सिनेमा आणि समाजाच्या संदर्भात 'आरसा-प्रतिबिंब' वाद सनातन आहे. अगदी जेव्हांपासून सिनेमा बनायला लागले तेव्हापासूनच. मात्र यापैकी कोण आरसा आणि कोण प्रतिबिंब या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत ना कोणी समाजशास्त्रज्ञ अचूकपणे देऊ शकला आहे ना कोणी सिनेअभ्यासक. कारण ते तसे कोणा एकाच्या बाजूने देता येण्यासरखे नाहीच मुळात.
काल नॉक आउट नामक चित्रपट पाहिला. तुफान करमणूक झाली म्हणून वाटले की इथे शेअर करावीच.
तर सुरुवातीला बरा थ्रिलर असावा असे वाटले. सुरुवात अशी की एका बिल्डिंग मधे लपलेला एक शूटर शिनेमाचा हिरो(?) ला लांबून कॅमेराज, सि सिटिव्ही ,टेलिस्कोपिक लेन्स असलेली गन इ. च्या सहायाने एका टेलिफोन बूथ मधे होल्ड अप करतो. थोड्या ड्रामा अन थोडा गोळीबार इ.नंतर बाहेर तोबा गर्दी, पोलिस, मिडिया वगैरे ऑडियन्स जमल्यानंतर हे सगळे कोण, का अन मुख्य म्हण्जे कशासाठी करत आहे हे हळू हळू आपल्याला कळते अन तस तसा शिनुमा महान म्हणजे महानच विनोदी होत जातो !
*********** स्पॉयलर अलर्ट*************************************
एका उपक्रमाअंतर्गत गीतकार, नाटककार, लेखक, लोककलांना प्रोत्साहन देणारे 'अशोकजी परांजपे' यांच्याबद्दल माहिती हवी आहे.
"केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर", "अवघे गरजे पंढरपूर", "कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर" अशी अजरामर गीते लिहीणारे अशोकजी परांजपे यांच्याबद्दल इंटरनेटवर शोध घेतला असता फारशी माहिती मिळू शकली नाही.
ईटीव्ही वरील, 'अशोकजी परांजपे' यांच्या गीतांवर आधारित 'कैवल्याच्या चांदण्याला' ह्या कार्यक्रमात लोकशाहिर विठ्ठल उमप यांनी त्यांच्या परदेशातील कारकिर्दीची सुरुवात अशोकजी परांजपेंमुळेच झाली असे बोलून दाखवले होते!
मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.
परवा प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर झूम चॅनेल आणि टाईम्स ग्रुप नी २३ वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या माध्यमातून जबरदस्त लोकप्रिय झालेलं लोक संचार सेवा परिषदेनी बनवलेलं 'मिले सुर मेरा तुम्हारा' गाणं रीक्रिएट केलं. त्याबद्दल वेगवेगळ्या बीबींवर चर्चा होत असलेली पाहून हा बीबी उघडला...
पहिल्या गाणं म्हणजे देशातल्या संगीत क्षेत्रातल्या आघाडीच्या कलावंतांनी एकत्र येऊन भारताचं घडवलेलं बहुरंगी आणि बहुढंगी दर्शन होतं. त्यात तत्कालीन सेलेब्रिटीज सोबत प्रांतीय कलाकारांचाही बरोबरीचा सहभाग होता. आणि ओव्हर ऑल गाण्यातनं भारतीयत्वाला साद घातली जायची...
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
कालपर्यंत रस्त्यावर देवीचा मुखवटा हातात घेऊन भंडारा लावून घ्या म्हणून येणार्या बायकांबद्दल तसं काहीच वाटत नव्हतं. कधी भंडारा लावून घेतला नाही म्हणून एखादी / एखादा शिव्याशाप द्यायचा त्याकडेही दुर्लक्षच केलं होतं. आज मात्र यापुढे तसं करु शकेन का? असा प्रश्न पडला तो 'जोगवा' हा नवा सिनेमा पाहील्यामुळे. सिनेमा जोगत्या आणि जोगतीणींबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल जी माहीती देतो ती अर्थातच धक्कादायक आहे. याआधी असं काही असेल असा विचारही केला नव्हता.