Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती संस्कृतीची शिरा आहे.
ती संस्कृतीची शिरा आहे.
>>> गोत्र शिरा असेल तर उपमा काय असेल? आणि डोसा?
ब्रह्मांडीय भूमिका विसरलात. गोत्र शोधा.>>
मी माझी ब्रह्मांडीय भुमिका विसरलेय. रादर मला ती कधी माहितीच नव्हती. मला सासर-माहेरची गोत्रं माहिती आहेत. आता भुमिका कशी शोधू?
फार फार पूर्वी जेव्हा सर्व लोकसंख्या हजारांत असेल तेव्हा इनब्रीडींग टाळण्यासाठी गोत्राचा वापर केला गेला असू शकतो.
. हे कमावलेलं असतं—जन्मसिद्ध
. हे कमावलेलं असतं—जन्मसिद्ध नव्हे ..
प्राचीन भारतात गोत्राचा वापर जनुकीय ओळख राखण्यासाठी होत असे.
एकदा असे म्हणायचे अन एकदा तसे!
या फॉरवर्डकर्त्याचे गोत्र विचारायला पाहीजे एकदा!
- गोत्र म्हणजे आत्मिक कोड
- गोत्र म्हणजे आत्मिक कोड
- ते तुमचं आध्यात्मिक DNA आहे
- ही आहे डीप कोडिंग
- गोत्र म्हणजे तुमचं आध्यात्मिक GPS
- सगळ्यात जुना पासवर्ड — आपलं गोत्र
- गोत्र ट्रॅकिंग ही एक सुरक्षाव्यवस्था होती
- गोत्र म्हणजे तुमची कॉस्मिक भूमिका
- गोत्र म्हणजे भूतकाळ नव्हे — ते भविष्यातील ज्ञानाचं पासवर्ड आहे
"तुमची ब्रह्मांडीय भूमिका" म्हणजे ?
"तुमची ब्रह्मांडीय भूमिका"
"तुमची ब्रह्मांडीय भूमिका" म्हणजे ?
>>> तुम्हाला समजलं की मलाही सांगा. मला उगीच FOMO आला होता.
गोत्र वाला मलाही आलाय
गोत्र वाला मलाही आलाय
गोत्र made my day !!
गोत्र made my day !!
वेळ नाही वालं फॉरवर्ड अर्धवट
वेळ नाही वालं फॉरवर्ड अर्धवट वाचलं. पूर्ण वाचायला वेळ नाही.
देवा !
देवा !
साक्षात् श्रीरामाच्या टिवशना घेणाऱ्या गोत्रात जन्म घेऊनही मला अजून गल्लीय, मोहल्लीय भूमीकाच ठरवता आलेली नाही, पृथ्वीय आणि ब्रह्मांडीय तर फार दूरची गोष्ट.
मला हे जग स्वीकारेल ?
वेळ नाही वालं फॉरवर्ड अर्धवट
वेळ नाही वालं फॉरवर्ड अर्धवट वाचलं. पूर्ण वाचायला वेळ नाही.>>>
साक्षात् श्रीरामाच्या टिवशना घेणाऱ्या गोत्रात जन्म घेऊनही मला अजून गल्लीय, मोहल्लीय भूमीकाच ठरवता आलेली नाही >>
(No subject)
अबब....DNA, GPS, Password!!!!
अबब....DNA, GPS, Password!!!!!
जेव्हा ब्रिटिश भारतात आले
जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी गोत्रपद्धतीला अंधश्रद्धा म्हणून हिणवलं. बॉलीवूडने पुजाऱ्यांच्या गोत्र विचारण्याची चेष्टा केली.
नेमका ब्रिटिशांवर राग आहे की बॉलीवूडवर?
