
“शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश अन् धर्मापायी प्राणं घेतलं हाती” हे शांता शेळके लिखित मराठी मनाला वर्षानुवर्षे स्फूर्ती देणारे वीररसयुक्त गीत. हे गाणं केवळ सुश्राव्य स्फूर्तिदायी गीत म्हणून ऐकून सोडून न देता, ते प्रत्यक्ष आयुष्यात जगणारा शूर मराठी सरदार म्हणजे इंदूरचा सुपुत्र ‘वैभव भागवत’. देशासाठी सर्वस्व देणाऱ्या ‘शौर्य चक्र’ विजेत्या ‘पायलट ऑफिसर’ वैभवची कहाणी युवा पिढी आणि समस्त नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी अशीच.
नमस्कार मायबोलीकर,
मागच्या दिवाळीत दै. दिव्य मराठीच्या मधुरिमा दिवाळी अंकात माझी 'शापित जग' हि लघुकथा प्रकाशित झाली होती. नंतर मग मी ती admins ची परवानगी घेऊन मायबोलीवरही सादर केली.
त्याची लिंक हि आहे: https://www.maayboli.com/node/64611
आजच सकाळी मला श्रीहरी कृपेने काही ओळी सुचल्या, त्या देत आहे. माझी ही पहिलीच कविता आहे त्यामुळे कशी वाटली, काय सुधारणा हव्या ते नक्की कळवा.
हरे कृष्ण...हरे कृष्ण...
ब्रम्ह, आदिमाया, महेश।
इंद्र, सूर्य, गणेश।
सर्व एकच श्रीविष्णुंचे अंश।
नित्य हरीनाम मुखी, दूर ठेवी भय सर्प दंश।।
म्हणत हरे कृष्ण हरे राम।
हरीचे झाले ज्ञानोबा, तुकाराम।
पीताच विष्णू भक्तीचे जल।
प्रल्हादाने आटवले दैत्यांचे बल।।