळपट्टी दगाबाज किंवा श्रेलंकेची गोलंदाजी भयानक वाटत नाहीत.
जय हो !!!!

Pages