"फार कठीण प्रश्न आहे साहेब. पण तुम्हाला म्हणून सांगते. हे एका सी. ए. फर्ममध्ये कामाला आहेत. आता सी. ए. म्हटलं की इंकम टॅक्सशी संबंध आलाच. क्लायंटसच्या विविध भानगडी असतात. कधी कधी प्रत्यक्ष जावं लागतं. तसे ते खरं तर कंपनीच्या कामासाठी लोणावळ्यास गेले होते. दोनलाच गेले होते. तीन तारखेस जरा वेळ मिळाला म्हणून सुनंदाला जरा समजवायला गेले होते की आम्हाला तुझे पैसे नकोत.
आता हे काम पोलिसांना सांगितलं तर नस्ती भानगड उभी रहायची. पण यांच्याबरोबर कंपनीचा ड्रायव्हर होता. तो देईल साक्ष. " बाईंच्या चेहऱ्यावर खरेपणा दिसत होता.
४ ऑगस्ट २००५. हरकिशन लखानी आदल्याच रात्री आपल्या बिझनेस टूरवरून भारतात परतले होते. एक रात्र मुंबईत काढून दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी आपल्या खंडाळ्याच्या बंगल्याचा रस्ता धरला होता. गाडी पार्क करतेवेळी त्यांना बंगल्यात जरा जास्तच वर्दळ दिसली. खाकी वर्दीतील चार-पाच हवालदार इथे तिथे फिरत होते. कसलीतरी मोजमापे घेत होते. हरकिशनभाई विचार करतच गाडीतून उतरले आणि त्यांची भेट इन्स्पेक्टर तावड्यांशी झाली.
"तुम्ही श्री. लखानी का? " तावड्यांनी विचारले.
"हो. काय भानगड काय आहे इन्स्पेक्टर? "
"आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी मि. लखानी, आपल्या पत्नी श्रीमती सुनंदा यांचा काल रात्री खून झाला आहे. "
असं वाटतंय जणू फार फार महत्वाचं काहीतरी फार फार मागे राहून गेलंय...
किंवा जणू मीच नकळत चालता चालता फार लांब येऊन पोचलेय आणि ते ठिकाण... जिथं मला पोचायचं होतं... ते कधीच मागे पडलंय.
विश्वास बसत नाही... इतकी वर्ष झाली! किंवा विश्वास बसत नाही... 'इतकीच' वर्ष झाली!! असं वाटतंय जणू एक जन्म उलटून गेला!!
मागच्या जन्मातलं आता काहीच आठवत नाही.
जे आठवतंय ते इतके धूसर... कधीकाळी वाचलेल्या एखाढ्या छानश्या कादंबरीतलं एखादं बिन महत्त्वाचं पात्र आठवावं तसं!
विश्वास बसत नाही!!
पण विश्वास ठेवायला हवा. मी ठेवला... त्यांनी ठेवला... म्हणून तर आज मी इथे आहे! नाहीतर...
तुम्ही, तुम्ही असलेलं जगाला फारसं आवडत नाही...
मग त्याला हवं तसं घडवण्यात वर्षे लोटतात...
आता तुम्ही प्रिय असता,
कारण तुम्ही जगासारखे असता...
मग कधी निवांत क्षणांत, तुमचं खरं रूप हळूच बाहेर येतं, शेजारी येऊन बसतं...
ते लाडकं असतं- फक्त तुम्हाला!
त्याची आर्त नजर तुम्हाला छेदून जाते..
थोडीशी खूडबूड झाली, की
त्या आर्त नजरेला ओलांडून जगाशी सामना करायला तुम्ही पुन्हा तयार...
पण तरीही, 'तोतया' शब्दाचा अर्थ मनाला पटत नाही...
आज नविन ऑफिसचा पहिलाच दिवस होता. नुकतीच रिजनल ऑफीसमधून ब्रान्च ऑफीसला बदली झाली होती. नाही म्हटलं तरी थोडे टेंशन होतेच. नऊ-दहा वर्षे सर्व्हिस झाली होती. बराचसा अनुभव गाठीशी होता. तरी स्वतंत्र ब्रांच सांभाळण्याची पहिलीच वेळ. नविन ऑफीसमध्ये स्वागत झाले, मि. सबनिस सहकाऱ्यांच्या ओळखी करून देत होते.
नुसतं देवाकडून मिळालेलं स्त्रीत्व पुरेसं आहे का? .......
तुम्ही म्हणाल आज हे काय नवीनच??
पण जेव्हा अनेक उभी राहिलेली, कोलमडलेली घर दिसतात आजूबाजूला.....पुन्हा जगायला शिकलेली माणसं भेटतात, तेव्हा मला माझ्या आईचं एक वाक्य आठवतं...."घरातली बाई खमकी असेल ना, तर अख्खं घर रुळावर राहत......."
आज कोजागिरी पोर्णिमा.त्या निमित्ताने आठवणी जाग्या झाल्या एका सहस्त्र चंद्र दर्शनाच्या. आणि हे सहस्त्र चंद्र दर्शन होते महान गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे. त्यावेळी टोरोंटो कॅनडा येथे आम्ही एक सी.डी. प्रकाशित करून साजरा केलेला सहस्त्र चंद्र दर्शनाचा हा सोहळा मायबोलीच्या रसिकांसाठी सादर ...
अश्विन पोर्णिमा जी आपण कोजागिरी पोर्णिमा म्हणून साजरी करतो. ह्या निमित्ताने हा खास कार्यक्रम "कोजागिरी पोर्णिमेचा"
आई ओरडणार आता.
पीटीच्या सरांनी जास्त वेळ प्रॅक्टीस घेतली.... त्याला मी काय करू? त्यांना सांगू? आई ओरडेल सातच्या आत घरात गेले नाहीतर?...
आईला सांगितलं तरी काही उपयोग नाही. कितीही सांगितलं तरी तिचं चालूच असतं. सातच्या आत घरात यायलाच पाहिजे... अशी चालू नकोस, तशी बसू नकोस, आता मोठी झालीस....
एकदा म्हणायचं लहान राहिलीस का आता? मोठी झालीयेस. जरा विचार कर आपला आपण...
परवा आपणहून कबड्डीसाठी नाव घातलं तर म्हणे... घरात कुणी मोठं आहेत की नाही? आम्हाला विचारायचस तरी. अजून लहान आहेस म्हणून सांगतेय. अगदिच शिंग फुटल्यावर....
एकाच वाक्यात एकदा लहान काय मोठी काय.... वैतागचय.
त्रिपुटी
(सुप्रिया विनोद - अक्षर प्रकाशन - रु१००/- पृष्ठे:८८)