क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विक्रमी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात इतक्या प्रचंड प्रमाणात क्रिकेट खेळलं जात असूनही, प्रतिभेची कमतरता नसूनही व फिरकी आपलं पारंपरिक कसब असूनही, आपल्याला एकही खराखुरा प्रभावी फिरकी गोलंदाज मिळत नाही हे आश्चर्य आहे. शोध घेण्यात, प्रोत्साहन व संधी देण्यात , व फिरकीला योग्य ते महत्व देण्यात आपण कमी पडतोय, हे निश्चित. कुलदीपला बहरण्यासाठी योग्य चांगली वागणूक मिळाली आहे असं मला तरी वाटत नाही. तो फलंदाजीबाबत गंभीर आहे, तंत्रशुद्ध व प्रयत्नशील आहे, हे मी पाहिलेल्या त्याच्या प्रत्येक खेळीत मला तरी जाणवलं आहे. पण त्याला नेहमीच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकवून ठेवून, तो ऑलराउंडर म्हणून निवडण्याच्या लायकीचा नाही हा शिक्का मारण्यात काय अर्थ आहे !

शोध घेण्यात, प्रोत्साहन व संधी देण्यात , व फिरकीला योग्य ते महत्व देण्यात आपण कमी पडतोय, हे निश्चित. >> +१. परत रणजीला दुय्यम स्थान देण्याच्या हव्यासामूळे होतकरू फिरकी गोलंदाज सुद्धा रेड बॉल टॅ़टिक्सला मह्त्व देण्याऐवजी व्हाईट बॉल वर मेहनत घेतात. साई, दुबे, शौकिन, सुथार वगैरे लिमिटेड क्रिकेटमधे अधिक मेहनत घेताना दिसत आहेत.

ऑलराउंडर म्हणून निवडण्याच्या लायकीचा नाही हा शिक्का मारण्यात काय अर्थ आहे >> बिट्स अ‍ॅण्ड पीस ऑलराउंडर टी २० साठी ठिक असतात पण वन डे मधे नि टेस्ट मधे फारच उघडे पडतात हे गंभीरसारख्या स्ट्रीट स्मार्ट खेळाडूला जाणवत नसेल तर आपण काय बोलणार.

मुळात जर ९-१०-११ नम्बरवर पण ‘थोडीफार का होईना पण बॅटिंग येत असेल, तर सामान्य किंवा प्रसंगी अतिसामान्य बॉलिंग पण चालेल‘ अश्या प्रकारचे खेळाडू हवे असतील तर फंडामेंटल्स मधेच काहीतरी चुकतंय. बुमराह, सिराज आणि कुलदीप मिळून ५० रन्सही काढू शकणार नाहीत कदाचित, पण त्यांच्या बॉलिंगसमोर जवळ जवळ ४०० चा स्कोअर दर वेळी उभा रहाण्याची शक्यता पण कमी आहे.

आपण काय बोलणार.
>>
या विचारामुळेच इथल्या पोस्ट कमी झाल्या असाव्या काय??

Pages