>>> हे एपिक आहे
गोत्रपद्धतीने स्त्रियांना संरक्षण दिलं
>>>
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
राजर्षी छत्रपती शाहू महाराज दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवणारा हा लोकराजा-लोकनायक. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाहूराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या. ध्येयधोरणे आखून विकासासाठी त्यांनी सत्ता राबवली.स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूरच्या या गादीवरील या राजाने सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रत्यक्षात आणलेदेखील! राजा म्हटले की, ऐषोराम करणाऱ्या सत्तांधांची प्रतिमा नजरेसमोर येते.
गाद्यागिद्यवर लोळणाऱ्या राजांपेक्षा शाहूराजांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातली, पणाला लावली. या द्रष्ट्या राजर्षीच्या कर्तृत्वाची ओळख आपण करून घेऊ. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. यांचा वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1848 रोजी 10 वर्षीय यशवंतरावांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजे हे वयाच्या 20 वा वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले.
धारवाड येथे इतिहास, व रघुनाथराव महाराजांचा विवाह कन्या लक्ष्मीबाई छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण राजकोटव झाले. विद्यार्थीदशेने असताना त्यांनी इंग्रजी, संस्कृत राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभास केला.
सर फ्रेझर सबनीस यांसारखे गुरु त्यांना मिळाले. छत्रपती शाहू बडोद्याचा गुणाजीराव खानविलकर यांच्या यांच्याशी 1891 मध्ये झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे व राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी समाजाचा सर्वांगीण समाजामध्ये शिक्षणाचा विकासासाठी प्रयत्न केले त्यांनी प्रसार करण्यावर विषेश भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी राजाज्ञा काढली जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना 1 रुपये दंड आकारव्याची कायदेशीर तरतूद केली.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कोल्हापूर येथे संस्थात 6 जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व त्वरित अंमलबजावणी करून मागासवर्गीयांना प्रगतीच्या प्रवाहात आणले. विहिरी, पाणवठे, इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची आपल्या कोल्हापूर संस्थानामधे करून ही पद्धत बंद पाडली त्यांनी समानतेने वागवावे काढला त्याकाळी धर्माचा प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी जोगला-मुरळी प्रतिबंधक कायदा जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली.1977 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून दिली. जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमातीच्या, लोकांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी ब्रिटीशकालीन हजेरी पद्धत बंद करून त्यांना कोल्हापूर संस्थानात नोकऱ्या दिल्या.
त्यांना घरे बांधून दिली वणवण भटकणाऱ्या लोकांची राहण्याची व पोटापाण्याची सोय करून दिली. गुन्हेगार पासून मुक्त होऊन त्या लोकांना समाजामध्ये माणूस म्हणून सन्मानाने वावरता येऊ लागले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 1991 मधे भेट झाली ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाशी महाराजांनी आंबेडकरांचा मुकनायक या वृत्तपत्रास व आंबेडकरांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्ष बास अर्थसहाय्य केले.सामाजिक सुधारणांबरोबरच शाहू महाराजांनी शेती व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी अनेक कृषि व औद्योगिक प्रदर्शने भरवली. कृषि उत्पादनांसाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळेच कोल्हापूर ही गुळाची बाजार पेठ जगभर प्रसिद्ध पावली शाहू महाराजांनी पाया रचून ‘शाहू मिल’ची स्थापना करून चालना दिली.कृषी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी अनेक धरणे बांधली. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक कार्याबरोबरच संगीत नाट्य, चित्रकला, मुल्लविद्या यांसारख्या कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांनी अनेक नाटल कंपन्या व गुणी कलावंतांना आश्रय दिला बालगंधर्व व केशवराव भोसले यांसारखे थोर महाराष्ट्राला दिले. मल्लविदच्या प्रांतात शाहू महाराजांनी संस्थानासह सर्व देशातील मल्लांना उदार आखाजाच्या धर्तीवर त्यांनी खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून कोल्हापूर ही मल्लविधेची पंढरी बनवली छत्रपती शाहू महाराजांचा आवडीचा छंद म्हणजे शिकार करणे होय.शाहूंचा पट्टीचा शिकारी म्हणून लौकीक होता. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे त्यांची दालनांचा उद्धारक व रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली.
