विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस ही मॅच अपणच जिंकणार आहे. मी फक्त तेंडल्य बद्दल बोलत होतो.. जयवर्धने ज्या पधतीने खेळला ते पाहुन तेंडल्याचे लिमिटेशन जाणवले. आज तेंडल्याने अँकर होणे अपेक्षीत होते... असो

आज सगळेच खेळतील.. धिस कप इस आवर्स ! गो इंडीया गो!

आडो, पाकिस्तान विरुद्ध पण मी म्हंटलो होतो की नाही? Happy

आंधळा आशावाद नाहीये हा. हे नवीन पबलीक खरच खूप स्टाँग आहे मेंटली. पुर्वीचा भारत असता तर आता पर्यंत गळती लागली असती, दारुण पराभवाची तयारी वगैरे. नो मोअर.

पब्लिकहो काळजी करु नका... कोहली आणि गंभीर मस्त खेळताहेत... २ बाद होऊनही १७ ओव्हर्स मध्येच ९१ धावा झालेल्या आहेत...

जिंकणार आपणच जिंकणार.....
जीतम्.... जीतम्.....

मागच्या भारत पाकिस्तान मॅच च्या वेळेस पण शास्त्री पाकच्या काळ्जीने कॉमेंट्री करत होता.
तेव्हा जिंकलो म्हणून आज तो मुद्दाम तसच करत असेल Happy

गंभीर कोहली शेवटपर्यंत खेळत राहीले तर उत्तम ! भागीदारी महत्त्वाची ठरेल नि आत्मविश्वासही दुणावेल.. एकाग्रतेने खेळा म्हणजे जितम !

श्रीलंका ६०-२ होते व धावांची सरसरी होती ३.५ च्या आसपास; आपण आता १००ओलांडले -२ विकेट व सरासरी आहे ५.२५ . माझा विश्वास आहे या नवीन खेळांडूवर !

अगदी अगदी मलाही वाटतय ही नवीन टीमच काहितरी करून दाखवणार सगळे म्हातारे टेन्शनने हार्टअ‍ॅटॅक येईल या काळजीने उगाचच काहितरी बकबक करतायत...
२०/२० ची टीमच आणणार वर्ल्ड कप आपल्याला Happy

हो भाऊ पण आपली बरीच मदार सचिन आणि सेहवाग वर होती. आणि तेच गेलेत. अर्थात योग म्हणतो तसं संयमाने खेळलो तर शक्य आहे. कोहली बहुतेक आउट....

Pages