आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा फेअर प्ले अवॉर्ड कोणाला मिळाला आहे कल्पना आहे का?
>>
कुणालाही असलं तरी हे अवॉर्ड ही फालतुगिरी आहे

कुणालाही असलं तरी हे अवॉर्ड ही फालतुगिरी आहे
>>
Lol

जे फालतुगिरी करत नाहीत अश्यांना दिले जाते हे अवॉर्ड Happy

सहा वेळा धोनी/चेन्नई
त्याखालोखाल ३ वेळा आहे कोणीतरी....

ज्याचा एक भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून अभिमान आहे. ते आकडे दिले की त्रास >> तुझा गोंधळ होतो आहे. आकड्यांचा त्रास नाही तुझ्या व्हरबल डायरियाचा त्रास होता. दोन गोष्टींमधे मोठा फरक आहे. तू , तू वगळता बाकी सर्वांना चुम्मा , रोहित, धोनी आवडत नाहीत, त्यांचा द्वेष करतात , वगैरे मौल्यवान समज स्वतःच्या डोक्यात भरून ठेवले आहेत ह्याला आम्ही बापडे काय करणार ? द धोनीचा मुद्द तू इथे आणलास नि त्यावर बोलले कि तू म्हणणार कि धोनीबद्दल वाईट बोलता ? Lol

जॉनी अपेक्षेपेक्षा चांगला खेळला. रोहित जेकिल अँड हाईड सारखा खेळला. - मिस होते जे तो कधीच मिस करत नाही असे होते पण जे बसले ते सुखद एफर्टलेस होते. तिलक ने विकेटसमोर शॉट मारायला सुरू केल्यावर तो सुटेल असे वाटालेले पण परत जास्त क्युट शॉट मारायला गेलानि बाद झाला. सूर्या लवकर बाद झाला तेंव्हा अडिचशे ची आशा सोडून दिली होती ते फारसे चुकले नाही. तिलक, नमन ह्यांना अजून ग्रोथ साठी अजून बराच वाव आहे - विशेषतः शेवटी पेडलवर सेफली दबाव कसा देत जायचा ते समजण्यासाठी. पांड्या एकदाच खेळला बाबा.

रशिदचा एकंदर फॉर्‍म बघता जास्तच आदराने खेळले आहे असे वाटले. ह्याउलट प्रसिद्धच्या पाठी लागले. बहुधा योग्य मॅचप जमले नाहित.

बुमराहाला दुसरी ओवर दिली...
भले विकेट आली नाही पण मुंबई प्लान क्लिअर आहे..
वरून विकेट काढल्या की गुजरात संपली...
तसेही मला नाही वाटत काही वेगळे होईल..
रविवारची सोय झालीय...
माझा आजचा अंदाज सुद्धा बरोबर येतोय

Hit wicket Lol

Match on??
मुंबई फुल प्रेशर मध्ये आली आहे..
रन खूप इजी येत आहेत..

अश्विनी कुमारने छान टाकली...
तो एक ओवर जरी पसरला असता तरी सगळा गेम प्लान गंडला असता. त्याने प्रेशर कायम ठेवले. आणि प्लान बी कडे जावे लागले नाही.

Thin batting line up ने मोक्याच्या वेळी दगा दिला GT ला!!

शेवटी तेवातीला पहिल्या बॉलवर दुसरी धाव मिळत होती का? नीट आठवत नाही.. पण घेतली असती स्ट्राईक तर मला त्याची जास्त भीती वाटत होती. काहीतरी येडे चाले करून मारायची.. पण बहुधा शाहरुख स्वतः हिरो बनायला गेला असे वाटले आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवला.. पुन्हा बघायला हवे ते पहिला बॉल

“ Thin batting line up ने मोक्याच्या वेळी दगा दिला GT ला!!” - येस! ते आणि मुंबईचा अनुभव - दोन्ही आज एकदम जुळून आलं.

तो एक ओवर जरी पसरला असता तरी सगळा गेम प्लान गंडला असता. त्याने प्रेशर कायम ठेवले. आणि प्लान बी कडे जावे लागले नाही. >> येस. ती ओव्हर् मह्त्वाची ठरली. बुमरा वेडा आहे च्यामारी, १३ डॉट बॉल्स आहेत नि सुंदरला पार आडवा पाडला. Happy

“ Thin batting line up ने मोक्याच्या वेळी दगा दिला GT ला!!” >> बटलर नसणे भारीच नडले. प्रसिद्ध मधल्या ओव्हर्स मधे एव्हढा जबरदस्त चालत असताना ह्या सामन्यामधे का बदल केला असा ?

गिल आज जसा बाद झाला स्विंग होणार्‍या बॉलवर ते बघून इंग्लंड दौर्‍याच्या कल्पनेने पोटात गोळा उभा राहिलाय Happy

धडाकेबाज फलंदाजांचं सध्या वारेमाप पीक आलेलं असलं, तरीही रोहित इज रोहित !!!!!
*गिल आज जसा बाद झाला स्विंग होणार्‍या बॉलवर .* - गिल प्रतिभावान, सुज्ञ आहे व यावर योग्य लक्ष देईलच.तुमची, माझी भीती खरी न ठरो, ही प्रार्थना !

>> ते आणि मुंबईचा अनुभव - दोन्ही आज एकदम जुळून आलं.
हो ना!! साई सुदर्शन जरा अजुन टिकला असता किंवा तेवातीया चालला असता तर चित्र वेगळे दिसले असतें.

>>बटलर नसणे भारीच नडले.
बटलरचे नेहमीचे आहे हे!! Wink

अरे मुंबई कशी काय जिंकली? फिक्स होती बहुतेक मॅच. आता पंजाब सोबत हारायला पाहिजे म्हणजे आयपीएलला नवीन ट्रॉफी मालक मिळेल.

गिल तंत्रापेक्षा जास्त दबावात बाद झाला. मोठ्या महत्वाच्या सामन्यात प्रेशर आले की त्याचा खेळ बरेचदा बदलताना पाहिले आहे. पण हे चित्र बदलताना पाहिले आहे बरेच खेळाडूबाबत. त्या बाबत सुद्धा होईल अशी आशा करूया.

त्या दिवशी पंत आणि आज साई हे दोघे खेळलेले बघून इंग्लंड दौऱ्याबाबत सकारात्मक मूड तयार झाला आहे.
साई तर पूर्ण सीजन खेळत आहे. पण कालची इनिंग स्पेशल होती. एवढा मोठा स्कोअर असून सुद्धा त्याने आपले बेसिक नाही सोडले यासाठी कमालीचा आत्मविश्वास हवा.

पाऊस पडतोय...
जर नाही झाला सामना तर पंजाब फायनल..
जर सामना अध्येमध्ये थांबत झाला तर अश्या सामन्यात चेस करणे फायदेशीर असते..
ओवरकास्ट कंडिशन .. बॉल स्विंग होणार.. सुरुवातीला मुंबई विकेट जातात की नाही यावर ठरेल.. पण खेळले आणि स्कोअर टाकला तर मुंबईला चेस करणे अवघड असतेच..
सामना पूर्ण व्हावा अशी इच छा

Pages