शाहू महा राजांचा सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षेत्रिय सभेने त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली. अशा या थोर लोकराजा, दलित-पतितांचा उद्धारक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वयाच्या 48 व्या वर्षी म्हणजे 6 मे 1922 रोजी मुंबई येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.
हे एपिक आहे Lol नेमका
हे एपिक आहे Lol नेमका ब्रिटिशांवर राग आहे की बॉलीवूडवर>>> लगानमधे "टुमको डुगना लगान देना पड़ेगा" ज्याच्या तोंडी आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त राग असेल बहुतेक...
शाहू महाराजांवरच्या पोस्टमधे
शाहू महाराजांवरच्या पोस्टमधे अशुद्ध लेखन सोडल्यास काहीच्या काही काय आहे? मला एवढी सविस्तर माहिती नव्हती त्यामुळे तपशिलात काही चूक आहे का ते माहिती नाही. याहून जास्त अशुद्ध लेखन तर सुप्रसिद्ध वर्तमानपत्रांच्या ऑनलाइन आवृत्तीत सर्रास असतं.
शाहू महाराजांवरच्या पोस्टमधे
..
बरोबर वावे.
बरोबर वावे.
मूक नायक, हा धागा शुद्धलेखन व इतर त्रुटींसाठी नव्हे तर लिखाणच काहीच्या काही समज/गृहितकावर आधारित आहे या साठी आहे.
त्या लेखात शुद्ध लेखन आणि इसवीसनाच्या काही त्रुटी आहेत एवढेच.
गेली काही दिवस मारुती
गेली काही दिवस मारुती चितमपल्लींच्या नावाने चिंच आणि रक्तचंदनाची झाडे कशी अचाट चमत्कार करतात त्याचे काकाफॉ चलनात आहेत.
वानगी:
“रक्तचंदनाचं खोड: आयआयटी, इस्रो आणि DRDO NASA ला लाजवणारं नैसर्गिक चमत्कार!"
आजकाल तुम्ही घरातले मोबाइल टॉवरपासून ते चंद्राच्या किरणांपर्यंतचं सगळं रेडिएशन टाळायचं असेल, तर एकच उपाय –
रक्तचंदनाचं एक लाकडी खोड उचलून भिंतीला टेकवा.
घरात फक्त रक्तचंदनाचं खोड ठेवलं की तुमचं घर CERN च्या लेबप्रमाणे शुद्ध होऊन जातं.
काही ठिकाणी तर सांगतात, की रक्तचंदनाच्या सतरंजीवर बसून ध्यान केलं तर तुम्हाला 5G चं सुद्धा दर्शन होतं –
ते सुद्धा रेडिएशन-फ्री थरांमध्ये!
जपानी लोकं भारतात येऊन रक्तचंदनाच्या ऑक्शनची 'मुहंबोली किमत' देऊन सगळं रक्तचंदन जपानला घेऊन जातात... बॉम्बहल्ल्यात होरपळलेली जपानी माणसं जीवनात कुठलंच रेडिएशन नको म्हणून वाट्टेल ते प्रयत्न करतात... आणि घरातील रक्तचंदनाची दारं -खिडक्या आणि टेबल ठेवलेल्या खोलीतच आपली इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स ठेवतात... कारण रक्तचंदनाच्या खोडात रेडिएशन शोषून घेण्याची ताकद असते...
'रेडिएशन शोषण' म्हणजे नेमकं काय ?
रेडिएशन म्हणजे अणुंच्या हालचालीतून निघणाऱ्या उर्जेच्या लाटा. हे रोखण्यासाठी गंभीर शास्त्रीय पातळीवर सुसज्ज संरचना लागतात –
जसं की लेड शील्ड, ग्राफीन, बोरॉनयुक्त कंपाऊंड इ.
