सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स डेच्या निमित्ताने लिहीत आहे. तुम्हा सर्वांना सांगावे असं वाटले. मदर्स डेच काय मला तर आयुष्यभराची गिफ्ट मिळाली!!
शीर्षकात लिहील्याप्रमाणे हो! he 'said' I Love you! हा ही म्हणजे अर्थातच माझा मुलगा. माझा, ऑटीझम असलेला, अजुन एकही शब्द न उच्चारणारा कसा काय म्हणाला आय लव्ह यू?
मी पांचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो. घर मुंबईला. त्यामुळे वर्षात चार मुंबई-पांचगणी चकरा एस्टीने व्हायच्या. तेव्हां एशियाड देखील नव्हत्या त्यामुळे वोल्वो वगैरे कौतुकांचा प्रश्नच नाही. बॉम्बे सेन्ट्रल डेपो ते महाड मार्गे पाचगणी सात तासांचा प्रवास.
माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण-
माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने!
संध्याकाळची वेळ होती. शाळेतून कंटाळून, दमून भागून आलेली बच्चे कंपनी खेळायला बिल्डींगच्या परिसरात जमू लागली. धावाधावी, पकडापकडी, लपंडाव असे खेळ रंगू लागले आणि बघता बघता अख्खा परिसर त्यांच्या ओरडण्याच्या, किंचाळण्याच्या आवाजांनी दुमदुमून गेला होता.
काही लहान मुलांचे उडया मारायचे खेळ चालले होते. आजूबाजूला बसायला जे सुमारे २ - २ १/२ फूट उंचीचे बाकडे बनवले होते त्यावरून ६-७ वर्षाची ती लहानगी चिमुरडी बाळे उडया मारून आपण किती शूर आहोत हे दाखवून आपाआपसात गोंधळ घालत होती.
त्यातल्या काही मुलांचे बोलणे कानी पडले ए मी ना जिन्यावरून २ पायर्यांवरून उडी मारू शकतो.
फक्त एक घर तर घ्यायचं होतं.
या ‘फक्त’पाशी येऊन पोहोचायला चंद्रकांत काशिनाथ फाटक ऊर्फ चंदाला गेले चार-सहा महिने फार घाम गाळावा लागला होता...
आपला फारच घाम गळतोय हे लक्षात आल्यावर त्यानं कारचा ए.सी. अजून वाढवला. ए.सी.वाढवणे या शब्दप्रयोगाचा ऐश्वर्याला राग येतो. "तो काय आवाज आहे का वाढवायला किंवा कमी करायला?" असं तिचं म्हणणं.
"मग काय म्हणायचं?"
"Drop the temperature."
"म्हणजे तेच ते ना?"
"नाही!"
मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू.
मनात नेहमीच असतात अपेक्षा,
पण दुर्दैवाने होऊ नये उपेक्षा,
त्यासाठी काळजी घ्यावी कुणीतरी,
कुणीतरी कशाला करावी आपल्यांनीच...१
काही अपेक्षित कधी मोठे नसते,
ह्वे प्रेम तेही जरासे असते,
त्याच्या बदल्यात मिळते निराशा,
तेव्हा सगळी ऒढच सरते...२
मग आता....
कराव्यात की नको ह्या अपेक्षा,
कोमेजतात मनाच्या सर्व कक्षा,
अपेक्षेच्या परीक्षेत झुरण्यापेक्षा,
काय असते मोठी स्वतःला शिक्षा...३
----- सामिप्य..
व्यभिचार म्हणजे नक्की काय यावर इथे यन्न नंबर ऑफ टाईम्स चर्चा झाली असावी. पण तरीही बालमनाला पडलेले प्रश्न आजही कायम आहेत.
तीच ती आपल्या राजाराणीची कथा. जी कित्येक आयांनी आपल्या मुलांना मम्मम भरवताना सांगितली असावी.
आटपाट नगराचा एक राजा होता.
राजाला दोन राण्या होत्या.
एक आवडती, तर एक नावडती!
किमान दोन राण्या असल्याशिवाय राजाचे राजापण कसे सिद्ध होणार नाही!
कधी दोनाच्या जागी अनेक राण्या असायच्या, पण त्यातही एक पट्टराणी असायचीच.
तर ती पट्टराणी सर्वात आवडती का असायची हे बरेचदा कथेत सांगितलेले नसायचे.
पण जी सर्वात सुंदर असणार तीच पट्टराणी हे बालमनालाही समजू यायचे.
माणूसकीचे मारेकरी
माणसांकडून निष्ठूरतेच्या
हद्दी ओलांडल्या गेल्यात
गतानुगतिकतेच्या भावना
माणसांतुन कोलांडल्या गेल्यात
इथे माणूसकीचे मारेकरी
मना-मनात जागत आहेत
माणसांशी वागताना माणसं
माणसांप्रमाणे ना वागत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
आज काय लिहू कळत नाही. बराच वेळ ऑटीझम अवेअरनेस डे व मंथबाबत काहीतरी लिहीलेच पाहीजे ह्या विचाराने बसले आहे. पण काहीच सुचत नाही. मुलाचा स्प्रिंग ब्रेक चालू असल्याने मागे त्याचा दंगा, कर्कश आवाज काढणे इत्यादी चालू असल्याने ह्या परिस्थितीत काही विचार करून लिहीणे जरा अवघडच.!
गेल्या फेब्रुवारीपासून मी ऑटीझमवर लिहीत आहे. अजुनही पुष्कळ लिहीण्यासारखे आहे. मात्र सध्या डोक्यात सैतानाने घर करू नये म्हणून बिझी राहण्याच्या दृष्टीने हजारो व्याप मागे लावून घेतले आहेत. स्वस्थ बसून वाचन/लिखाण होणे सध्या दुर्मिळ बाब बनत चालली आहे. Anyhoo, I am loving' it !