पण साधं रक्तचंदनाचं खोड़ हे लीलया करतं हे तुम्हाला ठाऊक आहे ?????
गावाभोवती चिंचेची झाडं का लावली पाहिजेत...याचं वैज्ञानिक कारण मारुती चितमपल्ली अतिशय आत्मीयतेने सांगत...चिंचेच्या झाडात विलक्षण अशी अर्थिंग क्षमता असते... पावसाळ्यात गावात विजा पडू नयेत म्हणून गावाभोवती चिंचेची झाडं लावावीत...जोपासावीत..वादळ - वा-यात विजा कडाडल्यात तर चिंचेखाली उभं राहू नये...कारण चिंचेचं झाड विजेला खेचून जमिनीत घेऊन जातं...!
आम्हाला हे शास्त्र कुठं ठाऊक होतं... मारुती चितमपल्ली स्वतः रक्तचंदनाच्या ऑक्शनचा अभ्यास करायला जपानला गेले होते.. ही जिज्ञासा, चिकाटी , पदरचा पैसा खर्च करून शास्त्रीय ज्ञान प्राप्त करण्याची जिद्द ,त्यासाठीची भटकंती आणि मिळविलेली वनविद्या वाचकांच्या ओंजळीत अर्घ्य देत आयुष्य वेचलेल्या पितृतुल्य मारुती चितमपल्ली यांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली!
रक्तचंदनाच्या ऑक्शनचा अभ्यास
रक्तचंदनाच्या ऑक्शनचा अभ्यास >>>> निक्केईवर होतं का ऑक्शन?
अवांतरः यावरुन मला पुष्पा
अवांतरः यावरुन मला पुष्पा आठवला. त्यात जपान आणि रक्त चंदन चोरी दाखवली आहे. मला वाटले तो निव्वळ योगायोग आहे!!

सद्गुरूंचे (कानाच्या दोंही
सद्गुरूंचे (कानाच्या दोंही पाळींना हात लाऊन) दगडाच्या शिव पिंडी ला दर कालाने अमुक लिटर दूध & तूपाने अभिषेक करणे कसे गरजेचे आहे, अ थवा पिंडी ला तडे जाऊन त्यातून निघणार्या संप्रेरक, प्रेरणा & एनेर्जीला कशी बाधा येऊ शकते हे त्यांच्याच स्वरात व्हॉफॉ वर फिरत होते.
रच्याकने, वॅसलीन का लाऊ शकत नाहीत पिंडीला? खाण्यायोग्य पदार्थ असे दगडावर ओतून टाकणे योग्यय का? म्हटले तर लोकांना राग येतो.
काही वेळाने उडवून टाकीन ही पोस्ट,
हे पटणारे नाही. सद्गुरुनी
हे पटणारे नाही. सद्गुरुनी असे म्हणावे याचे आश्चर्य वाटले.
Sadhguru: Most lingas are made of stones, which need some kind of fatty or oily substance to retain their integrity. This is why milk or ghee is offered to lingas periodically so that they do not crack or become brittle. Applying ghee or milk also ensures that the linga remains wet, which enhances people's receptivity to its energies. If one pours water, the linga remains wet for a few minutes and then dries up. But if one pours milk, the linga stays wet for much longer because the fat enters the pores in the stone. Linga is reverberating in a specific manner. Facilitating this is an important part of maintaining it.
बरीच रत्ने आहेत की त्यांची.
बरीच रत्ने आहेत की त्यांची.
महाशिवरात्रीला का झोपु नये, मुंडन करणे व शेंडी ठेवणे या मागील विज्ञान, मसल मेमरीवरून चुकीचा दावा वगैरे सुरूच असते.
कोण आहे का सद्गुरू?
कोण आहे का सद्गुरू?
जग्गी वसुदेव.
जग्गी वसुदेव.
Pages